मुंबई – संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणा-या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.
वांद्रे पूर्वमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ४२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान क्रेंद्राबाहेर नागरिकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नारायण राणे यांच्या यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक देशव्यापी बातमी बनली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेसोबत एमआयएमही रिंगणात आहे.
या मतदासंघातून १० उमेदावार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये चार अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२०१४च्या निवडणुकीत या मतदारसंघात मोदींची हवा असूनही ४२ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ६० टक्क्यांपर्यंत मतदान करून घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते भिडले असून, नारायण राणे यांनी गेल्या ११ दिवसांत हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.
तासगाव-कवठे महांकाळमध्येही पोटनिवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव-कवठे महांकाळमध्येही आज मतदान होत आहे. या मतदानालाही आठ वाजल्यापासून सुरुवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत १६.७ टक्के मतदान झाले आहे. या जागेवरुन पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील निवडणूक लढवत आहेत. सुमन पाटील यांच्याविरोधात महत्त्वाच्या पक्षांनी आपला उमेदवार उभा केलेला नाही.
Archive for April, 2015
0
वांद्रे(पूर्व) मध्ये ४२ टक्के मतदान
0
शेतीच्या वादातून भावाचा खून

यवतमाळ, दि. १० – वडीलो पार्जीत शेतीच्या हिस्सेवाटणीवरून उद्भवलेल्या वादात सळाखीचे घाव घालून मोठ्या भावाचा खून केल्याची घटना काल गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील पोखरी येथे घडली.
नारायण किसन डाखोरे (५५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. तर परशुराम किसन डाखोरे (४५) असे आरोपीचे नाव आहे. डाखोरे बंधूची काळी दौ. येथे वडीलोपार्जीत चार एकर शेती आहे. कुटुंबातील पाच सदस्य या शेतीचे वारस आहेत. दरम्यान यापूर्वी कुटुंबातील एका भावाचा मृत्यू झाला होता. उर्वरीत चार भावंडामध्ये शेतीची हिस्सेवाटणी करण्याची प्रक्रीया सुरू होती. घटनेच्या दिवशी काल रात्री नारायण डाखोरे हे जेवन आटोपून अंगणात खाटेवर झोपले होते. तर त्यांची पत्नी जीजाबाई व मुलगा विनोद बाजुलाच जेवन करीत होते. याच दरम्यान दारुच्या नशेत आरोपी परशुराम डाखोरे हा हातात लोखंडी सळाख घेऊन त्या ठिकाणी धडकला. काही कळायच्या आत अनपेक्षीतपणे त्याने अचानक वडील बंधूच्या नारायणवर सपासप सळाखीने प्रहार केले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या नारायणला पुढील उपचारासाठी पुसद येथे नेत असतांना वाटेत कासोळा गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ठाणेदार प्रकार शेळके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान आरोपीने पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.
0
बी. कॉमचा पेपर फुटल्याने औरंगाबादमध्ये खळबळ

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बी. कॉम. परीक्षेचा पेपर फुटल्याने काल खळबळ माजली. तिसऱ्या वर्षाचा इनडायरेक्ट टॅक्स विषयाचा हा पेपर बाजारात उपलब्ध तर होताच त्याशिवाय व्हॉट्स-अपवरही हा पेपर ‘फिरत’ होता.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर काल उशिरा वेगळा पेपर देऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.पेपर फुटल्याच्या निषेधार्थ मनविसेने विद्यापीठ मुख्य इमारती समोर प्रतिकात्मक काळा पेपर दाखवून आंदोलन केले.दरम्यान विद्यापीठाचे उपकुलगुरू डी.एम. नेटके यांनी पेपर फुटीचा मात्र इन्कार केला. त्यांच्या मते पेपर फुटला नाही, मात्र बाहेर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि प्रत्यक्ष पेपरमध्ये साम्य होते. या पेपरमधील पाच पैकी २-४ प्रश्न सारखे होते. याशिवय तो अंदाजपूर्वक काढण्यात आलेला कागद होता. तो कोणी काढून व्हॉट्सअपवर टाकला याचा शोध घेऊन पोलीस कारवाई येत्या दोन तीन दिवसात करणार आहे.
0
प्रेयसीचा मृतदेह नदीत फेकणारा नराधम प्रियकर जेरबंद

भंडारा – बेकायदेशीर गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या प्रेयसीचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या ३ जणांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले असून भोंदू डॉक्टर मात्र फरार आहे.
सुमित लंजे (वय २२) असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी, ३१ मार्चपासून सदर मुलगी बेपत्ता झाली होती. पालांदूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वैनगंगा नदीत पोत्यात दगडाला बांधलेला तिचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या नागपूर येथून मुसक्या आवळल्या.
0
तरुणाची हत्या, मृतदेह फेकून आरोपी फरार

नाशिक – शहरातील सातपूरच्या शिवाजी नगर भागात एका तरुणाची हत्या करण्यात आली. संतोष कसबे (२८) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह फशीच्या डोंगराजवळ टाकण्यात आला. या घटनेने शहरात एकच खबळब उडाली असून पोलीस यंत्रणा गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना उगडकीस आला सातपूर परिसरात मागच्या दहा दिवसातील ही दुसरी हत्या झाल्याने सातपूर शिवजीनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घटना घडण्यापुर्वी नाही, तर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे घटना घडल्यानंतर पोलीसांच्या कामाला सुरुवात होते.
0
पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार एअर चीफ मार्शल मुळगावकर यांचे निधन

पुणे – माजी एअर चीफ मार्शल ह्रषिकेश मुळगावकर यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. पुणे येथील कमांड रुग्णालयात त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते, २९ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
ह्रषिकेश माळगावकर यांना १९४७ साली स्वतंत्र दिनादिवशी हवाई दलाच्या सलामीचे नेतृत्व करण्याचा सन्मान मिळाला होता. सन १९७६ साली त्यांची मुख्य एअर मार्शलपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९७८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी ३८ वर्षे हवाई दलाची सेवा केली.दरम्यान मुळगावकर हे उत्तम विमानचालक होते. त्यांनी हवाई दलातील ६७ प्रकारची विविध विमाने चालवली होती.
0
सरकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ९० दिवसांत प्रस्ताव

मुंबई – सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची खुली चौकशी करण्याआधी संबंधित विभागाची परवानगी बंधनकारक असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केले. सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव व्ही.एम. भट यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर, प्रशासकीय विभागाचे प्रमुख, प्रथम वर्गातील अधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरोधात एसीबीकडे तक्रार आल्यानंतर, त्या तक्रारींची शहानिशा झाल्यावर त्यांची खुली चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. खुल्या चौकशीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर ९० दिवसांत त्या विभागाने निर्णय न दिल्यास एसीबीने यासाठी परवानगी मिळाल्याचे गृहित धरावे, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्राची नोंद करत न्यायालयाने सुनावणी आठ आठवड्यांसाठी तहकूब केली.
या प्रकरणी अंकुर पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. १२ मार्च १९८१ रोजी शासनाने परिपत्रक जारी केले. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या खुल्या चौकशीसाठी परवानगी आवश्यक असल्याचे नमूद केले. मात्र, गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात चौकशी करताना आरोपींमध्ये वर्गीकरण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले.
0
औरंगाबादमध्ये एमआयएम आणि अपक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन सुरुवातीपासून एमआयएमच्या पक्षात अंतर्गत असंतोष खदखदत होता. तो शुक्रवारी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे समोर आला. तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन झालेल्या मतभेदांचे पर्यवसन शुक्रवारी हाणामारीत झाले. १० एप्रिलला निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
यावेळी एमआयएमचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले अमजद खान यांच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला केला .खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या कादरी यांच्या समर्थकांनीही अमजद खान यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
याआधी तिकीट वाटपावरुन पक्षांतर्गत मतभेदांमुळे एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या तिकीट वाटप समितीचा राजीनामा दिला होता.येत्या २१ एप्रिलला औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होत आहे. तर मतमोजणी २३ एप्रिलला होणार आहे. एमएमआयने या निवडणुकीसाठी आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
एकाच विद्यार्थ्याला ३ वेगवेगळ्या गुणपत्रिका
पुणे : राज्य शिक्षण मंडळाकडून सोलापूर येथील एका विद्यार्थ्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर काही कागदपत्रांसाठी त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केला असता तो दहावीमध्ये नापास असल्याचे कळविण्यात आले.
सोलापूर येथील दीपक बलभीम ढावरे या विद्यार्थ्याने २000 साली इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास गणित विषयात नापास असल्याची गुणपत्रिका मिळाली. परिणामी त्याने अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला नाही. परंतु, दीपककडून दहावीची ही गुणपत्रिका हरवली. त्यामुळे २00३ मध्ये त्याने विभागीय शिक्षण मंडळाकडे डुप्लिकेट गुणपत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला.
त्या वेळी शिक्षण मंडळाकडून त्यास दहावीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे दीपकने पुढे शिक्षण सुरू केले. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले आणि डिसेंबर २0१४ मध्ये त्याने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे बोर्ड सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. परंतु त्यावेळी त्याला दहावीत नापास असल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पास असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, असा अर्ज त्याने राज्य शिक्षण मंडळाकडे केला आहे. दरम्यान, दीपक ढावरेला चूकून त्याच्या बहिणीचे गुण दिले गेले. परंतु, त्याने तिस-यांदा गुणपत्रकाची मागणी केली. त्या वेळी त्याला नापास असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
0
सत्यम घोटाळा: रामलिंग राजूना ७ वर्षांची शिक्षा

हैदराबाद, दि. ९ – देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’ घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांचा कारावास आणि पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरूवारी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने बी. रामलिंग राजूंसह दहा जणांना दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश बीव्हीएल एन. चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला असून रामलिंग राजू यांना फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे आणि ‘क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट‘ या गुन्ह्यांखाली दोषी ठरवले असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सुमारे सहा वर्षे चाललेल्या या खटल्यात तीन हजार कागदपत्र व २२६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी राजू यांनी आधीच ३२ महिने (सुमारे अडीच वर्ष) तुरूंगात काढले आहेत.
आर्थिक गैरव्यवहारांसाठीच्या विशेष न्यायालयाने ‘सत्यम’चे माजी अध्यक्ष बी. रामलिंगम राजूंसह त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) व अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास बंदी घातली आहे.
काय आहे ‘सत्यम घोटाळा’
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेले रामलिंग राजू यांनी सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. या फसवणूकीमुळे कंपनीचे १४ हजार १६२ कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर सीबीआयने राजू यांच्यासह कंपनीतील अन्य १० जणांवर गुन्हा दाखल केला होता.
0
सिलेंडरच्या स्फोटाने घर भस्मसात

यवतमाळ, दि़९ – वणी तालुक्यातील झरपट या गावी आज गुरुवार९ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घरासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही़
झरपट येथील मनोहर दत्तू गौरकार यांचेकडे एचपी या कंपनीचे गॅस आहे़ दुपारी१२ वाजताच्या सुमारास गॅसने अचानक पेट घेतला़ त्यामुळे मनोहर गौरकार हे तात्काळ घराबाहेर धाव घेतली़ पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले आणि सिलेंडरचा स्फोट झाला़ स्फोट एवढा भयानक होता की घराशेजारीच असलेला त्यांचा मुलगा विनोद गौरकार याच्याही घराला आगीने कवेत घेतले़ या आगीत घरातील कपडे, सामान, अन्न-धान्य जळून खाक झाले़ आगीची माहिती कळताच तहसिलदार रणजीत भोसले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली़ व परिवाराला प्रशासनाच्या वतीने अन्न धान्याची मतद करून शासन स्तरावरुन मदत देण्याचे अभिवचन दिले़.
0
प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस सश्रमकारावास

यवतमाळ, दि. ९ – क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. आज गुरूवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांनी हा निकाल दिला.
दशरथ गुलाब चव्हाण (५५) रा. बाणगाव ता. नेर असे आरोपीचे नाव आहे. २७ सप्टेंबर २०१० रोजी आरोपीने करणी केल्याच्या वादातून घराशेजारी राहणाºया इंदल गोपीचंद आडे यांच्या पोटावर सुरीने वार करून खुन करण्याचा प्रयत्न केला. जखमी इंलवर ग्रामीण रुग्णालय नेर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. याप्रकरणी उध्दल गोपीचंद आडे यानी दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी आरोपी दशरथ चव्हाण याच्याविरुद्घ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान अतिरिक्त भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक आर.जी. माहुरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवनाते यांनी तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंद वानखेडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावनी पार पडली. यामध्ये दोन्ही पक्षाची बाजु ऐंकुण १३ साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी इंदल व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी दशरथला दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त शासकीय अभियोक्ता नरेंद्र बी. मेश्राम यांनी युक्तीवाद केला.
0
साधना सरगम यांच्या सुरमयी मैफलीने यवतमाळकर मंत्रमुग्ध

यवतमाळ ,दि. ९ – समता मैदानातील हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्वरसम्राज्ञी साधना सरगम यांच्या ‘म्यूझिक इंडिया’ नाईक ने येथील येथील समता मैदानात सप्तसुरांचा पाऊस पाडला. सायं. ६ वाजता समता मंचावर साधना सरगम यांच्या आगमन होताच, त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोश केला. पार्श्वगायिका साधना सरगम यांनी प्रेक्षकांना हात उंचावून ‘जयभीम, जय ज्योती’चा उद्घोष केला. यावेळी अख्खे समता मैदान आनंदाने भारावून गेले. साधना सरगम यांच्या ‘नमस्कार घ्यावा अहो बुध्द देव, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा’ या समधूर गिताने ‘म्यूझिकल नाईट’ चा प्रारंभ झाला. पुढे त्यांच्या सोबत आलेल्या कलावंतनी, ‘छाती ठोक हे सांगू जगाला’ असा विद्वान होणार नाही’ या भीमगीताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित पार्श्वगायिका प्रभा अत्रे या गायीकेने ‘उमर मे छोटी, भोली भाली भीमराज की बेटी मै तो जयभी वालू हूँ’ हे गीत सादर करताच, समता मैदानात टाळ््यांचा पाऊस पडला. याप्रसंगी साधना सरगम यांचा समना प्रतिष्ठानच्या वतीने सदस्य सत्कार करण्यात आले.
साधना सरगम यांच्या जादुई आवाजाने यवतमाळकरांना भूरळ घातली. दरम्यान पावसाचे वातावरण तयार झाले. क्षणार्धात पावसाच्या सरी कोसळून लागल्या. या स्थितीतही मैदारातील प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन मैफलीचा आनंद लुटला. पावसाचा जोर वाढल्याने काही काळ कार्यक्रमाला ब्रेक देण्यात आला. मात्र लगेच पाऊस थांबल्या बरोबर परत स्वरसम्राज्ञी साधाना सरगम यांचे मंचावर आगमण झाले. दरम्यान त्यांनी संगितप्रेमी जिल्हाधिकारी राहूल रंजन महिलाव यांना गीत सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. ‘जब काई बात बन जाये’ हे साधनाचे गीत, स्वत: साधना सरगम व जिल्हाधिकारी महिवाल यांनी गायले. रोमॅटीक काही गीते त्यांनी यावेळी प्रस्तूत केली. याप्रसंगी समता मैदानातील वातावरणे काही काळ रोमॅटीक बनून गेले.
पार्श्वगायिला साधना सरगम यांच्या म्यूझिकल इंडीया या कार्यक्रमासाठी पुणे येथील संदीप पंचवटकर यांना खास निमंत्रिक करण्यात आले होते. त्यांच्या संचनाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘जब कोई बात बन जाये’, ‘पहला नशा’, ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आगयी’, ‘मेरे ख्वाबो मे जो आये’, ‘.. हो जा रंगीलारे’, ‘ढोल बजने लगा’ या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य गाजवले. शेवट ‘मिले सुरू तेरा मेरा तो सुर बने हमारा’ हे भारतीय एकात्मता जागविणारे गीत गावून सरगम यांनी यवतमाळ करांना ही रात्री ‘खुबसुरत’ करण्याबाबत मनापासून धन्यवाद दिले. यवतमाळच्या प्रेमला मी कधीही विसरणार नाही हे सांगतानाच त्यांची ‘बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा’ हे गित प्रस्तूत केले. शेवटी ए.आर. रहमान यांनी सांगित बध्द केलेल्या सुपरहिट ‘जय हो’ गिताने, त्यांनी मैफलीचा विरोध घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता पर्व प्रतिष्अीनच्या अध्यक्षा मंगला दिघाडे, राखी भगत, उज्वला इंगोले, अर्चना खरतडे, रविता भोवते, एकता वाणी, अंजली मेश्राम, स्मिता उके, अनिल आडे, मधुकर भैसारे, प्रज्ञा फुलझेले, जया मनवर, जयश्री भगत, प्रिया वाकडे, लोपमृदा पाटील, माया गोबरे, सुनिता काळे, किशोर भगत, दिपक नगराळे, विनोद बुरबूरे, नारायण थूल, अंकूश वाकडे, धीरज वाणी आदींनी परिश्रम घेतले.
0
धोनीला ठोठावला दंड

रांची, दि. ८ – भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बाईकप्रेम तर सर्वांनाचा माहीत आहे, मात्र रांचीच्या रस्त्यावरून केलेली बुलेटराईड त्याला महागात पडली आहे. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला आहे.
चार महिन्यांचा परदेश दौरा, विश्वचषक स्पर्धा या सर्वानंतर धोनी ब-याच काळाने घरी परतला. त्यानंतर तो रांची शहरात त्याच्या हिरव्या रंगाच्या बुलेटवरून फिरत होता, त्याचे फोटो मीडियातही प्रसिद्ध झाले. मात्र त्याच्या बुलेटच्या पुढील बाजूला नंबर प्लेट नव्हती. बाईकचा नंबर मडगार्डवर लिहीण्यात आला होता. हे लक्षात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलयाचे सांगत पोलिसांनी त्याला ४५० रुपयांचा ठोठावला. दंडाची पावती घरी पाठवून दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका- शरद पवार

मुंबई – ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की शिवसेना-भाजप युती सत्तेत राहणार नाही. त्यामुळं दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील,’ असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तवले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपवर तोफ डागली. ‘नारायण राणे दिसायला लहान आहेत पण कर्तृत्वाने महान आहेत. युतीच्या राजवटीत बाळासाहेबांनी मनोहरपंत जोशींना बाजूला करून, नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. जे बाळासाहेबांना कळलं ते आताच्या पिढीला कळते की नाही ते माहीत नाही, असा टोलाही पवार यांनी हाणला.
‘बाळासाहेबांची सेना ही मर्दांची सेना होती,’ असेही पवार म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्राबरोबरच राज्यातील राज्यकर्त्यांनाही लक्ष्य केले. ‘खूप अपेक्षा होत्या देशवासीयांच्या; पण सुरुवात चांगली झालेली नाही. राज्य ज्यांच्या हातात दिले ते कसे, कोणासाठी चालवत आहेत तेही तुमच्यासमोर आहेच,’ असं सांगतानाच, वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक ही बदलांची सुरुवात आहे,’ असं पवार म्हणाले. ‘काँग्रेसशी आमचेही कधी कधी मतभेद झाले असतील तरीही देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस घडवली आहे. त्यामुळे मोदी यांची देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा सत्तेचा माज दर्शविते’, असे पवार म्हणाले.
‘महाराष्ट्रात गायीच्या हत्येवर बंदी होती. गायीचा आपण सन्मानच करतो, पण बैल थकले, म्हणूनच शेतकरी त्यांना विकतो. तुम्ही शेतकऱ्यांना या बैलांना सांभाळण्याचा भत्ता द्या,’ अशी सूचना पवार यांनी केली. यूपीएच्या राजवटीततील भूसंपादन कायद्यात जमीन संपादनासाठी ७० टक्के शेतकऱ्यांची अनुमती आवश्यक होती. पाच वर्षे संपादित केलेली जमीन त्याच कारणासाठी वापरली नाही तर मूळ शेतकऱ्याला पुन्हा देण्याची तरतूद होती. त्याला भाजपची संमती होती. मग आता बदल का? असा सवाल त्यांनी केला.
0
सुप्रिया सुळेंना भरसभेत भोवळ

तासगाव – तासगाव पोटनिवडणुकीच्या प्रचारातील भाषणादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चक्कर येऊन व्यासपीठावरून कोसळल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु, त्या लगेचच शुद्धीवर आल्यानं सगळ्यांचीच काळजी मिटली. सुप्रिया सुळेंच्या डोक्याला किंचित मार लागल्याचं कळतं.
राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज श्रीराम हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं. हे भाषण संपवताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पोडियमचा आधार घेता-घेता व्यासपीठावरून खालीच कोसळल्या. हा प्रकार पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ताईंना नेमकं काय झालं, हे कुणालाच कळेना. पण सुप्रिया लगेचच शुद्धीवर आल्या. पाणी पिऊन त्यांनीच घाबरलेल्या कार्यकर्त्यांना सावरलं. तोपर्यंत, डॉक्टरांनीही सुप्रिया सुळे यांची प्राथमिक तपासणी केली आणि त्या ठीक असल्याचं सांगितलं, तेव्हा सगळ्यांनीच निःश्वास सोडला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना चक्कर येण्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, पण उन्हाळ्यामुळे हा प्रकार घडला असावा. आपली तब्येत एकदम ठीक असल्याचं सुप्रियाताईंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
0
उधारीच्या पैशावरून युवकाचा खून

यवतमाळ, दि. ७ – खºर्याच्या उधारीवरून चौघांनी संगणमत करून युवकाचा खून केला. ही घटना येथील धामणगाव मार्गावरील अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नितेश उर्फ मिथून सुभाष मादेवार (३०) रा. पिंपळगाव असे मृतकाचे नाव आहे. तर संतोष नामदेव वडतकर (३५) रा. तलावफैल, सुरेंद्र गुबरे (२६) रा. वर्धा, सलमान (४०) रा. तलाव फैल, पन्नालाल जयस्वाल (४०) रा. मंगेश नगर भोसा अशी आरोपींची नावे आहेत. ६ एप्रिल रोजी सायंकाळी मृतक नितेश हा कॉटन मार्केट परिसरातील आरोपी संतोष वडतकर याच्या पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता. यावेळी नितेशने खर्रा घेऊन पैसे न दिल्याने पानठेला चालक संतोषसोबत त्याचा शाब्दीक वाद झाला. दरम्यान रात्री चारही मारेकºयांनी जेवण्यासाठी धाब्यावर जाऊ असे म्हणून मृतकाला काळ््या रंगाच्या शाईन दुचाकीने (एम.एच. २९ / ४४३२) धागणगाव मार्गाने नेले. अशातच अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर दुचाकी थांबवून धारदार शस्त्राने नितेशच्या छाती व पोटावर सपासप वार करून जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालया परिसरात फेकुन देऊन तेथून मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधिर अन्य कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. समाधान हिरामण काळे (३२) रा. तलाव फैल यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत एकाही आरोपीला अटक केली नव्हती. अधिक तपास ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, रवी सुरोशे करीत आहे.
0
अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – अगोदरच दुष्काळ आणि त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी हा फटका सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात यावी यासाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यावेळी शेतकऱ्यांना अधिवेशन संपेपर्यंत मदत जाहीर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.त्यामुळे सरकार किती रुपयांची मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
0
२० चंदन तस्कर ठार

हैदराबाद – आंधप्रदेशातील चित्तोर जिल्ह्यात चंदन तस्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले. तसेच या चकमकीत काही पोलीस आणि वनअधिकारीही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चित्तोरमधील चंद्रगिरी मंडळ परिसरातील सेशाचलम जंगलात दोन ठिकाणी या घटना घडल्या. चीकातीकोना येथे ११ तस्कर ठार झाले तर इतागुंटा येथे नऊ जण ठार झाले.
सोमवारपासून पोलिसांच्या विशेष पथकाची चंद्रगिरी मंडल भागातील श्रीनिवासा मंगापुरम, श्रीवरीमेट्टु आणि इतागुंटा यापरिसरात शोध मोहीम सुरु होती. यावेळी पोलीस आणि रक्त चंदनाची तस्करी करणा-यांमध्ये जोरदार चकमक झाली.
पोलिसांनी तस्करांना शरण येण्यास सांगितले. मात्र तस्करांनी पोलिसांवक दगडफेक सुरु केली. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. अनेक तास ही चकमक सुरु होती. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला.
0
२५ वर्षीय तरुणाची मित्राकडून हत्या

डोंबिवली – डोंबिवली पूर्व परिसरात पहाटेच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाची रस्त्यावर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास पांडुरंगवाडी परिसरातील कांचन कुटीबर इमारतीसमोरील रस्त्यावर श्रेयस चारी नामक तरुणाची दारुच्या बाटलीने भोसकून हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतला असून तो संशयित श्रेयसचा मित्र असल्याचे समजते.या मित्रानेच श्रेयसची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डोंबिवलीत राहणारा श्रेयस ठाण्यातील रेमंड कंपनीत हार्डवेअर इंजीनियर या पदावर कार्यरत होता.










