पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 5th, 2014

भारताचा अफगाणिस्तानवर आठ गडी राखून विजय 0

भारताचा अफगाणिस्तानवर आठ गडी राखून विजय

Shikhar Dhawan

मिरपूर- आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानवर आठ गडी राखून दमदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने ठेवलेले १६० धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३२.२ षटकात पूर्ण केले.

भारताकडून पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि अंजिक्य रहाणेने सर्वाधिक १२१ धावांची भागीदारी केली. १२१ धावा झाल्यानंतर भारताच्या पहिल्या खेळाडूला बाद करण्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यश आले. अजिंक्य रहाणे मिरवासच्या गोलंदाजीवर ५६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर लगेचच शिखर धवन ६० धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मा (१८) आणि दिनेश कार्तिक (२१) यांनी अफगाणिस्तानचे १६० धावांचे तुटपुंजे आव्हान ३२ षटकातच पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या मिरवास आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात थोडी अ़डखळतच झाली. भारतीय गोलंदाजांपुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पुरती भंबेरी उडाली. ३० धावा झाल्या तेव्हा त्यांचा पहिला फलंदाज तंबूत परतला. त्यानंतर टप्पाटप्प्याने अफगाणिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. शेनवरी(५०), नूर अली(३१) ,शहाजहाद(२२) आणि दवलत(१४) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. मंगल आणि नूर अली या जोडीला पहिल्या विकेटसाठी सर्वीधिक ३० धावांची भागीदारी करता आली.  भारताकडून रविद्र जडेजाने सर्वाधिक चार बळी घेतले. तर आर. अश्विन(३), शामी(२) आणि मिश्रा(१) गडी बाद केले.

March 05, 2014 in विदर्भ
महाराष्ट्रात मतदान 0

महाराष्ट्रात मतदान

images.jpeg2

मुंबई –  लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम ७ एप्रिलपासून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. १० एप्रिल, १७ एप्रिल आणि २४ एप्रिलला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदान होईल. त्याचं सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणेः
गुरुवार, १० एप्रिल २०१४
दहा मतदारसंघ
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
गुरुवार, १७ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
गुरुवार २४ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड.
विधानसभा पोटनिवडणूक १० एप्रिलला
वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक १० एप्रिलला घ्यायचं निवडणूक आयोगानं निश्चित केलं आहे. या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष झनक यांचं गेल्या वर्षी २८ ऑक्टोबरला निधन झालं होतं. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे.

March 05, 2014 in महाराष्ट्र
 लोकसभा निवडणुक   ७ एप्रिलपासून 0

लोकसभा निवडणुक ७ एप्रिलपासून

images.jpeg1

 नवी दिल्ली – दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना वेध लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत नऊ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात मतदान होईल. ही देशाच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणारी निवडणूक ठरणार आहे.राजधानीतील विज्ञान भवन येथे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी सहकारी निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि डॉ. नसीम झैदी यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या.

एकूण टप्पे : नऊ
 पहिला टप्पा: ७ एप्रिल, दोन राज्ये, ६ मतदारसंघ
आसाममध्ये ५ मतदारसंघ, त्रिपुरामध्ये १ मतदारसंघ
दुसरा टप्पा: ९ एप्रिल, पाच राज्ये, ७ मतदारसंघ
मिझोरोमध्ये १ मतदारसंघ, अरुणाचल प्रदेशात २ मतदारसंघ, मणिपूरमध्ये १ मतदारसंघ, मेघालयमध्ये २ मतदारसंघ, नागालँडमध्ये १ मतदारसंघ
 तिसरा टप्पा: १० एप्रिल, १४ राज्ये, ९२ मतदारसंघ
अंदमान निकोबारमध्ये १ मतदारसंघ, बिहारमध्ये ६ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये १ मतदारसंघ, चंदिगडमध्ये १ मतदारसंघ, हरयाणात १० मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंड ५ मतदारसंघ, केरळमध्ये २० मतदारसंघ, लक्षद्विपमध्ये १ मतदारसंघ, मध्य प्रदेशमध्ये ९ मतदारसंघ, महाराष्ट्रात १० मतदारसंघ, दिल्लीतील ७ मतदारसंघ, ओरिसातील १० मतदारसंघ, उत्तर प्रदेशात मतदारसंघ
 चौथा टप्पा: १२ एप्रिल, तीन राज्ये, ५ मतदारसंघ
आसामध्ये ३ मतदारसंघ, सिक्किममध्ये १ मतदारसंघ, त्रिपुरामध्ये १ मतदारसंघ
पाचवा टप्पा: १७ एप्रिल, १३ राज्ये, १२२ मतदारसंघ
बिहामध्ये ७ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये ३ मतदारसंघ, गोव्यात २ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंडमध्ये ५ मतदारसंघ, कर्नाटकात २८ मतदारसंघ, मध्य प्रदेशात १० मतदारसंघ, महाराष्ट्रात १९ मतदारसंघ, मणिपूरमध्ये १ मतदारसंघ, ओरिसामध्ये ११ मतदारसंघ, राजस्थानमध्ये २० मतदारसंघ, उत्तरप्रदेशात ११ मतदारसंघ, प.बंगालमध्ये ४ मतदारसंघ.
 सहावा टप्पा: २४एप्रिल, १२ राज्ये, ११७ मतदारसंघ
आसाममध्ये ६ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, छत्तीसगडमध्ये ७ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, झारखंडमध्ये ४ मतदारसंघ, मध्य प्रदेशात १० मतदारसंघ, महाराष्ट्रात १९ मतदारसंघ, पाँडेचरीत १ मतदारसंघ, राजस्थानमध्ये ५ मतदारसंघ, तामिळनाडूत ३९ मतदारसंघ, उत्तर प्रदेशात १२ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ६ मतदारसंघ.
सातवा टप्पा: ३० एप्रिल, ९ राज्ये, ८९ मतदारसंघ
आंध्र प्रदेशात १७ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, दादरा-नगर हवेलीमध्ये १ मतदारसंघ, दीव-दमणमध्ये १ मतदारसंघ, गुजरातमध्ये २६ मतदारसंघ, जम्मू काश्मीरमध्ये १ मतदारसंघ, पंजाबमध्ये १३ मतदारसंघ, उत्तर प्रदेशात १४ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ९ मतदारसंघ.
आठवा टप्पा: ७ मे, १२ राज्ये, ६४ मतदारसंघ
आंध्र प्रदेशमध्ये २५ मतदारसंघ, बिहारमध्ये ७ मतदारसंघ, हिमाचलमध्ये ४ मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमध्ये २ मतदारसंघ, उत्तर प्रदेशमध्ये १५ मतदारसंघ, उत्तराखंडमध्ये ५ मतदारसंघ, प. बंगालमध्ये ६ मतदारसंघ.
नववा टप्पा: १२ मे, ३ राज्ये, ४१ मतदारसंघ
बिहारमध्ये ६ मतदारसंघ, उत्तर प्रदेशमध्ये १८ मतदारसंघ, प. बंगालमध्ये १७ मतदारसंघ

मतमोजणी : १६ मे रोजी
…………………………..

March 05, 2014 in देश-विदेश

AAP – BJP कार्यकर्ते भिडले

 

नवी दिल्ली – दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान दगडफेक झाली. यावेळी आपमधील अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचा ताफा अडवल्याचा निषेध करत ‘आप’ च्या संतप्त कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
रोड शोसाठी परवानगी न घेतल्याने निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं कारण देत अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये राधनपुर इथं आज दुपारी ताब्यात घेण्यात आलं. चौकशीनंतर केजरीवालांना सोडून देण्यात आलं. पण गुजरातमधील नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने प्रशासनाला हाताशी धरत केजरीवालांना ताब्यात घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. गुजरातमधल्या घटनेनंतर दिल्लीत आपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही कऱण्यात आली. यावेळी आपचे मोठे नेतेही उपस्थित होते. आपच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही तिथं दाखल झाले. आणि यावेळी दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. यावेळी भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली, असा आरोप आपच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी केला आहे. तर हा दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असल्याचं सांगत आपचे नेते राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जावू शकतात, असं प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिलं.

March 05, 2014 in देश-विदेश