
तिरुअंनतपूरम – श्री पद्मनाभम् मंदिरात एका पिशवीत पाच पाईपबाँम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. या मंदिरातील खजिन्याच्या वृत्ताने हे मंदिर काही वर्षापूर्वी चर्चेत आले होते. एक लाख कोटीच्या वर या खजिन्याची किंमत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
पद्मनाभम् मंदिरात रविवारी स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना हे बॉम्ब आढळून आले. मुख्य मंदिरापासून १०० मीटर अंतरावर हे बॉम्ब एका पिशवीत ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान आता येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत.
Archive for April 26th, 2015
0
श्री पद्मनाभम् मंदिरात ५ पाईपबॉम्ब आढळल्याने खळबळ !
0
मदतकार्याचा वेग वाढवा, पंतप्रधानांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

नवी दिल्ली – नेपाळसह उत्तर भारतात आलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोधमोहीम आणि मदतकार्य वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांनी या बैठकीत त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची माहिती दिली. भारत आणि नेपाळमध्ये झालेले नुकसान तसेच या ठिकाणी सुरु असलेल्या मदतकार्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच रविवारी आलेल्या भूकंपासंदर्भातील माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हवाई मार्ग तसेच रस्तामार्गाने मदतकार्याचा वेग वाढवावा, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. भूकंपामुळे अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढा, असे पंतप्रधानांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांमध्ये समन्वय राखला जावा, यावरही मोदी यांनी जोर दिला. भूकंपाचा फटका बसलेल्या ठिकाणी अन्न, पाणी, दूध आणि दूध पावडर तात्काळ पोहोचवावे, असे मोदी यांनी सांगितले.या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीयमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणंत्री मनोहर पर्रिकर तसेच विविध विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित होते
0
क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड

नागपूर : शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्यावरून पोलिसांनी फ्लॅटचा मालक फिरोज, अजीज अली मो. फलतानी (२८) रा. सिकंदराबाद, दानिश सलीम दमानी (२०) रा. सिकंदराबाद, उमेद गुलाम सदानी (३९) हैदराबाद यांना अटक केली आहे.
या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार हैदराबादशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी बैरामजी टाऊन साई ललिता अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये धाड टाकली. तेव्हा फ्लॅटमध्ये क्रिक्रेट सट्ट्याची खायवाडी सुरु होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत शनिवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यात सट्टा खायवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद येथील सट्टेबाजांची चमू नागपुरात पोहोचली होती.
परंतु योजनेनुसार ठाणेदार रफीक बागवान यांच्या नेतृत्वातील चमूने सायंकाळी ५.१५ वाजता फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत लॅपटॉप आणि मोबाईलवर खायवाडी करतांना आरोपी आढळून आले. पोलिसांनी अड्ड्यातून एक एलईडी टीव्ही, १३ मोबाईल, १ लॅपटॉप, १ सेटटॉप बॉक्स, चॉर्जरसह १ लाख ७ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.
0
मारहाण केल्याने युवकाची आत्महत्या, गावकºयांची लाडखेड ठाण्यावर धडक

यवतमाळ – मारहाण केल्याने युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी बोरगाव लिंगा येथे घडली. यावेळी आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी युवकाच्या मृतदेहासह लाडखेड पोलिस ठाण्यावर धडक दिली.
विशाल विजय जाधव (२२) रा. बोरगाव लिंगा असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी २५ एप्रिल रोजी सदर युवक घरी असतांना सचिन सुधाकर बोरकर (३५), अंकुश चक्रधर बोरकर यांनी त्याला घरून हर्षा महादेव घोडसर या हीलेच्या घरी नेले. त्यानंतर विष्णु लांडे याच्या शेतात नेऊन सचिन बोरकर, अंकुश बोरकर, प्रविण लांडे, बिपीन विष्णु लांडे, विष्णु लांडे यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्याने अपमाणित झालेल्या विशालने गावाशेजारी असलेल्या गुणवंत दिवाकर ठोकळ यांचे शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज रविवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईक लाडखेड पोलिस ठाण्यात गेले असता ठाणेदारांनी तक्रार न घेताच त्यांना परत पाठविले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी मृतदेहासह लाडखेड पोलीस ठाण्यावर धडक दिली. जो पर्यंत मारहाण करणाºयाविरूद्घ गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह नेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी सात जणांविरूद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
0
जन्मदात्या पित्याकडून ३ मुलींवर बलात्कार

पुणे : कोंढवा पोलिसांचे बीट मार्शल हद्दीमध्ये गस्त घालीत होते… साधारणपणे पंधरा वर्षांची एक मुलगी रस्त्यावर रडत बसलेली त्यांना दिसली… मार्शलवरील दोन्ही पोलिसांनी तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली… तिला सोबत घेऊन हे दोघेही पोलीस चौकीत गेले. महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली… त्यानंतर तिने जे काही सांगितले, त्यामुळे पोलीस हादरून गेले…. जन्मदात्या पित्यानेच आपल्यावर बलात्कार केल्याने ही मुलगी ओक्साबोक्शी रडून सांगत होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधम पित्याने त्याच्या आणखी दोन मुलींबाबतही असाच प्रकार केला आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलींनी आईला सांगूनही तिने गप्प राहण्याचा सल्ला दिला. नवऱ्यावर कोणीतरी करणी केल्याने तो असे वागत असल्याचे तिला वाटत होते.
पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. मूळचं उत्तर प्रदेशातील हे कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात रहायला आलं. कोंढव्यामध्ये चार मुली आणि एका मुलासह हे दाम्पत्य रहात आहे. बाप रिक्षा चालवतो. तर त्याची पत्नी छोटीमोठी कामे करते. पत्नी कामावर गेली, की तो दुपारी जेवणाच्या निमित्ताने घरी यायचा. घरामध्ये एकट्या असलेल्या मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर बलात्कार करायचा. त्याच्या सर्वांत मोठ्या २२ वर्षीय मुलीने शुक्रवारी पोलिसांना जबाब दिला. त्यामध्ये आपल्यावरही वडिलांनी चार वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिचे लग्न लावून दिले.
उत्तर प्रदेशला सासरी नांदत असताना पतीने तिला परत पाठवून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहते. परंतु ती वडिलांशी बोलत नाही. वडील पुन्हा बलात्कार करतील, या भीतीने ती कायम आईसोबतच राहते. आईसोबतच कामावर जाते. तर धाकट्या १८ वर्षांच्या मुलीवरही त्याने अशाच पद्धतीने बलात्कार केला होता. परंतु तिने जेव्हा आईला हा
प्रकार सांगितला तेव्हा आईने सर्वांना शांत राहण्यास सांगितल्याचे जबाबात म्हटले आहे. वडिलांवर कुणीतरी करणी केली आहे, त्यामुळे ते असे वागतात, असे ती मुलींना सांगत होती.गेल्या आठवड्यात त्याची नजर तिसऱ्या मुलीकडे वळली. दुपारी जेवायला आला असता त्याने तिच्यावरही बलात्कार केला. घरासमोर रडत बसलेल्या या मुलीला पोलीस चौकीत आणल्यावर सर्व बाबींचा खुलासा झाला.पोलिसांनी तिच्या आईलाही बोलावून घेतले. परंतु तिने फिर्याद देण्यास नकार दिला. तसेच मुलीलाही फिर्याद देऊ नको असे सांगितले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीच स्वत:हून फिर्याद दाखल केली आणि त्याला अटक केली.
0
विजय सामाने यांची आत्महत्या

कोल्हापूर – ‘ख्वाडा’ आणि ‘धग’ या पुरस्कारविजेत्या मराठी चित्रपटांचे तरुण वेशभूषाकार विजय मारुती सामाने (२८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. सामाने यांच्या पश्चात वडील, पत्नी, आठ महिन्यांची मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
सामाने यांचे देवल क्लबजवळ ड्रेपरीचे दुकान आहे. दुकानाशेजारी असलेल्या डान्स स्कूलमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास चेष्टामस्करीही केली. त्यानंतर ते दुकानात झोपी गेले. दुपारी अडीचच्या सुमारास विद्यार्थ्यांनी विजय यांच्या दुकानाचे शटर उघडले असता, ते गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. विद्यार्थ्यांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारास हलविले. पण, उपचारापूर्वीच विजय यांचा मृत्यू झाला. विजय यांनी १०० चित्रपटांत वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘धग’साठी वेशभूषाकार म्हणून स्पर्धेसाठी नामांकन झाले होते. मराठीतील पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटासाठीही वेशभूषाकार म्हणून काम केले होते. यासाठी त्यांना नामांकनही मिळाले होते. सावित्रीच्या लेकी, संभा, बंजारा, राजमाता जिजाऊ, हायकमांड, ढोलकी, मनातल्या उन्हात, चांदी, घरवाली हुशार या चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनाने चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
0
नेपाळमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मृतांचा आकडा २३००

काठमांडू – नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भारताची बचावकार्य करणारी टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून भारतीयांना प्राधान्याने मदत होत आहे. भारत सरकारने या बचाव मोहिमेला ऑपरेशन ‘मैत्री’ असे नाव दिले आहे. तसेच अमेरिकेने नेपाळसाठी १० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर कॅनडाने नेपाळसाठी पाच दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
नेपाळमध्ये शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाने हाहाकार माजविला आहे. धरणीमाय कोपल्याने मृत्यूचे तांडव नेपाळमध्ये सुरु आहे. उत्तर भारतातही या भूकंपाचा फटका बसला आहे. या ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या २३०० वर पोहचल्याचे समजते. अजूनही मोठ्या-मोठ्या इमारतीखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.
0
मुद्रा गोहाडने पटकाविले चार पदक

यवतमाळ;दि. २५ – येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतील पाचवीमधील विद्यार्थीनी मुद्रा विनायक गोहाड हीने शैक्षणिक सत्रात चार पदके प्राप्त केली.
शैक्षणिक सत्र २०१४-१५ या वर्षात मुद्रा गोहाड हीने विविध परिक्षेत्र घवघवित यश संपादन करून पदके पटकाविली. सिल्व्हर झोन फाऊंडेशन दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल आॅलिम्पीयाड आॅफ इंग्लिश, इंटरनॅशनल आलिम्पियाड आॅफ सायन्स या परिक्षांमध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे. तर राष्टÑभाषा प्रचार समिती वर्धाद्वारे घेण्यात आलेल्या राष्टÑभाषा प्राथमिक परीक्षेत्र शळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. तीच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.









