
दिग्रस,दि. २० – शहरातील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये आग लागल्याने आठ दुकान जळुन खाक झाले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यामध्ये २० लाखाचे नुकसान झाले आहे.
येथील सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये टिनाचे दुकाने आहेत. काल रविवारी रात्री दिग्रस पोलीस ठाण्यातील जमादार नारायण लोढे, पोेकॉ गणेश मसरे, साहेबराव चव्हाण हे गस्त ाालत होते. अशातच त्यांना या दुकानातून धुर निघतांना दिसला. त्यांनी लगेच दुकानाच्या फलकावरील लिहुन असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून या बाबत कळविले. नगर परिषद मुख्याधिकाºयांनाही माहीती देऊन अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले. तसेच यवतमाळ व दारव्हा नगर परिषदच्या अग्निशमन दलही तेथे पाहेचले होते. या आगीमध्ये आठ दुकाने जळुन खाक झाली असून २० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये विष्णु जाधव यांची कॅन्टींग व हॉटेलमधील एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले. विजय दारव्हेकर यांच्या दुकानातील फर्निचर, आलमाºया, टीव्ही संच, खुर्च्या, डायनिंग टेबल, कुलर असा एकुण १ लाख ५० हजाराचा माल जळाला. अशोक चव्हाण याच्या गोडाऊनमधून केबल बंडल, खुर्च्या, कुलर, मोटारी, ड्रेसिंग टेबल जळाले असून ४ लाख ६५ हजाराचे नुकसान झाले. तनवीर शमी पुतलाखान यांचे ५ लाख ६० हजार, म. हारुण खलीफा यांचे ४ लाख रुपये, अरुण डफडे यांचे २ लाख ८० हजार असे एकुण १९ लाख ५६ हजार रुपयाचे नुकसान झाले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. राऊत, एस.एल. राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता.














































