
यवतमाळ, दि. २७ – वणी तालुक्यातील मुर्ती येथील विवाहीत महिलेचा खुन करणाºया आरोपीस जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र न्यायाधिश यांनी आज मंगळवारी हा निकाल दिला.
प्रकाश गजानन गोहोकार रा. मुर्ती असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची गावातीलच संगिता विलास बोंडे या महिलेवर वाईट नजर होती. त्यातूनच आरोपी दोन, तीन वर्षापासून सतत त्या महिलेची छेडखानी करीत होता. मात्र महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही. अशातच २४ आॅक्टोंबर २०११ रोजी शेतात कापूस वेचण्याकरीता जात होती. दरम्यान येलेकार याच्या शेतातून जाणाºया पांधर रस्त्यावर अडवून महिलेच्या पोटात चाकुने सपासप वार करून खुन केला. याप्रकरणी मृतकचा पती विलास बोंडे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपास अधिकारी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी तपास पुर्ण करून प्रकरण अतिरीक्त सत्र न्यायाधिश डोरले यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले होते. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ११ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पुरावे व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्र.अ. मानकर यांनी काम पाहिले.
Archive for January 27th, 2015
0
महिलेचा खून: आरोपीस जन्मठेप
0
पोलिसांच्या हातावर तूरी देऊन आरोपी पसार

यवतमाळ, दि. २७ – खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाल्याची घटना येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली. बापुराव दंडाजे (३२) रा. चपराळा (आंध्रप्रदेश) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील बापूराव दंडाजे याने पाटणबोरी येथील जावायाचा खून केला होता. तेव्हापासून तो कारागृहातच होता. दरम्यान काल २६ जानेवारीला त्याला पोलिसांनी औषधोपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना, त्याने पोलीस शिपायांची नजर चुकवून हाताची हतकडी खोलून रुग्णालयातून पळ काढला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
0
नातवानेच केला आजोबाचा खून

यवतमाळ, दि. २७ – पूर्व वैमनस्यातून चुलत नातवानेच आजोबाचा खून केल्याची घटना डेहणी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. लक्ष्मण अगलदरे रा. डेहणी असे मृतकाचे नाव असून, शंकर अगलदरे (३०) असे आरोपी नातवाचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून बालाजी अगलदरे व शंकर अगलदरे यांच्यात नेहमीच खटके उडत होते. बालाजी यांचे वडील लक्ष्मण अगलदरे हे घराबाहेर बसून असताना, शंकर तेथून चालला होता. दरम्यान शंकरची नजर चाुलत आजोबाकडे केली. यावेळी त्याने शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला व रागाच्या भरात शंकरने लक्ष्मण यांच्या डोक्यावर काठीने वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून शंकर घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी शेजारच्या नागरीकांनी रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या लक्ष्मण अगलदरे यांना उपचारार्थ यवतमाळ रुग्णालयात नेले. दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बालाजी अगलदरे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी शंकरविरुद्घ खूनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
ग्रंथोत्सवानिमित्त जेष्ठ साहित्यिक डॉ.विजया वाड यांचे व्याख्यान

यवतमाळ, दि. २७ : यवतमाळ ग्रंथोत्सवानिमित्त दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जेष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ.विजया वाड यांचे व्याख्यान टॉऊन हॉल, नगर परिषदसमोर यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ.वाड यांच्या 101 व्या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. डॉ.वाड यांची वेगवेगळ्या विषयांवरील 100 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहे. त्यांचे ‘हृदयीच्या गोष्टी’ हे 101 व्या पुस्तक यवतमाळात प्रकाशीत होणार आहे. त्यांच्या पुस्तक प्रकाशनासह त्यांना ऐकण्याची यवतमाळकरांना ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. डॉ.वाड यांच्या प्रकाशित साहित्यांमध्ये कादंबरी, कथासंग्रह, बालकादंबरी, बालवाचकांसाठी चरित्र पुस्तके, प्रवासवर्णन, बालकांच्या कथा, बालनाट्ये, बालकविता यांचा समावेश असून त्यांच्या कथांवर चित्रपटही आले आहे. गेल्या काही वर्षापासून त्या राज्य शासनाच्या मराठी विश्वकोश निमिर्त्ती मंडळाच्या अध्यक्ष आहे. मुंबई येथील राजा रामदेव पोदार शाळेतुन त्या प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या साहित्यास राज्य व केंद्र शासनासह विविध नामांकीत संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यात 35 पुरस्कारांचा समावेश आहे. दुरदर्शनच्या ‘शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमात टिव्ही टिचर म्हणून 11 वर्ष त्यांनी काम केले असून ‘परागण’ हा मुंबई दुरदर्शनवरील पहिला पाठ घेण्याचा मान त्यांना मिळाला. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल त्यांना कोलंबो विद्यापिठाने डी.लिट्ने सन्मानित केले आहे. पीएचडीचे सुवर्ण पदक बाम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेजने त्यांना दिले आहे. विश्वकोशाचे 17, 18 व 19 हे तिन खंड अवघ्या पाच वर्षात त्यांनी संपादीत केले. शिवाय 20, 178 पानांची शिडी करून विश्वकोशाचे 1 ते 17 खंड शिडी करून जनतेस उपलब्ध करून दिले. देशासह विविध 14 देशातही त्यांची व्याख्याने झाली आहे. त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
0
शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. २७ : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 11.40 कोटींची मदत वितरीत करण्यात आली. परंतु यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे वचन मला शेतकरी बांधवांकडून हवे आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त पोष्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा.भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, माजी आमदार नंदीनी पारवेकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधिक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक जे.बी.डाखोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. सुरूवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यविरांना नमन केले. संपूर्ण जिल्हावाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शासनाकडून जनतेची जास्तीत जास्त कामे झाली पाहीजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामास सुरूवात केल्यानंतर अडीअडचणी समजून त्या सोडविण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी जिल्ह्याला 122 कोटी रूपये मिळाले असून त्यापैकी 75 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत वितरण सुरू आहे. मदत वाटपातून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, अशा सुचना प्रशासनास केल्या आहे. पालकमंत्री पदासोबतच महसूल विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करीत असतांना जिल्ह्यासाठी काही नाविन्यपुर्ण केले पाहिजे, या भावनेमुळेच जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांना निवासस्थानांसह सुसज्ज इमारती,तालुक्यांच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती, पोलिस ठाण्यांच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, तहसिल कार्यालयांमध्ये महिला सुविधा केंद्र व प्रतिक्षालये उभारण्याचा मनोदय केला असून टप्प्याटप्प्याने ही
कामे पुर्ण होणार आहे असे ते सांगितले.
प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी दुषीत पाण्याचे स्त्रोत आहे तेथे तेथे जलशुध्दीकरणाची विशेष सुविधा करता येईल का? यासाठी तपासणी करण्याच्या सुचना केल्या आहे. याबाबतही आम्ही लवकरच तोडगा काढू. जिल्ह्यातील स्मशानभूमींचा सर्वांगिन विकास करण्याचे धोरण आम्ही आखणार आहोत. त्यासाठी
नियोजनबध्द पध्दतीने काम केले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर बंजारा तांडे, वाड्या, वस्त्या आहेत. परंतु त्यांना महसूली गावांचा दर्जा नाही त्यांना तो मिळावा म्हणून लवकरच निर्णय घेतला जाणार राज्य सरकारने अतिशय महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेत समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पतसंस्था, कारखानदार, लघु उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी जलयुक्त शिवार योजनेतील किमान 5 गावे दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी यवतमाळातील नाट्यगृह लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष लक्ष घालून ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे लहान शेतकऱ्यांना आपल्या जमीनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाही. हे व्यवहार अधिक सुलभ करता यावे म्हणून तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
0
कार अपघातात सात ठार, ४ जखमी

हैदराबाद – तेलंगणमधील मेबबूबनगरमध्ये दोन कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून दोन कारपैकी एक कार महाराष्ट्र पासिंगची होती, असे पोलिसांनी सांगितले.
कोमिरेड्डीपल्लीपासून जवळच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर आज सकाळी हा अपघात झाला. महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन असलेल्या कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात जागीच सात जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वानपर्थीचे पोलीस उपअधिक्षक जोगुला चेन्नया यांनी घटनास्थळी भेट दिली असून अपघातात ठार झालेल्यांपैकी सहा जण महाराष्ट्रातील गाडीतून प्रवास करत होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जे चार जण अपघातात जखमी झाले आहेत त्यांची प्रकृतीही चिंताजनक असून त्यांना जवळच्याच रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे, असे जोगुला यांनी सांगितले.
0
अमेरिका भारताचा चांगला मित्र बनू शकतो – ओबामा

नवी दिल्ली – तीन दिवसीय भारत दौ-याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट सभागृहात भाषण केले. नमस्ते, बहुत धन्यवाद या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत ओबामांनी उपस्थित भारतीयांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
जात, धर्म, वर्ण, महिला सशक्तीकरण आणि भारत-अमेरिका संबंध या सर्व मुद्यांवर ओबामांनी आपले विचार मांडले. अमेरिका भारताचा सर्वात चांगला मित्र बून शकतो. भारत-अमेरिका एकत्र आले तर जग अधिक सुरक्षित होईल असे ओबामा म्हणाले. दोन्ही देशांनी दहशतवादाची झळ सोसली असून, दोघांसमोरही आता नवी आव्हाने आहेत.
भारत-अमेरिकेमधील नागरी अणूऊर्जा करारातील अडथळे दूर करुन, आता आपण अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे त्यामुळे भारतीयांची वीजेची गरज पूर्ण होऊ शकेल असे ओबामांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आता सुधारणा होणे आवश्यक असून, सुरक्षा परिषदेवर भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे यासाठी आपण शिफारस करणार आहोत असे ओबामा यांनी जाहीर करताच सभागृहात टाळयांचा एकच कडकडाट झाला. भारत-अमेरिका वेगवेगळया क्षेत्रात एकत्र काम करु शकतात. भारत-अमेरिका जे आजार रोखता येऊ शकतात अशा लसींची एकत्र निर्मिती करुन, बालमृत्यू रोखण्यामध्ये महत्वपूर्ण काम करु शकतात.
अलीकडच्या काहीवर्षांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक गरीबी निर्मूलन झाल्याचे ओबामांनी सांगितले. ओबामांनी आपल्या भाषणात स्त्री सबलीकरणावरही जोर दिला. प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य दलातील संचलनाचे महिलांनी जे नेतृत्व केले त्याचे ओबामांनी कौतुक केले. मुला इतकी प्रत्येकी मुलगीदेखील महत्वाची आहे. मुली यशस्वी होतात तेव्हाच देश यशस्वी होतो असे ओबामा म्हणाले.
जात, धर्म, पंथ आणि वर्ण यामध्ये न अडकता मानवतेला महत्व देण्याचा सल्ला त्यांनी दिली. अमेरिकेत माझ्या आयुष्यातही असे काही क्षण आले जिथे आपल्या रंगामुळे वेगळी वागणूक मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाहरुख खान, मेरी कोम, मिल्खा सिंग यांचा धर्म, रंग न पाहता त्यांचे यश सर्व भारतीयांनी सारखेपणानेच साजरे करावे असे ओबामा म्हणाले.









