पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 14th, 2015

लाचखोर ठाणेदारासह मुख्याध्यापक ‘एसीबी’च्या जाळ््यात 0

लाचखोर ठाणेदारासह मुख्याध्यापक ‘एसीबी’च्या जाळ््यात

images-2
यवतमाळ, दि. १४ – जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून शनिवारी पाटणचे ठाणेदार व पोलीस नाईकाला तसेच पुसद येथील मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.
पाटण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ठाणेदार शिवाजी भद्दू अहिरे (४३) व पोलीस नाईक सुरेश निब्रड (४५) याने गुन्’ात पकडलेले ट्रॅक्टर सुर्पूतनाम्यावर सोडण्यासाठी तक्रारकर्त्याला १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यांनतर एसीबीच्या पथकाने दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पुसद येथील वसंतराव नाईक विद्यालयातील मुख्याध्यापक राम दिनकर बल्लाळ (५२) सहाय्यक शिक्षकाच्या वेतनातून दरमहा ३.५ टक्के रक्कम कपात करीत होते. सहा महिन्यापर्यंत रक्कम कपात केल्यानंतर सहाय्यक शिक्षकाने रक्कम कपात करण्यास नकार दिला. यावेळी मुख्याध्यापकाने शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापकाच्या त्रासाला कटांळलेल्या शिक्षकाने त्यांची भेट घेऊन चौकशी केली. यावेळी मुख्याध्यापकाने १६ महिन्याच्या वेतनातील ३.५ टक्केनुसार रक्कम व १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. कोणतेही कारण नसताना, पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापक वेठीस धरत असल्यामुळे सहाय्यक शिक्षकाने एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर ठरल्यानुसार १४ हजार रुपयाच्या रक्कमेतील पहिला सात हजार रुपयांचा टप्पा देण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकाच्या कक्षात गेला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पथकाने मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जिल्’ात लाचखोरांची संख्या दिवसंदिवस वाढत असून, पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर असल्याचे आजच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीष देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, नीलेश पखाले, प्रकाश शेंडे आदींनी केली.

 

March 14, 2015 in विदर्भ
 मोदी सरकार राजकीय हेरगिरी करतय – काँग्रेस 0

मोदी सरकार राजकीय हेरगिरी करतय – काँग्रेस

rahul-and-modi
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टिका केली आहे.
काँग्रेसने यासाठी भाजपाला जबाबदार धरले असून, सरकारने विरोधकांच्या आयुष्यात हेरगिरी चालवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली पोलिस राजकीय हेरगिरी करत असून, राजकीय विरोधकाच्या आयुष्यात अशा प्रकारची हेरगिरी, टेहळणी आणि अतिक्रमण हे गुजरात मॉडेल असू शकते पण हे भारतीय मॉडेल नक्कीच नाही अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर टिका केली.
दुस-या बाजूला दिल्ली पोलिसांनी आपल्या कृतीचे समर्थन करताना ही सुरक्षा तपासणी असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांना एसपीजीचे विशेष सुरक्षा कवच आहे हे नेहमीचे सुरक्षा ऑडिट होते.
कायदा-सुव्यवस्थेचा भाग म्हणून चौकशी करण्यात आली यात दुसरा कोणताही चुकीचा हेतू नव्हता असे दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस.बासी यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या तुगलक रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी केली होती.

 

March 14, 2015 in मुख्य पान
 तासगावमधून आबांच्या पत्नीला उमेदवारी 0

तासगावमधून आबांच्या पत्नीला उमेदवारी

2440_ncp3
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीपासूनच या जागेसाठी आर.आर.पाटील यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा होती. येत्या १७ मार्चला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असणारे आर.आर.पाटील यांचे मागच्या महिन्यात कर्करोगाने निधन झाले. सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहाकाळ हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपाने उमेदवार न देण्याचे आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.

March 14, 2015 in मुख्य पान
 राहुल गांधी दिसतात कसे 0

राहुल गांधी दिसतात कसे

images
नवी दिल्ली – तुमचा मुलगा कसा दिसतो?, उंची किती?, रंग?, कोणत्या रंगाचे कपडे घातले होते?, काही जन्मखूण वगैरे?, फोटो-बिटो आणलाय का?, असे प्रश्न पोलीस हरवलेल्या व्यक्तीविषयी विचारताना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिलंय, काहींनी प्रत्यक्ष अनुभवलंही असेल. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत ही माहिती घेणं गरजेचंही आहे. पण, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, अर्थात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतही असेच प्रश्न विचारण्याचा ‘पराक्रम’ दिल्ली पोलिसांनी केलाय. त्यावरून काँग्रेस भलतीच खवळली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचं एक पथक राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकलं. ते नेमके कशासाठी आलेत, हे कुणालाच कळेना. ते काही सांगायलाही तयार नव्हते. उलट, राहुल गांधी कसे दिसतात?, त्यांच्या डोळ्यांचा रंग कसा आहे?, केस कसे आहेत? असे प्रश्न विचारायलाच त्यांनी सुरुवात केली. ते ऐकून सगळेच चक्रावले. आता, दिल्ली पोलिसांच्या या चौकशीची तक्रार काँग्रेसनं पोलीस आयुक्तांकडेच केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी काही आठवड्यांची रजा घेऊन ‘आत्मचिंतना’साठी अज्ञातवासात रवाना झाले आहेत. २३ फेब्रुवारीपासून त्यांचं दर्शन कुणालाच घडलेलं नाही. राहुलबाबा देशात आहेत, की विदेशात, हे काँग्रेस नेत्यांनाही ठाऊक नाही. तसंच, ते खरंच आत्मचिंतनासाठी गेलेत आणि कुणावर नाराज होऊन गेलेत, याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच, दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या रंगरूपाची चौकशी करून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलंय.
राहुल गांधींची सगळी माहिती, फोटो इंटरनेटवर आहेत. ते खासदार असल्यानं संसदेतही त्यांच्याविषयीच्या सगळ्या नोंदी आहेत. असं असतानाही, दिल्ली पोलिसांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन नसती चौकशी करायची गरजच काय होती?, असा संतप्त सवाल काँग्रेसनं केला आहे. या चौकशीमागे काहीतरी कारस्थान किंवा खोडसाळपणा असावा, असं त्यांना वाटतंय. म्हणूनच, दिल्ली पोलीस आयुक्तांकडून त्यांनी याबाबतही माहिती मागितली आहे. याबाबत ‘टाइम्स’नं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकरणाचं काय होतं, पोलिसांनी ही चौकशी का केली असावी, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

March 14, 2015 in मुख्य पान
भारताचा झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय 0

भारताचा झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय

AP6_24_2013_000002B
ऑकलंड, दि. १४ – सुरेश रैना (नाबाद ११०) आणि कर्णधार धोनी (नाबाद ८५) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेले २८८ धावांचे आव्हान भारताने ४८.४ षटकांतच पूर्ण केले.
रोहित शर्मा(१६), शिखर धवन(४), विराट कोहली (३८), अजिंक्य रहाणे(१९) हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्यानंतर रैना व धोनीने तूफान खेळी कपत विजय अक्षरश: खेचून आणला.
रोहित शर्मा व शिखर धवनने भारताला सुरूवात तर चांगली करून दिली, मात्र ६व्या षटकांत ते दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १९ धावा काढून बाद तंबूत परतला. ३८ धावांची खेळी करणारा विराट कोहली तरी भारताला सावरेल आणि विजयाच्या समीप नेईल असे वाटत होते, मात्र सिकंदर रझाच्या गोलदांजीवर तोही बाद झाला आणि भारताने महत्वाचे चार गडी गमावले. त्यानंतर रैनाने धोनीच्या साथीने सावधपणे खेळून भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्या पनयानगराने २ तर सिंकदर रझाने १ बळी टिपला.
तत्पूर्वी ब्रँडन टेलरच्या १३८ धावांच्या शानदार खेळीमुळे झिम्बाब्वेने भारतासमोर जिंकण्यासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले. नाणफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. झिम्बाब्वेची सुरूवात संथ झाली आणि त्यांचे सलामीचे फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र त्यानंतर ब्रँडन टेलरने भारतीय गोलंदाजी चोपून काढत १३८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने पावणेतीनशे धावांचा टप्पा पार केला. भारतातर्फे मोहम्मद शमी, मोहित शर्मा व उमेश यादवने प्रत्येकी ३ तर आर. अश्विनने १ बळी टिपला.

 

March 14, 2015 in क्रीडा
 अश्लील चित्रफीत फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर 0

अश्लील चित्रफीत फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर

Facebook & Whatsapp
पुणे : संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली. तरुणीने यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
गिरीश श्याम सुगंध (वय ३५, रा. शांतीनगर, नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी वानवडी भागात राहण्यास आहे. ती मगरपट्टा येथील संगणक कंपनीत नोकरी करते. तिचे वानवडी भागात आईस्क्रीम पार्लर आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिची अश्लील चित्रफीत काढली. दरम्यान, आरोपी एक दिवस दारू पिऊन दुकानावर आल्यामुळे तिने त्याच्या कानाखाली मारली होती. तसेच त्याला नोकरीवरून काढले होते.
त्यामुळे चिडलेल्या गिरीशने ही चित्रफीत मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवली. तसेच फेसबुकवरही टाकली. याबाबत तिने त्याला विचारणा केल्यावर त्याने ही चित्रफीत फेसबुकवरून काढली. ती पुन्हा फेसबुकवर टाकण्याची धमकी द्यायला त्याने सुरुवात केली होती. तिच्याकडे वारंवार दोन लाख रुपयांची मागणी तो करू लागल्यावर पीडित मुलीने पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनांनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सायबर शाखेच्या सहायक निरीक्षक सीमा साठे यांनी आरोपीबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, तो पीडित मुलीला सारखे दिल्ली, मनमाड, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन बोलावीत होता. पीडित मुलीने त्याला आपल्याला लांब येणे शक्य नसल्याचे सांगून पुण्याला बोलावले. तो पुणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक अनिल पाटील यांनी उपनिरीक्षक मारुती भुजबळ, प्रशांत पवार, संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, रमेश गरुड, सिद्धार्थ लोखंडे, आनंद दळवी, हृषीकेश महल्ले यांनी सापळा लावला. स्टेशन परिसरात आलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

 

March 14, 2015 in मुख्य पान
झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई 0

झोपडपट्टीदादांप्रमाणे वाळूमाफियांवर कारवाई

3a12img_112812_sand11_240x180
मुंबई : मुजोर वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्ट (एमपीडीए) खाली वाळूमाफियांवरही कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केली. राज्याचे वाळू धोरण येत्या महिनाभरात जाहीर करण्यात येईल, असेही खडसे यांनी सांगितले. शेकापच्या जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील विनापरवाना वाळू उपशाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर पाटील यांनी वाळू माफियांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. महसूलमंत्री खडसे म्हणाले की, या कारवाया रोखण्याकरिता झोपडपट्टीदादांवर कारवाई करण्याकरिता केलेल्या एमपीडीए कायद्याचा निश्चित वापर केला जाईल. त्याकरिता आवश्यकता वाटल्यास त्या कायद्यात सुधारणा करु. वाळू उपशावर बंदी घालण्याबाबत एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. राज्याने आपले नवे वाळू धोरण जाहीर करावे, अशी सूचना या याचिकांच्या सुनावणीत पुढे आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, बिल्डर अशा सर्व संबंधितांशी चर्चा करून हे धोरण तयार केले जाईल, असे खडसेंनी सांगितले. कोकणातील जांबा दगड काढण्यावरील बंदीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकरांकडे झालेल्या बैठकीत मार्ग काढण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाळू काढण्याबाबतही निर्णय घेण्याचे आश्वासन खडसे यांनी दिले.

 

March 14, 2015 in मुख्य पान
गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविले 0

गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविले

peg
यवतमाळ : गुंगीचे औषध देऊन तरूणीला पळविल्याची घटना वडकी येथे उघडकीस आली असून, प्रितम शंकर ढवळे (२६) व अन्य तीन रा. चंद्रपूर अशी तरूणीस पळविणाºयांची नावे आहे. चंद्रपूर येथील प्रितमने युवतीशी लग्न करण्यासाठी गळ घातली होती. यावेळी तरूणीने त्याला विरोध केला. त्याने दोन मित्रांच्या मदतीने वडकी येथे येऊ न मुलीला बोलायचे आहे, असा बहाणा करून गुंगीचे औषध दिले व तिला पळवून नेले. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

March 14, 2015 in विदर्भ