पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 10th, 2015

बिबटला विष पाजून मारले, दोन आरोपी अटकेत 0

बिबटला विष पाजून मारले, दोन आरोपी अटकेत

download (1)
यवतमाळ, दि. १० – यवतमाळ वनवृत्तातील वनक्षेत्रातील बिबट असूरक्षित असल्याचे गेल्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दारव्हा वनपरीक्षेत्रात एकाच महिन्यात दोन मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजीच असताना, आज मंगळवारी बोरजई शिवारात बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. मारोती अ‍ैईसकर , गणेश खडके असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
वनसंपदनेने नटलेल्या जिल्हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळेच यवतमाळ, पुसद व पांढरकवडा अशा तीन वनवृत्ताची विभागणी करण्यात आली आहे. यवतमाळ वनवृत्तातील आठ वनपरीक्षेत्रापैकी, यवतमाळ, हिवरी, दारव्हा या रेंजमधिल राखीव वनात सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. सागवान वृक्षांसोबतच वन्यप्राण्यांचे देखील वनात वास्तव असून, बिबटची संख्या देखील लक्षनिय आहे. त्यामुळे या वनपरीक्षेत्रावर तस्करांचा नेहमीच डोळा असतो. यवतमाळ वनपरिक्षेत्रात मध्यतंरी बिबट मृत्यूची तीन घटना घडल्या होत्या. बिबटच्या मृत्यूचे गुढ वनविभाग उकलण्यात अपयशी ठरले असताना, गेल्या महिन्याभरात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबट मृत्यूची मालिका सुरू आहे. दोन बिबट मृत्यूची चौकशी सुरू असताना, आज मंगळवारी चाणी बिटमधिल बोरजई शिवारात बिबट मृतावस्थेत पडून असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. महिन्याभरात बिबट मृत्यूची घटना घडल्याने उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय वनअधिकारी राहुल गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे व क्षेत्रसाहाय्यक धोत्रे यांच्या चौकशी दरम्यान बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची माहिती पुढे आली. यामध्ये मारोती अ‍ैईसकर , गणेश खडके या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी दोन घटनेतील बिबट मृत्यूचे गुढ वनअधिकाºयांनी उकलले नसून, वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बिबटच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

February 10, 2015 in मुख्य पान
महिलेच्या खून प्रकरणात चार संशयित ताब्यात 0

महिलेच्या खून प्रकरणात चार संशयित ताब्यात

download (5)
यवतमाळ, दि. १० – यवतमाळ लगत असलेल्या किट्टा कापरा येथील वृद्घ महिलेच्या खून प्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप पूरावा लागला नसून, बाळू घुडे, दिनेश राठोड, महादेव नेरकर, देवेंद्र घरकडे रा. सर्वजण किट्टाकापरा अशी चौकशी करण्यात आलेल्यांची नावे आहे.
यवतमाळ तालुक्यातील किट्टा कापरा येथे ८ फेबु्रवारीला किसनाबाई किसन देवकर (७२) या वृद्घ महिलेचा खून झाला होता. निराधार योजनेतून मिळणाºया पगारावर घराचा उदरनिर्वाह ती चालवित होती. गावातील काही गरजूना अडीअडचण आल्यास मदतही करीत होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने महिलेचा गळा आवळून हत्या केली. हत्येच्या दिवशी गावात शाळेमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला महिला देखील गेली होती. मात्र कार्यक्रम अर्धवट सोडून महिला घरी परतली. तेव्हा तिच्या घरी चोरटा चोरी करीत होता. त्याच चोरट्याने महिलेचा गळा आवळून खून केलाचा धागा घेऊन पोलीस तपास करीत आहे. आज गावातीलच चार युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनला आणले होते. चौकशीत पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

February 10, 2015 in विदर्भ
जादूटोण्याच्या संशयावरून युवकाची हत्या, दोन आरोपी अटकेत 0

जादूटोण्याच्या संशयावरून युवकाची हत्या, दोन आरोपी अटकेत

mh031
यवतमाळ, दि. १० – गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह काल सोमवारी कोपरी शिवारातील पुलाखाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. जादूटोण्याच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, आज मंगळवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नितीन धुर्वे रा. सावंगी पेटका, पवन एबंडवार रा. अंतरगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथील गणेश मेश्राम गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या भावाने ६ फेब्रुवारीला भाऊ बेपत्ता असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली होती. पोलीस व कुटूंबियाकडून गणेशचा शोध घेण्यात येत असताना, दरम्यान काल ९ फे बु्रवारीला कोपरी शिवारातील पुलाखाली मृतदेह काही लोकांना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान मृतदेह गणेशचाच असल्याची ओळख पटली. गणेशच्या खूनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हाण पोलिसांपुढे असताना, आज स्थानिक गुन्हे शाखेला गणेशचा खून जादूटोण्याच्या कारणातून झाल्याची माहिती मिळाली. हा धागा धरत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित नितीन धुर्वे, पवन एबंडवार याला अटक केली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर पूरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून पुलाखाली फेकल्याची कबूली आरोपींनी दिली. हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पुजलवार, सुगत पुंडगे, संजय दुगवे, सचिन दुंगे, साजिद शेख, आशिष चौबे, योगेश डगवार, सतीश गजभिये आदींनी केली.

February 10, 2015 in विदर्भ
भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांची चैन उडविली 0

भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांची चैन उडविली

chain_snatching
धूम स्टाईलने चैन स्नॅचरचा धुमाकुळ
कल्याण,ठाणे (सतिष राठोड) दि. १० – गेल्या काही दिवसांपासून कल्याण,मुंबई,ठाणे व उप नगरीय शहरांमध्ये चैन स्नॅचरांचा धुम स्टाईलने धुमाकुळ घातला आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारात कल्याण पूर्वेतील लोकग्राम,चिंचपाडा,विजय नगर परिसरात चक्क १५ मिनिटात ३ ठिकाणी चैन स्नॅचरांनी महिलांच्या अंगावरील ११.५ तोळे सोन्याचे दागिने बाईक वर धूम स्टाईलने चोरण्याचा पराक्रम केला आहे.
पहिल्या घटनेत भारतीय महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता पाटील हे आॅटो रिक्षातून उतरून रिक्षा चालकाला पैसै देण्यासाठी पर्समध्ये हात घातला. यावेळी एका बाईकवर हेल्मेट घातलेले २ चोरट्यांनी धूम स्टाईलने पाठलाग करून अंगावरील एक १० ग्रॅम व दुसरा ५० ग्रॅमचे असे २ मंगळसुत्रे हिसकाउन नेले. तर दुसºया घटनेमध्ये चिंचपाड्यात रिक्षामध्ये बसत असतांनाच वैशाली विचारे यांचा ५ तोळ्याचा मंगळसूत्र गळ्यातून हिसकाउन चोरटे पळून गेले. तर तिसरी घटनेत ही अशाच प्रकारे धूम स्टाईलने ३.५ तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरले.
या घटनेला पोलीसच कारणीभूत असल्याची प्रतिक्रीया भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षांनी दिली आहे. याप्रकरणी विजय नगर पोलीसांनी चोरट्याविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

February 10, 2015 in महाराष्ट्र
१४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ 0

१४ फेबु्वारीला केजरीवाल घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

AAP supporters celebrate
नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर बसण्यास सज्ज झाले आहेत.
वर्षभरापूर्वी दिल्लीकरांची माफी मागत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वर्षभरानंतर केजरीवाल पुन्हा दिल्लीत सरकार स्थापन करणार आहेत. १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात शपथविधी सोहळा होणार असून यावेळी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
‘१४ फेब्रुवारीला रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील’ असे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी सांगितले. या निवडणुकीत केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या नुपूर शर्मा यांचा तब्बल ३१ हजार ५८३ मतांनी पराभव केला.
२०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावर दिल्लीत सत्ता स्थापन केली होती. २८ डिसेंबर रोजी रामलीला मैदानात केजरीवाल यांनी दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर जनलोकपाल विधेयकाच्या मुद्याचे भांडवल करुन केजरीवाल सरकारने राजीनामा दिला होता.

February 10, 2015 in मुख्य पान
अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी 0

अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी

download
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य स्पर्धक असणा-या किरण बेदी यांनी आपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल टि्वटरवरुन अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.
अरविंद तुझे अभिनंदन. तुला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. आता दिल्लीला एका वेगळया उंचीवर घेऊन जा. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवा असे बेदी यांनी टि्वट केले आहे.
किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभेची निवडणूक लढणा-या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. किरण बेदी यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना या निकालाला नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराशी जोडण्यास नकार दिला.
जेव्हा पक्ष जिंकतो तेव्हा तो सामूहिक विजय असतो. जेव्हा पराभव होतो तो एकटयाचा असतो. मी या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारते. पोलिस सेवेत असतानाही मी अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे असे बेदी म्हणाल्या.
अरविंद केजरीवाल आणि माझ्यामध्ये सामना होता. आमच्या दोघांपैकी कोणी एक जिंकणार होता असे बेदी यांनी सांगितले. दिल्लीमध्ये भाजपाचा अत्यंत दारुण पराभव झाला असून, भाजपला दहाच्या आता जागा मिळतील अशी स्थिती आहे. स्वत:हा किरण बेदी भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणा-या क्रिष्णनगरमध्ये पहिल्या तीन फे-यांमध्ये पिछाडीवर होत्या.

 

February 10, 2015 in मुख्य पान
केजरीवालांनी याआधीची चूक पुन्हा करु नये - अण्णा हजारे 0

केजरीवालांनी याआधीची चूक पुन्हा करु नये – अण्णा हजारे

Anna Hazare addresses media
राळेगणसिद्धी- दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणा-या आम आदमी पक्ष आणि नेते अरविंद केजरीवाल यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी यावेळी टीका केली.
दिल्लीत भाजपाला मिळालेले हे अपयश हा तर पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. मोदींनी दिल्लीतील नागरिकांची विश्वासार्हत गमावली. ते भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरले, असे हजारे यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली निवडणुकीत आप ६०हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याने आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल केजरीवालांचे अभिनंदन. मात्र मुख्यमंत्री असो वा नसो, त्यांनी केलेले आंदोलन विसरता कामा नये. भ्रष्टाचारविरोधी चळवळीमुळेच केजरीवालांना नागरिकांचा विश्वास संपादन कऱण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे यापूर्वी केलेली चूक केजरीवाल यांनी पुन्हा करु नये, असे अण्णा म्हणाले.

February 10, 2015 in मुख्य पान