पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November 12th, 2014

विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे 0

विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे

pk-11-BJPs-Haribhau-Bagde.jpg00
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.
बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन, फडणवीस सरकारने पहिला अ़डथळा पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले  अर्ज मागे घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला अनुकूल असलेली भूमिका तसेच संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणे कठिण होते तशीच शिवसेनेला काही मते फुटण्याचीही भिती होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विजयाराज औटी आणि काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते.

November 12, 2014 in मुख्य पान
अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन 0

अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन

index

मुंबई – प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत हेगडी प्रधान यांची भूमिका साकारणारे अतुल अभ्यंकर यांचे बुधवारी पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.
अभ्यंकर यांची जय मल्हारमधील हेगडी प्रधान ही भूमिका विशेष गाजली होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या या भूमिकेसाठी या मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना नुकताच झी मराठी अॅवॉर्डस्२०१४ चा सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्यावर आज दुपारी साडेतीन वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. अभ्यंकर यांच्या अकाली निधनाने मराठी मालिकाविश्वावर शोककळा पसरली आहे.

November 12, 2014 in मनोरंजन
भाजपने लोकशाहीची हत्या केली - काँग्रेस 0

भाजपने लोकशाहीची हत्या केली – काँग्रेस

Maha CM presser
मुंबई -आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकणा-या भाजपने सरकार वाचवण्यासाठी लोकशाहीची हत्या केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आवाजी मतदानामुळे भाजपला बहुमत मिळाले हे सिद्ध होत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
‘वाजपेयी सरकार एका मतामुळे पडले होते. फडणवीसांचे सरकार हे अल्पमतातील सरकार आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान घेण्याची आमची मागणी विधानसभा अध्यक्षांनी जाणूनबुजून  फेटाळून लावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आवाजी मतदानाच्या आधारे विश्वासदर्शक ठराव जिंकून भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. अशा मतदानामुळे भाजप बहुमताने विजयी झाले हे सिद्ध होत नसल्याचे ते म्हणाले. तर ‘आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासातील काळा दिवस आहे.  आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जावा हे दुखद आहे. आम्ही या विरोधात नक्कीच पाऊल उचलू. यावरुन सरकारच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

November 12, 2014 in मुख्य पान
दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन 0

दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन

index.jpeg0

मुंबई – बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे बुधवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. चोप्रा यांनी बागबान, द बर्निंग ट्रेन, बाबूल अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर छोट्या पडद्यावरील महाभारत आणि रामायण या मालिकांमुळे रवी चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
दिवंगत सिने निर्माते आणि दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांचे पुत्र रवी चोप्रा यांना गेल्या नऊ वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते. मंगळवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रवी चोप्रा यांनी निर्मिती केलेले भूतनाथ रिटर्न्स हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा होता.

November 12, 2014 in मनोरंजन
राज्यपालांना धक्काबुक्की , काँग्रेसचे ५ आमदार निलंबित 0

राज्यपालांना धक्काबुक्की , काँग्रेसचे ५ आमदार निलंबित

2014-11-12~go2_ns
मुंबई, दि. १२ – राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, जयकुमार गोरे आणि विरेंद्र जगताप अशी या पाच निलंबित आमदारांची नाव आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव बुधवारी विधीमंडळात अभिभाषणासाठी आले होते. सकाळी विश्वासदर्शक ठरावात घटनेची पायमल्ली झाल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला होता. राज्यपालांनी विधीमंडळात अभिभाषणासाठी येऊ नये अशी मागणी करणारे पत्रही काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. मात्र दुपारी राज्यपाल विद्यासागर राव विधीमंडळात आले असता शिवसेना व काँग्रेस आमदारांनी त्यांची गाडी रोखून ठेवली. तसेच राज्यपाल विधीमंडळात प्रवेश करत असतानाही काँग्रेस आमदारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळात राज्यपालांच्या हाताला किरकोळ इजा झाली व राज्यपालांच्या ताफ्यातील एका अधिका-याला किरकोळ दुखापत झाल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेस आमदारांच्या या कृतीविरोधात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान सभेत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी झालेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली होती. मात्र राज्यपालांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. अखेरीस या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

November 12, 2014 in मुख्य पान
फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला 0

फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

devendra-fadanvis-cm3
मुंबई,- भारतीय जनता पक्षाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. फडणवीस सरकारने यासह पहिल्या भाजपा सरकारची पहिली बाजी मारली असून, शिवसेनेचा विरोध डावलत भाजपाने आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आधी विरोधी पक्षनेतेपद जाहीर व्हावे असे सांगत शिवसेनेनं विश्वासदर्शक ठरावाला विरोध केला होता. परंतु, आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मतदानानं भाजपाला तारून नेलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानानं भाजपाला बहुमत मिळाल्याचं जाहीर करत सभागृहाचं शिक्कामोर्तब केलं.
हा ठराव मंजूर झाल्यानंतर काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. काल रात्रीपर्यंत खल झाल्यानंतर शिवसेनेनं विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपानं बाजी मारल्याचं दिसत आहे. भाजपानं सध्यातरी विश्वासदर्शक ठराव रेटून नेला असला तरी यानंतर ज्यावेळी महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीसाठी येतील त्यावेळी फडणवीसांना अनुकूल पाठिंबा मिळेल का आणि त्यावेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेईल यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
दुपारी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी आधी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा आधी होईल असे ठरले होते. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नक्की कोण आहे याबाबत संभ्रम असल्याचं सांगत, विश्वासदर्शक ठराव आशिष शेलार मांडतिल असं सांगितलं. शेलार यांनी लगेच ठराव वाचला आणि आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केला.
यामागोमाग शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केलं. या ठारावमुळे आता फडणवीस सरकार किमान सहा महिने सत्तेवर राही हे निश्चित झालं आहे. ठरावासाठी आवाजी मतदानाचा मार्ग का स्वीकारण्यात आलं, मतदान का घेण्यात आलं नाही, नक्की ठरावाच्या बाजुने किती आमदार होते विरोधात किती होते या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे सहावे पुस्तक प्रकाशित 0

निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे सहावे पुस्तक प्रकाशित

unnamed.jpg00Rajesh Khawale
यवतमाळ, दि. 12 : येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे आनंदी रहा-यशस्वी व्हा हे पुस्तक नुकतेच अमरावती येथे प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे सहावे पुस्तक आहे. प्रशासनात जबाबदार अधिकारी म्हणून काम करत असतांनाच त्यांनी आपल्यातील लेखकही टिकवून ठेवल्यानेच त्यांचे सहावे पुस्तक प्रकाशित होवू शकले. या पुस्तकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर पुस्तक अमरावती येथील मिशन आयएएसचे प्राध्यापक डॉ.नरेशचंद्र काठोडे यांनी प्रकाशित केले असून पुस्तकास त्यांचीच प्रस्तावना आहे.
श्री.खवले यांची आतापर्यंत एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यात चला आपले गाव तंटामुक्त करू या, तंटामुक्त गावाची गिता वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगिता, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम-प्रश्नोत्तर स्वरूपात, प्रेरणा स्पर्धा परिक्षेची, विचारांची फुले व आता आनंदी रहा-यशस्वी व्हा या पुस्तकांचा समावेश आहे. यातील प्रेरणा स्पर्धा परिक्षेची हे पुस्तक राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.आनंदी रहा यशस्वी व्हा हे पुस्तक जीवन जगतांना त्यात सकारात्मकता आणण्यासोबतच आयुष्यातील छोट्यामोठ्या प्रसंगांना कसे समोर जावे याबाबत विविध अंगाने प्रकाश टाकण्यात आला आहे. दैनंदिन धकाधकीचे जीवन म्हणजेच केवळ आयुष्य नव्हे. या आयुष्यासोबतच मुक्त आणि म्हणाला आनंद देणारे आयुष्य जगण्याचा टिप्स या पुस्तकातून वाचकांना सहजच कळेल या पध्दतीने देण्यात आला आहे. यापुर्वी त्यांची प्रकाशित पुस्तके महिन्याभराच्या आत संपल्याचा अनुभव आहे. हे पुस्तकही त्याच दिशेन वाटचाल करीत आहे. पुस्तकांच्या स्वरूपात मानधन मिळालेली रक्कम श्री.खवले हे गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी म्हणून चालविण्यात येत असलेल्या मिशन आयएस या संस्थेला दान देतात. या पुस्तकाचे मानधनही त्यांनी नुकतेच संस्थेला दिले आहे.

November 12, 2014 in रोजगार
डिजीटल प्रमाणपत्राच्या वितरणात यवतमाळ राज्यात दुसरा 0

डिजीटल प्रमाणपत्राच्या वितरणात यवतमाळ राज्यात दुसरा

mYmap1
यवतमाळ, दि. 12 : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरीकांना वारंवार लागणारे आणि महत्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजीटल पध्दत अस्तित्वात आणली आहे. जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने या पध्दतीचा चांगल्या प्रकारे अवलंब करण्यात आल्याने अवघ्या काही महिण्यात या पध्दतीचा वापर करून अधिकाधिक नागरीकांना चांगली सुविधा देण्यात जिल्ह्याचे राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. लवकरच प्रथम क्रमांक पटकाविण्याकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
नागरीकांना घरबसल्या ई-पध्दतीने विविध प्रकारचे दाखले मिळावे तसेच दाखले वाटपातील विलंबता कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी तसेच गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने ई-सेतू, महाआँनलाईनमार्फत व्हीएलसी केंद्र सुरू करण्यात आहे. पुर्वी नागरीकांना आँफलाईन पध्दतीने दाखले दिल्या जायचे. आता डीजीटल पध्दत आल्याने नागरीकांना घरबसल्या आपल्या दाखल्याची स्थिती कळणार आहे. शासनाने विविध पाच प्रकारचे दाखले डीजीटल पध्दीने देण्यास प्रारंभ केला आहे. त्यात उत्पन्न दाखला, ॲफीडेव्हीट, रहीवासी दाखला आदी महत्वाच्या दाखल्यांचा समावेश आहे. या पध्दतीने दाखले वितरीत करावयास प्रारंभ झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा हा अशा पध्दतीने दाखल वितरण करण्यात राज्यात 22 व्या क्रमांकावर होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी डीजीटल पध्दतीच्या वापरास प्राधान्य देऊन जिल्ह्याची या कामात प्रगती उंचवण्याचे काम हाती घेतल्यानंतर गेल्या महिण्यात जिल्हा 7 व्या क्रमांकावर आला होता. नुकतेच शासनाने संकेतस्थळावर जाहीर केल्यानुसार यवतमाळ जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. चालु महिण्यात यवतमाळ जिल्ह्यात 2404 इतके दाखले डिजीटल पध्दतीने वितरीत केले आहे. यापेक्षा केवळ एका जिल्ह्याने म्हणजे अहमदनगर जिल्ह्याने 2589 इतके दाखले वितरीत केले. त्यामुळे या कामात सद्यातरी अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम आहे. परंतु जिल्ह्यात झपाट्याने होत असलेले काम पाहता अहमदनगरला मागे टाकून यवतमाळ प्रथम क्रमांक पटकावेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.

November 12, 2014 in मुख्य पान