
पर्थ – अननुभवी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) हरवत भारताने विश्वचषकातील सलग तिसरा विजय नोंदवला. अर्ध्या दिवसात संपलेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांनी वर्चस्व राखले.
मात्र प्रतिस्पर्ध्यानी निराशा केल्याने लढत एकतर्फी झाली. गतविजेत्यांनी ९ विकेट आणि १८७ चेंडू (३१.१ षटके) इतक्या मोठय़ा फरकाने जिंकताना ‘ब’ गटातील अव्वल स्थान आणखी भक्कम केले. तसेच बाद फेरीसाठीची दावेदारी अधिक मजबूत केली.
पर्थच्या (वाका) खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज वर्चस्व राखतील, असे वाटले. मात्र फिरकीपटूंना अधिक यश मिळाले. भुवनेश्वर कुमार (१ विकेट) आणि उमेश यादव (२ विकेट) या मध्यमगती दुकलीच्या प्रभावी मा-यानंतर अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने (१०-१-२५-४) अप्रतिम मारा करत विश्वचषकच नव्हे तर वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीची नोंद केली.
त्याला डावखु-या रवींद्र जडेजाची (२३-२) चांगली साथ लाभली. भारताच्या गोलंदाजी अचूक आणि टिच्चून मारा केलाच. मात्र यूएईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांचे आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले. निम्मा संघ ४४ धावांत परतल्यानंतर यूएईचे धावांचे ‘शतक’ पूर्ण होण्याबाबत साशंकता होती.
मात्र शायमन अन्वरने (३५) तळातील असांका गुरुगेसह (नाबाद १०) शेवटच्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करताना संघाला शतकी मजल गाठून दिली. अन्वरची खेळी यूएईतर्फे सर्वाधिक वैयक्तिक खेळी ठरली. तसेच त्याने गुरुगेसह केलेली भागीदारी डावातील सर्वोच्च ठरली.
गोलंदाजांनी विजय नक्की केल्याने १०३ धावांचे आव्हान म्हणजे केवळ सोपस्कार होते. डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या (१४) बदल्यात १८.५ षटकात भारताने विजयी लक्ष्य पार केले. अन्य सलामीवीर रोहित शर्मा (५५ चेंडूंत नाबाद ५७ धावा) आणि ‘वनडाउन’ विराट कोहलीने (४१ चेंडूंत नाबाद ३३ धावा) दुस-या विकेटसाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी करताना २० षटकांच्या आतच विजय साकारला.
रोहितने यंदाच्या विश्वचषकातील पहिले आणि वनडेतील २४वे अर्धशतक झळकावताना १० चौकार आणि एक षटकार लगावला. कोहलीने ५ चौकार मारले. फलंदाजांनी निराशा केली तरी यूएईच्या गोलंदाजांनी भारताची एक विकेट घेतली. तसेच एकही अवांतर धाव दिली नाही.
सलग तिस-या विजयामुळे भारताने १२ गुणांसह ‘ब’ गटातील अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भारताच्या आणखी तीन लढती (वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आर्यलड) शिल्लक आहे. गटवार साखळीतील चौथ्या लढतीत शुक्रवारी (६ मार्च) पर्थवरच भारत विंडिजशी झुंजेल.
धावफलक
यूएई – अमजद अली झे. धोनी गो. भुवनेश्वर ४, आंद्री बेरेंगर झे. धोनी गो. उमेश ४, कृष्णचंद्रन झे. रैना गो. अश्विन ४, खुर्रम खान झे. रैना गो. अश्विन १४, स्वप्नील पाटील झे. धवन गो. अश्विन ७, शायमन अन्वर त्रि. गो. उमेश ३५, रोहन मुस्तफा पायचीत गो. मोहित २, अमजद जावेद झे. रैना गो. जडेजा २, मोहम्मद नाविद त्रि. गो. अश्विन ६, मोहम्मद तौकीर त्रि. गो. जडेजा १, मंजुला गुरुगे नाबाद १०, अवांतर – १३ धावा (लेगबाईज ४, वाईड ९), एकूण – ३१.३ षटकांत सर्वबाद १०२
बादक्रम : १-७ (बेरेंगर), २-१३ (अमजाद), ३-२८ (कृष्णचंद्रन), ४-४१ (स्वप्नील पाटील), ५-४४ (खुर्रम), ६-५२ (मुस्तफा), ७-६१ (जावेद), ८-६८ (नवीद), ९-७१ (तौकीर), १०-१०२ (अन्वर)
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१९-१, उमेश यादव ६.३-२-१५-२, रविचंद्रन अश्विन १०-१-२५-४, मोहित शर्मा ५-१-१६-१, रवींद्र जडेजा ५-०-२३-२
भारत – रोहित शर्मा नाबाद ५७, शिखर धवन झे. मुस्तफा गो. नाविद १४, विराट कोहली नाबाद ३३, अवांतर – ०. एकूण – १८.५ षटकांत १ बाद १०४.
बादक्रम : १-२९ (धवन).
गोलंदाजी – मोहम्मद नाविद ५-०-३५-१, मंजुला गुरुगे ६-१-१९-०, अमजद जावेद २-०-१२-०, कृष्णचंद्रन ३-०-१७-०, मोहम्मद तौकीर २.५-०-२१-०
निकाल : भारत ९ विकेटनी विजयी.
Archive for February 28th, 2015
0
भारताचा यूएईवर दणदणीत विजय
0
जादूटोण्याच्या संशयातून इसमाचा खून

पुसद (यवतमाळ), दि. २८ – जादूटोणा केल्याच्या संशयातून इसमाला लोखंडी खांबाला बांधून आठ जणांनी बेदम मारहाण केली. यातच इसमाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील वेणी (खु.) येथे २७ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. माधव लक्ष्मण खंदारे (५५) असे मृताचे नाव आहे.
माधव खंदारे हा इसम रात्री दरम्यान काम आटोपून घरी आल्यानंतर गावातील आठ जणांनी त्यास घरी गाठले. जादूटोना केल्याचा संशय व्यक्त करीत लोखंडी खांबाला बांधून लाथा बुक्यांनी पोट, छातीवर बेदम मारहाण केली. हा प्रकार बघून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून माधवला आठही जणांच्या तावडीतून सोडविले. गंभीर जखमी माधव खंदारे त्याच अवस्थेत घरी गेला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पार्वती खंदारे हिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी इस्माईल खान मनवर खान, नाजीर खान मनवर खान, उस्मान खान नामदार खान, सलमान खान इस्माईल खान, जमीर यांच्याविरुद्ध १४३, १४७, १४९, ३०३ कलम ३ (२) महाराष्टÑ नरबळी इतर अमानुष व इतर अनिष्ट प्रथा व जादुटोना प्रतिबंध कायदा २०१३, कलम ३ (२)(५) अनुसूचित जाती अन्वये गुन्हा नोंद केला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार बुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे. जाटूटोण्याच्या संशयातून एकाला संपविल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
0
वादळी वाºयासह पाऊस, वीज कोसळून एक ठार, तीन जखमी

यवतमाळ, दि. २८ – वादळी वाºयासह गारपीटीने जिल्ह्याला आज दुपारी चांगलेच झोडपून काढले.बिटरगाव येथे वीज कोसळल्याने एक ठार झाला असून, दोन जण जखमी झाले. महागाव तालुक्यातील वनोली येथील युवकाच्या अंगावर भिंत कोसळली. दिग्रसमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. यवतमाळातही वादळी वारा व गारपीटीमुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. रब्बी पिकांना व फळबागांना गारपीटीचा व वादळी वाºयाचा सर्वाधिक फटका बसला असून, पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.
शहरात दुपारी ३ वाजताच्या सुामारास वादळी वाºयासह गारपीट झाली. यामध्ये दत्त चौकालगत असलेल्या भाजी व फ्रु ट विक्रेत्यांची पळापळ झाली. दुकानाचे शेड उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. तहसील चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौकासह अन्य मार्गावरील झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळी वारा व गारपीटीमुळे विद्यूत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तहसील चौकानजीक असलेल्या कारागृहावरील टिनपत्रे उडाली. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील शेतकरी पांडूरंग चिकने (४५) आपल्या दोन मुलासह शेतातून परतत असताना, अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे व विजेच्या कडकडाटीमुळे त्यांनी झाडाचा आडोशा घेतला. यावेळी रतननगरनजीक पांडूंरंग चिकने यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल व मनोज ही दोन मुले जखमी झाली आहे. महागाव तालुक्यातील वनोली येथील पवन प्रकाश चव्हाण (१६) या युवकावर शेतातील कोठ्याची भिंत पडल्याने तो जखमी झाला आहे. दिग्रस येथील होलटेक पुरा, शनिमंदिर चौकातील राजा तिलावार यांचे घरावरील टिनाची कैची पुर्ण पणे उडून एका उंच झाडावर अडकली. देवनगर परिसरातील नारायणराव चिरडे यांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यावरील फाड्या (दगड) घरात पडले. रमेश ठाकुर यांचा लाकूड फाटा व वर अंथरलेल्या टिनाचे संपूर्ण घर खाली कोसळले. तालुक्यातील विठोली, कांदळी, तुपटाकळी, लाख (रा) परिसरातील गहु, संत्रा पिकाचे नुकसान झाले. वादळी वारा व गारपीटीमुळे गहु, हरबºयासोबतच फळबागांचेही नुकसान झाले आहे.
0
वखार महामंडळात साडेचार कोटींचा घोटाळा, तिघांवर गुन्हे दाखल

उमरखेड (यवतमाळ) , दि. २८ – वेगवेगळ््या लोकांकडून खरेदी केलेले सोयाबीन, हरभºयाचे एकूण १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामातून वखार मंडळाचे भाडे अदा न करताच परस्पर हलविल्या प्रकरणी पोलिसांनी केंद्र प्रमुख, परिवाहक आणि धान्य व्यापारी या तिघांविरुद्ध फसवणूक तथा अफरातफर प्रकरणी गुन्हे दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे धान्य स्थानिक वाशीम अर्बन को. आॅप. बँकेला कर्जापोटी तारण होते. चातारी येथील घाऊक धान्य खरेदीदार श्रीधर माने यांनी सन २०१३ ते २१ फेब्रुवारी २०१५ पर्यंत वेगवेगळ््या लोकांकडून सोयाबीन तथा हरभरा खरेदी करून एकंदर १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामात साठविले होते. या धान्याच्या तारण पावतीवर खरेदीदाराने कर्जापोटी लाखो रुपयांची उचल वाशीम अर्बन बँकेच्या स्थानिक शाखेतून उचल केली होती. कर्जापोटी उचल केलेल्या रकमेची परत फेड न करताच त्याचप्रमाणे वखार मंडळाच्या साठवणुकीचे भाडे न देताच धान्य गोदामातून वखार मंडळातील केंद्र प्रमुख रोडगे, परिवाहक नेरकर आणि धान्य व्यापारी श्रीधर माने यांना एकमेकांच्या संगनमताने परस्पर हलविले. ही बाब राज्य वखार मंडळाचे अमरावती विभागाचे व्यवस्थापक मिलिंद मंगल घन यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची सविस्तर तक्रार उमरखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी केंद्रप्रमुख परिवाहक आणि धान्य साठवणूक व्यापारी या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गोदामात साठविलेल्या धान्याची बाजार भावाने ४ कोटी २० लाख ३१ हजार ६१३ रुपये एवढी किंमत असून, उमरखेडच्या इतिहासातील मोठा धान्य घोटाळा असून, वखार मंडळाच्या विश्वासार्हतेवर या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
मोदींचा संकल्प दाखवणार ‘महागाईचे दिन’

नवी दिल्ली – सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन..’ चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने महागाईचे दिन दाखवणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना उद्योगजगताला पुढल्या चार वर्षांसाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा दिला आहे. त्यामुळे अच्छे दिन श्रीमंतांचे का ? असा प्रश्न या अर्थसंकल्पावर उपस्थित झाला आहे.जेटलींनी वयैक्तिक करदात्यासाठींची आयकर (इनकम टॅक्स) कररचना कायम ठेवली असली तरी, त्याचा करदात्याला फायदा होण्याची शक्यता कमी आहे. कारण दुस-या बाजूला जेटलींनी सेवाकर १२.३६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.त्यामुळे हॉटेल, मोबाईल, घर, गाडी या सर्वच वस्तू महागणार आहेत. ग्राहकाला वस्तू खरेदी करताना सेवा कर द्यावा लागतो. कॉर्पोरेट टॅक्स पुढल्या चार वर्षांसाठी ३० टक्क्यांवरुन २५ टक्के केला आहे. त्यामुळे मोदींच्या अच्छे दिनांसाठी आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे.
या अर्थसंकल्पात ही ठळक वैशिष्ट्ये
कर सेवा
आर्थिक विकास कार्यात जीएसटीची भूमिका परिवर्तनवादी असते
पुढील चार वर्षांसाठी कॉर्पोरेट टॅक्स २५ टक्के
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार
एक कोटीहून अधिक उत्पन्नावर दोन टक्के अधिभार
कृषि क्षेत्र
ग्रामीण विकास पायाभूत विकास बँकेसाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान
सूक्ष्म सिंचन प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी
शेतक-यांना कर्जासाठी ८.५ लाख कोटी रुपयांचा निधी
पायाभूत सुविधा क्षेत्र
पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ७० हजार कोटी रुपायांची तरतूद
सिंचन आणि रेल्वे, रस्ते प्रकल्पासाठी टॅक्स फ्री बॉण्ड
पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन आणि विकासाठी पीपीपी मॉडेलचा आधार
रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडासाठी १५० कोटी रुपये
प्रत्येकी चार हजार मेगावॅट क्षमतेचे चार अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प सुरु करणार
शिक्षण
जम्मू-काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये एम्स स्थापणार
कर्नाटक, धनबाद येथील आयआयटींचा दर्जा वाढवणार
अमृतसरमध्ये उद्यानविद्येच्या अभ्यासक्रमासाठी पीजी इन्स्टिट्यूट
महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फार्मा सेंटर
अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
संरक्षण
संरक्षण क्षेत्रासाठी दोन लाख, ४६ हजार ७२७ कोटींची तरतूद
संरक्षण साधनांच्या उत्पादनासाठी मेक इन इंडियावर अधिक लक्ष केंद्रित करणार
कल्याणकारी योजना
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५० हजार प्रसाधने बांधण्यात आली.
जीएसटी एक एप्रिल २०१६मध्ये लागू करणार
२०२० पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर मिळणार
देशातील ८० हजार माध्यमिक शाळांमध्ये सुधारणा आणणार
अटल पेन्शन योजना सुरु होणार.यात ५० टक्के प्रिमियम सरकार भरणार
वरिष्ठ नागरिकांसाठी अनेक नव्या योजना
मनरेगासाठी अतिरिक्त पाच हजार कोटी रुपयांची तरतूद
लघु उद्योगांसाठी मुद्रा बँकेची स्थापना
पारंपारिक उर्जा
इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी
२०२२पर्यंत पारंपारिक उर्जेचे लक्ष्य – सौर उर्जा – १०० हजार मेगावट, पवनउर्जा – ६० हजारमेगावॅट, जैवइंधन – १० हजारमेगावॅट, आणि लघु जलविद्युत – पाच हजारमेगावॅट
पर्यटन
देशातील जुना गोवा, हम्पी, एलिफंटा लेणी, राजस्थानातील जंगले, लेह पॅलेस, वाराणसी, जालियनवाला बाग, हैदराबादमधील कुतुब शाही मकबरा यांचा पर्यटनस्थळांचा दर्जा
१५० देशांतील पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा
0
काय महागणार आणि काय होणार स्वस्त

नवी दिल्ली – सामान्य नागरिकांना अच्छे दिन पासून दूर ठेवणारा मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थंसकल्प शनिवारी संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात सेवा करात १२.३६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा कर वाढल्याने याचा परिणाम महागाईवर होणार आहे. फोन बिल, हॉटेलचे बिल, घरे यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. काय होणार आहे महाग आणि काय होणार स्वस्त यावर एक नजर
हे होणार महाग
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने
सिमेंट
सुगंधित पेय आणि बाटलीबंद पाणी
प्लॅस्टिक पिशव्या
म्युझिक कॉन्सर्ट
दारू, चिटफंड आणि लॉटरी
बिझनेस क्लासचा हवाई प्रवास महागणार
आयात करण्यात आलेली व्यवसायिक वाहने
वर्ल्डकपमध्ये भारताची विजयाची हॅट्रीक
हे होणार स्वस्त
एक हजार रुपयांहून अधिक किमतीच्या चामड्याच्या चपला
लोकल कंपन्यांचे मोबाईल फोन, एलईडी/एलसीडी पॅनेल्स, एलईडी लाईटस आणि एलईडी दिवे
सोलार वॉटर हीटर
रुग्णवाहिका आणि त्याच्या सुविधा
संगणक, टॅब्लेट
अगरबत्ती
मायक्रोव्हेव ओव्हन
रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसर
पीनट बटर, पाकीटबंद फळे आणि भाज्या
राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालय, संग्रहालय यांना भेटी देणे
0
अर्थसंकल्पाचा फायदा उद्योगपतींना – पी.चिदंबरम

नवी दिल्ली – मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा आहे. पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे जमा-खर्च आणि समानतेचे गणित सोडवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.
या अर्थसंकल्पात केवळ उद्योगपतींना फायदा देण्यात आला आहे. तर ३.५ कोटी प्राप्तिकरदात्यांना थोडक्यात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सेवा कराचा बोजा वाढल्याने त्यात ते पिचणार आहेत, असेही चिदंबरम म्हणाले. सरकारने वित्तीय तूट कपात करण्याचे लक्ष ठेवले आहे. ही तूट ३.९ वरून ३.६ टक्के आणण्यात येणार आहे. याचाच अर्थ सरकारला ३७,५०० कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
0
मोदी सरकारचा महागाईचा डबल दणका

नवी दिल्ली – महागाई कमी करण्याचे दावे करुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महागाईमध्ये भर घालणारा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शनिवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करुन, सर्वसामान्यांना मोदी सरकारने महागाईचा डबल दणका दिला आहे.
प्रतिलीटर पेट्रोल तीन रुपये १८ पैशांनी तर, प्रतिलीटर डिझेल तीन रुपये ९ पैशांनी महागले आहे. आधीच १२ टक्के असणारा सेवाकर १४ टक्के करुन महागाईला खतपाणी घातल्यानंतर आता प्रतिलीटर डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस महागाईमध्ये होरपळणार आहे. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती डिझेलवर अवलंबून असतात. आता डिझेलच्या किंमती भडकल्याने दैनंदिन वापराच्या वस्तू महागणार आहेत.
0
आकडयांची आतषबाजी, घोषणाबाजीचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली – नऊ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्पापाठोपाठ सर्वसाधारण अर्थसंकल्पात केवळ आकडय़ांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ या वर्षाचा ४,६६,७११ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात सेवा कर १४ टक्के केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
रालोआ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी मांडताना उद्योगांना झुकते माप दिले. तर प्राप्तिकर सवलत ‘जैसे थे’ ठेवल्याने लाखो करदात्यांच्या पदरात निराशा पडली आहे. या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट करात येते चार वर्षे ५ टक्के कर सवलत दिली असून संपत्ती कर रद्द करून त्याऐवजी अतिश्रीमंतांवर दोन टक्के अधिभार लावला आहे.
सेवा कर महागल्याने सिगारेट, कुरियर, हवाई प्रवास, मद्य, हॉटेलिंग, केबल, डीटीएच सेवा, ब्युटीपार्लर आदींसाठी सर्वसामान्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकराचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.
0
कुर्ला स्टेशन ते बीकेसी अंतर ५ मिनिटात

मुंबई- कुर्ला स्टेशन ते एलबीएस मार्गहून बांद्रा कुर्ला काॅम्पलेक्स (बीकेसी) ला जाण्यासाठी वाहन चालकाला ३० मिनिट येवढा वेळ लागतो,पण अात्ता कुर्ला स्टेशन ते बीकेसी जाण्यासाठीचा वेळ ५ मिनिटात शक्य असेल,त्यासाठी बीएमसी ने हा रस्ता जोडण्यासाठी २५ कोटीचा एक प्रकल् मंजूर केला अाहे.
अारटीअाय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या सतत प्रयत्नातून हे शक्य झाले अाहे,तसेच १३ मार्च २०१३ ला बीएमसी कमिश्नर सिताराम कुंटे व अनिल गलगली यांच्या बैठक झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कार्याला गती मिळाली अाहे.या प्रकल्पानुसार २२११ वर्ग मिटरच्या डेविड चाळ ला हटवण्यात येणार असुन त्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा असेल.









