यवतमाळ – यवतमाळ- वाशिम लोकसभा मदरारसंघासाठी आज दिनांक 25 मार्च रोजी गोवींद देवाजी चव्हाण या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्या दिनांक 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिनांक आहे.
चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 39 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहे. उद्या शेवटच्या दिवाशी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात यावर निवडणूक रिंगणातील अंतीम उमेदवार ठरणार आहे.
Archive for March 25th, 2014
एका अपक्ष उमेदवाराची माघार
0
अमरावतीत ८७ वाघनखे, कस्तुरी जप्त

अमरावती – शहरातील नेहरू मैदानावरील गांधी शिल्प बाजार या हस्तकला प्रदर्शनातून रविवारी वनविभागाने ८७ वाघनखांसह मौल्यवान कस्तुरी जप्त केली. या प्रकरणी कर्नाटकातील जितुनाथ काकम आणि यारबी या दोघांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर येथील दलित मुस्लीम मागासवर्गीय युथ फेडरेशनने नेहरू मैदानात १५ मार्चपासून गांधी शिल्प बाजार हे हस्तकला प्रदर्शन भरविले आहे. येथे शंभरांवर स्टॉल्समधून रोझ वूड, सँडल वूड फिगर, कलमकरी पेंटिंग, खादी ड्रेसेस, सॉफ्ट टाॅइज, ग्लास पेंटिंग, वूड कटलरी असे विविध साहित्य विक्रीस ठेवले आहे. येथे वाघ नखे आणि कस्तुरीचीही चोरटी विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारी वनसंरक्षक सोमराज यांच्या नेतृत्वातील पथकाने येथे छापा घातला आणि सहाव्या क्रमांकाच्या स्टॉलमधून ६० तर १४ क्रमांकाच्या स्टॉलमधून २७ वाघ नखे जप्त केली. वाघनखांसोबतच मौल्यवान कस्तुरीही जप्त करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली. जप्त वाघनखे खरी की खोटी, हे तपासण्यासाठी हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
0
दोन अभयारण्ये खुली

नागपूर – उन्हाळ्यात सर्वत्र पर्यटनाची चाहूल लागते. अशावेळी विदर्भात पर्यटनाची अमाप संधी असतानाही वैदर्भीयांना बाहेरील पर्यटनस्थळे खुणावतात. मात्र, येथील पर्यटकांना येथेच थांबवून ठेवण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. दोन महत्त्वाची अभयारण्ये खास उन्हाळ्यासाठी २१ मार्चपासून वैदर्भीयांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहेत.
२५० चौरस किमी क्षेत्रफळावर विस्तारलेल्या उमरेड-कऱ्हांडला या वन्यजीव अभयारण्याला केंद्र सरकारने मागीलवर्षीच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर अनेकांची या अभयारण्याला भेट देण्याची इच्छा होती. त्यामुळे वन विभागाने खापरी प्रवेशद्वारातून हे अभयारण्य खुले केले आहे. यानुसार, सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान प्रवेश घेऊन ११ वाजतापर्यंत बाहेर यावे लागेल. त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान प्रवेश घेऊन सायंकाळी ६ वाजता परत यावे लागेल. अभयारण्याजवळील पवनी येथे शनिवारी आठवडी बाजार असल्याने तो दिवस सोडून अन्य दिवशी हे अभयारण्य सुरू असेल. यासोबतच देवलापार येथील मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य हा तब्बल ७५७ चौरस कि.मी .क्षेत्रफळाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. हे अभयारण्यदेखील आता निसर्गप्रेमींसाठी सुरू करण्यात आले आहे. या अभयारण्यातदेखील वाहनांना उमरेड-कऱ्हांडलाच्या वेळेनुसारच खुर्सापार प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. अभयारण्याजवळील पवनी येथे बुधवारी आठवडी बाजार असल्याने तो दिवस सोडून अन्य दिवशी हे अभयारण्य सुरू असेल
0
‘ते’ विमान कोसळले

क्वाललांपूर – गेले १७ दिवस २३९ प्रवाशांसह बेपत्ता असलेले मलेशिया एअरलाइनचे विमान दक्षिण हिंदी महासागरात कोसळले असल्याचे मलेशियचे पंतप्रधान नजिब रझाक यांनी सोमवारी जाहीर केले. त्यांच्या या घोषणमुळे गेले १७ दिवस सुरू असलेली विमानाबद्दलची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. दरम्यान, विमान कोसळल्याच्या अधिकृत घोषणेनंतर प्रवाशांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. इतके दिवस आपले जीवलग परत येतील, अशी त्यांना असलेली आशा यामुळे मावळून गेली.
एमएच३७० हे दक्षिण हिंदी महासागरात कोसळले असल्याचे जाहीर करताना आम्हाला अत्यंत खेद होत असल्याचे त्यांनी विशेष पत्रपरिषदेत म्हटले आहे. ब्रिटिश सॅटेलाइट कंपनी इन्मरसॅटने दिलेल्या माहितीनुसार हे विमान हिंदी महासागराच्या दक्षिण टापूत दिसल्याचे नोंदवण्यात आले आहे. मलेशिया एअरलाइन्सचे बोइंग७७७- २०० हे विमान ८ मार्चला २३९ प्रवाशांसह बेपत्ता आले होते. यात पाच भारतीय प्रवशांसह एका भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे. ब्लॅक बॉक्स शोधासाठी अमेरिकन नौदलाने ‘टीपीएल२५’ ही यंत्रणा या भागात तैनात केली आहे. या यंत्रणेमुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यास मदत होईल. २० हजार फूट खोलीपर्यंतचे अवशेष शोधण्यासाठी या यंत्रणेचा फायदा होऊ शकतो. मात्र, या भागात विमान कोसळल्याचे ठोस पुरावे मिळाले तरच या यंत्रणेचा फायदा होऊ शकेल.
0
‘हर हर मोदी’ न्यायालयात

वाराणसी – एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात दिल्या जाणाऱ्या ‘हर हर मोदी… घर घर मोदी…’ या घोषणेचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. सेंट्रल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोजकुमार दुबे यांनी याप्रकरणी याचिका दाखल करून भाजप नेत्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा झाल्यापासून यूपीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याच उत्साहातून कार्यकर्ते ‘हर हर मोदी… घर घर मोदी…’ ही घोषणा देत आहेत. मात्र, त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेस, सपा व आम आदमी पक्षाने या घोषणेस हरकत घेतली आहे. हा देवाचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी, यूपी भाजपचे प्रभारी अमीत शहा, वाराणसीचे महापौर रामगोपाल मोहले यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. मतांसाठी भाजप ‘हर हर महादेव, घर घर महादेव आणि कण कण महादेव’ या घोषणेचे विकृतीकरण करत असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ही घोषणा पक्षाची अधिकृत घोषणा नसल्याचे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विटरवरून कार्यकर्त्यांनी अशी घोषणा देऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
0
केजरीवालांच्या गाडीवर अंडाफेक

वाराणसी- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी वाराणसीत दाखल झालेल्या अरविंद केजरीवाल यांना ठिकठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आधी काशी येथे विश्वनाथ मंदिराबाहेर त्यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली तर नंतर शाईफेकीलाही त्यांना सामोरे जावे लागले.
वाराणसी येथील भोजूबीर भागात भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना मोठा विरोध केला. केजरीवाल दिल्ली सोडून वाराणसीत पळून आले आता आम्ही वाराणसीतूनही त्यांना पिटाळून लावणार, असे सांगत कार्यकर्ते केजरीवालविरोधी घोषणा देत होते. टागोर टाउन कॉलनीतील एका कार्यकर्त्याच्या घरी केजरीवाल गेले असता तेथे आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. त्यानंतर विश्वेश्रगंज येथील काळ भैरव आणि विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या केजरीवाल यांनाही भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ चकमकही उडाली.’आप’मधून बाहेर पडून स्थापन झालेल्या आम आदमी सेनेनेही केजरीवाल यांच्या वाराणसी दौऱ्याचा विरोध केला असून प्रत्यक्ष सभेतही मोठा हंगामा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.वाराणसीतील बेनियाबाग मैदानात केजरीवाल यांची सभा होत आहे. यावेळी ते वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, केजरीवाल वाराणसीत दाखल झाल्यापासून स्वागत आणि विरोध अशा दुहेरी चित्रामुळे पोलिसांची पुरती दमछाक झाली आहे. केजरीवाल यांच्या सभास्थानीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
0
इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन याला अटक

नवी दिल्ली – भारताच्या प्रमुख शहरांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मुख्य आरोपी व इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या काकडविट्टा येथून दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘बॉम्बमेकर’ वकास याच्या अटकेनंतर लगेचच अख्तर जाळ्यात अडकल्याने मुजाहिदीनचे कंबरडे मोडले आहे.
वकास याच्या अटकेनंतर सैरभैर झालेला मोनू पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मोनू हा एनडीएनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार होता. यासीन भटकळ याच्या अटकेनंतर इंडियन मुजाहिदीनची सर्व सूत्रे तहसीनकडे आली होती. तोच या संघटनेचा म्होरक्या होता. मुंबईत २०११ साली झालेले बॉम्बस्फोट, बोधगया स्फोट आणि पुणे बॉम्बस्फोटांतही तहसीनचा हात होता, अशी सूत्रांची माहिती आहे.









