पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 27th, 2015

 भिषण अपघातात तीन ठार  0

भिषण अपघातात तीन ठार

SAM_8989
यवतमाळ , दि. २७ – दारव्हा-कारंजा मार्गावरील सावंगी (रेल्वे) येथे स्विफ्ट कार आणि टाटा एस वाहनात आज सोमवारला दुपारी ३.४० वाजता समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात तीन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले.
कारंजा कडून दारव्हा कडे येणारी एमएच २९ एडी ६३०४ क्रमांकाच्या कारला विरुद्ध दिशेने येणाºया एमएच २९ टी ६८४७ क्रमांकाच्या टाटा एस वाहनाने समोरासमोर धडक दिली. कार मधील केशव इहरे, सुभाष इहरे आणि शेषराव इहरे सर्व रा. डेहणी ता. दिग्रस यांना जखमी अवस्थेत कारंजा येथील नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अपघाताता सायखेडा निवासी विठ्ठल बागल व दारव्हा निवासी राज ठाकूर गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. अपघातातील तीनही मृतक एकाच परिवारातीलअसून सोयरिक जोडण्यासाठी कारंजाला गेले होते. धडक इतकी जोरदार होती की टाटा एस वाहन अडकलेल्या जखमींना गावकºयांनी वाहनाचे दार कुºहाडिने तोडून बाहेर काढले. मृतक सुभाष इहरे दिग्रस स्टेट बँकेत वरिष्ठ रोखपाल पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली आणि पंचनामा करून पूढील कारवाई सुरू केली.

April 27, 2015 in मुख्य पान
   क्रिकेट सट्ट्यावर धाड, साहित्यासह एकास अटक 0

क्रिकेट सट्ट्यावर धाड, साहित्यासह एकास अटक

IMG-20150427-WA0017

यवतमाळ, दि. २७ – आयएपिएल क्रिकेट स्पर्धेत अनेकांनी सट्टा लावल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने प्रभात नगर येथील अड्ड्यावर धाड मारली. यावेळी एका आरोपीस अटक करून ५९ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.
सुनील भास्कर हमदापूरे (३६) रा. प्रभात नगर रेणुका मंगल कार्यालयासमोर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्घ राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिलस विरूद्घ रॉयल चॅजेंजर्स बंगळुरू याच्यात क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहीती यवतमाळ येथील उपविभागीय पोलीस अधिकाºयांचा पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने हमदापूरे यांनी भाड्याने घेतलेल्या सोनु घोडे यांच्या घरी सुरू असलेल्या सट्ट्यावर धाड टाकली. यामध्ये टीव्ही , लॅपटॉप, मोबाईल, ५ हजार ३०० रुपये नगदी असा एकुण ५९ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई जुगार कायद्या अंतर्गत ४,५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सुनील हमदापूरेला अटक केली. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, वडगाव रोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, इकबाल शेख, ऋतुराज मेंढवे, संतोष मडावी, प्रमोद मडावी यांनी केली.

April 27, 2015 in मुख्य पान
भू-संपादनाविरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च 0

भू-संपादनाविरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च

images
नागपूर – भू-संपादन कायद्यावरून केंद्र सरकारविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च काढण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातून या लाँगमार्चला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भूसंपादन कायद्याविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नव्या दमाने उतरणार आहे. भूसंपादन कायद्यासाठी एकमत करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गडकरींवर सोपवली आहे. त्यानंतर गडकरी लगेच कामालाही लागले. काँग्रेसनेही त्यांना शह देण्यासाठी भूसंपादन कायद्याविरोधात लाँगमार्चसाठी विदर्भाची निवड केली आहे. गांधी त्याकरीता नागपूर-अमरावतीला येणार असल्याची माहितीही काँग्रेस सूत्रांकडून मिळाली. दुष्काळ, गारपीट यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना भूसंपादन विधेयकामुळे तो देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे मोदी सराकर कसे उद्योजकधार्जिणे आणि शेतकरीविरोधी आहेत. हे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लाँगमार्च काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे.

 

April 27, 2015 in मुख्य पान
 अर्थमंत्रालयाने शोधला ७,८०० कोटी काळा पैसा 0

अर्थमंत्रालयाने शोधला ७,८०० कोटी काळा पैसा

index1
नवी दिल्ली- परदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणू, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने एक पैसाही आजपर्यंत परत आणला नाही. मात्र मागील वर्षी झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये देशात आणि परदेशात मिळून सात हजार ८०० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या ताज्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या चौकशीत उघडकीस आले आहे. देशांतर्गत केलेल्या या कारवाईत हजारो कोटी जप्त करण्यात आले असले आणि गैरप्रकार उघडकीस आणले असले तरी परदेशातील काळ्या पैशाचा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, मागील वर्षी केलेल्या कारवाईद्वारे प्राप्तिकर विभागाने एकूण ७,०७८ कोटी रुपयांच्या, तर सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाने ७५० कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे. या काळातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संख्या ही प्रचंड असल्याचे आर्थिक गुप्तचर संस्थेच्या (एफआययू) चौकशीत उघडकीस आले आहे.
देशभरातील विविध आर्थिक संस्थांकडून मिळालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबतच्या अहवालांचा (एसटीआर) अभ्यास अर्थमंत्रालयाच्या निदर्शनाखाली केला असल्याचे अर्थ मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. तसेच वसुली संचनालयानेही सुमारे २० कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यांचा शोध लावला असून, १७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
एफआययूने यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. पीटीआयला हा अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालात मागील वर्षभरात माहिती तंत्रज्ञान विभागाने सुमारे १६३ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. तसेच २०१३- १४ या आर्थिक वर्षामध्ये सक्तवसुली संचनालयाने १०५ गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. २०१२- १३ च्या तुलनेत हे प्रमाण शंभर टक्‍क्‍याने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

 

April 27, 2015 in मुख्य पान
 नेपाळ भूकंपात ३७०० बळी 0

नेपाळ भूकंपात ३७०० बळी

AP4_26_2015_000027A
काठमांडू- नेपाळसह उत्तर भारताला हादरवून सोडणा-या भूकंपामुळे आतापर्यंत तीन हजार सातशे जणांचा बळी गेला आहे तर ६५०० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख रामेश्वर दंगल यांनी दिली. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
डोंगर आणि द-याखो-यांमध्ये वसलेली २००. ३०० आणि १००० लोकसंख्या असलेली संपूर्ण गावेच्या गावे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. येथे जाण्यासाठी रस्तेही राहिले नाहीत. या भागात हेलिकॉप्टरमधून पाहणी केली असता हे भीषण वास्तव समोर आल्याचे पोलीस उप महानिरीक्षक कोमल सिमग बाम यांनी सांगितले.अजूनही ढिगा-याखाली हजारो लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे मदतकार्य सुरु असतानाच रविवारी रात्री पाऊस कोसळू लागल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. वारंवार धक्के जाणवत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.नेपाळमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. पुढील ४८ तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरडी कोसळण्याचीही शक्यता आहे.

April 27, 2015 in देश-विदेश
घरातील स्वच्छतागृहासाठी ११ वर्षाच्या मुलीने सोडले जेवण 0

घरातील स्वच्छतागृहासाठी ११ वर्षाच्या मुलीने सोडले जेवण

2015-04-27-images_ns
भोपाळ, दि. २७ – मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवसासाठी उपोषण केले. पैशाअभावी ताराच्या वडिलांना स्वच्छतागृह बांधता येत नव्हते, अखेरीस स्थानिक प्रशासनाने आर्थिक मदत दिल्याने ताराच्या घरातील स्वच्छतागृहाचे काम सुरु झाले आहे. सागर जिल्हा प्रशासनाने स्वच्छता मोहीमेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ताराची नियुक्ती केली आहे.
सागर जिल्ह्यातील किरोड गावात राहणारी तारा बन्सल ही गावातील सरकारी शाळेत सहावी इयत्तेत शिकते. काही दिवसांपूर्वी ताराच्या शाळेत एका समाजसेवी संस्थेने स्वच्छतेसंदर्भात जनजागृती अभियान राबवला होता. उघड्यावर शौचालयास जाऊ नये असा संदेशही या अभियानातून देण्यात आला होता. तारा या अभियानामुळे प्रभावित झाले व तिने घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी तगादा लावला. ताराचे वडिल महेश आणि काका पुरुषोत्तम हे दोघे शेतमजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बन्सल कुटुंबाच्या घरात स्वच्छतागृह नव्हते. यामुळे तारा व घरातील अन्य महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. चिमुकल्या ताराने या विरोधात लढा देण्याचा निर्धार करत दोन दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही. वडिलांनी आधी घरात शौचालय बांधावे असे तिचे म्हणणे होते. मुलीच्या हट्टाखातर महेश बन्सल यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले. मात्र पैशाअभावी ते बंद पडले. अखेर जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती समजली व त्यांनी ताराच्या घरी जाऊन शौचालय बांधण्यासाठी मदत दिली. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा हजार रुपये दिले असून उर्वरित पैसे बांधकाम पूर्ण झाल्यावर देऊ असे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.

April 27, 2015 in मुख्य पान