
यवतमाळ – गळ्यात निळे शेले, डोक्यावर टोपी, डि.जे.च्या तालावर नाचत आणि जय भीमचा गजर करीत शहराच्या विविध भागातून निघालेल्या रॅलीने आज शहर जय भीममय झाले होते. बसस्थानक चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््याला अभिवादन करण्यासाठी निळ््या पाखरांचा कारवा लोटला होता. ही गर्दी रात्री उशीरापर्यंत कायम असल्याने वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली होती.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. अभिवादनसाठी रांबच रांब रांग लागली होती. शहरातील चारही भागात सकाळी व्याख्यानासह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ५ वाजतानंतर शहरातील पाटीपुरा, तलाव फैल, अंबिकानगर, अशोकनगर, जामनकरनगर, भोसा, वडगावरोड, आशीर्वानगर, लोहारा, नेताजीनगर, पिंपळगाव, उमरसरा, वाघापूर आदी भागातून ही रॅली काढण्यात आली होती. यात युवक, युवती, लहान मोठ्यांसह डि.जे, बॅन्डच्या तालावर ताल धरीत होते. सर्व रॅलीचे बसस्थानक चौकात आगमण झाल्यानंतर जितके-तिकडे निळ्या पाखरांचाच कारवा दिसत होता. तर जय भीम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकाळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत पदाधिकाºयांनी महामानवाला अभिवादन केले. कुठलिही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Archive for April 14th, 2014
0
जय भीम’च्या गर्जनेने शहर दुमदुमले
0
संघाच्या तालावर भाजप नाचतोय -सोनिया गांधी

मोरादाबाद- यंदाची लोकसभा निवडणूक ही संपूर्ण दोन विचारसरणीदरम्यान लढली जात आहे. भाजप हा पक्ष संकुचित विचारसरणीच्या आणि जहालमतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तालावर नाचत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. येथील प्रचारसभेत त्या सोमवारी बोलत होत्या.
आपल्या जहालमतवादाने आणि संकुचित विचारसरणीच्या सहाय्याने समाजामध्ये फुटीचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. अनेक वर्षापासून जपून ठेवलेली देशाची मूल्ये आणि रीतीरिवाज तोडण्याचे काम ते करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जनता त्यांना नक्कीच पराभूत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपची विचारसरणी देशासाठी घातक असून काँग्रेसच फक्त देशाला एक स्थिर आणि भक्कम सरकार देईल, असे त्या म्हणाल्या. देशातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेसने सरकारने वेगळ्या मंत्रालयाची तसेच राष्ट्रीय वक्फ विकास महामंडळाची स्थापना करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले. महात्मा गांधी, मौलाना आझाद आणि त्यांच्यासारख्या अनेक त्याग केलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस पक्ष आतापर्यंत खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, काँग्रेसच देशाला कणखर आणि स्थिर सरकार देऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.
0
हेमामालिनी यांच्याविरोधात एफआयआर दाखल

मथुरा – निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपच्या मथुरा येथील उमेदवार हेमामालिनी यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.
हेमामालिनी यांनी श्री जी बाबा सरस्वती विद्यामंदिर शाळेत शनिवारी सभा घेतली होती. या सभेत विद्यार्थ्यांचाही समावेश होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे निवडणूक धिरेंद्र सचन यांनी सांगितले. निवडणूक आय़ोगाच्या नियमानुसार शाळा सुरु असताना तेथे सभा घेणे आचारसंहिता उल्लंघन केल्यासारखे आहे असेही सचन यावेळी म्हणाले.लोकसभा निवडणुकीत भाजपकडून हेमामालिनी यांना मथुरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
0
बिहारमध्ये ‘आप’च्या उमेदवारावर हल्ला

पाटणा – आम आदमी पक्षाचे नालंदा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणब प्रकाश रविवारी रात्री निवडणूक प्रचार करत असताना, त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. बिंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत उतरफु गावामध्ये निवडणूक प्रचारासाठी जात असताना, त्यांच्यावर हल्ला झाला.
२५ जणांचा जमाव अचानक माझ्या गाडीसमोर आला. त्यांनी गाडीतून खेचून मला बाहेर काढले आणि मला लाठीकाठीने मारहाण केली असे प्रणब प्रकाश यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक आणि जिल्हा न्यायदंडाधिका-यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली.आपने या हल्ल्यासाठी सत्ताधारी जदयूला जबाबदार धरले आहे. नालंदा लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. येथून कौशलेंन्द्र कुमार जदयूचे उमेदवार आहेत. राज्याचे माजी पोलिस प्रमुख रंजन सिन्हा काँग्रेस-राजद आघाडीचे उमेदवार आहेत. सत्येंद्र शर्मा भाजप-लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत.
0
कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का ठार

कोरापूट – कट्टर माओवादी कमांडर पूर्णा हुल्का सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. ओडिसाच्या कोरापूट जिल्ह्यातील नारायणपटणा भागात रविवारी मध्यरात्री माओवादी आणि रक्षापथकांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत पूर्णा हुल्का ठार झाला.
आंध्रप्रदेश-ओडिसामधील अनेक नक्षलवादी कारवायांचा तो सूत्रधार होता. श्रीकाकुल्लम-कोरापटू डिव्हीजनचा तो कमांडर होता. ओडिसा सरकारने त्याच्यावर एक लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर होती. नारायणपटना भागात पूर्णा त्याच्या साथीदारांच्या मदतीने घातपाती कारवाया करणार असल्याची पोलिसांना गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षापथकांनी पूर्णा जेथे येणार होता तेथे आधीपासूनच सापळा रचून ठेवला होता. पूर्णा आणि त्याचे साथीदार तेथे आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी उलट सुरक्षापथकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पूर्णा ठार झाला. अंधाराचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर असणारे सहकारी तेथून पसार झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन देशी बनावटीच्या पिस्तुल, बंदुका आणि अन्य माओवादी साहित्य जप्त केले आहे.
0
भीम सा नर पैदा हो
पैदा हो तो भीम सा नर पैदा हो
एक नया आंबेडकर पैदा हो !!
सर झुकानेवाले तेरा सर क्या है
सर मे तेरे भीम का सर पैदा हो !!
झोपडो मे रहनेवाले लोगो की
उंचे उंचे नये नगर पैदा हो !!
दिल से मिले दिल वतन के लोगो के
ऐसे नये नर के असर पैदा हो !!
मारनेवालो के हात रोक सके
हो तो ऐसा यानी जिगर पैदा हो !!
शेर हो तो वामन तेरे शेरोसे
एक ही संसार का घर पैदा हो !!
वामनदादा कर्डक
[ मोहोळ ]
0
स्वाभिमानी जिनं
घरा घरामध्ये नेलं स्वाभिमानी जिनं
हेच काम केलं इथं भीमजयंतीनं !!
कामगिरी केली अशी कामगिरी केली
लाचारी बिचारी सारी दूर दूर गेली
गेलं जुनं काम गेलं पाटलाला भिनं !!
आला नावे जाग आला आली नावे जागं
ठाई – ठाई फुलारली भिमाईची बाग
डोलतात फुलं इथं नव्या टवटवीनं !!
भाकरीची आस होती भाकरीची आस
भाकरीचा घास दिला त्याच घरी खास
जीवनाचं सोनं केलं ह्याच भाकरीनं !!
समाजाचं देणं त्याला समाजात येणं
विचाराचं देणं घेणं करी नम्रतेनं
वामनाचं गीत आलं ह्याच तयारीनं !!
वामनदादा कर्डक
[ मोहोळ ]















