
पुणे – पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या खामुंडी गावामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दोन चिमुरडयांवर हल्ला केला. यात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून, एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून बिबटयाने या भागामध्ये दहशत निर्माण केली आहे. पहाटे पाचच्या सुमारास बिबटयाने दोन्ही बालकांवर हल्ला केला. प्रवीण दुधवडे अस मृत मुलाच नाव असून, रेणुका वाघमारे जखमी मुलीचे नाव आहे.
दोन महिन्यांपूर्वी बिबटयाने या भागात एका महिलेवर हल्ला केला होता. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावला आहे.खामुंडी गावातील नागरीक दोन महिन्यांपासून बिबटयाच्या दहशतीखाली वावरत आहेत मात्र वनखात्याला अद्यापही बिबटयाला पकडता आलेल नाही. जखमी रेणुकाला पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
Archive for April 17th, 2015
0
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार
0
विवाहितेने पतीपासून विभक्त होऊन अल्पवयीन प्रियकरासोबत थाटला संसार

भंडारा – जिल्ह्यातील आंधळगांव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या कांद्री परिसरातील एका गावातील संपन्न व सुशिक्षित कुटुंबातील ३७ वर्षीय विवाहित व दोन मुलांच्या आईने एका अल्पवयीन प्रियकरासोबत वेगळा संसार थाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आतापर्यंत पुरुषांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या नित्य – नव्या घटना समोर येत असतात. परंतु हे प्रकरण थोडेसे वेगळे आहे. यामध्ये विवाहित महिलेने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमजाळात ओढून त्याला आपल्यासोबत पळवून नेले आहे. या प्रकरणात प्रियकर अल्पवयीन असल्याने विवाहितेली तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
या विवाहितेने या अल्पवयीन मुलाला मागील एक वर्षापासून आपल्या प्रेमपाशात गुंतवून ठेवले आहे. आता आपल्या या छोट्या प्रियकराबरोबर स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने आरोपी महिलेने त्याला पळवून नेऊन घरोबा थाटला. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या घरच्यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलेचा पती सरकारी नोकरदार आहे. घरी सर्व सुखसुविधा असताना, स्वत: महिलाही सुशिक्षित आहे आणि तिला नऊ वर्षा मुलगा व सहा वर्षाची मुलगी अशी दोन अपत्ये असताना तिने हे पाऊल उचलले आहे. पती नोकरीला गेल्यानंतर घरी एकटीच असणार्या या महिलेने शेजारी राहणार्या एका १७ वर्षीय मुलाला आपल्या प्रेमजालात ओढले. मागील एक वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत. आता लपून- छपून भेटण्याऐवजी आपण आपला वेगळा संसार थाटू, असे ठरवून त्यांनी घरातून पळून जाण्याची योजना आखली. महिलेने या मुलाला त्याच्या मावशीकडे रामटेकजवळील नगरधन येथे जाण्यास सांगितले. व ठरल्याप्रमाणे ती दुसर्या दिवशी रामटेकला पोहोचली. दूरध्वनी करून तिने मुलाला बोलावून घेतले व ते सरळ मौदा येथे गेले. तेथे त्यांनी एक भाडयाने खोली घेऊन आपला संसार थाटला. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने आंधळगांव पोलीस ठाण्यात दाखल केली तर तिकडे मुलाच्या मावशीने आपला भाचा बेपत्ता असल्याची तक्रार रामटेक पोलिसात नोंदवली. रामटेक व आंधळगांव पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांची लोकेशन प्राप्त केली असता तो मोबाईल क्रमांक मौदा येथे असल्याचे समजले. लगेच पोलीसांनी मौदा गाठून त्या महिलेसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३६३ व ३४२ भादंविसं कलम ४/१२ व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
0
बारबालांसोबत पोलिसांचा थयथयाट

ठाणे – कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या एका कुख्यात डान्स बारवर १२ मार्च रोजी धाड पडली तेव्हा या बारमध्ये चक्क दोन पोलीस तेथील बार बालांबरोबर अश्लील चाळे करताना आढळून आले.
या अश्लील चाळयांची व्हिडीओ क्लिप ठाण्यापर्यंत पोहोचली आणि गुरुवारी सकाळ पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या क्लिपमध्ये बारबालांशी अश्लील चाळे करताना आढळून आलेल्या त्या दोन्ही पोलिसांवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निलंबनाची कारवाई केल्याने मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत. कल्याण-शिळ रोडला सोनारपाडा गावाजवळ इंद्रप्रस्थ नामक लेडीज सर्व्हीसच्या नावाखाली पहाटे उशिरापर्यंत चालणारा बार आहे. या बारमध्ये कानठळया बसविणाऱ्या डीजेच्या आवाजावर अर्धनग्नावस्थेत थिरकणाऱ्या बारबालामुळे सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली. या वेळी अश्लील गाण्यांच्या तालावर सर्व बारबाला बीभत्स हाव-भाव करत बारमधील उपस्थित ग्राहकांच्या भावना भडकावताना आढळून आल्या. तत्पूर्वी कुणीतरी याच बारमध्ये व्हिडीओ शूटींग करुन ते पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचविले होते. धाडीच्या वेळी पोलिसांनी सुधाकर मनगोर (वय ३२), रजत शेट्टी (३०), संतोष अंधारीकर (३६), रवि दुबे (२४), सुरेंद्र शेट्टी (३४), उमेश शेट्टी (५७) आणि प्रदीप काळे (२४) या बार चालक, कॅशियर, म्युझिक ऑपरेटर्ससह १७ बारबालांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या बारमधून डिजेसह इतर सामान ताब्यात घेतले आहे. मात्र या बारमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघे बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ क्लिपमध्ये चौकशी दरम्यान आढळून आले. या क्लिपची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चार दिवसांनंतर गंभीर दखल घेतली. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या फतव्यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, या कारवाईमुळे मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत.
0
स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध वाचनाशी – राजेश खवले

यवतमाळ – यश ही सहज मिळणारी बाब नसून त्यासाठी कठोर परीश्रम, चिकाटी, इच्छाशक्ती, आत्म्विश्वास आदी गोष्टींची गरज असण्यासोबतच चौफेर वाचनही अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या तंत्रात बरेच बदल झाले असून घोकमपट्टीऐवजी विश्लेषणावर भर दिला जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा थेट संबंध अवांतर वाचनाशी आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधीकारी राजेश खवले यांनी केले.
येथील यवतमाळ करिअर ॲकेडमीच्या वतीने अयोजित मनोविकास ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानिमित्य् आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत अवांतर वाचनाचे महत्व्’ याविषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्थानिक स्नेहनगर मधील वायसीएच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राजेश खवले यांनी स्पर्धा परीक्षेत वाचन किती महत्वाचे आहे, हा विषय उदारहणांसह सोपा करून सांगितला. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे सन, वार, महिने, विविध आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी ब्राह्मी पद्धतीचा उपयोग कसा होतो, याबाबतही खवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाच्या मर्यादा असेल तर, यशाने तुमच्यापर्यंत का यावे, असा परखड प्रश्न करून विद्यार्थ्यांनी वाचनाला मर्यादा घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सिलॅबसच्या बाहेरचे वाचनही आता स्पर्धा परीक्षेत उपयोगी पडते. आयुष्यात ग्रंथरूपी बारूद भरली नाही तर आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. वयानुरूप वाचनाची आवड, निवड बदलू शकते परंतु, वाचाल तरच वाचाल, हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
व्यक्तीमत्व विकासासंदर्भात मनोविकास प्रकाशनचा हातखंडा आहे. मेंदूला चालना आणी माणसाला दिशा देणारी पुस्तके मनोविकास सातत्याने वाचकांना उपलब्ध करून देते. ही पुस्तके स्पर्धा परीक्षेसोबतच दररोजच्या आयुष्यातही अत्यंत मोलाची आहे, हा अनुभव आपण घेतला असल्याचेही राजेश खवले यांनी यावेळी सांगितले. यवतमाळात प्रथमच एक महिना म्हणजे 17 मे पर्यंत चालणारा मनोविकास ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आल्याने यवतमाळकर ख-या अर्थाने वाचन समृद्ध होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी यवतमाळ करिअर ॲकेडमीचे संचालक संभाजी राणे, रमेश पखाले यांनी राजेश खवले यांचे रोपटे व ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील असंख्य विद्यार्थी, पालक व वाचकांनी गर्दी केली होती.









