पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 18th, 2015

बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ लोणावळ्यात रास्ता रोको 0

बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ लोणावळ्यात रास्ता रोको

2015-02-18~lonavlamurder_ns

पुणे- लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ लोणावळाकरांनी बुधवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळला. रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच लोणावळ्यात कडकडीत बंद बरोबरच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी एका लग्न समारंभातून बेपत्ता झालेल्या आयेशा छगन जैन या सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह मंगळवारी दुपारी लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयेशा जैन ही दोन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत इंदापूरहून लोणावळ्यामध्ये एका लग्नासाठी आली होती. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समारंभातून आयेशा अचानक गायब झाली. तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडली नाही.

यामुळे सोमवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर आयेशाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.

या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये महिला व मुली मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, रिसॉर्टमधील संशियितांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या चिमुरडीच्या हत्येचा लोणावळा शहरामधून तीव्र निषेध करण्यात आला आहे. निषेधार्थ शहरात सर्वत्र शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शाळा, कॉलेज, दुकाने, बाजारापेठा बंद ठेवण्यात आल्या.

लोणावळा पोलिसांचा निषेध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर कुमार रिसोर्ट चौकात सकाळी दहा वाजतापासून नागरिक जमा झाले होते. लोणावळा शहरवासीयांसोबत मावळ, खोपोली परिसरातील नागरिकही हजारोंच्या संख्येने लोणावळ्यात आले होते. संतप्त नागरिकांनी कुमार रिसॉर्टवर दगडफेक, तोडफोड करून रिसॉर्ट प्रशासनाचा निषेध केला. संतप्त जमावामुळे निषेध आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

तर अन्य काही महिला, मुलींनी शहरात मूक मोर्चा काढला. या आंदोलनात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकत्रे, विविध संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते.

February 18, 2015 in मुख्य पान
सात वर्षाच्या मुलीची हत्या, लोणावळ्यात कडकडीत बंद 0

सात वर्षाच्या मुलीची हत्या, लोणावळ्यात कडकडीत बंद

  • download (5)
  • लोणावळा, दि. १८ – लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली असून वैद्यकीय चाचणीत चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेविरोधात लोणावळ्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.

रायगडमधील इंदापूर येथे राहणारे एक कुटुंब रविवारी लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर त्यांची सात वर्षांची मुलगी आयशा ही बेपत्ता असल्याचे समोर आले. लग्न समारंभ संपल्यावर रात्री साडे आठपर्यंत आयशा तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असल्याचे तिच्या आईने बघितले होते.

गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी दुपारी आयशाचा मृतदेह कुमार रिसॉर्टच्या टॅरेसवर आढळला. तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेविरोधात आज लोणावळामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच कुमार रिसॉर्टवर दगडफेकही केली.  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला.

 

 

 

February 18, 2015 in मुख्य पान

गर्भवती महिलांना BMC मोफत रक्तपुरवठा सेवा सुरु करणार

मुंबई,महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,(सतिष राठोड)

बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच काही दिवसात गर्भवती महिलांना रक्त पूरविण्याचे अायोजन केले असून,गर्भवती महिलांना यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका अल्ट्रा सोनोग्राफी,एक्स-रे,ईसीजी व इतर सुविधा मोफत देण्यात येत होत्या,अाता गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व व प्रसूति नंतर जन्माला अालेल्या नवजात बालकांना गरज पडल्यास १ महिन्यांपर्यत मोफत रक्त पूरविण्यात येणार अाहे.अनेकदा जन्माला अालेल्या नवजात बालकाला कावीळ सारखे अाजार उद्भवतात.त्यावेळेस नवजात बालकाच्या शरीरातील रक्त काढून,नविन रक्त चढवावा लागतो.अाणि याची अंमल बजावणी म्हणून बीएमसीच्या काही मुख्य रुगणालयात व प्रसूति गृहात उपलब्ध करण्यात येणार अाहे.त्याच बरोबर ही सेवा १०८ (ब्लड काॅल) या क्रमांकावरही उपलब्ध राहणार असून,कदाचित त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर खासगी ब्लड बॅंके कडून,सरकारने निर्धारित केलेल्या किमतीत (जननी सुरक्षा योजना) या योजनेअंतर्गत करण्यात येईल.अात्तापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गरजू महिलांनाच रक्त पूरवठा करण्यात येत होता,पण अाता नविन सर्कुलर नुसार बीएमसीच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सगळ्या गर्भवती महिलांना मोफत रक्त पुरवठा सेवा देण्यात येईल.

 

February 18, 2015 in मुख्य पान
ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात 0

ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात

IMG_20150217_202431

ठाणे,(प्रतिनिधी)

गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष अाध्र प्रदेशचे माजी मंत्री मा.अमरसिंह तिलावत हे होते,प्रमुख मान्यवरांचे सत्कारही करण्यात अाले.त्यात समाज सेवक रविराज राठोड यांनी सांगितले कि,समाजाला एकत्रीत करण्यासाठी गोर बंजारा संघर्ष समिती स्थापना करण्यात अाली असून,या समिती मध्ये महाराष्टातूनच नाही,तर पूर्ण देशातून बंजारा समाज प्रेमी जुडलेले अाहेत,व निस्वार्थी पणाने समाज सेवा करत अाहेत,बंजारा समाजातील गोर गरीबांचे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून समिती मार्फत अार्थिक मदत,वह्या-पुस्तक व सामाजिक कार्य व मार्गदर्शन केले जातात.
त्यानंतर सेवा गृपचे अध्यक्श व समाज सेवक मा.मंगल चव्हाण यांनी अापले मनोगत व्यक्त केले,समाजाला जर प्रगती पथावर घेऊन जायचे असेल तर,त्यासाठी शिक्षणाचे महत्व कळून घ्यावे लागेल.अाणि  अंधश्रध्देला समाज बळी पडू नये म्हणून अंधश्रध्देपासून समाज दूर राहीले पाहीजे.तसेच समाज सेवक मिलिंद पवार यांनी देखील अापले मनोगत व्यक्त करतांना बोलले कि, महापुरुषांची जयंती साजरा करणे हे कार्य नसून,त्यांचे विचार अाचरणात अाणावे हेच मोठे कार्य अाहे.हाच बंजारा समाज जो पहीले व्यापारी होता,तोच अाज त्या व्यापारांकडे मजूरी करुन अापली पोटजीविका भागवत अाहे.बंजारा समाजाचे मुले वकिल,डाॅक्टर,इंजिनियर,कठेकेदार नाही होऊ शकत का ? होऊ शकतो ! तर त्यासाठी शिक्षण व अापली विचार सारणी महत्वाची असते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा.अमरसिंह तिलावत (माजी मंत्री अांध्र प्रदेश),कर्नाटकचे माजी अामदार मा.मनोहर नायक-ऐनापूर,हे होते.व प्रमुख उपस्थिती गोर बंजारा संघर्ष समिती,भारत.
समाज सेवक व बंजारा समाजातील बंधु अाणि भगिनींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

 

February 18, 2015 in महाराष्ट्र