पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 3rd, 2014

‘लोकशासन’ मोर्चा तहसीलवर धडकला 0

‘लोकशासन’ मोर्चा तहसीलवर धडकला

DSC08391

यवतमाळ –  केंद्र व राज्य शासनाने जाहर केलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी, भुमिहीन,शेतकरी, शेतमजुरांच्या विविध समस्या निकाली काढावी यासह विविध मागण्यासाठी ‘लोकशासन आंदोलन’ संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक दिली. न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले असून तहसील प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व विकासााची समान संधी मिळवून देणे हे केंद्र व राज्य शासनाच्या मुलभूत कर्तव्य आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेणे ही सत्ताधारी व विपक्षांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी कल्याणकारी योजना राबवून घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. केंद्रसरकारने भूमिहीनांना जमिन देण्याचे मान्य केले होते. मात्र महाराष्टÑताील केंद्रीय मंत्री या योजनांना विरोध करीत होते. कल्याणकारी योजना राबविण्यात देश पातळीवर अत्यंत खालच्या क्रमांकावर आहे असा आरोप न्या. पाटील यांनी केला. शेतकरी, शेतमजुर, भूमिहीन, अल्पभूधारक, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत, अपंग निराधा, वृद्घांना विविध समस्तेतून गरीबांची मुक्ता व्हावी यासाठी ‘लोकशासन आंदोलन’ संघटनेने येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी दारिद्रय रेषेच्या यादीतून वगळण्यात आले त्यांचा या यादीत समावेश करावा, अन्नसुरक्ष कायद्याप्रमाणे कुटूंबातील प्रत्ये व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत द्यावे, ठरावीक मुदतीत दारिद्र रेषेच्या यादीत समावेश केला नाही तर सबंधिता अधिकाºयावर दप्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. या मोर्चाने तहसील प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांकडून पिवळे रेशन कार्डसाठी अर्ज भरून तहसीलदारांच्या स्वाधिन केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकशाही दिनात ७४ तक्रारी

यवतमाळ- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांनी विविध विभागाशी संबंधित ७४ तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यकायर्कारी अधिकारी, तसेच अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी मागील लोकशाही दिनातील ४० तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.आज लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी दाखल झालेल्या ७४ तक्रारीमध्ये महसुल विभागाच्या २३, जिल्हा परिषद २७, पाटबंधारे ६, भुमी अभिलेख ३, वनविभा्ग ३, महाराष्ट्र राज्य विज वितरण २, सहकार २, नगर परिषद १, सार्वजनिक बांधकाम १, जिवन प्राधिकरण १, व इतर विभागाच्या दोन तक्रारींचा समावेश होता. प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश लोकशाही दिनाच्या कामकाज प्रसंगी संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आले. या लोकशाही दिनाच्या कामकाजास इतर विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक , एक ठार

 

वणी (यवतमाळ)- तालुक्यातील विकास कामाच्या भूमी पूजनाकरीता घोन्सा या गांवाकडे जात असलेल्या आमदाराच्या ताफ्यातील आमदार पुत्राच्या वाहनाची दुचाकीला धडक लागून ३५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना दि़३ मार्चला दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली़.
आचार संहितेचा धसका घेवून विद्यमान आमदारांनी विकास कामाच्या भूमीपूजनाचा धडाका लावला आहे़ एकाच दिवशी अनेक गांवात भूमी पूजन असल्याने वेळेत पोहचण्याची घाई आमदारासह कार्यकर्त्यांना झाली आहे़ यामुळे भरधाव वेगाने वाहने चालविण्याची वेळ त्यांचावर येवून ठेपली़ यामुळेच रासा गांवाजवळ निष्पाप वेकोली कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागला़
येनक गांवातील युवक वेकोलीच्या कुंभारखाणी वसाहतीत वास्तव्यास आहे़ तो व त्याचा मित्र दुचाकी क्ऱएमएच ३४ एएच २३०१ या वाहनाने वणीकडे कामानिमित्त जात असतांना विरुध्द दिशेने भरधाव वेगात येत असलेले आमदार पुत्राचे बोलेरो वाहन क्ऱएमएच २९ एडी ५०५ हे रासा येथील वरारकर यांच्या शेताजवळील वळणावर अचानक पुढे आल्यामुळे दुचाकी चालक साईनाथ ठाकरे याने करकच्चून ब्रेक मारला़ मागे बसलेले गंगाधर रामू सोनटक्के उसळून चारचाकी वाहनापुढे पडल्याने ते चिरडल्या गेले़ गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले़ तर वाहन चालक प्रशांत वल्लपकर यांचेवर पोलीसांनी भादवी कलम २७९, ३०४ अ, अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली़
यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर वेकोली युनियनचे सदस्य व मृतकाच्या नातेवाईकांनी आर्थीक मोबदला मिळाल्याशिवाय शवविच्छेदन करु देणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही वेळ ग्रामीण रुग्णालयासमोर वातावरण संतत्प झाले होते़.

 

 

एप्रिलच्या दुस-या आठवडयात लोकसभेचा रणसंग्राम ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कुठल्याही दिवशी अचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, सर्वच राजकीय पक्षांनी विकासकामाच्या उदघाटनाचा धडाका लावला आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दुस-या आठवडयापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे.
७ ते १० एप्रिलदरम्यान पहिल्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. यंदा प्रथमच सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीची २००९ ची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये झाली होती.निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, या आठवडयातच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. संवेदनशील नक्षलग्रस्त भागांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होऊ शकते. आंध्रप्रदेश, नव्या अस्तित्वात आलेल्या तेलंगणमध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणूका होऊ शकतात. लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण देशभरात आठ लाख मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

March 03, 2014 in देश-विदेश

न्यायालयाच्या आवारात गोळीबार, ११ जणांचा मृत्यू

इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराने वझरिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडल्यानंतर दहशतवाद्यांनीही पाकिस्तानात रक्तपातास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याने इस्लामाबादमधील स्थानिक न्यायालयाच्या आवारात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात न्यायाधीश रफाकत अवान यांच्यासह अकराजणांचा मृत्यू झाला आहे. २५ जण जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा पथके पाठवण्यात आली आहेत. हा दहशतवादी अजूनही न्यायालयाच्या आवारात असून, पाकिस्तानी रेंजर्सनी न्यायालयाच्या परिसराला वेढा घातला असून, शोध मोहिम सुरु आहे. हल्लेखोराने दोन ग्रेनेडचाही वापर केला.

March 03, 2014 in देश-विदेश
इस्टरच्या मारेक-याला अटक 0

इस्टरच्या मारेक-याला अटक

Esther
मुंबई – टीसीएस कंपनीची कर्मचारी इस्टर अनुह्या (२३) हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये चंद्रभान सानप याला अटक केली आहे. मूळचा नाशिकचा असलेला चंद्रभान सानप याला याआधीही रेल्वे मार्गावर चो-या करणे, दरोडे घालणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. सानपनेच इस्टरची हत्या करुन तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत तिवराच्या जंगलात टाकून दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन पोलिस आणखी माहिती देणार असल्याचे समजते.
गोरेगाव येथील टीसीएसच्या ऑफिसमध्ये काम करणारी आणि मूळची हैदराबादची असलेली इस्टर ५ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता कुर्ला टर्मिनस येथे उतरली आणि १६ जानेवारी रोजी तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तपासासाठी पोलिसांनी कुर्ला टर्मिनस स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज पाहून एका व्यक्तीचा शोध सुरू केला होता. अखेर ही व्यक्ती चंद्रभान सानप असल्याचे उघड झाले आणि सापळा रचून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.अनुह्या रेल्वे स्टेशानात उतरल्यानंतरचे विशिष्ट मोबाइल टॉवर लोकेशनवरील शेकडो कॉल्स, अनुह्याच्या मोबाइलमधून रिकव्हर केलेल्या डेटा, तिच्या मित्रमंडळींचे आणि संशयीतांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर), सासीटीव्ही अशी ब-याच तांत्रिक बाबी तपासल्यानंतर अखेर पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले आणि इस्टरच्या मारेक-याला शोधून काढले.

March 03, 2014 in महाराष्ट्र
माओवाद्यांचा पोलिस केंद्रावर हल्ला 0

माओवाद्यांचा पोलिस केंद्रावर हल्ला

images.jpeg2
गडचिरोली – एटापल्ली उपविभागातील पोमके हेडरी पोलिस मदत केंद्रावर शनिवारी रात्री १.३० वाजता सशस्त्र माओवाद्यांनी हल्ला चढविला. यात सुदैवाने पोलिस विभागाची कोणतीही हानी झाली नाही. मदत केंद्रावरील सतर्क पोलिसांनी माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी जवळपास अर्धा तास गोळीबार सुरू होता. अखेर पोलिसांचा वाढता दबाव पाहता हल्ला यशस्वी होत नसल्याचे दिसताच अंधाराचा फायदा घेऊन माओवादी पसार झाले. मदत केंद्रावरील पोलिसांना संपविण्याची माओवाद्यांची योजना होती. हा हल्ला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पाळत ठेवून करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने माओवाद्यांचे मनसुबे उधळले गेले. चकमकीनंतर पोलिसांनी परिसरातून २ क्लेमोरमाइन, २ हॅण्ड ग्रेनेड हस्तगत केले.

March 03, 2014 in मुख्य पान
वेगळ्या विदर्भासाठी आयोग हवा 0

वेगळ्या विदर्भासाठी आयोग हवा

vidarbha_map
नागपूर – व्हाट्स अॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमाने विदर्भवादी एकत्रित आले असून त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा पिल्लई समितीकडे द्यावा अशी मागणी केली आहे. विदर्भ कनेक्ट या ग्रुपची रविवारी अधिकृत बैठक झाली. त्या बैठकीत वेगळ्या विदर्भ राज्याच्या स्थापनेकरिता सामूहिक प्रयत्न करण्याचा ठराव मंजूर झाला.
‘आम्ही विदर्भाचे नागरिक केंद्र सरकारला विनंती करतो की, बोडोलॅन्ड राज्याच्या शिफारशीकरिता स्थापन केलेल्या माजी गृह सचिव जी.के. पिल्लई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा मुद्दाही सादर करावा’, असे ठरावात नमूद केले आहे. त्या ठरावाची प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सादर करण्यात येणार आहे. व्हाट्स अॅपवर शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी विदर्भ कनेक्ट ग्रुपवर आले आहेत. त्यात विदर्भ जनकल्याण परिषद (वेद), विदर्भ पर्यावरण कृती गट (व्हीईएजी), जनमंच, नागपूर श्रमिक पत्रकार संघ (एनयुडब्लूजे) युथ फॉर विदर्भ, विदर्भ राज्य संघर्ष समिती आणि विदर्भ संयुक्त कृती समिती यासारख्या संघटनांचा समावेश आहे. मुंबई हायकोर्टातील वरिष्ठ अधिवक्ता, विधिज्ञ आणि विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ कनेक्टची रविवारी बैठक झाली. त्यात वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सहयोग ट्रस्टच्या संयोजिका अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर, सुधीर पालीवाल, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते आशिष देशमुख आणि विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनचे तेजंदरसिंग रेणू उपस्थित होते. विदर्भ कनेक्ट ग्रुपची व्याप्ती वाढवण्याकरिता त्याचे एक विशेष पेज फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. याशिवाय विदर्भ कनेक्ट नावाने एक वेबसाइट सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे ११ जिल्ह्यांमधील विदर्भवादी एकत्रित येणार आहेत. विदर्भ कनेक्टच्या ग्रुपमधील सदस्यांनी बैठकीपुर्वीच विदर्भवादी चळवळ सुरू केली आहे. इन्फोसिसच्या उद्घाटनासाठी नागपुरात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकरिता स्वागत फलक लावून इन्फोसिस व मुख्यमंत्र्यांचे विदर्भ राज्यात स्वागत असल्याचा नारा देण्यात आला होता. या ग्रुपच्या वतीने लवकरच एक कार्यालय देखील सुरू करण्यात येणार आहे. या ग्रुपची पुढील बैठक १९ मार्चला होणार आहे

March 03, 2014 in मुख्य पान