पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 30th, 2015

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ३५ ठार 0

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ३५ ठार

पेशावर में धमाका
इस्लामाबाद – दक्षिण पाकिस्तानात शिया मशिदीमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढत चालला असून, आतापर्यंत ३५ जण ठार झाले आहेत.
पाकिस्तानच्या शिकारपूर शहरातील मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. दुपारच्या नमाजासाठी मशिदीमध्ये गर्दी झालेली असताना हा बॉम्बस्फोट झाला.
शिकारपूर रुग्णालयात आतापर्यंत ३१ मृतदेह आणण्यात आले असून, चौघांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. शिकारपूर सिंध प्रांतात असून, कराचीपासून पाचशे कि.मी. अंतरावर आहे. या बॉम्बस्फोटातील जखमींचा आकडाही मोठा आहे.

भारताचा पराभव, इंग्लंड फायनलमध्ये 0

भारताचा पराभव, इंग्लंड फायनलमध्ये

Virat Kohli
पर्थ, दि. ३० – ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघाने ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ येथे होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाला केवळ २०० धावाच करता आल्या. भारतीय संघाला ५० षटके पूर्ण खेळता आली नसून भारतीय संघ ४८.१ षटकांतच सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य राहण्‍ो याने सर्वाधिक ७३ धावा केल्या. शिखर धवन ३८, विराट कोहली ०८, सुरेश रैना ०१, अंबाती रायडू १२, महेंद्र सिंग धोनी १७, स्टूअर्ट बिन्नी ०७, रवींद्र जाडेजा ०५, अक्षर पटेल ०१, मोहित शर्मा नाबाद ०७, मोहम्मद शामी २५ धावांच्या बळावर भारताने सर्वबाद २०० धावा केल्या. भारताने ठेवलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चमकदार झाली नाही. बेल १० धावांवर असताना मोहित शर्माने त्याला पायचित ठरवले. इंग्लंडकडून टेलरने सर्वाधिक ८२ धावा केल्या. रुट ०३, मोर्गन ०२, बोपारा ०४ धावांवर बाद झाले. इंग्लंडचा डाव कोसळला असतानाच बटरने उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले त्याने ६७ धावा करीत संघाला विजयाजवळ आणून ठेवले. अखेरीस इंग्लंडने ७ गडी गमावित भारतावर विजय मिळविला. भारताकडून स्टूअर्ट बिन्नीने ३, मोहित शर्मा २ तर सामी व अक्षर पटेलला प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

 

January 30, 2015 in रोजगार
विनयभंग करणाºया आरोपीस शिक्षा 0

विनयभंग करणाºया आरोपीस शिक्षा

2014-09-21~courtorder_ns
यवतमाळ, दि. ३० – खानावळमध्ये महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधिश एम.पी. असीम यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला. राजू मनोहर देशपांडे (३८) रा. सिद्घेश्वर नगर वाघापूर असे आरोपीचे नाव आहे.
वाघापूर येथील पंचशिलनगरमधील महिला त्याच भागातील खानावळमध्ये काम करत होती. अशातच १० मे २०१४ रोजी आरोपीने मागील दाराने खानावळीत प्रवेश करून त्या महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तोंड दाबुन आवाज करू नका अशी तंबी दिली. सदर महिलेच्या आवाज ऐकुन दुसºया खानावळीतील दोन महिला मदतीसाठी धावून आल्या. त्यांनाही आरोपीने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६ व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे यांनी तपासपूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सत्र न्यायाधिश एम.ची. असीम याच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकुण पाच साक्षदार तपासण्यात आल्या. यामध्ये दोषसिद्घ झाल्याने आरोपी राजू देशपांडे यास भादंवि कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष कारावास आणि ३५४ (अ) व ५०४ मध्ये प्रत्येकी तीन महिने शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले.

 

January 30, 2015 in विदर्भ
जयंती नटराजन यांचा काँग्रेसला 'रामराम' 0

जयंती नटराजन यांचा काँग्रेसला ‘रामराम’

untitled-1_1422594726
नवी दिल्ली, दि. ३० – काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र अन्य पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे नटराजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नटराजन यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
नटराजन यांनी पक्षनेतृत्वाला पाठवलेले एक पत्र उघड झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. स्वत:ची बाजू मांडण्यासाठी नटराजन यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय दु:खदायक आहे, आपले कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेससोबत आहे. फाईल्स मंजुरीसाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात आपण बाहेर असताना अजय माकन यांनी आपल्याला फोन करून दिल्लीला बोलावले आणि मला मोदींविरोधात स्नूपगेटवरून टीका करण्यास सांगितले. मला वैयक्तिक टीकेपेक्षा त्यांच्या नीतींबाबत टीका करणे योग्य वाटत होते, मात्र तसे करत आले नाही, असेही त्या म्हणाल्या. माझी तामिळनाडू काँग्रेसबद्दल कोणतीच तक्रार नाही, माझी तक्रार हायकमांडबद्दल आहे. मला पक्षाध्यक्षांना भेटण्याची वेळच दिली नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नसल्याचा गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान नटराजन यांचे पत्र उघड झाल्यानंतर आज मोठा गदारोळ झाला. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असताना काही उद्योजकांच्या फाईल्स मंजुर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दबाव यायचा असा गंभीर आरोप जयंती नटराजन यांनी त्यांच्या पत्रात केला होता. या दबावापुढे नमते न घेता मी काही फाईल्स रोखूनही ठेवल्या होत्या असा दावाही त्यांनी केला आहे.
जयंती नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक पत्र पाठवले होते. हे पत्र शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या हाती लागले असून या पत्रात जयंती नटराजन यांनी पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप करुन काँग्रेसलाच गोत्यात आणले आहे. यामध्ये नटराजन यांनी पक्षातील काही नेते त्यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला. पक्षातील वरिष्ठांकडून पर्यावरण खात्यातील फाईल्स मंजुर व्हाव्यात यासाठी काही सूचना येत होत्या, या सुचना म्हणजे आमच्यासाठी आदेश असायचे अशी तक्रार त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. पक्षात माझा अपमान व मानसिक त्रास झाला, माझी बाजू मांडण्यासाठी मी तुमची आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र मला भेट मिळू शकली नाही असे त्यांनी पत्रात म्हटले होते. हे पत्र शुक्रवारी उघड झाल्यावर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. जयंती नटराजन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्या दुस-या पक्षात जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिर्डीच्या विकासासाठी १२०० कोटींचा प्रस्ताव 0

शिर्डीच्या विकासासाठी १२०० कोटींचा प्रस्ताव

sai
शिर्डी दि. ३० – शिर्डीच्या विकासासाठी साईबाबा ट्रस्टने विकास आराखडा तयार केला आहे. या कामासाठी १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव ट्रस्टने सरकारकडे पाठवला आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळय़ासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करा, असा प्रस्तावही ट्रस्टने दिला, अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. यावेळी देशासह परदेशातूनही कोटय़वधी भाविक तसेच पर्यटक नाशिकला भेट देतील. हे भाविक शिर्डीतही दाखल होणार असल्याने त्यांच्या सोयीसुविधांसाठी तसेच तीन वर्षानी साईबाबा समाधी शताब्दी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचा विकास करण्यासाठी १२०० कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी द्यावी. तसेच शिर्डीच्या विकासासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी ट्रस्टने सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात केली आहे.
याबाबत बुधवारी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ ढवळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लख्मी गौतम आणि साईबाबा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिर्डीच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक येथे होणा-या कुंभमेळय़ात सुमारे १ कोटी भाविक उपस्थित राहतील. त्यापैकी जवळपास २५ लाख भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होतील. या पार्श्वभूमीवर सरकारने विविध विकासकामांसाठी १९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अहमदनगर-मनमाड या २३ किमीच्या बायपास रोडसाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
येथे येणा-या लाखो भक्तांना पाणी, सुरक्षा, चांगले रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

 

January 30, 2015 in मुख्य पान
कुठे आहे काळा पैसा – राहुल गांधी 0

कुठे आहे काळा पैसा – राहुल गांधी

download
नवी दिल्ली दि. ३० – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करण्याचा शब्द दिला होता. तुम्हाला पैसे मिळाले का ? तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा करणे दूर राहिले मोदी स्वत: हा दहा लाखांचा सूट परिधान करत आहेत अशी घणाघाती टिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते गुरुवारी बोलत होते. राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये आम आदमी पक्षाचाही समाचार घेतला.
काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आम आदमी पक्ष बलात्कार, भ्रष्टाचार असे मुद्दे उपस्थित करुन आंदोलने करायचा. पण आता दिल्लीमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये ३० टक्के वाढ झालेली असताना हा पक्ष शांत आहे.
आपल्या भाषणात राहुल गांधींनी गरीबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत काँग्रेसचे सरकार आले तर, सर्वप्रथम कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी रोजगार दिला जाईल असे राहुल म्हणाले.

January 30, 2015 in मुख्य पान