पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 12th, 2015

अभिनेत्री रिया सेनचे घर जळून खाक 0

अभिनेत्री रिया सेनचे घर जळून खाक

riya-home-1_1428811127
मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन हिचे जुहू येथील घर जळून खाक झाले आहे. रात्री उशिरा सेन परिवार झोपेची तयारी करत होते त्याच वेळी एसीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग लागली.
ही आग मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास लागली. आग लागली तेव्हा घरात रियासह तिची आई अभिनेत्री मुनमुन आणि वडिल भरत देव वर्माही उपस्थित होते.सूचना मिळताच अग्निशामक दलाचा जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, असे अग्नी दलाचे अधिकारी अभय काळे यांनी सांगितले. के म्हणाले की, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मत्रा मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे.

 

April 12, 2015 in मुख्य पान
आसाममध्ये बॉम्ब स्फोट, एक ठार 0

आसाममध्ये बॉम्ब स्फोट, एक ठार

Timeline-of-maj20369
गुवाहटी – आसाममध्ये एका गावात बॉम्बचा स्फोट झाल्याने एक जण ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा स्फोट आज सकाळी साडे सहा वाजता झाला.
आसामच्या उदलगुरी जिल्ह्यातील बोरजहार या गावात हा स्फोट झाला त्यात रामचंद्र बर्मन या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.बर्मनचा भंगाराचा व्यावसाय आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे, तेथे काही धातू अढळून आले आहेत. ते सर्व धातू बर्मनने शनिवारी गोळा केले होते. तो बॉम्ब असल्याचे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे त्याने बॉम्बवर हातोडा मारला आणि मोठा स्फोट झाला. यात बर्मनचा जागावरच मृत्यू झाला. तीन जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

April 12, 2015 in मुख्य पान
खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा 0

खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा

vishbadha_1428793753
हिंगोली – मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे तालुक्यातील समगा येथील जिल्हा परिषद शाळेतील ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना हिंगोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली असून ७५ जणांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
समगा येथील जिल्हा परिषद शाळेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी आणि वाटाणे देण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थ्याने खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्याने ९५ विद्यार्थ्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब रोडगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे आदी डॉक्टरांनी ताबडतोब विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. एक तासाच्या उपचारानंतर त्यातील २० विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जास्त बाधा झालेल्या ७५ विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना सुटी देण्यात येणार आहे. डॉ. रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. या प्रकरणी डॉक्टरांनी खिचडी आणि वाटाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.

April 12, 2015 in मुख्य पान
नागपुरात तीन कुख्यात गुंड भावांची निर्घृण हत्या 0

नागपुरात तीन कुख्यात गुंड भावांची निर्घृण हत्या

images..
नागपूर – जुगाराच्या पैशांवरून झालेल्या भांडणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन भावांचा वस्तीतील मुलांनीच चाकू, तलवारीने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिडी पेठ भागात घडली. एकनाथ उगले, केशव उगले संजय उगले अशी मृतांची नावे आहेत.
एकनाथ हा अफजल अली नावाच्या गुंडासोबत भागीदारीमध्ये काम करत होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत, तर केशव आणि संजय हे अण्णा राऊत नावाच्या गुंडासाठी बिडी पेठ वस्तीमध्ये जुगार अड्डे चालवायचे. या तिन्ही भावांची या वस्तीत मोठ्या प्रमाणावर दहशत होती. सामान्य नागरिक त्यांच्या जाचाला कंटाळले होते.
गुरुवारी हे तिघेही भाऊ वस्तीतील एका मित्राच्या मुंडण कार्यक्रमासाठी नागपूर-भंडारा मार्गावरील वागोळा या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना तिघाही भावांनी जुगाराचा डाव रचला. त्या वेळी पैशांवरून त्यांचा काही युवकांशी वाद झाला. या वादामुळे वस्तीतील युवक कार्यक्रम सोडून नागपुरात परतले.रात्री तिघेही भाऊ घराकडे येताना दिसताच एका चौकातील पान ठेल्यावर चाकू, तलवारींसह उभ्या असलेल्या युवकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात एकनाथ आणि केशव हे जागीच ठार झाले, तर संजयने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र युवकांनी त्यालाही संपविले. दरम्यान, सर्व आरोपी फरार आहेत.
गुंड संपवण्याचे सत्रच
गेल्याकाही वर्षात नागपुरात कुख्यात गुंडांची हत्या करण्याचे सत्रच सुरू झाले आहे. अक्कू यादव, पिंटू शर्के या गुंडांचा भर कोर्टात खून करण्यात आला होता. मार्च २०१३ रोजी कुख्यात गुंड इक्बाल याला विद्यापीठाच्या इमारतीसमोर महिलांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. तो झोपडपट्टीतील महिलांची छेड काढायचा.

April 12, 2015 in मुख्य पान