पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 5th, 2014

काँग्रेसचा विश्वास कर्तृत्वावर; ढोंगीपणावर नाही! - सोनिया गांधी 0

काँग्रेसचा विश्वास कर्तृत्वावर; ढोंगीपणावर नाही! – सोनिया गांधी

unnamedunnamed1

भंडारा, नागपुरात विशाल सभा; विदर्भात काँग्रेसमय वातावरण

नागपूर – काँग्रेसचा विश्वास केवळ कर्तृत्वावर आहे, ढोंगीपणावर नाही. काँग्रेसला विरोधी पक्षांसारखा न केलेल्या कामांचा ढोल वाजवता येत नाही आणि दिखावाही करता येत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केली आहे.

दि. 5 एप्रिल 2014 रोजी काँग्रेस अध्यक्षांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा-बीआरइएम आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास मुत्तेमवार व रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकूल वासनिक यांच्या प्रचारार्थ अनुक्रमे लाखनी व चिखली-कळमना येथे जाहीर सभांना संबोधित केले. या सभांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुकूल वासनिक आदी नेते उपस्थित होते.

या दोन्ही सभांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, पंडित नेहरूंनी देशाच्या औद्योगिकरणाची बीजे रोवली. इंदिरा गांधींनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण करून गावोगावी बॅंक उघडल्या. राजीव गांधींनी संगणक आणि संचार क्रांतीची मुहूर्तमेढ केली. भारत आज जगातील एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो, त्याचे मूळ काँग्रेसने केलेल्या अनेक कामांमध्ये दडले आहे. विरोधी पक्ष कितीही ढोल बडवत असला तरी त्यांच्याकडे कोणतेच धोरण नाही. काँग्रेस सामाजिक एकता व सद्भावनेवर विश्वास ठेवणारा पक्ष असून, विरोधी पक्षांनी समाजात फूट पाडण्याशिवाय दुसरे काहीच केलेले नाही. गोंधळ घालणे आणि काँग्रेसच्या क्रांतिकारी निर्णयांना विरोध करणे, हेच त्यांचे एकमेव काम आहे. अशा मानसिकतेपासून देशाला वाचविण्याची गरज असल्याचे काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी म्हणाल्या.

सट्टा बाजार : मोदींला १.३० पैसे तर राहुल गांधींसाठी ३ रूपये 0

सट्टा बाजार : मोदींला १.३० पैसे तर राहुल गांधींसाठी ३ रूपये

thumb
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबई सट्टा बाजार आत्तापासूनच तापू लागला असल्याचे व आजच्या तारखेला ९० कोटी रूपयांचे बेटींग घेतले गेल्याचे वृत्त आहे. वास्तविक निवडणुक काळात मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बेटींगची सुरवात होत असते. मात्र भाजपने मोदींचे नांव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले आहे आणि भाजप व काँग्रेस यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे आता स्पष्ट झाल्याने सट्टेबाजांनी सट्टा लावण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी बेटींग ओपन करण्यात आले असल्याचेही समजते.
यात पंतपअधानपदी मोदींच्या नावाला रूपयाला १.३० पैसे असा दर निघाला आहे. हाच दर राहुल गांधींसाठी ३ रूपये, मनमोहनसिंग यांच्यासाठी १२ रूपये तर सोनिया गांधी यांच्यासाठी १३ रूपये असा आहे. मुंबई अहमदाबाद, जयपूर, इंदोर, कराची व दुबईतून या सट्टावर पैसे लावले जात असल्याचेही समजते. अर्थात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तेव्हा बेटींगचे दरही बदलतील असेही सांगितले जात आहे. सट्टा खेळणारे आणि सट्टा घेणारे दोघेही बारकाईने राजकीय प्रवाह, निवडणुक, राजकीय डावपेच यांवर बारकाईने नजर ठेवून असतात असे तज्ञ सांगतात.
लोकसभा निवडणुकांत भाजप २७२ जागा मिळवेल यासाठीचा दर सध्या रूपयाला दीड रूपया असा निघाला आहे. काँग्रेससाठी हा दर ५ रूपये आहे. देशात पाच राज्यात या वर्षात होत असलेल्या विधानसभेसाठी चार राज्यांतील निवडणुकांसाठी सटटा सुरू झाला आहे. सट्टेबाजांनी मिझोराममधील निवडणुकांत कांहीही रस दाखविलेला नाही. उर्वरित चार राज्यात दोन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे. शील दीक्षित यांच्या दिल्लीसाठी भाजपचा दर अडीच रूपये तर काँग्रेससाठी हाच दर ४.६० पैसे इतका आहे. मध्यप्रदेशात भाजपसाठी २ रूपये तर काँग्रेससाठी साडेचार रूपये, छत्तीसगढ मध्ये भाजपसाठी २.१० पैसे तर काँग्रेससाठी साडेचार रूपये व राजस्थानात हाच दर भाजपच्या वसुंधरा राजेंसाठी सव्वातीन रूपये तर काँग्रेससाठी ४.६० पैसे असा असल्याचेही सागितले जात आहे.

April 05, 2014 in देश-विदेश
बदला घ्यायची हीच वेळ – अमित शहा 0

बदला घ्यायची हीच वेळ – अमित शहा

amit-shah
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे भाजप प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांनी मुजफ्फरनगर जवळच्या दंगल पिडीत जाट गावात जातीयवादी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
मुजफ्फरनरपासून जवळच असलेल्या राजहार गावामध्ये घेतलेल्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना शहा यांनी तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर, भाजप उमेदवाराला मतदान करा. तुम्ही तलवारी किंवा अन्य अस्त्रांनी हा विषय सोडवू शकत नाही असे वादग्रस्त विधान केले होते. आज भाजपला मतदान करुन तुम्ही बदला घेऊ शकता. तुमच्या बरोबर न्याय झालेला नाही ही बदला घ्यायची वेळ आहे. मुघल शासनाच्या काळात तलवारी आणि अस्त्रांनी सूड उगवला जायचा पण आता तुम्ही मतदानाने बदला घेऊ शकता. त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी बटण दाबा असे वादग्रस्त विधान शहा यांनी केले आहे. अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते सत्यव्रत चर्तुवेदी यांनी भाजपला काही प्रश्न विचारले आहेत. सोनिया गांधी यांनी शाही इमामांची भेट घेतली तर, भाजपने काँग्रेस जातीयवादाचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. आता भाजपचे नेते भावना भडकविणारी विधाने करत आहेत. अमित शहा यांच्या विधानावर आता भाजपची काय भूमिका आहे असा सवाल चर्तुवेदी यांनी केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये स्वत:ला जातीयवादापासून दूर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेच निकटवर्तीय अमित शहा यांच्या या विधानामुळे नरेंद्र मोदी अडचणीच सापडले आहेत.

April 05, 2014 in देश-विदेश
‘अब की बार मोदी सरकार’ अडचणीत 0

‘अब की बार मोदी सरकार’ अडचणीत

10155606_730534226986237_465472456_n
अलहाबाद – दूरचित्रवाहिनी आणि सोशल मिडीयावर वारंवार दाखवली जाणारी ‘अब की बार मोदी सरकार’ ही जाहीरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या जाहीरातीतील अब की बार मोदी सरकार या घोषवाक्यावर अभिनव यादव नावाच्या एका तरुणाने आक्षेप घेतला आहे.
मोदी ही गुजरातमधली एक जात असून भाजपच्या या घोषवाक्यातून फक्त त्या जातीचा प्रचार होत असल्याचा आक्षेप या तरुणाने घेतला आहे. अभिनवने या घोष वाक्याविरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, जाहीरातीतील या घोषवाक्यामुळे जातीच्या राजकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे या घोषवाक्यावर बंदी आणण्याची मागणी अभिनवने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने अभिनवच्या तक्रारीची दखल घेतली असून, त्याने नोंदवलेल्या आक्षेपांचा तपास सुरु केला आहे.

April 05, 2014 in देश-विदेश
देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात आरोपपत्र? 0

देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात आरोपपत्र?

images (1)
नवी दिल्ली- आदर्श घोटाळ्याप्रकरणी भारतीय परदेशी सेवेत असलेल्या देवयानी खोब्रागडे आणि उत्तम खोब्रागडे यांच्यावर सीबीआय आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. आदर्श सोसायटीमध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर घेतल्याप्रकरणी त्याच्यावर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार खोब्रागडे यांनी खोटी माहिती सादर करून घर मिळवल्याचे पुरावे सापडले आहेत. माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे हे म्हाडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. याप्रकरणी चौकशी करणा-या सीबीआयने २५ जणांच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. आदर्श सोसायटीमध्ये या २५ जणांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन घर मिळवल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आदर्श सोसायटीमधील १०२पैकी २५ घरे ही बेकायदेशीर असल्याचे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे.ए.पाटील यांच्या समितीच्या अहवालात म्हटले आहे.

April 05, 2014 in मुख्य पान
मध्यप्रदेशात भाजपने वाटले पैसे, निवडणूक आयोगाकडे तक्रार 0

मध्यप्रदेशात भाजपने वाटले पैसे, निवडणूक आयोगाकडे तक्रार

images
भोपाळ – मध्यप्रदेशात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मतदारांना पैशांचे वाटप करत असल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलीय. मध्यप्रदेशातील भिंड लोकसभा मतदारसंघात भाजपने मतदारांना पैसे वाटले असल्याचे सांगत मध्यप्रदेशचे विरोधी पक्षनेते सत्यमेव कटारे यांनी यासंबंधी आयोगाकडे पुरावे सादर केले. ‘गटजोड सुख समृद्धी वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप कटारे यांनी केला. रेवा येथील मतदारांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, हा गंभीर गुन्हा असल्याचे कटारे म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने असेच पैसे वाटले होते’ असे कटारे यांनी सांगितले.

April 05, 2014 in मुख्य पान