
यवतमाळ , दि. ८ – एका महिलेने नवजात अर्भकाला प्लास्टीकच्या पिशवीत टाकून फेकुन दिलयाची घटना नेताजी चौकात उघडकीस आली. दाम्पत्याच्या सतर्कतेने अर्भकाचे प्राण वाचले.
अनैतिक संबंध उघडकीस येईल या भीतीपोटी एका महिलेने दोन दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक नाल्यात टाकून पलायन केले. एका प्लास्टीक पिशवीच्या भोवती दोन-तीन कुत्रे घुटमळत होते. त्या पिशवीतून हात बाहेर आल्याचे रस्त्याने जाणाºया दाम्पत्याच्या निदर्शास आले. हा प्रकार बघून महिलेचा पती व परीसरातील नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली. प्लास्टीकच्या पिशवीभोवती चिखल उडलेला होता. अन्नाचे शितोडे पिशवीत शिरले होते. एका युवकाने लगेच समोर जावून नवजात शिशूला पिशवीतून बाहेर काढले व थेट शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वेळ न दवडता त्या अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. काही युवकांनी अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी लगेच अर्भकाला स्वच्छ करून उपचार केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अर्भकाला फेकुन देणाºया महिलेवर गुन्हा दाखल केला.
Archive for January 8th, 2015
0
महिलेन फेकले नवजात अर्भक
0
यवतमाळ बंद : बसवर दगडफेक, व्यवसायिकांच्या संयमाचा उद्रेक

यवतमाळ, दि. ८ -नगर पालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात पुकारण्यात आलेल्या यवतमाळ बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. रोजगार हिरावल्या गेल्यामुळे व्यवसायीकांच्या संयमाचा उद्रेक झाल्याने नागपूरकडे जाणाºया बसवर दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.
शहराची वाढती लोकसंख्या, मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पादचाºयांचा फुटपाथही अतिक्रमणाच्या विळख्यात असल्यामुळे रहादारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबतचा निर्णय घेऊन शहरात ३ जानेवारीपासून मोहिम राबविण्यास प्रारंभ केला. आर्णीरोड, धामनगावरोड, गोधणीरोडवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर इतर मार्गावरील व नेताजी चौकातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या. गेल्या चार दिवसात शेकडो दुकानांवर बुलडोजर चालविण्यात येत असताना, याला नेताजी चौकातील व्यवसायींकानी विरोध करीत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. विदर्भवीर माजी खा. जांम्बुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात व्यवसायींकानी नेताजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र प्रशासनाने याकडे डोळेझाक करीत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. शहरातील जवळपास अर्ध्याअधिक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आज नेताजी व दत्त चौकातील अतिक्रमण हटविल्या जाणार असल्यामुळे याला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील व्यवसायींकानी एकत्रित येवून यवतमाळ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला आज समिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही पेट्रोलपंप धारकांनी व्यवसायीकांच्या बंदला पाठींबा दर्शविला होता. नेताजी चौक, आर्णी रोड, दत्त चौक, मेन रोड, टांगा चौक, आखाडा चौक, धामणगाव रोड, दारव्हा नाका आदी मार्गावर असलेली प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. अतिक्रमणधारकांनी कुटुंबियासह नेताजी चौकात सकाळपासूनच ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान एम. एच. १४ बीटी १२८२ क्रमांकाची नागपूर-वर्धा व एम. एच. ४० वाय ५६८३ क्रमांकाची यवतमाळ-औरंगाबाद बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस दलाच्या वतीने चौकाचौकात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0
पाण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात उपोषण

उमरखेड, दि. ८ – हिवाळ््यातच पाणीटंचाई पेटालयाला लागले आहे. इसापूर धरणाचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ३४ जणांनी बिटगावपासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या कोठा तांंडाच्या नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. बिटरगाव, कोठा, भोजनगर, रतननगर, गणेशवाडी, या गावातील नागरिकांचा समावेश आहे. इसापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी दरवर्षीच पैनगंगा नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गांजेगावपासून सहस्त्रकुंड पर्यंतच्या गावापर्यंत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चार टिएमसी पाणी काही दिवसापूर्वी सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. मात्र पाणी गांजेगाव बंधाºयाच्या समोर गेले नाही. इसापूर धरणातून सहा टिएमसी व मराठवाडा येथून तेवढेच आरक्षीत पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक विजय रुडे, उत्तम देवकते, संजय देवकते, संजय करपे, अरुण राठोड, शंकर हामंद, गणेश राठोड, उत्तम राठोड, लक्ष्मण राठोड, हमिद खान, सुरेश गायके, रतन राठोड, उल्हास जाधव, युवराज राठोड, सुरेश पवार, संजीव राठोड, गोपिनाथ केंद्रे, रामराव पाटील, नारायण देवकते, भारत पवार, माधव भलगे आदींचा समावेश आहे. या आंदोलनाला परिसरातील जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
0
भर रस्त्यातून अपहरण करुन बलात्कार

गाझियाबाद दि. ८ – महिलांसाठी असुरक्षित बनलेल्या दिल्लीमध्ये एका १६ वर्षीय शालेय विद्यार्थीनीचे रस्त्यातून अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडीत विद्यार्थीनी गाझियाबाद येथे रहाणारी आहे. बुधवारी संध्याकाळी शिकवणी वर्गावरुन घरी परतत असताना, स्कॉर्पियोमधून आलेल्या तिघांनी पीडित विद्यार्थीनीचे अपहरण करुन तिला नोएडा येथे घेऊन गेले. तिथे एका फ्लॅटमध्ये तिघा आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
नंतर पीडित तरुणीला तिच्या घराजवळ फेकून आरोपी पसार झाले. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीवरुन गाझियाबाद पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. हे तिघेही आरोपी विशीतील असून, तरुणी त्यातील एकाला ओळखत होती.
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजापा स्वबळावर लढेल

मुंबई दि. ८ – राज्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजापा स्वबळावर लढेल असे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पदाधिका-यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जर त्यांना स्वबळावर लढायचे असेल तर भाजपा स्वबळावर लढेल असेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारां बरोबर बोलत होते. यातून त्यांनी एकप्रकारे शिवसेनेला ठेंगा दाखवत सुचक इशारा दिला आहे.
शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली तरी भाजपा त्यांना गीणतीत पकडायला तयार नाही. यापुढे राज्यात भाजपाच्याच तालावर शिवसेनेला नाचावे लागेल अशीच रणनिती आखली गेली आहे. त्याचाच प्रत्यय गुरूवारी आला.
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताच सर्वात पहिला हल्ला शिवसेनेवरच केला. राज्यात यापुढे शतप्रतिशद भाजपाचे उद्दीष्ठ डोळ्या समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. येवढेच नाही तर स्थानिक कार्यकर्त्यांला यापुढे ताकद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असे संकेत दिले आहेत. शिवाय या बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकारही स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मिशन १०० प्लस हाती घेतले आहे. त्याला त्यांच्या या वक्तव्याने बळकटी मिळणार आहे. त्यामुळे दानवे यांनी सुरूवातीपासूनच शिवसेनेवर दबाव टाकण्याची रणनिती यातून आखल्याचे स्पष्ट आहे. दानवे ज्या आक्रमकतेने शिवसेनेला आव्हान देत आहेत तीच पद्धत यापुढेही कायम राहीली तर ती शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असेल.
0
सचिन लवकरच रुपेरी पडद्यावर

नवी दिल्ली दि. ८ – दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच त्याच्या चाहत्यांना चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटात खुद्द सचिन भूमिका करणार आहे.
सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी मुंबई स्थित ‘२००नॉट आऊट’ ही निर्मिती संस्था काम करत आहे तर पुरस्कार विजेते ब्रिटीश लेखक जेम्स एरस्किने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या वर्षाच्या शेवटी अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती निर्मिती संस्थेच्या प्रवक्त्यांनी यावेळी दिली. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. तर १०० शतके ठोकली आहेत.
0
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी पोट निवडणूक

मुंबई दि. ८ – विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांसाठी ३० जानेवारीला पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरूवारी केली. पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार हे विधानपरिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. तर विनायक मेटे यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या चार जागांवर आता पोट निवडणूक होणार आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुकीची आधिसूचना १३ जानेवारीपासून लागू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी असेल. त्यानंतर ३० जानेवारीला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी पाच वाजता मतमोजणी होईल. त्यानंतर विजयी उमेदवारांची घोषणा होईल.
पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांची जुलै २०१६ मध्ये संपणार होती. दोघांचीही मुदत एकाच दिवशी संपणार असल्याने या दोन जागांसाठी एकत्रीत निवडणूक होईल. आशिष शेलार यांच्या सदस्यत्वाची मुदतही जुलै २०१८ पर्यंत होती. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची एप्रिल २०२० पर्यंत मुदत होती. या दोघांचाही कार्यकाळ वेगळा होता. त्यामुळे या स्वतंत्र निवडणूका होतील त्यासाठी मतपत्रिकाही वेगळ्या असतील असे विधीमंडळ सचिवालया मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी २० ऑक्टोबर २०१४ ला विधानपरिषद सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. तर १३ ऑक्टोबरला अपात्र ठरवण्यात आले होते.
0
धान्य वाटपात गैरप्रकार आढळल्यास संबंधीतांवर कार्यवाही – राहुलरंजन महिवाल
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक, बसस्थानकावरील पेट्रोल पंपाची तपासणी
यवतमाळ दि. ८ : आर्थिकदृष्ट्या कमकूवत तसेच गरजू लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने स्वस्त दरात विविध योतजेअंतर्गत अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या वितरण व्यवस्थेत गैरप्रकार आढळल्यास संबंधीतांची गय न करता कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाळकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.काळे, सहाय्यक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्री.देशमुख यांच्यासह परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.नारायण मेहरे, नगरसेविका ज्योती खोब्रागडे, प्रा.केशव चेटुले, प्रा.राजेंद्र ठाकूर, नरेश पालारवार, अशोक उमरतकर, हितेश सेठ, भारत चव्हाण, गणपत काळे, बळवंत ठाकरे आदी उपस्थित होते. अन्नधान्य वाटपात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रारी केल्या पाहिजे. अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. साखर वाटप व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या वाटपावर बारकाईने लक्ष देण्याचा सुचना केल्या. ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्यांनी वितरण व्यवस्था सुरळीत सुरु राहवी म्हणुन सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले. बैठकीत जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच गॅस एजेंन्सीकडून विविध वस्तुंच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काही पेट्रोलपंपाना भेटी देवून तपासणी करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार यवतमाळ बसस्थानकावरील दोनही पेट्रोलपंपांवरील आवश्यक सुविधा व ग्राहकांना योग्यप्रमाणात पेट्रोल दिले जात आहे का याची पाहणी केली. या पाहणीत काही त्रुट्या आढळून आले अ सून त्याप्रकरणे संबंधीतांना नोटीस बजावण्यात येणार आहे.










