पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 29th, 2015

आगीत झेरॉक्स सेंटर खाक 0

आगीत झेरॉक्स सेंटर खाक

IMG-20150329-WA0170
दिग्रस, दि. २९ – झेरॉक्स सेंटरला लागलेल्या आगीत मशिनसह दस्तऐवज जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजता दरम्यान पंचायत समिती परिसरात घडली. यात तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पंचायत समिती बाजुला समृद्धी झेरॉक्स न्यू क्रांती बचत पुरूष गटाद्वारे चालविल्या जात होते. या ठिकाणी ४ झेरॉक्स मशीन, १ लॅमिनेशन मशीन व इतर कागदपत्रे आगीत जळून खाक झाली. या बाबतची तक्रार दिग्रस पो. स्टे. ला गजानन भोगराज राठोड यांनी दिली आहे.
आग लागल्याची घटना काही नागरिकांच्या लक्षात येताच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रफुल्ल व्यवहारे, नवलकुमार ठोंबे, अशोक जाधव, किशोर कांबळे, संजय पोटे, पकंज ढोले, सुर्वे, महल्ले, ठेकेदार, इम्रान पटेल, रावत इंजिनिअर, ग्रामसेवक मंगल अंबोरे आदींनी पुढाकार घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून ही आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही.

 

March 29, 2015 in विदर्भ
राज्यात गार, पावसाची शक्यता 0

राज्यात गार, पावसाची शक्यता

images
पुणे – थंडी, ऊन, पाऊस असा तिन्ही ऋतूंचा एकत्रित खेळ सुरू असलेल्या राज्यावर शनिवारी गारांचा मारा झाला. पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये गारांसह जोरदार पाऊस पडला. पुढील दोन दिवसात राज्यात कोकण वगळता अन्यत्र काही ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या उत्तर भागात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून वाहणारे थंड व कोरडे वारे आणि अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यांचा संयोग होऊन राज्यात पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारांसह पाऊस होत आहे. तर तामिळनाडू ते मध्य महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही भागात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यासह काही भागात सध्या पाऊस होत आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. यापैकी काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसराला वादळी पावसाने झोडपले. तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची धांदल उडाली. कोल्हापुरात विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहराला जवळपास तासभर झोडपले. सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले मात्र पाऊस पडला नाही.

लाचखोर श‌िपायाच्या घरात १० लाखांची रोकड 0

लाचखोर श‌िपायाच्या घरात १० लाखांची रोकड

images (1)
ठाणे – वाहनचालकाचे लायसन्स परत देण्याच्या बदल्यात तेराशे रुपयांची लाच घेणारा व‌िरारच्या वाहतूक शाखेचा श‌िपाई शंकर तनपुरे (३०) याच्या घर झडतीत चक्क १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रत‌िबंधक व‌िभागाच्या पालघरच्या पोल‌िसांनी तनपुरे याला अटक केली होती. तनपुरे यांनी तक्रारदाराकडे वाहनचालक लायसन्स परत देण्याच्या बदल्यात लाच घेतली होती. अटक झाल्यावर त्याच्या घराच्या झडतीत पोल‌िसांना १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळली. ही रोकड त्याने कशी म‌िळवली, याचा पोल‌िस शोध घेत आहेत.

 

March 29, 2015 in महाराष्ट्र
ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते 0

ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते

australia-team
मेलबर्न – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत रविवारी मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने आपणच जगज्जेते असल्याचे पुन्हा सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.
मेलबर्न मैदानावरील हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाने दिमाखात विश्वचषक उंचावला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघाने कर्णधार मायकेल क्लार्कला एकदिवसीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणा-या न्यूझीलंड संघाकडून त्यांच्या देशवासीयांना मोठी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडच्या संघाने अपेक्षाभंग केला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत न्यूझीलंड इतिहास रचणार असे वाटत होते. न्यूझींलंडचे हे स्वप्न अधुरेच राहिले.
विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून न्यूझीलंडने विजयाची मालिका कायम ठेवली होती. मात्र त्याला खिंडार पाडली ती ऑस्ट्रेलियाने. जगज्जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंडने ठेवलेले १८४ धावांचे सोपे आव्हान ऑस्ट्रेलियाने सात विकेट राखून पूर्ण केले आणि सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर न्यूझीलंड संघाने शरणागती पत्करल्याने त्यांचा डाव अवघ्या १८३ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार क्लार्कने आपल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शानदार ७४ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय क्रिकेटला निरोप दिला.
दुस-याच षटकांत आरोन फिंचच्या रुपाने न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र त्यातून सावरत डेविड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथने दुस-या विकेटसाठी ६१ धावा केल्या. ४५ धावांवर वॉर्नरला बाद करण्यात यश मिळाले. त्यानंतर कर्णधार क्लार्क आणि स्मिथ या जोडगोळीने ११२ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. क्लार्कनंतर खेळण्यासाठी मैदानात आलेल्या वॉटसनने स्मिथच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत १८३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी सोपे आव्हान ठेवले. जेम्स फॉकनर आणि मिचेल जॉन्सनच्या अचूक मा-यासमोर न्यूझीलंडच्या सरस फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. यंदाच्या विश्वचषकातील न्यूझीलंडचा दमदार फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी मोठे आव्हान ठेवेल असे वाटले होते. मात्र मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
न्यूझीलंडच्या ग्रँट एलियटने ८३ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बाकी खेळाडूंची अपेक्षित साथ लाभली नाही. न्यूझीलंडचे तब्बल सहा फलंदाज केवळ एक अंकी धावसंख्या करुन बाद झाले.
न्यूूझीलंडच्या ब्रँडेन मॅकक्युलमने नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मैदानावर फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जोरदार धक्का दिला. कर्णधार ब्रँडन मॅकक्युलम भोपळा न फोडताही परतला. विश्वचषकात द्विशतकी कामगिरी करणारा मार्टिन गप्टिल मोठी खेळी करेल असे वाटत असताना मॅक्सवेलने त्याला अवघ्या १५ धावांत तंबूत धाडले. तर विल्यमसन्स केवळ १२ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर न्यूझीलंडच्या ग्रँड एलियटने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर संघाचा डाव सावरला. एलियटने ५१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पहिले तीन विकेट झटपट गमावल्यानंतर एलियट आणि टेलरने मैदानावर जोडी जमवत संघाचा डाव सावरला. मात्र टेलर बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंड संघाला गळतीच लागली. कोरे अँडरसन आणि ल्युके राँचीला शून्यावर बाद करण्यात ऑसी गोलंदाजांना यश आले. तर व्हेटोरीने केवळ नऊ धावा केल्या. एकीकडे बाकीच्या फलंदाज झटपट गाशा गुंडाळत असताना ग्रँट मैदानावर दुस-या बाजूला एकाकी किल्ला लढवत होता. ग्रँटने ८१ चेंडूत ८३ धावा केल्या संघाला दीडशे पार नेले. न्यूझीलंडची ३५ व्या षटकांत तीन बाद १५० ही धावसंख्या होती. त्यानंतर पुढील ३३ धावांत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे तब्बल सात गडी बाद केले. आणि न्यूझीलंडचा डाव १८३ धावांत संपुष्टात आला.

 

सायनाने प्रथमच जिंकली इंडिया ओपन सुपरसिरीज 0

सायनाने प्रथमच जिंकली इंडिया ओपन सुपरसिरीज

Yonex Sunrise India open
नवी दिल्ली- अव्वल रँकिंग निश्चित करणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरल्यावर सायना नेहवालने रविवारी आणखी एक इतिहास घडवला. इंडिया ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना पहिली भारतीय ठरली. याबरोबरच सायनाने तिचा अव्वल रॅँकिंगचा आनंद द्विगुणित केला.
सायनाच्या अव्वल रॅँकिंगवर अधिकृतपणे गुरुवारी शिक्कामोर्तब होईल. तत्पूर्वी, सायनाने रविवारी अंतिम फेरीत तिसरी सीडेड थायलंडच्या रॅचनॉक इंटॅनॉनचा २१-१६, २१-१४ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला.
सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व सायनाने जेतेपदावर शिक्कामोर्तब होईपर्यंत कायम ठेवले. २०११पासून इंडिया ओपनला सुपरसिरीजचा दर्जा मिळाला आहे. मात्र तेव्हापासून महिला एकेरी, पुरुष एकेरी किंवा दुहेरी अशा कोणत्याही प्रकारात भारतीयाने घरच्या प्रेक्षकांसमोर अंतिम फेरीही गाठली नव्हती.सायनाचीही या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी याआधी म्हणजे गेल्यावर्षी गाठलेली उपांत्यपूर्व फेरी होती. यंदा मात्र सुरुवातीपासून सायनाने प्रभावी खेळ केला.

फलोत्पादन अभियानाच्या शेडनेटने आणली समृध्दी , काकडी, टोमॅटोचे उत्पादन 0

फलोत्पादन अभियानाच्या शेडनेटने आणली समृध्दी , काकडी, टोमॅटोचे उत्पादन

unnamed
यवतमाळ, दि. २९ आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पादनात कमालीची वाढ होवू शकते, हे आता जवळजवळ प्रत्येकच शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अत्याधुनिक साधनांसह शेडनेटसारख्या बाबींचा वापर करतांना दिसत आहे. बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा या गावातील एका शेतकऱ्याने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातुन उभारलेल्या शेडनेटने आपल्या शेतात समृध्दीचा मळा फुलविला आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक पिकांना मोठ्याप्रमाणावर फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकाशिवाय पर्याय राहिलेला नाही, हीच बाब बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा येथील शेतकरी प्रमोद डफळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली शेती फळपिकाकडे वळविली. डफळे हे उच्च शिक्षीत शेतकरी असून आपल्या शेतीसच त्यांनी शिक्षणाची जोड दिली आहे. आत्मा योजनेतंर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी फळपिकांचा अभ्यास दौरा केला होता. त्याप्रमाणे फळपिक घेण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यासाठी शेडनेट चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपल्या 30 आर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली.
सन 2012 मध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानातंर्गत शेडनेटसाठी त्यांना 50 टक्के अनुदान मिळाले. शेडनेटमुळे पिकांना लागणारे वातावरण नियंत्रित करता आले. खुप जास्त व कमी तापमान तसेच पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासोबतच हंगामाशिवायही शेडनेटमुळे पिके घेता येणे शक्य झाल्याने त्याच आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.
श्री.डफळे यांनी पहिल्यावेळी शेडनेटमध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी काकडीची लागवड केली. सध्या काकडी पिकाचे दुसरे उत्पादन ते घेत आहे. या पिकासाठी त्यांना 50 हजाराचा खर्च आला तर 15 दिवसात त्यांना 1 लाख 25 हजाराचे उत्पन्न मिळाले. दोन महिन्यामध्ये त्यांना काकडी पिकापासून एकूण 3 लाख 50 हजार रुपये इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. काकडीचे उत्पादन ते यवतमाळच्या बाजारपेठेत करतात. काकडीसोबतच डाळींब, संत्रा व चारापिकेही ते घेतात. त्यांच्याकडे 30 जनावरे असून त्यात 15 जरसी गायींचा समावेश आहे. काकडीच्या यशस्वी प्रयोगानंतर कारले व पालकाचे उत्पादन शेडनेटमध्ये घेणार असल्याचे ते सांगतात.

ग्रामपंचायत निवडणूकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन - राहुल रंजन महिवाल 0

ग्रामपंचायत निवडणूकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन – राहुल रंजन महिवाल

images-13
यवतमाळ , दि. २९ : जिल्ह्यातील मे व आगस्ट या महिन्यांमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तथा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या धर्तीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी म्हणाले.
जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या 663 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर 81 ठिकाणी रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॅा.शरद कुलकर्णी, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता श्री.काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे आदी उपस्थित होते. सदर ग्रामपंचायत निवडणूका 2011 च्या जनगणनेनूसार घेण्यात येत असून यासाठी इलेक्टॅानिक मतदान यंत्र वापरण्यात येत आहे. निवडणूकीनिमित्त लावण्यात आलेली आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीच्या संपुर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणूकीसाठी प्रभागाच्या क्षेत्रात लागू राहतील, असे बैठकीत सांगण्यात आले.

March 29, 2015 in विदर्भ
बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारावर भर - पालकमंत्री संजय राठोड 0

बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारावर भर – पालकमंत्री संजय राठोड

_DSC0514
यवतमाळ , दि. २९ : कळत न कळत अनेकांकडून गुन्हा घडत असतो. अशा गुन्ह्यात काहींना बंदी व्हावे लागते. परंतु हे बंदीही शेवट माणूसच असतात. बंदी मुक्त झाल्यानंतर अशा व्यक्तींना समाजाकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तींकडे वेगळया नरजेतून न पाहता स्वयंरोजगारांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कारागृहाचे अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी, परमानंद अग्रवाल, तुरुंग अधिकारी श्री.भांबरे, शोभा बाविस्कर, ॲड.विनीत ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी कारागृहातून मुक्त झालेले वसंत नारायण मिलमिले, दिपक नारायण ससाने, चंद्रशेखर नारायण मुंदे, सलीम शाह मज्जीद शाह, सुरेश विठ्ठलराव एकोणकार यांना प्रत्येकी पाच हजार रूपयाच्या अर्थसहाय्यचे वितरण करण्यात आले. शासनाच्यावतीने बंदीबांधवांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येत असलेली पाच हजाराची रक्कम कमी असून ही रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.राठोड म्हणाले. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बंदीबांधवांना पुनर्वसनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अभ्यास करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
एखादी व्यक्ती कारागृहात असतांना त्यांचे कुटुंब अडचणी असते. अशा कुटुंबांना मदत देण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. कारागृहात बंदी मुक्त वातावरणात राहिल्या पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर राहणार असून कारागृह प्रशासनाने त्याबाबतीत अवगत करावे. बंद्यांना अडचणी असल्यास त्यांनी हक्काने सांगाव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी परमानंद अग्रवाल यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी यांनी तर संचलन धनंजय नंदपटेल यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहास भेट देवून तेथील भोजनव्यवस्थेची तसेच त्याच्या दर्जेची पाहणी केली. तसेच बंदी वास्तव्यास असलेल्या बॅरेक्स व तेथील सुविधांची माहिती घेतली. कार्यक्रमास जवळपास 250 ते 300 कैदी बांधव उपस्थित होते.

March 29, 2015 in विदर्भ