
आरोपीमध्ये वडीलांचा समावेश, आईच्या सतर्कतेने प्रयत्न फसला
माहुर – ( प्रतिनिधी) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साईबोरी येथील अल्पवयीन मुलीला परप्रांतात विक्री करण्याचा डाव तीच्या आईने हाणूण पाडला. माहुर पोलिसांनी मुलीच्या वडीलासह टोळीतील सदस्यांना जेरबंद केले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
इंदल मोहन राठोड (४०) रा. साईबोरी ह.मु. पापलवाडी जि. नांदेड, दलाल काळु तुकाराम जाधव (२७) रा. खंडवा जि. खैरगौन मध्यप्रदेश याच्यासह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले. राठोड याने आपल्या अल्पवयीन मुलीला जाधव या दलालाच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील व्यक्तीला ५० हजार रुपयात विकले. त्यानंतर तीचा जबरीने विवाह करून देण्यात येणार होता. हा प्रकार मुलीची आई कुनीबाई राठोड हीला माहीत होताच माहुर पोलिसांना माहीती दिली. त्यावरून पोलीसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली असून क्रुझर चालकासह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दतात्र्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, सहा. पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जगदिश गिरी, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांनी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.
Archive for November 9th, 2014
0
मुलीला परप्रांतात नेऊन विवाह लावणारी टोळी गजाआड
0
गोदेवरील पूल खचला, दोन तालुक्यांचा संपर्क तुटला

औरंगाबाद (प्रतिनिधी) – गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळूपट्टय़ांची मुदत संपूनही वाळूमाफियांनी उपसा सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी पुलांच्या पायथ्याची वाळूसुद्धा उपसली जात आहे. अशा वाळूउपशामुळे पैठण तालुक्यातील आपेगाव आणि गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल कमकुवत झाला होता. त्यात शुक्रवारी जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी बंधा:यांसाठी गोदावरी नदीच्या पात्रत पाणी सोडण्यात आले. आधीच कमकुवत झालेला हा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खिळखिळा झाला. पाण्याच्या प्रवाहामुळे पायाजवळील भरावाचा आधार निखळला. त्यामुळे हा पूल मधोमध खचला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या घटनेनंतर काही गावक:यांनी वेळीच येथून येणा:या-जाणा:या वाहनांना सूचना दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
बारा वर्षापूर्वी झाले पुलाचे बांधकाम
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2क्क्2 साली या पुलाचे बांधकाम झाले होते. हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा असल्याने येथून वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पूल खचल्यामुळे वाहनांची ये-जा आता बंद झाली आहे. या घटनेविषयी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निवृत्ती चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या बाहेरगावी आहे; पण शाखा अभियंता बी.बी. जायभाये यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनीही बांधकाम विभागाशी संपर्क साधून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
0
सुरेश प्रभू यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

मुंबई (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
व्यवसायाने चार्टड अकाऊंटन्ट सुरेश प्रभू हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. १९९६ मध्ये राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रभू हे शिवसेनेचे सदस्य असले तरी ते सक्रीय राजकारणात नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.
0
शिवसेना विरोधी बाकावर बसेल – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) – भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे, भगवा दहशतवाद म्हणणा-या शरद पवारांची भाजपाने साथ घेतल्यास शिवसेना विरोधी बाकावर बसेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी सत्तेत सहभागी होणार की नाही याविषयी उद्धव ठाकरेंचे तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सहभागी होण्यास नकार देत शिवसेेनेने भाजपाला त्यांचा ‘स्वाभिमान’ दाखवून दिला होता. त्यामुळे राज्यातही शिवसेना विरोधी बाकावर बसेल का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. लाचारी पत्कारुन आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही , राज्याचे चित्र स्पष्ट होईपर्यंत केंद्रातील मंत्रिमंडळात सहभागी होण्यात आम्हाला रस नव्हता त्यामुळे मी अनिल देसाईंना दिल्ली विमानतळावरुन परतायला सांगितले असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. तसेच वाजपेयी सरकार अवघ्या १३ दिवसांमध्ये पाडण्यात शरद पवारांचाच हात होता, या पवारांची भाजपा साथ घेणार का हे त्यांनी स्पष्ट करावे असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला विचारला.
आम्हाला मंत्रिपदाची आस नसून जनतेशी प्रतारणा करणार नाही असे सांगत हिंदूत्ववादी पक्षांनी एकत्र राहावे हीच आमची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्या गटनेता त्यांच्या पदाची जबाबदारी स्वीकारतील, परवा विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार असून विधानसभा अध्यक्षपदासाठी कदाचित आमचा उमेदवारही रिंगणात असेल असे सूचक विधान त्यांनी केले. भाजपाने भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही विश्वासदर्शक ठरावात त्यांच्याविरोधात मतदान करु असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला ४८ तासांचे अल्टिमेटमच दिले. तसेच केंद्राविषयी मात्र रविवारी सकाळी स्वाभिमानाची भाषा करणा-या शिवसेनेने पुन्हा एकदा ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. केंद्रातील सत्तेतून बाहेर पडणार का हेदेखील आगामी दोन दिवसांत स्पष्ट होईल असे ठाकरेंनी म्हटले आहे.
0
सत्यमेव जयते – पुरुषांची ‘मर्दानगी’

मुंबई (प्रतिनिधी) – अनेकदा देशातील हिंसाचारांच्या घटनांना पुरुष कारणीभूत असतात. पौरुषत्वाच्या भावनेने हा हिंसाचार घडतो. मात्र कधी कधी हेच पौरुषत्व मात्र अनेकांना हानीकारक ठरते. याच विषयावर सत्यमेव जयतेच्या सहाव्या भागात चर्चा करण्यात आली. सत्यमेव जयतेचा तिस-या पर्वातील हा अखेरचा भाग होता.
यावेळी आमिरने हिंसाचारांच्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच वाढते रॅगिंगचे प्रमाण या मुद्द्यावरही या भागात भाष्य करण्यात आले. पुरुषत्व सिद्ध करण्याच्या ईष्येने अनेकदा अॅसिड हल्ला, बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडतात. अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी या युवतीसोबतही आमिरने या भागात चर्चा केली. तसेच कंगना राणावत, दिपीका पदुकोण आणि परिणीती चोप्रा या तीन बॉलीवूड अभिेनेत्रींनीहीया भागात सहभाग घेतला होता.
0
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, २१ नव्या मंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – मनोहर पर्रिकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नक्वी यांच्यासह २१ नव्या चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला आहे . १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनामधील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार यावेळी उपस्थित होते.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया , वाय.एस.चौधरी(इंग्रजीमध्ये शपथ घेतली) ,जयंत सिन्हा ,राज्यवर्धन सिंग राठोड , बाबूल सुप्रियो(इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
कॅबिनेट मंत्री
मनोहर पर्रिकर,जे.पी नड्डा,सुरेश प्रभू,वीरेंद्र सिंह चौधरी
राज्यमंत्री
गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट,हरिभाई पार्थीभाई चौधरी,राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर, डॉ. रामशंकर कटेरिया, वाय.एस.चौधरी ,जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंग राठोड, बाबूल सुप्रियो ,साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला
राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)
बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, डॉ. महेश शर्मा










