
मुंबई- परदेशी गुंतवणूकदारांनी सलग पाचव्या सत्रामध्ये गुंतवणुकीवर भर दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २२,००० च्या शिखराला स्पर्श केला आणि तो १५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,९३४.८३ नव्या उच्चांकावर बंद झाला. तर निफ्टीने ६,५३७.२५ चा विक्रमी स्तर गाठला.
सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांबरोबरच (एफआयआय) किरकोळ गुंतवणूकदारही आपला पोर्टफोलिओ वाढवत आहेत. ‘बीएसई’च्या माहितीनुसार शुक्रवारी एफआयआयने बाजारात २,५७७.४४ कोटींची गुंतवणूक केली. ज्याने बाजारातील तेजीला मोठे बळ मिळाले.भांडवली वस्तू, गृह निर्माण, बँकिंग, तेल शुद्धीकरण या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला चांगली मागणी होती. तर माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला विक्रीचा सामना करावा लागला. दरम्यान सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने २२,०२३.९८ अंकांपर्यंत झेप घेतली. तर निफ्टीनेही ६,५६२.२० चा विक्रमी स्तर गाठला होता. गेल्या पाच सत्रांमध्ये निर्देशांकात ९८८ अंकांची वाढ झाली आहे.जागतिक बाजारातील तेजी आणि एफआयआयच्या गुंतवणुकीवर भर यामुळे बाजारातील तेजी दिवसागणिक वाढत असल्याचे बोनांझा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ संशोधक निधी सारस्वत यांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर वधारले. यात मारुती सुझुकी ३.७४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.४२ टक्के, एलअँडटी ३.३३ टक्के, एचडीएफसी बँक ३.२३ टक्के, एसबीआय २.५८, बजाज ऑटो २.५३ टक्क्यांनी वधारले. तर माहिती तंत्रज्ञानातील टीसीएस ३.६७ टक्के, टाटा मोटर्स ३.२० टक्के यांच्यासह सन फार्मा, गेल इंडिया, कोल इंडिया आणि हिंदाल्कोच्या शेअरमध्ये घट झाली.
Archive for March 10th, 2014
0
सेन्सेक्स २२,००० च्या घरात
0
आपची चौथी यादी जाहीर

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आम आदमी पक्षाने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. इन्फोसिसचे माजी अधिकारी व्ही. बालकृष्णन यांना आपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. ते मध्य बंगळुरूतून निवडणूक लढवणार आहेत.
तहलकाचे माजी पत्रकार आणि गुलैल संकेतस्थळाचे संस्थापक आशिष खेतान यांना आपने नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. दिल्लीतील आपच्या सहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार पत्रकार आहेत. टीव्ही पत्रकार आशुतोष चांदनी चौकमधुन, जर्नेल सिंह पश्चिम दिल्लीतून आणि आशिष खैतान नवी दिल्लीतून निवडणूक रिंगणात आहेत. पंजाबचे प्रसिध्द विनोदी कलाकार भागवत मान यांनाही आपने संगरुरमधुन तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी आपने आतापर्यंत १३१ उमेदवार जाहीर केले आहेत.
लोकप्रतिनिधींवरच्या खटल्यांचा वर्षभरात निकाल लावा – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली – भ्रष्टाचार किंवा अन्य गंभीर गुन्ह्यांखाली ज्या आमदार-खासदारांच्या विरोधात खटले सुरु आहेत ते खटले वर्षभराच्या आत निकाली काढा असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयांना दिला.
लोकप्रतिनिधींच्या विरोधात आरोप निश्चित झाल्यानंतर वर्षभराच्या आत खटल्याचा निकाल लावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयांना दिले. सत्र न्यायालयाला वर्षभराच्या आत खटला निकाली काढता आला नाही, तर संबंधित सत्र न्यायालयाला का खटला पूर्ण करता आला नाही ? त्या मागची कारणे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे स्पष्ट करावी लागतील असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राजकरणातून गुन्हेगारीकरण संपवण्यासाठी दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले. लोकप्रतिनिधींच्या विरोधातील खटले न्यायालयीन प्रक्रियेत बराच काळ रेंगाळत असल्याने, लोकप्रतिनिधींना दोषी ठरल्यानंतर त्याला अपात्र ठरवून फारसे काही साध्य होत नसल्याचे कायदा आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. आरोपपत्राच्या आधारावर संबंधित लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवणे योग्य ठरत नाही. सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवता येऊ शकते असे कायदा आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
0
काश्मीरमधील चकमक, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात सोमवारी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर एक अधिकारी जखमी झाला आहे.हंदवाडा येथून ८५ किमीवर असलेल्या मलिकपोरा गावात हे दहशतवादी असल्याची बातमी लष्कराच्या जवानांना मिळाली होती.दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना लष्करांच्या जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारा दरम्यान मेजर संदीप कोतवाल जखमी झाले. मृत झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
गारपिटग्रस्तांना निवडणूक आयोगाच्या परवानगीने मदत
बीड- महाराष्ट्रात झालेली गारपीट ही अत्यंत भीषण आहे. उभ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिलेली नाही. या गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतक-यांना उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत देण्याचा आपला प्रयत्न असून त्यात निवडणुकीची आचारसंहिता आडवी येणार नाही, असा दिलासा केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गारपिटग्रस्त शेतक-यांना दिला.
आचारसंहिता लागू झाली असली तरी प्रचंड नुकसान झालेल्या गारपिटग्रस्तांना निवडणूक आयोगाच्या परवानगीने मदत करु, असे पवार यांनी बीड येथे सांगितले. फळबागा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या गंभीर परिस्थितीची संपूर्ण कल्पना स्वत: दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांनी संबंधित विभागांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. गारपिटग्रस्तांच्या तातडीच्या मदतीसाठी केंद्र सरकारने एका समितीची नियुक्ती केली आहे. या आठवड्यात ही समिती संपूर्ण गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. त्यानंतर ही समिती मी अध्यक्षपदी असलेल्या उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सादर करणार आहे, असे पवार यांनी सांगितले.आचारसंहिता लागू असल्याने राजकीय नेत्यांना मदत वाटता येणार नाही, मात्र निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार शासकीय अधिकारी मदत वाटपाचे काम करतील. कसेही करुन शेतक-यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले. बारामतीला माझ्या स्वत:च्या बागांमधील केळी आणि चिकूचे संपूर्ण नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
0
स्वप्नील-सोनालीचा ‘मितवा’

पुणे (अमीत इंगोले) – ‘रामानंद सागर प्रॉडक्शन’चा वारसा लाभलेल्या ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’ ने आगामी ‘मितवा’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. रामानंद सागर यांची नात, मोती सागर यांची मुलगी असलेल्या मिनाक्षी सागर यांनी याआधी अनेक हिंदी मालिकांचे लेखन केले असून प्रथमच त्या त्यांच्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत. ‘व्हिडिओ पॅलेस’ची प्रस्तुती असलेल्या ‘मितवा’ चित्रपटात लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असून दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या दिग्दर्शन करणार आहेत.
‘रामानंद सागर यांच्या रामायणमधील ‘कुश’ ची आणि कृष्णामधील ‘कृष्णा’ची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली होती. इतक्या वर्षांपासूनचा आमचा स्नेह असल्याने आमच्या पहिल्या मराठी चित्रपट देखील स्वप्नीलला घेऊन करायचे निश्चित केले. त्याने देखील या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला, असे मिनाक्षी सागर यांनी सांगितले.‘मितवा’ ही म्युझिकल लव्हस्टोरी असून या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय या संगीतकारांचे संगीत लाभले आहे. सोबत मराठीतील सध्याचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर, अमित राह, पंकज पडघन हे देखील या चित्रपटासाठी संगीत देणार आहेत. या चित्रपटासाठी गीते अश्विनी शेंडे, मंदार केळकर, मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. कथा स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी लिहिली असून अनेक लोकप्रिय मालिकांचे लेखक शिरीष लाटकर यांनी चित्रपटाची पटकथा- संवाद लिहिले आहेत. दुनियादारीचे सिनेमटोग्राफर प्रसाद भेंडे हे आगामी ‘मितवा’ ची सिनेमटोग्राफी करणार असून महेश साळगांवकर कला दिग्दर्शक आहेत, संजय डावरा हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.
0
मानसी नाईकची दिलखेचक अदा

पुणे (अमीत इंगोले) – आपल्या नृत्याच्या अदाकारीने लक्ष वेधणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच वेगवेगळ्या नृत्यशैलीतून प्रेक्षकांसमोर येत असते. ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित आणि के. विलास दिग्दर्शित ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी चित्रपटातून मानसी नाईक एका धमाकेदार आयटम सॉंगमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी पें’, असे बोल असणा-या या गाण्यावर मानसी नाईकने दिलखेचक नृत्य सादर केलंय. या गाण्याचे वेगळेपण म्हणजे ‘रिक्षावाला फेम’ रेश्मा सोनावणे यांनी गे गाणं गायलं असून यांचे नृत्यदिग्दर्शन ‘डीआयडी फेम’ सिद्धेश पै यांनी केलं आहे.
के. विलास यांनी लिहिलेल्या गीताला सलील अमृते यांचं संगीत लाभलं असून नुकतंच या आयटम सॉंगचे चित्रीकरण नायगांव येथील आर.डी.एल स्टुडिओत करण्यात आलं. ‘एकता एक पॉवर’ या चित्रपटातून एक सामाजिक एकात्मतेचं महत्व सांगणारी कथा रेखाटण्यात आली असून या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर आणि विद्याधर जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘दिग्दर्शक के.विलास यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिलेत.
मानसीने यापूर्वी रेश्मा सोनावणे यांच्या आवाजातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर आपला जलवा दाखविला होता. रिक्षावालाप्रमाणे ‘एकता एक पॉवर’ मधील हे गाणं ही सर्वांना ठेका धरायला लावेल असा विश्वास मानसी नाईकने चित्रीकरणावेळी व्यक्त केला आहे. मानसी सोबत असलेल्या उत्तम ट्युनिंगमुळे हे आयटम सॉंग करताना खूप धम्माल आल्याचं मत नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै यांनी व्यक्त केलं
0
गारपिटीने जिल्हा गारद

यवतमाळ – जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू असून आज पुन्हा दारव्हा, नेर तालुक्यात गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकºयांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
नेर तालुक्यात सायंकाळ दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सारंगपूर येथे गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वी झालेल्या गारपीटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले असताना झालेल्या गारपीटीमुळे या नुकसानीत वाढ झाली आहे. महामार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. तर दारव्हा तालुक्यातील लाख (खी.), चाणी, कामठवाडा, शेलोडी, जांभोरा येथे गारपीट झाली. तसेच किन्ही वळगी, सायखेडा, खेड,आदी महागाव सर्कलमधील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. हातणी येथे तिसºयांदा गारपीटीचा तडाखा बसला. बोरी अरब येथे वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली होती. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकासह संत्रा बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाडखेडसह जांभोरा येथे गारपीट झाल्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वीज खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कळंब तालुक्यातील मार्कंडा येथे सतत १ तास झालेल्या गारपीटीमुळे शेतीपिकांसह घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली होती. जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी मुलाबाळांसह बाजीच्या खाली आसरा घेतला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडली तर वीज खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. गारपीटीमुळे काही महिला पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे.
लाचखोर लिपीकास एक वर्ष शिक्षा
पांढरकवडा – पाणी पुरवठाचे बिल काढण्यासाठी लाच मागणाºया कनिष्ठ लिपीकाला एक वर्ष शिक्षा ठोठावली. येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांनी आज हा निकाल दिला.
अरविंद झाडे असे शिक्षा झालेल्या कनिष्ठ लिपीकांचे नाव असून ते घाटंजी पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील इंदुमती जैयस्वाल या महिलेच्या मालकीची विहीर २००३ मध्ये पाणी पुरवठा करण्याठी ग्रामपंचायतने अधिग्रहीत केली होती. विहीरीचे भाड्याचे १५ हजार रुपये बिल काढण्यासाठी जैयस्वाल यांना एक हजाराची लाच या लिपीकाने मांगितली होती. याप्रकरणाची तक्रार जैयस्वाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या विभागाच्या पथकाने सापळा रचुन घाटंजी येथील श्याम उपहारगृहात लाच घेताना झाडे याना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये दोषी आढळल्याने झाडे यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने अॅड. प्रशांत मानकर यांनी काम पाहिले.
0
अवैध सागवान वाहतुक करणारा ट्रक जप्त

घाटंजी – मौल्यवान सागवाणाची अवैधपने तस्करी करणारा ट्रक आज पारवा वनविभागाच्या पथकाने जप्त केला. वनविभागामार्फत १२० नग (९.४६१घनमिटर) परवानगी मिळवून प्रत्यक्षात १५२ नग (१२.९४६घ.मि.) सागवाण पांढरकवडा येथून आंध्रप्रदेशातील कश्मिरनगर येथे चोरट्या मार्गाने जात होते. याबाबतची गुप्त माहिती पारवा येथील वनविभागाच्या पथकाने पारवा चौफुलीवर एम.एच. २९ / ९९४९ क्रमांकाचा ट्रक अडवून पाहणी केली. यामध्ये परवानगी पेक्षा जास्त सागवाणाची लाकूड आढळून आले. त्यामुळे चालक रमेश श्रावण गेडाम, क्लिनर विनोद शंकर रोहवकर याना अटक करून ट्रक जप्त केला. सहा. वनसंरक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल स्कॉडचे एस.ए. दरारे यांनी केली.
क्षतीग्रस्तांचे सर्वेक्षण करा; काँग्रेसची मागणी

यवतमाळ – जिल्ह्यात गारपिट व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यामुळे गहु, हरभरा, मका, संत्रासह अन्य पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण करुन तातडीने मदत करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
जिल्ह्यात गारपिट होऊन पिकासह घराची पडझड, मृत जनावर, रस्ते, पुल, विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासन आचार संहिता व निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नैसर्गिक क्षतीग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने केली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतांनी आ. नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर, अॅड. सिमा तेलंगे, योगेश पारवेकर, सिमा देशभ्रतार, मिनाक्ष्ज्ञी राऊत, आर्णी पंचायत समितीचे सभापती राजू विरखेडे, सोनबा मंगाम, अर्चना कोडापे, वैयजंती उगलमुगले, गोदावरी वगारे, उषा दिवटे, मंगला नंदुरकर, विणा नागदिवे, कमल राऊत, मिना सरतापे, मोहीनी गौर, हरिभाऊ जिभकाटे उपस्थित होते.
0
खासदार-आमदाराचा गारांसह मोर्चा

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी
यवतमाळ – जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड व शेतकºयांनी गारा, मृत प्राण्यांसह जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
जिल्ह्यात दहा-पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपिट सुरु आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासह संत्रा, मोसंबी, लिंबु, पपई आदि फळबागाचे हाती आलेले पिक जमिनदोस्त झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.आज शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड आणि शेतकºयांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. अतीवृष्टीग्रस्त, गारपिटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांना सरसकट आर्थिक मदत करावी , ज्या भागातील पिकांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीच्या सर्व सोयी सवलती लागु कराव्या अशी मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार, प्रविण पांडे, अरविंद गादेवार, हरिहर लिंगणवार, राजेंद्र गायकवाड, शैलेश ठाकुर, गजानन डोमाळे, प्रविण शिंदे, किशोर इंगळे, राजेंद्र गिरी, संजय रंगे, पराग पिंगळे, सचिन राठोड, अरुण वाकडे, गजानन पाटील, अनिल लांडगे, अतुल गुल्हाणे, राजू नागरगोजे, गजानन भोकरे, सदानंद कोंडेवार, रविंद्र भारती, सुभाष वारवड, विनोद काकेड, संतोष ठावरे, मनोज भोयर, गजनन कोळणकर, किशोर वाघ, हरिहर हरबडे, पृथ्वीराज आडे, विनायक भवरे आंदोलनात सहभागी झाले होते.

















