पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 2nd, 2014

वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी राज्य सक्षम -राजेंद्र मुळक

02022014(015)

वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी राज्य सक्षम -राजेंद्र मुळक
यवतमाळ दि. 02 : राज्याला साडे चौदा हजार मेगावॅट वीजेची आवश्यकता आहे. या तुलनेत चौदा हजार दोनशे पन्नास मेगावॅट वीज निर्मिती होत असल्यामुळे राज्य वीज निर्मिती व वीज पुरवठ्यासाठी सक्षम आहे असे प्रतिपादन वित्त, उर्जा व सिंचन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
आर्णी तालुक्यातील जवळा येथे आज सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत 132 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपूजन करण्यात आले यावेळी राज्यमंत्री मुळक बोलत होते. आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, पं.स.सभापती राजीव विरखेडे, उपसभापती सारनाथ खडसे, बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, जि.प.सदस्य देवानंद पवार, सोनबा मंगाम, विद्युत पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, वीज वितरणचे मुख्य अभियंता श्री. बोरकर, आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
राज्यात आता विज दर कमी झाले आहेत, असा उल्लेख करून राज्यमंत्री मुळक म्हणाले, वीजभार नियमन समस्या राहिली नाही, मात्र ज्या भागात वीज चोरीचे प्रमाण. वीज बिलाची रक्कम थकीत आहे तिथेच भारनियमन केले जाते. पेट्रोल, डिझेल, जसे ग्राहकाला रोखीने घ्यावे लागते तसेच विद्युत हे देखील इंधन आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा रोखीने घ्यावा लागतो म्हणून वीज निर्मिती करता यावी यासाठी वीज ग्राहकांनी बिलाची रक्कम नियमीतपणे भरावी तसेच वीज चोरीच्या अपप्रवृत्तीला आळा घालावा असेही आवाहन त्यांनी केले.
निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसन व इतर बाबींसाठी 150 कोटीची तरतूद 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. राज्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात औद्योगिक, कृषी व इतर क्षेत्रात राज्य देशात अग्रेसर आहे. त्यामुळेच विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या 132 के.व्ही. उपकेंद्राचे काम दर्जेदार व मुदतीत पुर्ण करावे. तसेच या केंद्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या कालावधीत या परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी अशा सूचनाही ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केल्या.
जवळा येथे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रामुळे याच भागातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या सुटतील असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केला. निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी वन कायद्यासह इतर येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री व इतर जेष्ठ मंत्र्यांच्या पुढाकाराने सोडविण्यात आल्या असून या प्रकल्पाला अंतिम मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्प क्षेत्रातील पुर्नवसनासाठी 150 कोटी रुपयाची निधी शासनाकडून उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा श्री. मोघे यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मुक्ता बेले, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, अधिक्षक अभियंता वासुदेव खाडे, श्री.जाधव, कार्यकारी अभियंता सुरेश पाठक, सुनील शेरेकर, रुपेश फरकाडे, श्री. तगलपल्लेवार, तहसिलदार नरेंद्र दुबे, प्रतिष्ठीत नागरिक भरत राठोड, बाळासाहेब शिंदे, डॉ. चव्हाण, नाना पाटील, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अधिक्षक अभियंता वंदन मेंढे यांनी मानले. सूत्र संचालन जयंत वाघमारे यांनी केले.

February 02, 2014 in रोजगार

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जण ठार

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जण ठार
माऊंट सिनाबंग – इंडोनेशियातील माऊंट सिनाबंग परिसरात शनिवारी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या उद्रेकात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच रविवारी बचावकार्यादरम्यान जवांनांना घटनास्थळी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले.
मृत व्यक्तींमध्ये स्थानिक वाहिनीचे पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचा समावेश आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात तप्त लाव्हारस, विषारी वायू आणि राख बाहेर पडत आहे. पुढील चार महिने हा ज्वालामुखीचा उद्रेक चालू राहणार आहे. त्यामुळे तेथील सुमारे चौदा हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे

February 02, 2014 in रोजगार

ठाण्यात कॉन्स्टेबलची आत्महत्त्या

ठाण्यात कॉन्स्टेबलची आत्महत्त्या
ठाणे – रेल्वे पोलिस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलने पोलिस ठाण्यातच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी घडली.
महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाड़ून आत्महत्त्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्त्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

February 02, 2014 in रोजगार

हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला अटक

हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला अटक
श्रीनगर – हिजाबुल मुजाहिदीनच्या कमांडरला सुरक्षा रक्षकाच्या दलांनी रविवारी काश्मीरमधील अनंतनग जिल्ह्यातून अटक केली.
‘मिळालेल्या माहितीवरुन सुरक्षा रक्षकांनी टाकलेल्या छाप्यात मुबारक अहमद वाणी उर्फ मेजर सकिबला अटक करण्यात आल्याचे’ सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणाहून एके रायफल, दोन पिस्तुल आणि काही युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेजर सकिबचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

February 02, 2014 in रोजगार

कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका

कूपनलिकेत पडलेल्या चिमुरडय़ाची सुटका
अहमदनगर : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला.. येथील खैरी निमगाव शिवारातील एका कूपनलिकेमध्ये अडकलेल्या चिमुरडय़ाला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. येथील पटारे यांच्या वस्तीवर ऊस तोडणी कामगार काम करत असताना विलास निकम या ऊस तोडणी कामगाराचा १८ महिन्यांचा चिमुकला शेजारीच शेतात असलेल्या
एका कूपनलिकेमध्ये पडला होता. या मुलाचा ३ वर्षाचा भाऊ बरोबर खेळत होता. त्याने आपला भाऊ खड्डय़ात पडल्याचे पाहून त्याने आईवडिलांना सांगितले. यानंतर तातडीनं या ठिकाणी मदत कार्य सुरू झाले.
दीडशे फूट खोल असलेल्या या कूपनलिकेमध्ये हा मुलगा तीस फुटांवर अडकला होता. गावकरी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदकार्य सुरू केले. मुलाला ऑक्सिजनचा पुरवठाही करण्यात आला. तीन डोझरच्या सहाय्याने मुलाची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री उशिरा या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

February 02, 2014 in रोजगार

दूरसंपर्क स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी

दूरसंपर्क स्पेक्ट्रमचा लिलाव सोमवारी
नवी दिल्ली – सरकारला तब्बल ११,३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ शकणारा बहुप्रतिक्षित स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि इतर पाच कंपन्या सहभागी होणार असून हे हक्क मिळवण्यासाठी या कंपन्यांमध्ये मोठी चुरस आहे.
दूरसंपर्क विभागाने १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ३८५ मेगाहर्ट्झ आणि ९०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ४६ मेगाहर्ट्झ रेडिओवेव्हज उपलब्ध केल्या आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई यासह एकूण १० क्षेत्रांमध्ये(सर्कल) विक्री करण्यात येणा-या या स्पेक्ट्रमच्या लहरींचे प्रमाण कमी केले आहे. यापूर्वी ४०३ मेगाहर्ट्झच्या लहरी उपलब्ध करण्याचे निर्धारित करण्यात आले होते.
या लिलावामध्ये सहभागी होणा-या अंतिम निविदादारांमध्ये आयडिया सेल्युलर, टेलिविंग्ज (युनिनॉर), रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम), टाटा टेलिसर्विसेस आणि एअरसेल यांचाही समावेश आहे.
दरम्यान काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये बोली लावण्यासाठी तीन कंपन्या पात्र नसल्याचे आढळले. व्होडाफोन इंडिया या कंपनीला सात क्षेत्रांमध्ये, आरकॉमला आठ आणि टाटा टेलिसर्विसेसला दिल्लीत बोली लावता येणार नाही.
फेब्रुवारी २०१२ मध्ये टू जी प्रकरणात १२२ परवाने रद्द केल्याने मोकळ्या झालेल्या रेडियोलहरींचा लिलाव करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकारला लिलावाची तिसरी फेरीही आयोजित करावी लागेल.
त्याशिवाय ९०० मेगाहर्ट्झ या स्पेक्ट्रम बँडअंतर्गत काही रेडियोलहरी जुन्या दूरसंपर्क परवान्याखाली असून त्यांची मुदत नोव्हेंबर २०१४ मध्ये संपत आहे. त्यामुळे या बँडचाही लिलाव करावा लागणार आहे. १८०० मेगाहर्ट्झच्या बँडच्या विक्रीसाठी सरकारने १७६५ कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झची आधारभूत किंमत ठेवली आहे. मार्चमध्ये झालेल्या विक्रीपेक्षा ही किंमत २६ टक्क्य़ांनी कमी आहे.
९०० मेगाहर्ट्झ बँडची आधारभूत किंमत पूर्वीच्या लिलाव दरापेक्षा ५३ टक्क्य़ांनी कमी आहे. दिल्लीसाठी ३६० कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झ, मुंबईसाठी ३२८ कोटी व कोलकात्यासाठी १२५ कोटी रुपये प्रतिमेगाहर्ट्झ किंमत आहे. या लिलावात सर्व स्पेक्ट्रम विकले जातील. हा लिलाव यशस्वी होईल, असा विश्वास दूरसंपर्क सचिव एम. एफ. फारुखी यांनी व्यक्त केला.

February 02, 2014 in रोजगार

केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ

केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या सर्व कर्मचा-यांना महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करून तो १०० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचा-यांना आणि ३० लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे.
१ जानेवारी २०१४ पासूनच्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने तो मिळेल.औद्योगिक कामगारांच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार हा महागाई भत्ता मिळणार आहे. महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ झाल्याने सरकारने वेतन आणि महागाई भत्ता हा मूळ पगारात समाविष्ट करावा, अशी मागणी होत आहे.
राहणीमानाच्या खर्चात ३०० टक्के वाढ झालेली असताना सरकार केवळ १०० टक्के महागाई भत्ता देत आहे. त्यामुळे या वाढीचा फार मोठा फरक पडणार नाही, असे कर्मचारी संघटनेने सांगितले.

February 02, 2014 in रोजगार