पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 17th, 2014

राज्यात ६१. ७१ टक्के मतदान 0

राज्यात ६१. ७१ टक्के मतदान

Hingoli Voting (10)
मुंबई- राज्यातील दुस-या टप्प्यात होत असलेल्या १९ लोकसभा मतदार संघात सरासरी ६१. ७१ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदार संघात ६८ टक्के तर सर्वात कमी मतदान सोलापूर आणि साताऱ्यामध्ये ५७ टक्के झाले आहे. काही तुरळक घटना वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. २००९ साली झालेल्या निवडणूकीत याच मतदार संघात सरासरी ५४. १४ मतदान झाले होते. त्यात यावर्षी जवळपास सहा टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी हिंगोली – ५८.३३ टक्के, परभणी – ५५.२१ टक्के, उस्मानाबाद – ५५.६१ टक्के, लातूर – ५८ टक्के, शिरुर – ५३.१० टक्के , मावळ – ५०.६५ टक्के, माढा – ५२ टक्के , सांगली – ५६.९१ टक्के, सातारा – ५०.३२ टक्के मतदान, कोल्हापूर – ६२ टक्के मतदान , हातकणंगले – ६१ टक्के मतदान , शिर्डी – ५४.६० टक्के , अहमदनगर – ५५ टक्के मतदान , बीड – ५५ टक्के , रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५३.६३ टक्के , सोलापूर – ४९ टक्के , नांदेड – ५५.३० टक्के , पुणे – ५१.२० टक्के , बारामती – ५०.५५ टक्के

 

April 17, 2014 in मुख्य पान
मोदी हे ‘एन्काउंटर मिनिस्टर’- चिदंबरम 0

मोदी हे ‘एन्काउंटर मिनिस्टर’- चिदंबरम

images (1)
चेन्नई- नरेंद्र मोदी हे सतत खोटे बोलणारे आणि ‘एन्काउंटर मिनिस्टर’ असल्याची संभावना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे माझी ‘रिकाउंटर मिनिस्टर’ अशी संभावना करतात, मग मीही त्यांना ‘एन्काउंटर मिनिस्टर’ संबोधू शकतो, असे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये तामिळनाडूतील शिवगंगा येथून ३,५०० मतांनी चिदंबरम विजयी ठरले होते. तेथील मतमोजणी वादग्रस्त ठरली होती. शिवगंगा येथे फेरमतमोजणी झाली नाही ही बाब माहीत असूनही ते फेरमतमोजणी झाल्याचे सांगतात. त्यामुळे गुजरातमध्ये झालेल्या खोट्या चकमकीचा संदर्भ देत चिदंबरम यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

April 17, 2014 in देश-विदेश
केजरीवालांच्या एका ट्विटने जमवले ८१ लाख 0

केजरीवालांच्या एका ट्विटने जमवले ८१ लाख

KEJRI
लखनऊ – वाराणसी आणि अमेठी मतदारासंघातून प्रचार करण्यासाठी स्वच्छ मार्गाने पैसे हवेत, अशा आशयाचे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटला प्रतिसाद म्हणून जगभरातून आम आदमी पक्षाच्या समर्थकांनी ८१ लाख रुपये देणगी दिली आहे. यातील १६ लाख एकट्या उत्तर प्रदेशातून मिळाले आहेत. अमेठीच्या लोकांनी २.१० लाख तर वाराणसीच्या लोकांनी २.५० लाख रुपये दिले आहेत.
आम आदमी पक्षाला लोकसबा निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल ट्विट केले की, वाराणसी पोहचलो आहे. २० तारखेला अमेठीला जाणार आहे. मोदी आणि राहुल गांधींच्या विरोधात लढण्यासाठी स्वच्छ मार्गाने पैसे पाहिजेत. जर तुम्ही देणगी देऊ इच्छित साल तर मला मेसेज करा.’ काही तासातच १७०० लोकांनी हा ट्विट रिट्विट केला. तसेच आम आदमी पक्षाच्या देणगीतही वाढ होऊ लागली. बुधवारी संध्याकाळपर्यंत ६०० हून अधिक लोकांनी ८१.१० लाख रुपये देणगीस्वरुपात दिले. यात एक रुपयापासून ५० लाखापर्यंत देणगी देणारे समर्थक आहे. दिल्लीत राहणा-या नताशा हिने ५० लाख रुपये देणगी दिली आहे. अनेक लोकांनी ५० हजार ते एक लाख रुपये दिले आहेत. सर्वात जास्त लोकांनी ५०० ते ५००० रुपये देणगी दिली आहे. देशातून दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातून सर्वाधिक देणगी आली आहे. तर विदेशातून युएई, अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडातून लोकांनी देणगी दिली आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुधीर भारद्वाज यांनी सांगितले, की पक्षाच्या स्वयंसेवकांनी सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनामुळे पक्षाच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

April 17, 2014 in देश-विदेश
२४ तासात सहा लाखाहून अधिक ट्विटस 0

२४ तासात सहा लाखाहून अधिक ट्विटस

Twitter
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल साईटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सध्या ट्विटरने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटमधील ट्विटरवर लोकसभा निवडणुकी संदर्भातील ट्विटची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ट्विटरवर गुरुवारी २४ तासात निवडणुकासंबधित सहा लाख २८ हजार ट्विटची नोंद झाली.
निवडणुकीतील उमेदवार, पत्रकार आणि सामान्य नागरिक निवडणुकासंदर्भातील बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, आपले मत मांडण्यासाठी ट्विटरचा वापर मोठ्या संख्येने करत असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ट्विटरचा वापर सर्वाधिक करतात. त्यापाठोपाठ आम आदमी पार्टी आणि iamwithcongress यांच्याद्वारे अधिक प्रमाणात ट्विट केले जातात. गुरुवारी २४ तासात निवडणुकीसंदर्भात सहा लाख २८ हजार ट्विट करण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले. किरण बेदी यांच्या ट्विटरवर सर्वाधिक रिट्विट केले जात आहे. त्याचबरोबर पत्रकार अनुराग धंडा यांनी मोदींच्या विवाहाबद्दल केलेल्या पोस्टवरही अधिक ट्विट केले जात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

April 17, 2014 in मनोरंजन
बिहारमध्ये पाच नक्षलवादी ताब्यात 0

बिहारमध्ये पाच नक्षलवादी ताब्यात

images
पटना – संपूर्ण देशात निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बिहार येथील चंपारण जिल्ह्यातून गुरुवारी सुरक्षा रक्षकांनी पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले.
चंपारण जिल्ह्यातील वाडा बिशानपूर-राजेपूर या भागातून कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून श्रीनारायण प्रसाद(४५), गणेश कुमार(२५), राजेश राम(१८), राजेश ठाकूर(२२) आणि दीपल राम(१८) अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांकडून दोन पिस्तुले, काही युद्ध सामग्री आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये सात जागांवर मतदान होत आहे. दुपारपर्य़ंत येथे २९ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.

April 17, 2014 in मुख्य पान
मंत्र्याच्या इच्छेनुसार मतदान यंत्राची ‘दिशा’ 0

मंत्र्याच्या इच्छेनुसार मतदान यंत्राची ‘दिशा’

1
कोलार (कर्नाटक) – लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री के. एच. मुनियप्पा यांना मतदान यंत्राची ‘दिशा’ योग्य वाटली नाही. त्यासाठी त्यांनी मतदान यंत्राची दिशा बदलण्याची मागणी निवडणूक अधिका-यांकडे केली. अधिका-यांनी तत्काळ त्यांच्या आदेशाचे पालन केले.
मुनियप्पा यांचे मतदान केंद्र हरोहल्ली मतदान केंद्रावर आहे. ते मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान यंत्राचे तोंड दक्षिणकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निवडणूक अधिका-याला मतदान यंत्र उत्तर-पूर्व दिशेला ठेवण्यास सांगितले. त्यानंतर अधिका-यांनी त्यांना मतदान यंत्राची दिशा बदलून दिली, अशी माहिती कोलारचे उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी डी. के. रवी यांनी दिली.

April 17, 2014 in मुख्य पान
मानवी भाव-भावनांचा गुंता ‘पोस्टकार्ड’ 0

मानवी भाव-भावनांचा गुंता ‘पोस्टकार्ड’

IMG_0104IMG_1820
‘अनुमती’ सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटानंतर ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासमवेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहेत. ‘पोस्टकार्ड’ असे त्यांच्या नव्या चित्रपटाचे टायटल असून स्मिता विनय गानू आणि विनय गानू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन अशा विविध जबाबदा-या प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पार पाडल्या आहेत.
मानवी भाव-भावनांचा गुंता एका पोस्टमॅनच्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अनुमती’ चित्रपटासारखीच तगडी स्टारकास्ट ‘पोस्टकार्ड’मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचे रंग उधळणार आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवलमध्ये आधीच पसंती मिळालेला ‘पोस्टकार्ड’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.१९६५ ते ७० या दरम्यानच्या काळाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आलाय. एका पोस्टमॅनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दु:ख, आनंद याचा अनुभव पोस्टमॅनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमॅन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. रूपक कथा ह्या फार्म मध्ये हा ‘पोस्टकार्ड’ चित्रपट सादर होतो. जो मानवी भावनांचा गुंता आणि नियतीची अढळता यातुन काही भावव्याकुळ माणसं ह्या कथेत समोर येतात. ‘स्मिता फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत स्मिता विनय गानू व विनय गानू यांची निर्मिती असलेल्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आहेत. दिग्दर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांचे आहे. तर कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, अभिनेत्री सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुहिता थत्ते, अभिनेता वैभव मांगले यांचा समावेश आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश राजगुरू, संकलन मयूर हरदास तर संगीत गंधार संगोराम व पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे. ध्वनी संयोजन नरेन्द्र भिडे, नृत्य संयोजन फुलवा खामकर तर कला दिग्दर्शन दत्ता लोंढे यांचे आहे. चित्रपटातील गाणी हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, नंदिनी श्रीकर या गायकांनी गायिली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून प्रशांत गोखले तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून रोहन शाह यांनी जबाबदारी पार पाडली.

April 17, 2014 in मनोरंजन