Archive for March 20th, 2014
पुण्याजवळ अपघात चार जण ठार
0
लोकसभेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल
यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज गुरुवारी पाच उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर १७ उमेदवारांनी ४६ अर्ज नेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये रमेश गोरसिंग पवार यांनी नया दौर पार्टी व भारतीय बहुजन आघाडी या पक्षांच्या नावे प्रत्येकी एक तर अपक्ष म्हणून एक असे तीन अर्ज दाखल केले. मनिष रामकृष्ण ढाले यांनी अपक्ष म्हणून दोन, मधुकर रंगलाल पवार यांनी भारतीय राष्टÑीय कॉंग्रेसच्या नावे दोन, रमेश विठोबा गुरनुले यांनी अपक्ष दोन, शेख जब्बार शेख युनुस यांनीही अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. आतापर्यंत ८ उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज १७ उमेदवारांनी ४६ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण ९४ उमेदवारांनी २४० अर्ज नेले आहे.
शेतकºयाची आत्महत्या
उमरखेड – सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपनाला कंटाळून युवा शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना साखरा येथे बुधवारी घडली. किसन शेषराव वानखेडे (२२) रा. साखरा असे शेतकºयाचे नाव आहे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आता पुन्हा रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वानखेडे याच्याकडे सात एकर शेती असून त्याने ग्रामीण क्षेत्री बँकेचे दिड लाख रुपये कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो राहत होता. फेबु्रवारी महिन्यात लग्न असलेल्या या युवा शेतकºयाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
आरोपी फरार
यवतमाळ – संचीत रजेवर गेलेला आरोपी काराहगृहात हजर न होता पसार झाल्याची घटना घडली. पांडुरंग बापुराव काकडे रा. बोरी अरब असे आरोपीचे नाव आहे. मध्यवर्ती कारागृह अमरावती येथून ६ आॅक्टोंबर २००५ रोजी तो संचीत रजेवर गेला होता. मात्र रजा संपल्या नंतरही तो कारागृहात हजर झाला नाही. शेवटी कारागृह प्रशासनाने त्याला फरार घोषित केले. या प्रकरणी अमरावती कारागृहाचे पोलीस शिपायी पांडुरंग दुमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल केला.
कार झाडावर आदळली, एक ठार
यवतमाळ – भरधाव कार झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.४५ वाजता ढुमणापूर देवस्थानाजवळ घडली.
धनराज गणपत पालकर (२८) रा. वडगाव असे मृतकाचे नाव आहे. सागर अरविंद मदनकर (२९) रा. गणेश कॉलनी हा आपल्या कारने (एम.एच.४०/ एसी २३३२)नेरकडून यवतमाळकडे येत होता. अशातच त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार ढुमणापूर देवस्थानाजवळील वळणावरील झाडावर आदळली. यामध्ये पालकर हा जागीच ठार झाला असून अन्य दोन जण जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. आशिष अरविंद मदनकर (३३) रा. दोनाडकर ले आऊट पिंपळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी चालक सागर याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला.
0
महिलेचे मंगळसूत्र उडविले
यवतमाळ – दाते कॉजेलचौकातून पायी जाणाºया महिलेच्या गळ््यातील मंगळसूत्र उडविल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
कशिश सुशिल कटीयारा (२७) रा. वैद्य नगर यांनी शाळेतून मुलीला घेऊन घराकडे जात होत्या. अशातच दाते कॉजेल चौकात समोरुन आलेल्या युवकाने या महिलेच्या गळ््यातील साडेबारा ग्रॅमचे मंगळसूत्र हिस्कावले. यावेळी सदर महिलेने आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी पाठलाग करुन मंगळसूत्र चोरट्यास पकडले. या बाबतची माहिती प्रा. मेहरे यांनी वाहतुक पोलीस सुरेंद्र वासनिक यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून चोरट्यास ताब्यात घेऊन वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधिन केले. यावेळी घटनास्थळावर सहा ग्रॅम सोन्याचा तुकडा सापडला. याप्रकरणी कशिश कटीयारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
0
बगदादमध्ये स्फोटात ४६ ठार

बगदाद – इराकची राजधानी बगदादमध्ये एका कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४६ जण ठार झाले आहेत. काल, बुधवारी रात्री उशिरा हा आत्मघाती हल्ला झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॅफेमध्ये टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेमका यावेळी एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात ४६ जण जागीच ठार झाले. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराकमध्ये शिया व सुन्नी या दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याने या वादातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
0
आनंद-कार्याकिन लढत बरोबरीत

खँती मॅन्सिस्क – कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा सर्जी कार्याकिन यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. आनंदची ही सलग तिसरी बरोबरी आहे. बरोबरीचे शुक्लकाष्ठ सुटत नसले तरी सहाव्या फेरीअखेर चार गुणांसह त्याने अव्वल स्थान राखले आहे.
अन्य लढतीत बल्गेरियाचा व्हॅसेलिन टोपालोवने रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिकला हरवले. पाचव्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलरविरुद्धच्या लढतीतून बोध घेत टोपालोवने प्रतिस्पध्र्याला वरचढ होण्याची तसेच नशीबवान ठरण्याची संधी दिली नाही.टोपालोवविरुद्ध नशीबाने विजय मिळवलेल्या स्विडलरचे अझरबैजानचा शखरियार मामेद्यारोवविरुद्ध काहीच चालले नाही. अव्वल सीडेड अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन आणि रशियाचा दिमित्री आंद्रेकीन यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली. यात अरोनियनने विजयाच्या अनेक संधी दवडल्या. सातव्या फेरीनंतर अरोनियनने (३.५ गुण) दुसरे स्थान मिळवले आहे. क्रॅमनिकसह टोपालोव, स्विडलर आणि मामेद्यारोवच्या खात्यात प्रत्येकी तीन गुण आहेत. कार्याकिन (२.५ गुण) आणि आंद्रेकीन शेवटच्या दोन स्थानांवर आहेत.
0
टी२० विश्वचषक- नेपाळचा अफगाणिस्तानवर विजय

चितगाव- आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यात नेपाळने अफगाणिस्तानवर नऊ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत नेपाळने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी १४२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना २० षटकात आठ बाद १३२ धावा करता आल्या.
टी२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील नेपाळने अफगाणिस्तानसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळने पाच गडी १४१ धावा केल्या.यापूर्वी अफगाणिस्ताननेे नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या खाखुरेलने केलेल्या ५६ धावांच्या जोरावर नेपाळला १४१ धावांचा टप्पा गाठता आला. अफगाणिस्तानकडून शपूर झारदान याने दोन गडी बाद केले. नेपाळ आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी पात्रता फेरीतील दोन सामन्यांमध्ये एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.
0
‘आप’ची आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने बिहारच्या पटनासाहिबमधुन संयुक्त जनता दलाच्या माजी मंत्री परवीन अमानुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा थेट सामना बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होणार आहे.
आपने बुधवारी रात्री आठवी यादी जाहीर केली. या यादीत सहा राज्यातील १९ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील लातूर आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. आपने बिहारमधुन पाच, झारखंडमधुन सात, मध्यप्रदेशमधुन एक, केरळ, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रामधुन प्रत्येकी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आपने आतापर्यंत २८७ उमेदवार जाहीर केले आहेत.परवीन अमानुल्ला या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सामाजिक कल्याण मंत्री होत्या. बिहारमधल्या प्रभावी मुस्लिम नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यावर्षी फेब्रवारी महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्या जदयूमधुन बाहेर पडल्या होत्या.
0
शक्ती मिल बलात्कार प्रकरण- चारही आरोपी दोषी

मुंबई- शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी गुरुवारी ‘इन-कॅमेरा’ सुनावणी झाली. छायाचित्रकार असलेल्या तरुणीवर ३१ जुलै २०१३ रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. त्यापूर्वी याच आरोपींनी एका टेलिफोन ऑपरेटरवरही सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले.
मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल कंपाउंड येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या घटना घडल्या होत्या. आरोपींनी प्रथम ३१ जुलै रोजी २३ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी त्यांनी एका छायाचित्रकार मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती शालिनी जोशी यांच्यासमोर शनिवारी सरकारी पक्षाचे अॅड. उज्ज्वल निकम आणि आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. गुरुवारी या प्रकरणाच्या निकालावर सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या प्रकरणातील अशफाक शेख, कासिम शेख ऊर्फ कासिम बंगाली, सलिम अन्सारी आणि विजय जाधव हे चारही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले. अल्पवयीन आरोपीवर बालगुन्हेगारीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. अन्य आरोपींवरील खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. आठ ऑक्टोबर २०१३ रोजी चार आरोपींवर ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर अल्पवयीन आरोपीवर वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे न्यायालयात उपस्थित होते. पिडीत तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळाल्याचे सांगत आर.आर.पाटील यांनी या निर्णयावार समाधान व्यक्त केले
0
अखेर नाराजी दूर ; गांधीनगरमधून निवडणूक लढवणार – अडवाणी

नवी दिल्ली – अखेर लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले. दिवसभरातील भेटी आणि चर्चेनंतर अडवाणी यांनी गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी अडवाणी गांधीनगर ऐवजी मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या अडवाणींची अखेर समजूत काढण्यात पक्षातील नेत्यांनी बुधवारी रात्रीपासून त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मतदारसंघाच्या निवडीचा अधिकार पूर्णपणे अडवाणींना असल्याचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी गुरुवारी सांगितले.गुजरातमधील गांधीनगर अथवा मध्यप्रदेशातील भोपाळ यापैकी त्यांना हव्या त्या मतदार संघातून अडवाणी निवडणूक लढवू शकतात. तो अधिकार त्यांना आहे, असे सिंग यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचेे जाहीर केले. त्याआधी गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास अडवाणींनी राजी व्हावे यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी अडवाणींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुषमा स्वराज आणि अरुण जेठली यांनीही अडवाणी यांची भेट घेतली होती.
0
इशान भागवते ठरला ‘ गुगल बॉय ’

यवतमाळ – जगदंबा अभियात्रीकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी इशान निखील भागवते हा गुगलर स्पर्धेत अव्वल ठरला आहे. त्याला महाविद्यालयात गुगल बॉय या पदविने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच गुगलर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये प्रथम फेरीत दहा मिनीटात दहा प्रश्न व्दितीय फेरीत दहा मिनीटात पंधरा प्रश्न आणि तृतीय फेरीत दहा मिनीटात वीस प्रश्न सोडवायचे होते. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर सर्च करुन ती उत्तरपत्रिकेत लिहीण्याची ही स्पर्धा होती. यामध्ये महाविद्यालयातील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वात कमी वेळात जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडविल्यामुळे इशान भागवते याला महाविद्यालयाचे सचिव शितल वातीले यांच्या हस्ते रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्याला सन्मानित करण्यात













