पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 21st, 2015

किशोर वैद्य यांचा अमृतमोहत्सव 0

किशोर वैद्य यांचा अमृतमोहत्सव

21_YTL_PAGE_1

January 21, 2015 in रोजगार
महिला पोलिसांची आत्महत्या 0

महिला पोलिसांची आत्महत्या

sucide-1
उत्तरप्रदेश/तामिळनाडू- उत्तरप्रदेशमधील महिला पोलिसाने गळफास घेऊन तर तामिळनाडूतील महिला पोलिसाने स्वत:च्या बंदुकीतून डोक्‍यात गोळी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उत्तरप्रदेशमधील बारामांकी येथील कोतवाली परिसरात राहणा-या मोनी शर्मा (२८) यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
तर तामिळनाडूतील नागैपुरम पोलीस स्थानकात रात्रीच्या कर्तव्यावर असलेल्या करूपाई (३१) या महिला पोलिसाने मंगळवारी रात्री स्वत:च्या बंदुकीतून डोक्‍यात गोळी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

January 21, 2015 in मुख्य पान
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक 0

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक

images
मुंबई- मुंबई शेअर बाजारात बुधवारी सकाळच्या सत्रातही तेजीचे वातावरण आहे. निर्देशांकाने २८ हजार ९०० अंकांची पातळी गाठली. तर निफ्टीनेही ८ हजार ७३०.४५ या नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
शेअर बाजारात पैशांचा ओघ सुरू असून सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार वधारला आहे.
गेल्या चार सत्रात निर्देशांकाने एक हजार ४३८ अंकांनी वधारला आहे. बुधवारी सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्समध्ये १५५.२५ अंकांची वाढ होऊन २८ हजार ९३९.९२ हा नवीन उच्चांक गाठला. तर निफ्टीही २० अंकांनी वधारला असून ८,७१५ अंकावर पोहचला.
मंगळवारी, मुंबई शेअर बाजाराने ५२२.६६ अंकांची झेप घेत २८,७८४.६७, तर निफ्टी १४४.९० अंकांच्या वाढीसह ८,६९५.६० या शिखरावर बंद झाला. निफ्टीने मंगळवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला होता. निफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच ८,७००ला स्पर्श केला.

 

‘पीके’ चित्रपटाची कथा चोरीचा आरोप, याचिका दाखल 0

‘पीके’ चित्रपटाची कथा चोरीचा आरोप, याचिका दाखल

pk
नवी दिल्ली- ‘पीके’ चित्रपटाची कथा पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लेखकाने एक कोटींची मागणी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने चित्रपट निर्माते व दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे.
‘पीके’ चित्रपटाच्या कथेची पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी कादंबरीकार कपिल इसापुरी यांनी ‘पीके’ विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘फरिश्ता’ या कादंबरीतील काही भाग चित्रपटाच्या कथानकात वापरल्याचा आरोप कपिल इसापुरी यांनी केला आहे.
या कादंबरीत भोंदू, धर्मगुरु यांनी मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार याविषयावर टिका केली आहे. हा मानवनिर्मित धंदा असून समूहात तुम्ही विशिष्ट व्यक्ती कोणत्या धर्माची आहे हे ओळखू शकत नाही, असेही या कादंबरीत म्हटले आहे. त्यामुळे इसापुरी यांनी त्यांच्या पुस्तकातून नक्कल केल्याप्रकरणी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसह दिग्दर्शक राजकुमार हिरानी, पटकथालेखक अभिजात जोशी यांना नोटीस बजावली आहे.

 

January 21, 2015 in मुख्य पान
मुख्यमंत्र्यांच्या काकूचे टोलविरोधात आंदोलन 0

मुख्यमंत्र्यांच्या काकूचे टोलविरोधात आंदोलन

127657-shobhatai
नागपूर- भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी नागपूरमधील बोरखेटी टोलनाक्यावर बुधवारी टोलविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सकाळी आठ वाजल्यापासून नागपूर- हैदराबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि बोरखेडीचे टोलनाके बंद करण्याची मागणी शोभाताईंनी केली आहे. या कंपनीने दोन ऐवजी चार ठिकाणी टोलनाके बसवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

January 21, 2015 in मुख्य पान
कापुस घेवुन जाणारा ट्राक्टर पलटी 0

कापुस घेवुन जाणारा ट्राक्टर पलटी

20150121_100730
आर्णी – बोरगांव येथिल शेतकरी बालकिशन पवार हे ट्राक्टर मध्ये कापुसभरून आर्णी येथे विकण्यासाठी घेवुन जात असतांना दाभडी जवळ राञी दोनच्या सुमारास भरलेल्या ट्राक्टर फलटी झाल्याची घटना घडली.हा अपघात रस्तावरिल खड्यांमुळे झाला असुन यात कोणतीही जिवित हानी किवा कोणीही जखमी झाले नाही.कापसाने भरलेला ट्राक्टर रस्ताच्या बाजूला फलटी झाला असुन ट्राक्टरच्या ट्रारलीचे मोठे नुकसान झाले आहे.बाधकाम विभागाने आर्णी ते बोरगांव या रस्ताचे काम जलद गतीने करण्याची मागणी जणतेतुन होत आहे.

 

January 21, 2015 in विदर्भ
शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, सहकार व पणन विभागाचा आदेश 0

शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, सहकार व पणन विभागाचा आदेश

2014-08-26~bankArt_ns
नागपूर- सन २०१४ मध्ये पडलेल्या अल्पपावसामुळे खरीप हंगामातील आणेवारी ५० पैसापेक्षा कमी निकाली. त्यामुळे सरकारने शेतकºयांना दुष्काळी पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांकडे तकादा लावल्याने या संकटात भर पडली होती. अखेर सहकार व पणन विभागाने शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश काढले.
जिल्ह्यातील २०५० गावातील अंतिम आणेवारी ५० पैशापेक्षा कमी निघाल्याने यापूर्वीच टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात येऊन विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सहकार विभागाशी संबंधित निगडीत सहकार कर्जाचे रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगीती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. त्या सर्व गावातील अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात येणार आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी बँक लि.मुंबई व जिल्हा मध्यवर्ती बँकानी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आयुष्याची सार्थकता-किशोर वैद्य 0

आयुष्याची सार्थकता-किशोर वैद्य

23
साहित्यांकाच्या भावविश्र्वात शहराविषीयीच्या विशिष्ठ संवेदना साकार झालेल्या असतांत. ते ज्या शहरात राहतात त्या शहराविषयी विलक्षण अस्मीता त्यांच्या मनात निर्माण झालेली असते. शहराविषीयी ज्या अपार आपुलकीने त्यांच्या मनाचा एक कोपरा सदैव काहीना काही करण्याची धडपड करीत असतो. अशाच सहित्यीकाच्या प्रवासातील एक नाव किशोर गंगाधर वैद्य बि.ए.बी.एड.सेवानिवृत्त प्राचार्य विकास हिंदी कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा त्यांच्या अमृत महोत्यव ७५ च्या पर्वावर त्यांच्या परिचय नव्याने व्हावा आणी त्यांना सर्वार्थान शुभेच्छांनी गौरविला जाव हा ह्या मागचा उद्देश प्राचार्य पदाची धुरा सांभाळता साभाळता आयुष्यातल्या हौसेच्या मोलाला ते विसरले नाही. अनेक खाचर वळग्यातुच जिवनाचा प्रवास सुरू केला. आयुष्यात काहि गमावल्या शिवाय कमावता येत नाही म्हणतात स्वत: च्या अनुभवला समोर जाताना काटे दुर करीत वाटचाल करीत राहिले मागे वळुन न पाहता आज त्यांच्या यशस्वी जिवनाचा आलेख इतका मोठा झाला आहे. उंचावत गेलाय की त्यांची मुले सुध्दा म्हणतात हेच आमचे बाबा आहेत आमच्यासाठी वंदनीय स्वत:ही घडवित असताना कुटुंबाची जबाबदारी त्यांनी कधी नाकारलीच नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी झटत राहीले मुलांना चांगल यशस्वी जिवन देवून मोठ्या जबाबदारीतुन मुक्त झाले. किशोर गंगाधर वैद्य व्यक्ती म्हणून मान्य आहेतच पण अनेक भुलावलेल्या पदांचा मानकरी आहे. नगर परिषद पांढरकवड्याचे शिक्षण सभापती नागपूर विद्यापिठाचे सीनेट सदस्य गो.क.ग न्यासचे विश्वस्त सचिव दत्त मंदिर न्यास दक्षता व शांतता कमिटी सदस्य समर्थ ब्रम्हचारी महाराज न्यास चिंचमंडळ स्वा.सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी होते. सन १९६४ आॅल इंडिया खो-खो व कबड्डी चॅपीयन शिप करता त्यांची ठाणे येथे निवड चालु होती. यवतमाळ जिल्हा न.प.प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे निमंत्रावरुन दिल्ली येथेल सम्मेलन १९८९ मध्ये त्यांची उपस्थिती होती. देशासाठी आपण काही देणे लागतो ह्या प्रमाणे सन १९६७ गोवा येथे मुक्तीवर मोहन रानडे यांचे सोबत विदर्भात प्रवासही केला. सन १९७५ ते १९७७ आणी बाबीत १३ महीन्यांचा तुरुंगवासही त्यांनी भोगला. कधी कधी आपल्या जवळपास वावरणारी व्यक्ती इतकी मोठी असते हे लक्षात येत नाही. आणी म्हणूनच अशा लिखाणाची गरज असते. सहित्सीक म्हणून मी त्यांचा उल्लेख केला त्यांची स्वत:ची काही पुस्तके आहे.(१) भारतीय स्वातंत्र्याची गाथा असे झुंजले चिमुर २००२ (२) प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकातील मृत्युं नंतर घडणाºयां घडामोडीचा आलेखच त्यांनी मांडलाय सामाजिक न्याय मंत्री अ‍ॅड.शिवाजी मोघे ह्यांनी त्यांच्या मनोगतातुन मोक्षधामाची व्यथा अगदी मार्मीक शब्दात मांडुन किशोर वैद्यानां न्याय दिला आहे. ते म्हणतात कोणा एकाचा मृत्युं झाला हे वैद्यंना कळायचीच वेळ वैद्य जात पात पक्ष सर्व बाजुला ठेवून हजेरी लावयाचे एखाद्या अनुपस्थित दिसले तर त्यांचे गैरहजेरीची चर्चा होते. असे लोक म्हणत प्रारंभापासून ते श्रध्दांजलीपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत हजारो अत्येष्टी पार पाडण्यात प्रसंगी स्वत:चे पैसेही खर्च केले यापेक्षा मोठा दुसरा सामाजिक कार्य कोणते असु शकेल. व्यक्त करीत असताना किशोर वैद्यांना अलेले बरे वाईट अनुभव त्यांनी प्रवास मोक्षधामाचा ह्या पुस्तकात लिहिले आहे.प.पु माधव महाराज व माया चे छायाचित्र असलेले पाटणबारीचा पावन मठ हे पुस्तक लिहुन खाºया अर्थाचे जिवनाचे सार्थक करून घेतले असेही म्हणाला हरकत नाही. पत्रकारीतेच्या क्षेत्रातही ते मागे नाही दै.लोकमत, दै.लोकदूत, लोकसत्ता, सकाळ वरुन भारत, नवभारत, नागपूर पत्रिका आणी केळापूरचे वारे या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून प्रदिर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नागपूर व यवतमाळ आकाशवाणीवर साक्षरता अभियाना अंतर्गत मुलाखतीचे प्रसारण त्यांनी त्यांच्या वाटचालीत अनेक पुरस्कार हि ळिविले. त्यात प्रामुख्या तिन वेळा आदर्श शिक्षक, पौढ शिक्षण साधण व्यक्ती पुरस्कार, स्वतंत्र्य भारताच्या उभारणी दुर संचार विभागाचे योगदान, उपमुख्यामंत्री गोपीनाथ मुडे यांचे उपस्तितीत सन्मानपत्र, जेष्ठ पत्रकार सन्मानपत्र , यवतमाळ जिल्हा ब्राम्हण सभेचा समाजभूषण पुरस्कार त्यांचे नावावरआहे. मॉरीशस, अंदमान, श्रीलंका, लंडन, इंटली, फ्रान्स, आॅस्ट्रीया,वॅटीगनसिटी, स्विर्त्झलँड, हॉलंड, युरोप देशांचे यात्राचे भ्रमणही केले. त्यांच्या शिक्षण पेशासोळयात लेखक साहित्यीक पत्रकार सामाजिक कार्यकर्ता देशाप्रती जबाबदारी भावना जपणाºया ह्या हुरहुन्नरी कलावंताचा त्यांच्या असमान्य व्यक्तीमत्वाला त्यांच्या पुढील उज्वल भविष्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! अमृत मोहोत्सवा निमित्य अभिष्ट चिंतन !
श्रीमती शुभदा मुंजे, यवतमाळ

 

January 21, 2015 in विदर्भ
शेतक-यांना मदत व पेट्रोल-डिझेल दरकपातीसाठी काँग्रेसची राज्यभरात तीव्र निदर्शने 0

शेतक-यांना मदत व पेट्रोल-डिझेल दरकपातीसाठी काँग्रेसची राज्यभरात तीव्र निदर्शने

Protest at Thane 01
मुंबई, दि. 21 – नैसर्गिक संकटांनी होरपळून निघालेल्या राज्यातील शेतक-यांना तातडीची भरीव मदत व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या किंमतींच्या प्रमाणात देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरकपात मागणी तसेच भू-संपादन कायद्यातील शेतकरी विरोधी दुरूस्त्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने दि. 21 जानेवारी 2015 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निदर्शने केली.
या तीनही मुद्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दि. 21 जानेवारीपासून दि. 25 जानेवारी पर्यंत जिल्हा आणि तालुकास्तरावर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यात प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील सरकारविरूद्ध आंदोलन करण्यात आले.
दि. 21 जानेवारी 2015 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, पुणे, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर आदी ठिकाणी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय कार्यालये, पेट्रोल पंपांवर आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले. दि. 22 जानेवारीपासून तालुका पातळीवर आंदोलन केले जाणार आहे.

तलाठी कार्यालयांना निवासस्थानासह स्वत:ची सुसज्ज ईमारत 0

तलाठी कार्यालयांना निवासस्थानासह स्वत:ची सुसज्ज ईमारत

unnamed
सर्व तहसिल कार्यालयांमध्ये महिला सुविधा केंद्र
यवतमाळ, दि. 21 : ग्रामीण स्तरावरील तलाठी कार्यालये गावकऱ्यांशी निगडीत असलेली महत्वाची कार्यालये आहे. बहुतांश नागरिकांचा तलाठी कार्यालयाशी संबंध येतो. त्यामुळे जिल्ह्यात सदर कार्यालये निवासस्थानासह स्वत:ची सुसज्ज ईमारत असलेली बनविण्यात येणार असून पहिल्या टप्यात काही कार्यालये यावर्षीच हाती घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी गार्डन हॅाल येथे दुष्काळी मदत वाटप तसेच बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, बांधकामचे अधीक्षक अभियंता श्री.बनगीनवार, उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला यांच्यासह महसूल, कृषी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सुरुवातीस तालुकानिहाय मदत वाटपाचा आढावा घेतला.‍ जिल्ह्यास मदत वाटपासाठी 122 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांना 70 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित वाटप तातडीने करण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत संबंधीतांना केल्या. मदत वाटपात काही अडचण असल्यास याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी स्वतंत्र बैठक घेण्याबाबतही त्यांनी सुचविले. यावेळी बांधकाम विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय तलाठी कार्यालये, बांधकामासाठी लागणारी जागा व निधीचा स्वतंत्र आढावा घेतला. पहिल्या टप्यात काही तलाठी कार्यालये यावर्षीच हाती घेण्यासाठी टाईप प्लॅन तयार करण्यासोबतच जमीन हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करण्याबाबत त्यांनी सांगितले. पुढील टप्यात जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालये निवासस्थानासह सुसज्ज करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तालुकानिहाय प्रशासकीय ईमारती, त्यासाठीचे अंदाजपत्र व जमीन उपलब्धतेबाबतही चर्चा केली. ज्याठिकाणी जागा नसेल तेथे जागेचे प्रस्ताव तातडीने पाठवून कार्यवाही करण्यास सांगितले. जिल्ह्यातील चालू, प्रलंबित व प्रस्तावित कामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. तहसिलच्या ठिकाणी महिलांसाठी सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यात सर्व तहसिलच्या ठिकाणी महिला सुविधा केंद्राचा उपक्रम हाती घेण्याचा सुचना त्यांनी केल्या. या सुविधांच्याबाबतीत जिल्हा मॉडेल म्हणून ओळखल्या जावा या पध्दतीने हे काम केले जावे, असे ते म्हणाले. यासोबतच बेंबळा पर्यटन, यवतमाळ शहरातील उड्डाण पुल, धान्य गोदाम याबाबतही पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचना केल्या. तिर्थक्षेत्रासाठी अनेक नवे प्रस्ताव वारंवार येत असतात. परंतु निकषात बसत असेल तरच तिर्थक्षेत्रांना मंजुरी द्या, असे पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचविले. बांधकाम विभागात अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली होत असतांना नवीन अधिकारी येईपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे ते म्हणाले. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत गावस्तरावर शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी अनुदानावर गोदाम बांधकामासाठी निधी उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातून
अधिकाधिक प्रस्ताव सादर केले जावे.जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदाराने किमान 5 नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले पाहिजे. त्यासाठी निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून देवू. तहसिलदारांनी बेधडकपणे संकल्पना मांडाव्या, त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करू, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात वनहक्क पट्टे वाटपाला गती द्यावी, आवश्यकता भासल्यास ग्राम वनहक्क समित्यांच्या अध्यक्षांची बैठक घेवून या समित्यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रसत्न करावे, असे सांगून कोतवाल, पोलीस पाटील भरती, तांडा वस्त्यांना महसूली दर्जा, वाळूबाबत हैदराबाबत पॅटर्न आदी विषयांचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

January 21, 2015 in विदर्भ
वैद्य यांचा गुरूवारी अमृतमोहत्सव 0

वैद्य यांचा गुरूवारी अमृतमोहत्सव

22
यवतमाळ दि. २१ ( रवी चरडे ) – केळापूर तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक पटलावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारे किशोर गंगाधर वैद्य यांनी वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्याने अमृतमहोत्सव समारंभाचे आयोजन २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिड्डेवार सांस्कृतीक भवन, पांढरकवडा येथे केले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री (भारत सरकार) हंसराज अहिर यांच्या हस्ते वैद्य दाम्पत्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर तर प्रमुख अतिथी म्हणून खा. भावना गवळी, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आ. मदन येरावार, आ. प्रा. राजू तोडसाम, आ. डॉ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, शेतकरी नेते किशोर तिवारी उस्थित राहणार आहे. या कर्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गजानन किशोर वैद्य, आनंद किशोर वैद्य यांनी केले आहे.