पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 9th, 2015

 बोहल्यावर चढण्यापूर्वीच भूमिपुत्राची आत्महत्या 0

बोहल्यावर चढण्यापूर्वीच भूमिपुत्राची आत्महत्या

  • IMG-20150309-WA0051

     

     

     

     

     

     

     

     

    यवतमाळ, दि. ९ – बोहल्यावर चढण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतानाच भूमिपुत्र असलेल्या नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आर्णी तालुक्यातील मुकिंदपूर येथे घडली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्ययात्रेसाठी जाण्याची वेळ आली असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत जनार्धन इंगोले रा. मुकिंदपूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आईच्या नावाने ११ एकर शेती असून दोन वर्षापासून वडीलही आजारी आहे. त्यामुळे प्रशांत हा शेती करीत होता. यावर्षी निसर्गाच्या लहरिपणामुळे पिकाची नासाडी झाल्याने उत्पन्न कमी झाले होते. प्रशांतची उमरखेड तालुक्यातील कळमुला येथील युवतीसोबत साक्षगंधाही काही महिन्यापूर्वी पार पडले होते. ११ मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता. दोन्ही बाजूने लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. दोन दिवसावर लग्न असल्याने बहिणी, जावाई याच्यासह अन्य नातेवाईकही त्याच्याकडे आले होते. अशातच ८ मार्च रोजी रात्री बहिणी व मुलींनी प्रशांतच्या हातावर मेहंदी काढून दिली होती. यावेळी आपल्याकडे सोसायटीचे १ लाख ५० हजार रुपये कर्ज, ट्रॅक्टरचे चार लाख आणि लग्नासाठी घेतलेले कर्ज असल्याचे बहिणींना सांगितले. सदर कर्ज कसे फेडावे या बाबतच चिंता वाटत असल्याचेही त्याने बोलुन दाखविले. अशातच आज सकाळी प्रशांतने गावालगत शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ होऊनही तो घरी न दिसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली मात्र थागपत्ता लागला नाही. अशातच प्रशांतचा गावालगत शेतात मृतदेह आढळून आल्याने शोककळा पसरली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अत्यसंस्काराला जाण्याची वेळ आली.

बांगलादेशचा १५ धावांनी विजय 0

बांगलादेशचा १५ धावांनी विजय

mahamudulla

अॅडलेड- इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवत बांगलादेशने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बांगलादेशने अंतिम आठ संघांत स्थान पटकावले तरी गटवार साखळीच्या (अ गट) पाच लढतींमधील चौथ्या विजयाने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. मोहम्मद महमुदुल्लाहसह (१०३) मध्यमगती रुबेल होसेनने (४ विकेट) विजयात मोलाचा वाटा उचलला. २९ वर्षीय महमुदुल्ला हा विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकणारा बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला. योगायोग म्हणजे त्याचे वनडेतीलही हे पहिलेच शतक आहे.
ही लढत इंग्लंडसाठी ‘करा किंवा मरा’ अशी होती. गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली तरी फलंदाजांनी निराशा केल्याने बांगलादेशचे २७६ धावांचे आव्हान गाठताना इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत आटोपला. सलामीवीर इयन बेल (६३), मधल्या फळीतील जोस बटलर (६५) आणि ख्रिस वोक्सने (नाबाद ४२) मैदानावर तग धरताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले तरी रुबेल होसेनसह कर्णधार मश्रफे मोर्ताझा आणि तस्कीन अहमदच्या (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी मा-यामुळे रंगतदार लढतीत बांगलादेशने बाजी मारली.
इयन बेलने एक बाजू लावून धरली तरी अन्य सहका-यांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ३०व्या षटकांत ५ बाद १३२ धावा अशी इंग्लंडची अवस्था होती. सामना एकतर्फी होणार, असे वाटत असतानाच बटलर आणि वोक्सने सातव्या विकेटसाठी १०.१ षटकांत ७५ धावा जोडताना लढतीत रंगत आणली. मात्र बटलरची विकेट पडल्यानंतर इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. वोक्सने विकेट राखली तरी तळातील ख्रिस ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला एकाच षटकात बाद करताना रुबेल होसेनने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या खेपेसही गटवार साखळीत इंग्लंडला बांगलादेशने हरवले होते. शतकवीर महमुदुल्ला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, महमुदुल्ला (१३८ चेंडूंत १०३ धावा) आणि मुशफिकुर रहिमने (७७ चेंडूंत ८९ धावा) पाचव्या विकेटसाठी रचलेली १४१ धावांची विक्रमी भागीदारी बांगलादेशच्या डावाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अनुभवी जेम्स अँडरसनसह ख्रिस जॉर्डन (प्रत्येकी २ विकेट) तसेच स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अलीने (प्रत्येकी एक विकेट) ठराविक अंतराने विकेट घेतल्या तरी महमुदुल्ला आणि मुशफिकुर जोडीने जवळपास निम्मी षटके (२३.५) खेळून काढताना बांगलादेशला पावणेतीनशे धावांची मजल गाठून दिली. मात्र त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. अँडरसनने लागोपाठच्या षटकांत तमिम इक्बाल आणि इम्रुल कायेसला (प्रत्येकी २ धावा) झटपट माघारी धाडले. २ बाद ८ अशा अवस्थेतील बांगलादेशच्या मदतीला महमुदुल्ला धावला. त्याने सौम्य सरकारसह (४०) तिस-या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. त्यानंतर महमुदुल्ला आणि मुशफिकुरची पाचव्या विकेटसाठीची १४१ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. विश्वचषकात बांगलादेशतर्फे कुठल्याही विकेटसाठीची ती सर्वाधिक भागीदारी आहे. महमुदुल्लाला विश्वचषकातील पहिले शतक ठोकण्याची संधी स्कॉटलंडविरुद्ध होती. मात्र त्यावेळी ९५ धावांवर तो बाद झाला. फलंदाजीत सातत्य राखताना इंग्लंडविरुद्ध महमुदुल्लाने स्वत:च्या नावे एक विक्रम केलाच. १३८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह महमुदुल्लाने पहिले शतक साजरे केले.

March 09, 2015 in क्रीडा
स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने महीलेचा मृत्यू 0

स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने महीलेचा मृत्यू

SWINE FLU_1
यवतमाळ दि. ९ – पांढरवकडा शहरातील एका महीलेचा अज्ञात आजाराने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी स्वाईन फ्लूची धास्ती घेतली आहे.
ललीता शेखर वर्मा (४५) रा. पांढरकवडा असे मृतक महीलेचे नाव आहे. ८ मार्च रोजी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टांनी तपासणी करून आजाराचे लक्षणे स्वाईन फ्लू सारखी असल्याने सदर महीलेला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या असून मुंबई येथून वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी या महीलेचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी स्वाईन फ्लू या आजाराची धास्ती घेतली आहे.

March 09, 2015 in महाराष्ट्र
सायबर कॅफेत रासलीला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १२ जण ताब्यात 0

सायबर कॅफेत रासलीला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १२ जण ताब्यात

bcba719edbf63ee5b66baeca50ce-grande
यवतमाळ, दि. ९ – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चौकातील निक्स कॅफेत महाविद्यालयीन तरूण तरूणींची रासलीला सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने धाड टाकुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १२ जणांना ताब्यात घेतले आहे. आज सोमवारी ९ मार्च रोजी ही कार्यवाही केली असून युवकांजवळून गर्भनिरोधक साहित्य जप्त केले आहे.
सहा तरूणीसह पराग पुडके (२१) रा. जगदंबा मंदीरजवळ पुसद, शुभम राजेंद्र जयस्वाल (२०) रा. समर्थवाडी यवतमाळ, प्रवर मुनींद्र सहीर (१९) रा. पाटीपूरा, अतूल विनय राऊत (२१) रा. बांगरनगर, कौस्तूक प्रकाश बगमारे रा. जयप्रभात चौक माळीपूरा, स्वप्नील हरीभाऊ रामगीरवार (२५) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी व कॅ फे चालक स्वप्नील मधूकर उजवणे (२२) रा. चापनवाडी इत्यांदीना पथकाने ताब्यात घेतले आहे. स्थानिक जिल्हा शासकीय रुग्णालय चौकातील निक्स कॅफेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरूण, तरूणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहितीा आज उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून दुपारच्या सुमारास कॅफेवर धाड टाकली. यावेळी सहा तरूणी व सहा तरूण अश्लील चाळे करताना आढळून आले. कॅफेतून गर्भनिरोधक साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या कॅफेला अधिकृत परवानगी देखील नसून, केवळ महाविद्यालयीन तरूण, तरूणींसाठी हा कॅफे चालविल्या जात होता. पथकाने बारा तरूणतरूणीसह कॅफे चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इंजिनियरींग, लॉ चे विद्यार्थी असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात अन्य ठिकाणी देखील असाच प्रकार सुरू असून, यासाठी डिवाएसपीचे पथक विशेष मोहिम राबविणार आहे. हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, इकबाल शेख, संतोष मडावी, प्रमोद मडावी, रूतूराज मेढवे, परेश मानकर, शांता जांभूळकर, रेखा खंडाळकर आदींनी केली.

March 09, 2015 in महाराष्ट्र
 ट्रॅव्हल-कंन्टेनरची धडक, एक ठार, सात जखमी 0

ट्रॅव्हल-कंन्टेनरची धडक, एक ठार, सात जखमी

apghat1
यवतमाळ, दि. ९ – नेर तालुक्यातील लोहतवाडी (रत्नापूर) येथील आठ युवक होळी सण साजरा करून औरंगाबाद येथे जात असताना पुणे औरंगाबाद दरम्यान ट्रव्हल्स व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये एक युवक जागीच ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
लोहतवाडी येथील विलास किसन राठोड (२२), कैलास किसन राठोड (२५), निवृत्ती विठ्ठल राठोड (२३), मुन्ना विठ्ठल राठोड, राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव आदी मित्र औरंगाबाद येथे मोलमजुरीचे काम करतात. दरम्यान होळी हा उत्सव साजरा करण्यासाठी ते आपल्यागावी लोहतवाडी येथे आले होते. दरम्यान परिवाराची भेट घेऊन ते काल रात्री ट्रव्हल्सने जात असताना या ट्रव्हल्सला कंटेनरने धडक दिली. झालेल्या या भिषण अपघातात विलास किसन राठोड (२२) हा जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ कैलास राठोड, निवृत्ती राठोड, मुन्ना राठोड हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव हे चार किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोहतवाडीचे उपसरपंच बाबाराव राठोड यांनी दिली.

 

March 09, 2015 in महाराष्ट्र
संतप्त जमावाचा सहा तास चक्का जाम 0

संतप्त जमावाचा सहा तास चक्का जाम

DSCN1131
यवतमाळ, दि. ९ – भरधाव वाहनाने धडक दिल्याने लासीना येथील युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी गतीरोध बसविण्याची मागणी केली होती. मात्र सबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी आज सोमवारी लासीना येथे चक्का जाम केला.
सिमेंट घेऊन जाणाºया ट्रकने चिरडल्याने अभय गौतम सोनोने (२२) रा. लासिना या युवकाचा मृत्यू झाला होता. यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त करून गतीरोधक बसविण्याची मागणी केली होती. मात्र तीन दिवसानंतरही सार्वजनीक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. दरम्यान आज नागरिकांनी आज सोमवारी सकाळी १२ वाजता पासून चक्का जाम आंदोलन केले. या बाबतची माहिती मिळताच यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक विजय लघारे, नेरचे ठाणेदार गणेश भावसार, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास वांदिले तेथे दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता गतिरोधक तयार केल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाने यवतमाळ-अमरावती मार्गावरील वाहतुक सहा तास खोळंबली होती.

March 09, 2015 in विदर्भ
खा. अशोक चव्हाण यांनी स्वीकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार 0

खा. अशोक चव्हाण यांनी स्वीकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार

Assuming Charge 01
मुंबई, दि. 9 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सोमवार, दि. 9 मार्च 2015 रोजी पदाची औपचारिक सूत्रे स्वीकारली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दि. 2 मार्च 2015 रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली होती.
येथील दादरस्थित प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी नवनियुक्त अध्यक्षांना कार्यभार सोपवला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्री श्योराज जीवन वाल्मिकी यांच्यासह अनेक प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तत्पूर्वी खा. अशोक चव्हाण यांनी सिद्धीविनायक मंदीरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन व शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण केले.

March 09, 2015 in महाराष्ट्र
लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब 0

लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

Loksabah_election_377_1388918769
नवी दिल्ली, दि. ९ – फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. मसरतच्या सुटकेचा निर्णय मुफ्तींनी एकट्याने घेणे शक्य नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असावी असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. मात्र आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्याबद्दल सरकारला कुठलीही माहिती नव्हती व सराकार या निर्णयात केंद्र सरकार सहभागी नव्हते असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

March 09, 2015 in मुख्य पान
शेअर बाजार ३४० अंकांनी घसरला 0

शेअर बाजार ३४० अंकांनी घसरला

2015-03-03~06_ns
मुंबई – गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीवर भर दिल्याने सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४० अंकांची घसरण झाली.
बीएसई सेन्सेक्स २९,१०८.२६ अंकांवर होता तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,९०० च्या खाली घसरला. निफ्टीमध्ये १२७ अंकांची घसरण होऊन निफ्टी ८८१० अंकांवर होता.
आयटी, तंत्रज्ञान, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. शुक्रवारी रंगपंचमीमुळे शेअर बाजार बंद होता.
अन्य आशियाई शेअर बाजारातील निराशाजनक चित्र आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

March 09, 2015 in अर्थ
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती स्थापणार- तावडे 0

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती स्थापणार- तावडे

download AAKROSH Gad Kille
मुंबई : गड-किल्ले हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा असून आमचे सरकार गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. या अमूल्य ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.
महाराष्ट्रात तब्बल ३५० किल्ले आहेत. यापैकी ४९ किल्ले राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारने संरक्षक स्मारक घोषित केलेल्या किल्ल्यांची संख्या ही ४७ इतकी आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबतही योग्य पाठपुरावा करेल असे सांगतानाच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये निनाद बेडेकर, ऋषिकेश यादव आदी तज्ज्ञ मंडळींचा समावेश असेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. केंद्राकडे किल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी असून केंद्राच्या अखत्यारीतील किल्ल्यांसाठी राज्याकडून नक्कीच पाठपुरावा करणार असून, खासगी किल्ले जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करण्यात येतील, तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

March 09, 2015 in मुख्य पान
आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी - पंकजा मुंडे 0

आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी – पंकजा मुंडे

images a4802e0beeef468497dd6663e10f0ca5
मुंबई : आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यामुळे या नक्कीच सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेतील, असे गौरवोद्गार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी काढले. ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत, महिलांमध्ये जन्मत: उद्योजकतेचे बीज रुजलेले असते, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. उद्योग क्षेत्रातील महिलांनी उत्पादनातील उत्तम दर्जाला प्राधान्य द्यावे. शिवाय, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर उद्योगांसाठी करावा, असा सल्ला सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यांनी दिला.

March 09, 2015 in मुख्य पान