
यवतमाळ, दि. १५ – डोळ््यात मिरचीपूड टाकून ५० हजाराची रोकड पळविणाºया चोरट्यांच्या टोळीला चोविस तासाच्या आत मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. रोहित नरेश चव्हाण (२५) रा. भोसा रोड, देवानंद भिवनकर (२७) रा. कोळंबी, अर्जुन दुर्गे रा. यवतमाळ, लक्ष्मण लालसिंग राठोड (३२) रा. लोणीघाटाणा अशी चोरट्यांची नावे आहे.
पांढरी येथील कृषी केंद्र बंद करून विनोद रामराव लाखेकर (४३) रा. उमरसरा हे परत येत होते. दरम्यान चार चोरट्यांनी लाखेकर यांना रस्त्यात अडवून डोळ््यात मिरचीपूड फेकली. त्यांच्याजवळ असलेले मध्यवर्ती व स्टेट बँकेचे पासबुक, सातबारा, ५० हजार रुपये रोकड असलेली काळी बॅग असा ऐवज लुटला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी तपासाची तक्रे फिरविली. लुटमार प्रकरणी रोहित चव्हाण, देवानंद भिवनकर, अर्जुन दुर्गे, लक्ष्मण राठोड या चार चोरट्यांनी ताब्यात घेवून विचारपूस केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर लुटमार केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून काळ््या रंगाची बॅग, कागदपत्रे, रोख १८ हजार ४०० रुपये दोन मोटर सायकल असा एकूण ९८ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि कडू, विकास खडके, ओमप्रकाश यादव, सुनील खंडागळे, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, बबलू चव्हाण, ममता देवतळे, प्रदीप तांबेकर आदींनी केली आहे.
Archive for March 15th, 2015
0
लुटमार करणाºया चार चोरट्यांना मुद्देमालासह अटक
0
इचोरी घाटात दुचाकी चालकाला लुटले, राकाँच्या पदाधिकाºयांनी चोरट्यांना पकडले

यवतमाळ, दि. १५ – यवतमाळवरून दारव्हा येथे जाणाºया दुचाकीचालकाला अडवून लुटल्याची घटना आज रविवारी इचोरी घाटात सायंकाळी ५ वाजता घडली. या बाबतची माहिती मिळताच राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी पप्पु उर्फ विवेक गावंडे यांनी पाठलाग करून लुटमार करणाºया तिन्ही आरोपींना पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.
आशीष नागेलवार (२६) रा. लोणबेहळ ता. आर्णी हा युवक आपल्या दुचाकीने (एम. एच. २९/ यू ५१५) यवतमाळवरून दारव्हा येथे जात होता. अशातच आज रविवारी सायंकाळी ५ वाजता इचोरी फाट्याजवळ घाटात एम. एच. ३१/ ३७०८ क्रमांकाच्या पल्सरने आलेल्या तीन युवकांनी आशीषची दुचाकी अडवून मोबाईल व एक हजार ५०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. आशीषने हा प्रकार यवतमाळ येथील मित्र राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी विवेक गावंडे यांना दिली. त्यावरून गावंडे आपल्या सहकार्यासह दारव्हा मार्गाने निघाले. अशातच जांबवाडी येथील धाब्यावर पल्सर उभी दिसताच आरोपींना पकडून यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या ताब्यात दिले. नरेंद्र बाळकृष्ण सुखदेवे (३३), नरेंद्र वसंत रंगारी (२८) रा. इचोरी, सैय्यद अजमल सै. अमन (३५) रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
0
राज्यसरकारने घेतले दाभडीला दत्तक

ना. हंसराज अहीर यांची माहिती
आर्णी,दि. १५ – लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशातील शेतकºयांशी चर्चा केली होती. या घटनेला २० मार्च रोजी एक वर्षपूर्ण होत आहे. दाभडीत घडलेल्या शेतकरी आत्महत्येमुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. गावचा व शेतकºयांचा सर्वांगिन विकास करण्यासाठी राज्य सरकारने दाभडीला दत्तक घेतले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडीत ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्याच गावात शेतकरी आत्महत्या करीत असल्याने सर्वांचे लक्ष दाभडीकडे वेधले आहे. २० मार्च रोजी काँग्रेसचे नेते दाभडी येथे येवून आंदोलन करणार आहे. याकडे ना. अहीर यांचे लक्ष वेधले असता म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यांना आताच हे का आठवले असा प्रश्न ना. अहीर यांनी उपस्थित केला. आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या गावचा विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा करीत असल्याचे सांगितले.
जुन्या भूमिअधिग्रहण कायद्यापेक्षा नवीन कायदा अधिक चांगला आहे. शेतकºयांच्या हितासाठी असलेला कायदा मंजूर व्हावा म्हणून जीवाचे रान करू असेही ना. अहीर म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ना. अहीर यांनी केली. आज दुपारी जवळा, शेलू, किन्ही या गावात जावून शेतीची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ. प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे आदी उपस्थित होते.
0
ब्राझीलमध्ये बसला भीषण अपघात, ४२ ठार

रिओ दी जानेरो – दक्षिण ब्राझीलमध्ये रविवारी प्रवासी बस दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ४२ जण ठार झाले . घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रवक्ते क्लाडिओ थॉमस यांनी सांगितले.
दोना फ्रान्सिस या प्रसिद्ध टूरिस्ट पॉईंटपासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला. या बसमधून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिका-यांच्या माहितीनुसार यापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.ही बस सुमारे ४०० मीटर खोल दरीत कोसळली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अद्याप याबाबतचा तपास सुरु आहे. गेल्या पाच वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातात ६६ जणांचा मृत्यू झाला. याआधी २००७ मध्ये झालेल्या अपघातात २७ जण ठार झाले होते. १९९९ मध्ये झालेल्या अपघातात ३५ जण ठार झाले होते.
0
ना. धों. महानोर ‘महाराष्ट्रभूषण’

मुंबई – ‘या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे’ अशा तजेलदार शब्दांत जगण्याचे सूत्र मांडणारे ज्येष्ठ निसर्गकवी व गीतकार ना. धों. महानोर यांना शनिवारी अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये रंगलेल्या दिमाखदार ‘कोहिनूर मटा सन्मान’ सोहळ्यात जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘हा सन्मान तमाम शेतकऱ्यांचा आहे’ अशी कृतज्ञ भावना महानोर यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्यांच्या दाहक प्रश्नावर ‘आपुलकी’ या संस्थेच्या माध्यमातून अव्याहत काम करणारे अभिजित फाळके यांना ‘महाराष्ट्राचा यूथ आयकॉन २०१५’ या पुरस्काराने गेल्या वर्षीच्या ‘यूथ आयकॉन’ विजेत्या ऋजुता दिवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले; तर अत्यंत प्रतिकूल परिस्थतिीशी झगडत आपली कला सातासमुद्रापार पोहोचवणारा तरुण प्रतिभावंत चित्रकार शशकिांत धोत्रे याला ‘कोहिनूर समुहा’चे एमडी उन्मेश जोशी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोहिनूर’ या पुरस्काराने सन्मानति करण्यात आले. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
0
बोट दुर्घटना; ३३ ठार, अनेक बेपत्ता

यंगून : वायव्य म्यानमातील समुद्रात घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून जवळपास १२ जण बेपत्ता आहेत. लाटांच्या तडाख्याने ही दुमजली बोट (आंग तागुन-३) शुक्रवारी बुडाली. बचाव पथकाला १६७ लोकांना वाचविण्यात यश आले असून यापैकी बऱ्याच लोकांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आल्याचे म्यानमा रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख माऊंग खिन यांनी सांगितले. या दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता ही बोट क्याऊक्फू येथून रवाना झाली होती. ८० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर लाटेच्या तडाख्याने ही दुर्घटना घडली. मृतांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे.
0
3 कोटी 37 लाख रक्कमेची 184 भूसंपादन प्रकरणे निकाली

यवतमाळ, दि 15 : लोकअदालतींना दरवर्षी नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. हजारे प्रकरणे सहज या लोकअदालतीत निकाली निघत असल्याने वेळ व पैशाची बचत होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाच्या सुचनेप्रमाणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्यावतीने काल जिल्हा न्यायालयासह संपुर्ण तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत भूसंपादन व महसूल तथा मनरेगाची मिळून तब्बल 638 प्रकरणे निकाली निघाली.
जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली भूसंपादन तसेच प्रलंबित व वादपूर्व असलेली महसूल तथा मनरेगाची प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीत भूसंपादनची एकून 292 प्रकरणे ठेवण्यात आली होती. आपसी तडजोडीने यापैकी 3 कोटी 37 लक्ष रक्कमेची 184 प्रकरणे निकाली निघाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही प्रकरणे निकाली निघाल्याने पक्षकारांना वेळ व पैसा वाचला आहे. सदर रक्कम पक्षकारांना त्यांचे प्रकरण दाखल झाल्यापासून व्याजासह देण्यात येणार आहे. नापिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे.
या लोकअदालतील महसूल विभाग तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रलंबित व वादपूर्व 346 प्रकरणेही ठेवण्यात आली होती. त्यापैकी 144 प्रकरणे निकाली निघाली आहे. भूसंपादन, महसूल व मनरेगाची मिळून एकून 638 इतकी प्रकरणे निकाली निघाली. सदर राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनात प्राधिकरणाचे सचिव एस.एम.आगरकर यांनी यशस्वीरित्या आयोजित केले होते.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीस, महसूल व भूसंपादन विभागाचे अधिकारी, बेंबळा व इतर प्रकल्पाचे अधिकारी, जिल्हा सरकारी वकील पी.व्ही.गाडबैलै, वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, वकील सदस्य व पॅनलवरील सामाजिक कार्यकर्ते, प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0
घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन

यवतमाळ, दि. १४ – नगर परिषद क्षेत्रांतर्गत शासनाच्या विविध घरकुल योजनांची तात्काळ अंमलबजावणी करून बांधकामास सुरुवात करावी यासाठी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.
नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नागा) या संघटनेचे प्रमुख आनंद गायकवाड यांनी विधान भवन मुंबई येथे समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन देऊन समस्त घरकुल योजनाच्या विलंबाची माहिती दिली. अशोकनगर, डोर्लीपुरा, पाटीपुरा, अंबिकानगर या भागात समाजकल्याण विभागाची रमाई आवास योजना २०११-१२ मध्ये लागू झाली मात्र ३१३ लाभार्थ्यांपैकी केवळ ५९ घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे तर २५४ घरकुलांची प्रकरणे अजुनही थंडबस्त्यात आहे. यवतमाळ नगर परिषदेकडून लाभार्थ्यांच्या जागेचे अजुनही मोजमाप करणेच सुरू आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी रंजनकुमार महिलवार यांना निवेदन देऊन उपोषणाची सूचना दिली असता न. प. ने ताबडतोब कार्यवाही करण्याची लेखी हमी दिली परंतु न. प. अभियंत्यांकडे पूर्ण न. प. ची कामे असल्याने घरकुल योजनेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याचीही कल्पना मंत्र्यांना देण्यात आली. रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी ठरवितांना अजुनही चालढकल सुरू आहे. अशोकनगर येथील योजना आराखड्यातील रस्ता वगळण्याची कारवाई तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे. वस्तुत: आवास योजनेला केवळ नगररचना संचालकाच्या मंजुरीचीच गरज असताना प्रकरण उगीचच वाढविण्यात येत असल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत संपूर्ण लाभार्थी पात्र ठरवून घरकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.









