पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 14th, 2015

रागाच्या भरात इसमाचा खून 0

रागाच्या भरात इसमाचा खून

download (5)
मारेगाव (यवतमाळ), दि. १४ – शाब्दीक वाद झाल्याने रागाच्या भरात काठीने मारहाण करून इसमाचा खून करण्यात आला. ही घटना मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे आज दुपारी १ वाजता दरम्यान घडली. दिलीप जैतू येडमे (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गोपाळा रामचंद्र बोकडे (५०) यास अटक करण्यात आली.
दिलीप व गोपाळा यांच्यात शाब्दीक वाद निर्माण झाला. त्यामुळे रागाच्या भरात दिलीपच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने घटनास्थळीच दिलीपचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देवाळात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी गोपाळा यास दोराने बांधून ठेवले. तसेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने, मंगेश भोयर, श्री. एफ. पाटील, जमादार भांदीकर, चव्हाण, आडे, राठोड , मोहाडे यांनी घटनास्थळ गाठले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून गोपाळा यास अटक करण्यात आली. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

February 14, 2015 in विदर्भ
बॅटºया चोरणारी टोळी जेरबंद , ११ लाखाच्या मुद्देमाल जप्त 0

बॅटºया चोरणारी टोळी जेरबंद , ११ लाखाच्या मुद्देमाल जप्त

Muddemaal
वणी, दि़१४ – शहर तथा ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर आहेत़ गत काही दिवसापासून चोरट्यांनी त्या टॉवरमधील बॅटºया चोरीकडे लक्ष केंद्रीत केले होते़ १४ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजताच्या दरम्यान रसोया फॅक्ट्रीजवळील आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर रुममधील बॅटºया चोरुन नेत असल्याची बाब गोपनिय माहितीच्या आधारे माहित होताच ११ लाख रुपयाच्या ऐवजासह चार आरोपींना वणी पोलीसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे़
वणी शहरापासून ३ किमी अंतरावर नांदेपेरा मार्गावर आयडिया मोबाईल कंपनीचे टॉवर आहे़ यातून चोरट्यांनी २४ बॅटºया चोरुन क्रुझर वाहन क्ऱएम़एच़२९ डी़ एऩडी़२३९८ ने जात असल्याचे कंपनीत कामावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले़ त्याने या बाबत वणी पोलीसांना तात्काळ सुचना दिल्या़ उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकार व ठाणेदार असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स़पो़नि़ दिपक पवार यांनी आपल्या पथकासह क्रुझर वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सदर वाहन लालगुडा परिसरातून भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले़ त्या वाहनाचा पाठलाग केला असता प्रमोद ज्ञानेश्वर मनोहरे वय (३३), मंगेश विजय डूबे वय (२४), अमोल विजय वानखेडे वय (२३), सोहेल युसूफ सय्यद वय (२४) या चौघांसह २४ नग मोबाईल टॉवरच्या बॅटºया, काळ्या रंगाची इलेक्ट्रीक केबल १५० फुट, लोखंडी कटर, ड्रील, पेंन्चीस पाने संच व वाहनासह ११ लाख २७ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़
परिसरातील जिनींग प्रेसिंग मधील महत्वपूर्ण असणाºया रेचाचे ८ नग गिअर बॉक्स, साहित्य व वाहन असा एकूण ३ लाख ३१ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल वणी पोलीसांनी जप्त केला़ दि़१० फेब्रुवारी रोजी सकाळी गस्त करीत असतांना लालगुडा परिसरातून येणाºया पिकअप वाहन क्ऱएम़एच़३० ए़बी़११७१ या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने जत्रा मैदानाकडे पळाल्याने पोलीसांनी पाठलाग केला असता वाहन चालक वाहन सोडून पळून गेला़ पोलीसांनी वाहन जप्त केले असून भंगार चोरट्याचा शोध घेत आहे़ ही कारवाई गुन्हेशोध पथकाचे अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, सय्यद साजीद, सुधीर पांडे, विकास घडसे, प्रमोद जूनूनकर, वसंता चव्हान, शेख नफिस, मनोहर पवार, सुरेश राठोड, बाळू गवारकर यांनी सहभाग घेतला होता़

 

February 14, 2015 in विदर्भ
पवार व माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच - मोदी 0

पवार व माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच – मोदी

2015-02-14~pawar_ns
बारामती, दि. १४ – शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे. शरद पवार आणि माझ्यात महिन्यातून दोन ते तीन वेळा चर्चा होत असते असे मोदींनी उघड केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौ-यावर आले आहेत. शरद पवारांच्या कृषी शाळेतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत बारामतीतील सभेत शरद पवारांवर तिखट शब्दात हल्लाबोल करणा-या नरेंद्र मोदींनी आज शरद पवारांचे कौतुक केले. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना मी त्यांच्याकडून गुजरात कृषी विकासाविषयी माहिती घ्यायचो, आमच्या कामात काही त्रुटी आहेत हे मी त्यांच्याकडून जाणून घ्यायचो असे मोदींनी सांगितले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारमध्ये माझी मदत करणारे शरद पवार हे एकमेव मंत्री होते अशी आठवणही त्यांनी याप्रसंगी सांगितली. शरद पवारांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे असेही त्यांनी सांगितले. वादसंवादातूनच लोकशाही पुढे सरकते, पण दुर्दैवाने दोन विभिन्न पक्षाचे दिग्गज नेते एकत्र आले की ती बातमी ठरते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. बारामतीत गती व मती असल्यानेच या शहराचा विकास झाला असे मोदींनी नमूद केले. साखर निर्याती आणि अॅंग्रो टेक्नोलॉजीवर भर देण्याची गरज असून ठिंबक सिंचन सारख्या पद्धतीद्वारे शेतीमध्ये पाण्याची नासाडी टाळून शेतीचा विकासही करता येईल असे मोदींनी स्पष्ट केले. तर राजकारण फक्त दोन दिवसांपुरते करायला हवे, उर्वरित ३६३ दिवस देशाच्या विकासाकडे बघायला हवे असे शरद पवार यांनी सांगितले.

 

February 14, 2015 in मुख्य पान
अरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 0

अरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Arvind Kejriwal's swearing-in ceremony
नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हजारो दिल्लीकरांच्या साक्षीने त्यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. आपचे नेते मनीष सिसोदिया, असिम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंदर जैन, गोपाल राय आणि जितेंदर सिंग तोमर यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवालांनी जनतेला उद्देशून भाषणही केले. लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक आम्ही आणू. तसेच सर्वप्रथम दिल्ली भ्रष्टाचारमुक्त कशी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करु असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.
बरोबर वर्षभरापूर्वी केजरीवाल यांनी याच दिवशी दिल्ली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत ‘आप’ने अभूतपूर्व यश मिळवले. ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा सोहळा झाला. य़ा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रित कऱण्यात आले होते. मात्र महाराष्ट्राचा पूर्वनियोजित दौ-यामुळे ते या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
मैदानावर तसेच परिसराबाहेर सर्वत्र पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मैदानात सुरक्षेच्या कारणावरुन नऊ आणि मैदानाच्या बाहेर १० एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी शेकडो सीआईएसएफचे जवान तैनात कऱण्यात आले होते.

 

February 14, 2015 in मुख्य पान