
दारव्हा,दि. २९ – शेतकरी संघटनेने आपल्या विविध मागण्या संदर्भात रुमणे मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयात धडक दिली. स्थानिक सर्कल मैदानातुन शेकडो शेतकरी बैलबंड्यासह या मोर्चात सहभागी झाले होते. सरकार विरोधी घोषणा बाजी करीत शेतकरी आत्महत्याच्या झाकीसह बैल व म्हशीवर शेतकºयांच्या विदारक अवस्थेचे फलक या मोर्चाचे प्रमख आकर्षण ठरले होते.
यावेळी अनेक शेतकºयांनी स्थानिक लोक प्रतिनिधींसह सरकारणे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून विश्वासघात केल्याचा आरोप करून सरकार विरुध्द रोष व्यक्त केला. पॅकेजच्या नावावर सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत असून, सरकारने वाचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा. उत्पादन खर्चात ५० टक्के नफा देऊन कृषी मालाचे भाव ठरवावे, घरगुती वीज बिलाचे दरवाढ करण्यात येऊ नये अश्या अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांना दिले. यावेळी मोर्चात निखील कुमार पानचोरे या युवकाने फाशी घेतलेल्या शेतकºयांचे दृश्य झाकीद्वारे सादर केले.
Archive for January 29th, 2015
0
दारव्हा उपविभागीय कार्यालयवर रुमणे मोर्चा धडकला
0
पीएसआयवर हल्ला करणाºया तिघांविरुद्ध गुन्हा

यवतमाळ, दि. २९ – वडीलाच्या मृत्यूचा दोष पोलिसांवर देत शहर ठाण्यात घुसून पीएसआयवर हल्ला करणाºया अवैध व्यवसायिकासह दोनजणाविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशांत शेटे व अन्य दोन रा. वाघापूर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. शहर पोलिसांनी अवैध व्यवसायवर धाड टाकल्यानंतर कारवाई दरम्यान प्रशांत शेटे याच्या वडीलाचा मृत्यू झाला होता. वडीलाच्या मृत्यूला पोलिसांना दोषी ठरवीत शहर ठाण्यावर धडक देऊन पीएसआय संतोष मनवर (३१) यांना मारहाण केली. याबाबत शहर पोलिसांनी तिनजणाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
ग्रामीण रुग्णालयात तोडफोड

नेर , दि. २९ – येथील शासकीय रुग्णालयात काल रात्री १२ वाजता तिन इसमानी धुडगुस घालून वैद्यकीय अधिक्षकांच्या कक्षाची तोडफोड करून काचा फोडल्या व वैद्यकीय अधीक्षकास शिविगाळ केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज पुन्हा रुग्णालयात जावून वैद्यकीय अधीक्षकास मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नेर शासकीय रुग्णालयात काल रात्री १२ वाजता आरोपी विजय उमरतकर व अन्य दोघांनी येऊन धुडगुसे घातल व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांची कक्षाची तोडफोड केली व त्यांना शिविगाळ केली. जाधव यांनी हा धुडघूस घालून घरी गेले असता तीघेही त्यांना शिविगाळ केली.वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान आज पुन्हा विजय उमरतरकर हा पाच वाजता दरम्यान रुग्णालयात गेला. तिथे उपस्थित वैद्यकीय अधीक्षकास मारहाण केली. त्यांनी पोलीस ठाणे गाठून मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद केला आहे.
0
खून करणाºया दोन आरोपीस जन्मठेप

यवतमाळ , दि. २९- करणी केल्याच्या कारणावरून इसमाचा खून करणाºया जवाहर नगर धुंदी येथील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रम्हण्यम् यांनी आज गुरूवारी हा निकाल दिला. कैलास श्रीराम चव्हाण, मधुकर कीसन राठोड अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहे.
प्रकाश तुकाराम राठोड रा. जवाहर नगर धुंदी हा नागपूर येथील इंडियन आॅईल कंपनीत ड्रायव्हर या पदावर कार्यरत होता. सदर व्यक्तीवर कैलास चव्हाण याच्या आईला करणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राठोड व चव्हाण यांच्यात पंधरा वर्षापासून वाद सुरू होता. तसेच आरोपी मधुकर कीसन राठोड, लक्ष्मी किसन राठोड, शोभा मधुकर राठोड, सिमा रमेश राठोड, रमेश किसन राठोड, अतुल मधुकर राठोड यानी प्रकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ७ आॅगस्ट २०१० रोजी धुंदी गावात आत्माराम जाधव याच्या तीसºया दिवसाच्या कार्यक्रमासाठी सदर ट्रायव्हर आला होता. कार्यक्रम आटोपून तो भारत आडे, पुरासिंग आडे यांना घेऊन दुचाकीने पुसदकडे जात होता. अशातच आरोपी कैलास व मधुकर याने धुंदी गावाजवळ मोटर सायकल खाली पाडली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कुºहाडीने वार करून प्रकाशचा खुन केला. या प्रकरणी भारत नरसिंग आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी सात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४१, १४७, १४८, १४९, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर.वाय. भद्रे यांनी आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक पि.आर. सुळे यांनी फरार असलेल्या मधुकर, रमेश व अतुल या तीन आरोपींना अटक केली होती. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने १५ साक्ष तपासण्यात आले. त्यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने आरोपी कैलास व मधुकर यास जन्मठेप सुनावली. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावला. तर उर्वरीत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुधाकर राठोड यांनी काम पाहीले.
0
शेतकºयाकडून लाच स्विकारणाºया तलाठ्यास अटक

यवतमाळ, दि. २९ – कर्जाचा बोजा सातबाºयावर चढविण्यासाठी एक हजाराची लाच स्विकारणाºया तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. रविंद्र विठ्ठल कवटकर (४७) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
दिग्रस तहसील अंतर्गत कांदळी साजा क्रमांक ९१ मध्ये तलाठी म्हणून रविंद्र कवटकर हे कार्यरत होते. कांदळी येथील शेतकºयांनी घेतलेले बॅक आॅफ बडोदाचा जुन्या कर्जाचा बोजा सात बाºयावरून अतरवुन देतो. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या नवीन कर्जाचा बोजा सातबाºयावर चढवून देतो असे म्हणून शेतकºयाला एक हजार रुपये लाचेची मागणी केली. २९ जानेवारी रोजी दिग्रस येथील तहसील कार्यालयात लाच देण्याचे ठरले होते. त्यावरून यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिग्रस तहसील कार्यालयात सापळा रचून तलाठ्यास लाच घेतांना रंगेहात अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अनील राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, निलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, अरुण गिरी, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली.
0
बीनागोंडात २५ वर्षांनी फडकला तिरंगा

गडचिरोली, दि. २९ – महाराष्ट्र – छत्तीसगडच्या सीमेवरील बीनाबोंडा गावात नक्षलवाद्यांची झुगारुन तब्बल २५ वर्षांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या या धाडसी पावलाला ग्रामस्थांनी साथ देत या ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील बीनागोंडा हे गाव म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. घनदाट जंगलात वसलेले हे गाव म्हणजे नो मेन्स लँड. नक्षलवाद्यांचा या गावात नेहमीच वावर असल्याने गावात नक्षलवाद्यांची दहशत असते. नक्षलवादी दहशतीच्या आधारे स्वातंत्र्य, प्रजासत्ताक हे सर्व खोटे असल्याचे स्थानिकांना सांगायचे. गेल्या २५ वर्षांत या गावात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला नाही. मात्र पोलिस आणि नक्षलवादविरोधी पथकाने यंदा अत्यंत नियोजनपूर्वक या भागात ध्वजारोहणाचा कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली. ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले. याचे फळ म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बीनागोंडातील आश्रमशाळेत पार पडलेला ध्वजारोहण सोहळा. आश्रमशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त अशा वातावरणात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
0
दोन बहिणींनी घडविली रोमियोला अद्दल

मुंबई दि. २९ – एकटक बघत राहणाऱ्या, अश्लील हावभाव करणाऱ्या आणि रोज घाटकोपर ते सीएसटीपर्यंत पाठलाग करणाऱ्या एका रोडरोमियोला दोन बहिणींनी चांगलीच अद्दल घडविली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्यानं दोन बहिणींनी स्वत:च भामट्याची मानगूट पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
घाटकोपर येथे राहणारी एक तरुणी सीएसटी परिसरात नोकरीला आहे. एकेकाळी तिचा शेजारी असलेला राजेश आष्टेकर नावाचा रिक्षाचालक रोज येता-जाता तिचा पाठलाग करायचा. तिच्याकडं एकटक बघत राहायचा, चित्रविचित्र हावभाव करायचा, अश्लील बोलायचा. या साऱ्याला ती तरुणी कंटाळली होती. त्याविरोधात तिनं घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, काहीच कारवाई न झाल्यामुळं राजेशचे उद्योग सुरूच होते. त्यामुळं या तरुणीनंच त्याला अद्दल घडवायचं ठरवलं.
नेहमीप्रमाणं बुधवारी सकाळी ती कामानिमित्त घराबाहेर पडली. निघताना तिनं तिच्या बहिणीलाही सोबत घेतलं. दोघींनी घाटकोपर स्टेशनला नेहमीची लोकल पकडली. आष्टेकरनेही तीच लोकल पकडली आणि त्यांच्यामागोमाग तो सीएसटीला पोहोचला. प्लॅटफॉर्मवर उतरताच त्यानं नेहमीचे चाळे सुरू केले. त्यावेळी या तरुणींनी त्याला तिथेच पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीसाठी कुर्ला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
0
दूषित रक्तातून एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण

मुंबई दि. २९ – कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंटसाठी रक्त घ्यायची वेळ आल्यास अजिबात हलगर्जीपणा न करता खबरदारीनंच वागा. कारण, एचआयव्ही बाधित रक्त दिलं गेल्यानं गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमधील रक्ताच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
रक्तातून एड्सच्या विषाणूंचं संक्रमण होऊ नये, यादृष्टीनं देशपातळीवर काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांसाठी कडक कायदे करण्यात आलेत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे एचआयव्ही बाधित रक्त ओळखणं सोपं झालंय. असं असतानाही, गेल्या पाच वर्षांत देशातील ८,९८३ जणांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याचं उघडकीस आल्यानं वैद्यकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्यात आणि सामान्य पेशंटनाही धडकी भरलीय. खुद्द राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेनंच, माहिती अधिकारांतर्गत हा आकडा जाहीर केला आहे. त्यापैकी १ हजार रुग्ण महाराष्ट्रातील असल्यानं राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. रक्तातून एचआयव्हीच्या संक्रमणात गुजरात आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे राज्य सरकारला तातडीनं ठोस पावलं उचलण्यावाचून पर्याय नाही.
एप्रिल ते ऑक्टोबर २०१४ या कालावधीत देशातील ६२९ जणांना रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाली, त्यात ८० जण राज्यातील आहेत. ही आकडेवारी समोर येताच एचआयव्ही नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संघटनांचं धाबं दणाणलंय आणि त्यांनी आपले हात वर करायला सुरुवात केली आहे. स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल (एसबीटीसी) आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीनं (एमएसएसीएस) एकमेकांकडे बोटं दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न केलाय. परंतु, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, हेच रक्तातून एचआयव्ही संक्रमणामागचं प्रमुख कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
अजूनही अनेक रक्तपेढ्यांमध्ये enzyme-linked immune-sorbent assay test (ELISA)द्वारे एचआयव्हीची तपासणी केली जाते. त्यातून अचून निदान होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला नुकतीच एचआयव्हीची बाधा झाली असेल, तर ते या चाचणीतून समजत नाही. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्याऐवजी, न्युक्लिअर अॅसिड टेस्टिंगद्वारे एचआयव्हीचं अचूक आणि जलद निदान होऊ शकतं. पण हे तंत्रज्ञान खर्चिक असल्यानं शहरातील मोजकीच खासगी हॉस्पिटल वगळता अन्य कुणीही ही चाचणी करत नाही. इतकंच नव्हे तर, राज्य सरकारी किंवा मुंबई महापालिकेच्या एकाही रक्तपेढीत ही सुविधा उपलब्ध नाही, अशी सविस्तर माहिती थिंक फाउंडेशनच्या विनय शेट्टींनी दिली.
रक्तदानावेळी रक्तदात्याचं रक्त घेताना आणि नंतर ते तपासताना योग्य खबरदारी घेतली जात नसल्याची गंभीर बाब एका रक्तपेढीच्या वरिष्ठ तंत्रज्ञानं निदर्शनास आणून दिली. एखादी व्यक्ती एचआयव्हीग्रस्त आढळल्यानंतरही तिला याबाबत कल्पना दिली जात नाही. त्यामुळे तो त्यानंतरही रक्तदान करत राहतो. ही पद्धत तात्काळ बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्थात, एसबीटीसी मात्र, जे चाललंय त्याबद्दल समाधानी दिसतेय. दरवर्षी सुमारे ११ लाख जण रक्तदान करतात. अशा परिस्थितीत किती नियंत्रण ठेवता येणार?, असा प्रश्न संचालक डॉ. संजय जाधव यांनी केला. सर्वांना रक्त पुरवणं ही जबाबदारी आमची आहे, पुढचं काम एड्स नियंत्रण सोसायटीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, एमएसएसीएकडील आकडेवारीनुसार, राज्यात एचआयव्हीची लागण होण्याचं प्रमाण लक्षणीय कमी झालंय. २००७ मध्ये १०,४३१ जणांना एचआयव्हीची बाधा झाली होती, तर २०११ मध्ये हे प्रमाण ५,८९३ इतकं झाल्याकडे ते लक्ष वेधतात. हे आकडे समाधानकारक असले, तरी रक्तातून एचआयव्हीचं संक्रमण थांबवण्यासाठी राज्य सरकारनं, महापालिकेनं आपल्या रक्तपेढ्यांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पुरवणं अपरिहार्यच आहे, हे कुणीही मान्य करेल.
0
आता सरकारी अधिकाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

मुंबई दि. २९ – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी आपल्याकडं म्हण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार मनोवृत्तीमुळं आताच्या ई जमान्यातही सर्वसामान्यांना या म्हणीचा प्रत्यय येत असतो. याच ‘बाबूगिरी’ला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी अभिनव मार्ग शोधला आहे. सरकारी कार्यालयांत सीसीटीव्ही बसवून अधिकाऱ्यांच्या कामावर वॉच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सर्वसामान्य लोकांना तसेच लोकप्रतिनिधींना या ना त्या कारणानं सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेळा घ्याव्या लागतात. मात्र, अनेकदा आधी वेळ घेऊन आणि तासन् तास वाट पाहूनही अधिकारी लोकांना भेटत नाहीत. त्यांच्या अडचणी ऐकून घेत नाहीत. याबाबतच्या असंख्य तक्रारी आल्यामुळं पालकमंत्री तावडे यांनी उपनगरातील सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये तसेच केबिनबाहेरील वेटिंग रूममध्ये लावण्यात येणार आहेत. त्यामुळं अधिकारी आपल्या कर्तव्ये योग्य पद्धतीनं पार पाडतात की नाही, हे समजू शकणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली असून येत्या मार्चपासून ते बसविण्यास सुरुवात होणार आहे. दर महिन्याला त्यातील फुटेजचा अभ्यास केला जाईल, असे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले.
0
ओबामांचा शिरच्छेद करू!- ISIS

न्यूयॉर्क दि. २९ – दोन अमेरिकी पत्रकार, एक ब्रिटीश आणि एका फ्रेंच नागरिकाचा शिरच्छेद करून क्रोर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि संपूर्ण जगासाठीच धोकादायक ठरू शकणाऱ्या आयएसआयएसनं आता थेट महासत्तेच्या महानेत्यालाच आव्हान दिलंय. ‘व्हाइट हाऊस’मध्ये शिरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचा शिरच्छेद करू आणि अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र बनवू, अशी धमकी त्यांनी एका व्हिडिओमधून दिल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे.
आयसिसचे तीन दहशतवादी एका कुर्दिश जवानाचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत आहेत. त्याच्या मानेवर धारदार सुरा ठेवूनच ते अमेरिकेला धमकावत असल्याचं नव्या व्हिडिओत दिसतंय. ‘ओबामा, आम्ही अमेरिकेला येत आहोत. बॉम्ब आणि स्फोटकं घेऊन आम्ही येऊ. व्हाइट हाऊसमध्ये शिरून तुमचा शिरच्छेद करू आणि अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र बनवू’, अशी धमकी त्यांनी या व्हिडिओत दिली आहे. त्यानंतर त्यांनी कुर्दिश जवानाला गळा चिरून ठार केल्याचंही व्हिडिओत दिसतंय.
या व्हिडिओत आयसिसनं फ्रान्स आणि बेल्जियमलाही धमकी दिली आहे. आम्ही कार बॉम्ब घेऊन येऊ आणि तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा त्यांनी दिलाय. जितक्या वेळा तुम्ही आमच्यावर क्षेपणास्त्र हल्ला कराल, आम्ही तुमच्या जवानांचा शिरच्छेद करू, अशी धमकी त्यांनी कुर्दिश लष्करालाही दिली आहे.
गेल्या वर्षभरात इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेनं, जगातील सगळ्यात क्रूर दहशतवादी संघटना अशीच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या संघटनेचा खात्मा करण्याचा निर्धार मध्यंतरी बराक ओबामा यांनी केला होता. त्यानंतर आता आयसिसनं थेट त्यांच्याशीच पंगा घेतल्यानं येत्या काळात आयसिस विरुद्ध अमेरिका यांच्यातील घमासान पाहायला मिळू शकतं.
0
पर्यावरण मंजुरीमुळे अडलेल्या खाणी सुरु करण्यासाठी प्रयत्न – ना.प्रविण पोटे

यवतमाळ,दि. २९ : यवतमाळ जिल्ह्यात विविध प्रकारची खनिजे आहेत. वणी परिसरातील या खनिजांच्या उत्पन्नातुन शासनासही चांगला महसूल उपलब्ध होतो. परंतु पर्यावरण मंजुरीमुळे लाईमस्टोन व डोलामाईन या खनिजांच्या काही खाणी बंद पडल्या आहे. यामुळे शासनाच्या महसूलाचे नुकसान होत आहे. त्यामुळेच या खाणींना तातडीने पर्यावरण मंजुरी उपलब्ध करून त्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी सांगितले. पोटे यांनी विश्राम भवन येथे जिल्ह्यातील उद्योग, पर्यावरण विभागामुळे अडलेले उद्योग तसेच जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ.राजू नजरधने, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.बनगीनवार, राजू डांगे, बांधकाम, उद्योग व पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोटे यांनी वणी परिसरातील कोळसा व अन्य खनिजांच्या खाणींची माहिती घेतली. या खनिजांमधून शासनास चांगले उत्पन्न प्राप्त होते. पर्यावरण विभागाच्या मंजूरीमुळे लाईमस्टोन व डोलामाईनच्या 9 खाणी काही दिवसांपासून बंद असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. बंद खाणींमुळे शासनाचे दरवर्षी 80 कोटी रूपयांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या खाणींना तातडीने पर्यावरण मंजूरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. कोळसा वाहतूकीमुळे वणी परिसरातील रस्ते खराब होतात. त्यामुळे जास्त वाईट स्थिती असलेल्या वणी-कायर-मुकुटबन हा 50 किलोमिटरचा रस्ता विशेष बाब म्हणून हाती घेण्यासाठी प्रस्ताव करण्याचा सुचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील काही रस्ते बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर हाती घेता येईल का? त्याची तपासणी करण्यासोबतच अमरावती-यवतमाळ या मार्गाचाही त्यासाठी अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.अनेक रस्ते वारंवार खराब होतात त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. बांधकाम
विभागाने सुध्दा रस्त्यांच्या कामावर चांगले मॉनिटरींग केल्यास रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी करता येवू शकते. त्यामुळे बांधकामाधिन रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सुचना त्यांनी केल्या. यावेळी श्री.पोटे यांनी जिल्ह्यातील खड्डे भरणीचे काम, रस्ते व इमारतीचे कामे, तेरावा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, योजना व योजनेत्तर कामांच्या बांधकामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदअंतर्गत सुरु असलेली कामे शक्यतोवर मार्च अखेरपर्यंत पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत सुरु झालेले सर्वप्रकारचे उद्योग त्यातुन निर्माण झालेली रोजगार क्षमता व गुंतवणूक तसेच आगामी काळात जिल्ह्यात सुरु होणाऱ्या गुंतवणूकीचा आढावाही श्री.पोटे यांनी घेतला. गेल्या तीन वर्षातील कामे तपासणार असल्याने त्यासाठी बांधकाम विभागाने तयारी करावी, असेही त्यांनी सांगितले









