पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 23rd, 2014

आ. खडसे यांच्या वाहनाला अपघात एक ठार, चार जखमी

Photo0008 Photo0781
यवतमाळ – भरधाव दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात आ. विजय खडसे यांच्या वाहनाला आज रविवारी सायंकाळी पाच वाजता वन तपासणी नाक्यासमोर अपघात झाला. यामध्ये माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जागीच ठार झाले असून आमदारासह चार जण जखमी झाले.
आ. विजय खडसे हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्कार्पीओ वाहनाने (एम.एच. १४/ ४३०५ ) नांदेड येथे जात होते. अशातच शहरापासून दीड किमी अंतरावर वन तपासणी नाक्यासमोरून येणाºया दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक आहुटे यांचा गाडीवरून ताबा सुटला. त्यामुळे स्लीप झालेले वाहन पलट्या खावून १०० फूट फरफटत गेले. यामध्ये माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. दशरथ वानखेडे (४०) रा. सुकळी हे जागीच ठार झाले. तर उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आ. विजय खडसे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे (३०), युवक काँग्रेसचे सचिव शिवाजी वानखेडे, त्यांची आई गोदावरी वानखेडे (७२) आदी चार जण जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघातात एम. एच. २९ / ए.एफ. १६५४ क्रमांकाची मोटारसायकल चकनाचूर झाली असून, अन्य चार दुचाकी क्षतिग्रस्त झाल्या. या घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळ व रुग्णालयात गर्दी केली होती.

February 23, 2014 in मुख्य पान

यवतमाळ जिल्ह्यात गारपिट

1 2
१०० घराची पडझड, पिकाचेही नुकसान
यवतमाळ- गेल्या ुआठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलाचा आज रविवारी जिल्ह्याला परिणाम भोगावा लागला. जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाºयासह झालेल्या गारपिटीने गहू, हरभºयाच्या पिकासह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. आधीच जिल्ह्याची आणेवारी ५० पैशाच्या आत असताना उन्हाळी हंगामावर मदार उरलेल्या शेतकºयांची स्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे अर्धमेली झाली आहे.
आज दुपारी वादळीवाºयासह गारपीटीने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, कळंब, वणी, दारव्हा तालुक्यातील गहू, हरभरा, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोसाट्यासह आलेल्या वादळासोबतच गारपीटीने हजारो हेक्टरवरील गहू, हरभºयांची धूळधाण लावली. मोजक्या प्रमाणात का होईना, कशाबश्या तग धरून असलेल्या संत्रा, मोसंबी, पपईच्या फळबागांचीही हानी झाली. आर्णी तालुक्यातील अनेक घरांवरील टिनपत्रे वादळात एखाद्या पृष्ठाप्रमाणे उडून गेली. अनेक गावातील विज पुरवठा खंडित झाला तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प पडली. शहरातील अनेक भागात गारांचे ढिग साचले होते. वादळात नगरपरिषदेचा लोखंडी दरवाजाही उन्मळून पडला. सेवानगर, पोलीस स्टेशन परिसर, मालाणीनगर, आमणी रोड, हैजरीवंगना परिसर आदी भागातील नागरिकांचा संसार काही वेळाच्या वादळामुळे उघड्यावर आला. तर तालुक्यातील पोडवण, देऊरवाडी(बुटले), टेंडुळी, अंतरगाव, चिखली, पाठोडा येथेही गारपीटीसह वादळी पावसाने नुकसान झाले. दिग्रस तालुक्यालाही गारपीटीचा त्रास भोगावा लागला. यात शहरासह, तुपटाकळी, वाईमेंढी, चिचपात्र, बेलोरा या गावात आवळ््याच्या आकाराच्या गारा पडल्या. ग्रामीण भागात सतत १५ मिनिटापर्यंत गारपिट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नेर तालुक्यामध्येही ११ गावातील पिके भूईसपाट झाली असून लाखोंरुपयाचा फटका शेतकºयांना बसला आहे. काही ठिकाणी जनावरांना इजा होवून घरांची पडझड झाली आहे. दुपारी ३.१३ ते ४.३० वाजेपर्यंत वादळी पावसाने तालुक्यात तांडव माजविले. वणी तालुक्यातील उकणी, भालर, लागी, निवासी, निलजई, पुनवट आदी गावात शेतीपिकांसह घरांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यासह कळंब, दारव्हा तालुक्यालाही वादळाचा सामना करावा लागला.

February 23, 2014 in मुख्य पान

वीजेच्या धक्क्याने शेतकºयाचा मृत्यू

दारव्हा – शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकºयाला वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ७.३० वाजता बोदेगाव शिवारात घडली.
दिलीप विश्वनाथ लोखंडे (४२) रा. बोदेगाव असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. अशातच वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

February 23, 2014 in महाराष्ट्र

लुटमार करणारी टोळी सक्रीय, पाच जणांना लुटले

यवतमाळ – शहरात चोरी, घरफोडी व लुटमारीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. काल लुटमार करणाºया टोळीने हैदोस घालून चाकुच्या धाकारवर पाच जणांना लुटल्याच्या घटना घडल्या. शहर ठाण्याच्या हद्दीत यवतमाळ नागपूर रोडवरच लागोपाट तीन जणांना आणि वडगाव रोड हद्दीत गोदणी रोडवर दर्गा आणि चापडोह येथे प्रत्येकी एकाला लुटले. नव्याने रुजु झालेल्या ठाणेदाराला चोरट्याने सलामी दिली आहे. या घटनेमुळे दुचाकी व कारने प्रवास करणाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून दहशत पसरली आहे.  सागर हरिदास अवधुतकर (२६) रा. सारस्वत ले आऊट हा युवका आपल्या दुचाकीने (एम.एच. २९/ एल ४५९५) अमलोकचंद महाविद्यालयात भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तेथून रुपलानी बाबा दर्गाकडे तो जात असताना रोडवर संडासला बसलेल्या चोरट्याने चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर खिशातील नगदी १ हजार ९५० रुपये, मोबाईल व दुचाकी असा एकुण २१ हजार ९५० रुपयाचा माल जबरीने हिस्कावून नेला. तसेच उमेश भिमराव मडावी (२४) रा. करळगाव हे आपल्या दुचाकी वाहनाने (एम.एच. २९/ एल ४५९५) चापडोह येथून गावाकडे परत जात होते. अशातच चापडोह शिवारात दोन इसमानी दुचाकी थांबवून मडावी जवळील १ हजार ८०० रुपये रोख, दोन मोबाईल असा एकुण ५ हजार ८०० रुपये हिस्कावून नेले. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी दोन्ही घटनेतील चोरट्याविरूद्घ गुन्हे दाखल केले. पाटबंधारे विभागात कार्यरत कालवा चौकीदार दिवाकर लक्ष्मण पजगाडे (३६) हे राळेगाव येथून यवतमाळकडे आपल्या दुचाकी वाहनाने (एम.एच. २९/ ए.बी. ५१५३) येत होते. अशातच भारी येथील विमानतळाजवळ रात्री ७.३० वाजताच्या सुमारास तोंडाला काळे दुप्पटे बांधुन असलेल्या तीन जणांनी आपले दुचाकी वाहन आडवे केले. चाकुचा धाक दाखवून पैसे कहा है असे म्हणून जबरीने खिशात हात टाकून नगदी एक हजार रुपये, दोन एटीएम कार्ड हिस्कावून कळंबकडे पळून गेले. तसेच याच परिसरात नामदेव तिजारे रा. अयोध्या नगरी यालाही अडवून १५ हजार रुपये नगदी, मोबाइल असा एकुण १६ हजाराचा माल हिस्कावून नेला. तर नंदकिशोर पातालबंशी रा. बाजोरीया नगर यालाही विमानतळा जवळ अडवून दोन हजार रुपये नगदी, एक मोबाईल आदि माल जबरीने हिस्कावून नेला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चोट्याविरूद्घ गुन्हे दाखल केले. वडगाव रोड पोलिस ठाण्यात अशोक बागुल हे आजच रुजु झाले असून चोरट्यानी त्यांना सलामी दिली आहे. या घटनांनी दुचाकी वाहनाने प्रवास करणाºया व्यक्तीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून दहशत पसरली आहे.