माहुर – शहरातील गणेश नगरस्थित एका प्लॉटमध्ये गुप्तधन सापडल्याची चर्चा आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.
शहरात पुरातन गणेश मंदिराच्या पायथ्याशी प्रभाग क्र. चार मध्ये मधुसुदन भारती यांंचे नावे प्लॉट असून त्यावर मुन्ना नामक व्यक्तीचा ताबा आहे. १२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी अनमाळ येथील पायाळू व्यक्ती, विदर्भातील एक मौलवी याच्या मध्यतीने येथील सोनेरी टोळीने सदर प्लॉटमध्ये खोदकाम केले. त्यामध्ये दोन सोन्याने भरलेले हंडे सापडले असून टोळी घेऊन पसार झाल्याची चर्चा आहे. ही वार्ता शहरात पसरताच गणेश मंदिराजवळ बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यापूर्वी शहरातील रामगड किल्ला, सोनापिर दर्गा, पुरातन वास्तुतुन गुप्तधन काढण्याचे प्रकार तचेस त्यासाठी नरबळी दिल्याच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद आहे. परिसरात नव्याने सोनेरी टोळी सक्रीय झाली असून गुप्तधन शोधण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक खडसे यांनी केली आहे.
Archive for February 13th, 2014
माहुरात गुप्तधन सापडल्याची चर्चा
सामाजिक न्यायमंत्री ना. शिवीजीराव मोघेंचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
यवतमाळ – सामाजिक न्यायमंत्री ना. शिवीजीराव मोघे यांनी आदिवासी आश्रम शाळा व मराठी डी.एड. कॉलेजला शासनाकडून मान्यता मिळवून देण्यासाठी ४२ लाख रुपये घेतल्याचा आरोप कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण तातडीने निकाली काढण्याची विनंती ना. मोघे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
आदिवासी आश्रम शाळ ा व मराठी डी.एड. कॉलेजला शासनाकडू मान्यता मिळवून देण्यासाठी ना. शिवाजीराव मोघे यांनी ४२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार वडगाव रोड पोलिस ठाण्यात कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यानी केली होती. मंत्र्याच्या विरोधात ही तक्रार असल्याने पोलिसांनी कार्यवाही केली नाही. शेवटी सोलंकी यांनी येथील जेएमएफसी कोर्टात फौजदारी स्वरूपाची तक्रार दिली. त्यामध्ये ना. मोघे, पुतण्या विजय माघे, जि.प. सदस्य देवानंद पवार यांच्याविरूद्घ गुन्हे दाखल करण्याची विनंती केली होती. या प्रकरणात न्यायालयाने तात्काळ गुन्हे दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश वडगाव रोड पोलिसांना दिले होते. तवरून पोलिसांनी २४ जुलै २०११ रोजी भादंवि कलम ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मोघे मंत्री असल्याने या प्रकरणात हस्ताक्षर तंज्ञाच्या अहवालासह भक्कम पुरावे असताना कोणताही सबळ पुरावा आढळला नाही असे कारण समोर करून ब समरी फायनल न्यायालयात पाठविला. मात्र सोलंकी यांनी अॅड. राजेश साबळे यांच्या मार्फत आक्षेप नोंदवून इश्यु प्रोसस करण्याची विनंती केली. न्यायालयाने २३ आॅगस्ट २०१२ रोजी इश्यु प्रोससचे आदेश देऊन तीघांनाही समन्स बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर ना. मोघे यांनी यवतमाळ न्यायालयात खटला रद्द करावा म्हणून उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कार्यवाहीला स्थगिती दिली. दरम्यान १ फेबु्रवारी रोजी पुन्हा मोघे, पवार याच्या विरूद्घ पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मोघे यांनी उच्च न्यायालयात मंगळवारी अर्ज दाखल करून फौजदारी अर्ज तातडीने निकाली काढण्याची विनंती केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सदर अर्ज फेटाळला.
ट्रक अपघातात एक ठार, तीन गंभीर

नेर – तालुक्यातील वटफळी येथे दोन ट्रकच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हा अपघात एवढा भयानक होता की दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचूर झाल्या असून मृतदेह काढण्यासाठी तब्बल सहा तासाचा वेळ लागला.
अमरावती वरून तुर घेऊन ट्रक (एम.एच. २०/ ए ए ८१९९) यवतमाळ मार्ग आदिलाबाद येथे जात होता. तर यवतमाळकडून दगडी कोळसा घेऊन औरंगाबाद येथे जाणाºया ट्रकची (टि.एन. ७७ / बि ८२३१) वटफळी या गावाजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये गोविंद पुनास्वामी (४०) रा भरकसरा तामिळनाडू यांचा जागीच मृत्यू झाला. तर सारवनाथ कुमार (३१) रा. शेद्राभट्टी तामीळनाडू, अनिल रामसिंग सोनवाल (२१) रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती मिळताच जमादार श्रीकृष्ण गुल्हाणे, अरविंद जाधव, प्रतापसिंग ठाकुर यांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भयानक होता की, दोन्ही ट्रकच्या कॅबीन चकनाचुर झाल्या असून मृतदेह बाहेरकाढण्यासाठी तब्बल सहा तास लागले. या प्रकरणी नेर पोलिसांनी ेट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
‘त्या’पित्यावर खूनाचा गुन्हा
यवतमाळ – सायतखर्डा येथे मुलीला गळफास लाऊन ठार मारल्याप्रकरणी पारवा पोलिसांनी पित्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. अजय तुकाराम ढवळे (३५) रा. नाचनगाव जि. वर्धा याने अनुष्का (५) या मुलीचा गळा आवळून तीला ठार मारले होते. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी सायतखर्डा येथे घडली होती. याप्रकरणी पारवा पोलिसांनी अजय ढवळे याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आर्यरुप टुरिझमचा २४ लाखाचा घोटाळा ९० लाखावर
सिआयडी मुख्यसुत्रधाराच्या मागावर
यवतमाळ – आर्यरुप टुरिझम कंपनीचा २४ लाखाचा घोटाळा आता ९० लाखावर पोहचला असून पोलिसांनी राज्यात ४३ गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास सिआयडी करीत असून कंपनीच्या फरार चार मुख्य संचालकांचा मागावर आहे.
१ जानेवारी २००९ रोजी आर्यरुप टुरिझम कंपनीची स्थापना सातारा जिल्हयातील खटावा येथील रविंद्र शिवाजीराव देशमुख, त्याच्या पत्नी वसुधा उर्फ वैशाली देशमुख व उदयसिंग नारायण घोरफडे रा. कोरेगाव (बाहुली) जि. सातारा, भाटी यांनी स्थापन केली होती. मुंबई येथे या कंपनीचे मुख्य कार्यलय असून नेट बँकीगद्वारे संपूर्ण व्यवहार सुरु होते. या कंपनीच्या एजंटनी ग्रामीण भागातील नागरिकांना हेरून कंपनीत जमा केलेल्या रक्कमेची दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बडी पडून अनेक व्यक्ती, व्यापारी, व्यावसायीकांनी लाखो रुपये गंतवणूक केली. निर्धारीत कालावधीत ग्राहकांनी नेटवर अकांऊटवरील रक्कम पाहिले असता तेथे दामदुप्पट रक्क्मेची नोंद दिसायची. मात्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यामध्ये रक्कम जमा केली नसल्याचे उघड होत होते. याप्रकरणी पंजाबराव देशमुख (खडकेकर) यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. यावेळी २४ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे चारही संचालक, मुंबईचे लेखापाल नितीन गुप्ते, एजंट विनायक गणपत बोन्सले रा. विडूळ ह.मु. वसंत नगर उमरखेड यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी प्रथम पुसद शहर पोलिसांनी तपास केला. मात्र या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असल्याने तपास सिआयडीकडे देण्यात आला. राज्यात या कंपनीविरूद्घ ४३ गुन्हे दाखल झाले असून ग्राहकांची ९० लाख रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लेखापाल गुप्ते याला अटक केली असून मुख्यसुत्रधार देशमुख दाम्पत्य, घोरफडे, भाटी व एजंट बोन्सले हा तेव्हापासून फरार होता. सिआयडीचे पथक त्याच्या मागावर असून कसुन शोध घेत आहे. या पथकाने यापूर्वीच कंपनीचे कार्यालय, शेती, मालमत्ता सिल केले असून बँकेचे खातेही गोठविल्याची माहिती सिआयडीचे पोलीस उपअधिक्षक सुरेश इंगळे यांनी दिली. सिआयडी पथकाने काल एजंट विनायक गणपत बोन्सलेला अटक केली व न्यायालयात हजर करून १५ फेबु्रवारी पर्यत सिआयडी कोठडी मिळविली.
मंगळावर पाण्याचा प्रवाह
वॉशिंग्टन , वृत्तसंस्था – मंगळावर द्रव स्वरूपातील पाणी अस्तित्वात असल्याचे पुरावे टेहळणी यान आणि ओडिसी यानाने पाठवले असल्याचा दावा अमेरिकी अवकाशसंस्था ‘नासा’ने केला आहे.
अवकाशयानाला मंगळ ग्रहावर गडद, बोटाच्या आकाराच्या खुणा दिसल्या आहेत. तापमान वाढले, की त्या उतारावरून खाली येताना दिसतात. याबरोबरच ग्रहावरील हवामानाच्या बदलांनुसार लोहखनिजांमध्येही बदल होताना दिसत असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. फेरिक सल्फेटसारखे लोहखनिजयुक्त खारे पाणी गोठत नसल्यामुळे ते हवामानबदलानुसार ग्रहावरून वाहत असावे, असे स्पष्टीकरण यासंदर्भात देता येते. संशोधकांनी या गडद प्रवाहांना ‘रिकरिंग स्लोप लाइन’ (आरएसएल) असे नाव दिले आहे. आतापर्यंत तेरा ‘आरएसएल’ मिळाल्याचे अवकाशसंस्थेने सांगितले आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर’ आणि ‘इकारस’ या जर्नलमधील दोन अहवालांचे प्रमुख लेखक लुजेंद्र ओझा म्हणाले, ”आरएसएल’मध्ये पाणी असल्याचे आम्ही अद्यापतरी ठामपणे म्हणू शकत नाही. पण, पाण्याशिवाय हा प्रवाह वाहू शकेल, असे आम्हाला वाटत नाही. ‘आरएसएल’ची शक्ती उष्ण हवामानात अधिक असते, तर थंड हवामानात ती कमी असते.’ काही वर्षांपूर्वीच्या प्रतिमांची तुलना या वेळी घेतलेल्या छायाचित्रांशी संशोधक करत आहेत. काही वर्षांपूर्वी ‘आरएसएल’ मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते, असे संशोधनात दिसून आले आहे.
मेधा पाटकर लोकसभा लढविणार
मुंबई – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज, गुरूवारी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे स्पष्ट केले नाही. येत्या चार ते पाच दिवसांत पक्ष व मतदारसंघाचे नाव सांगणार असल्याचे म्हटले आहे.मेधा पाटकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. पाटकर यांनी यापूर्वी केजरीवालांसोबत अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता. विविध संघटनांचा समूह असलेल्या जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या मेधा पाटकर या नेत्या आहेत.
सुरक्षारक्षकाचा प्राचार्यांवर कु-हाडीने हल्ला, दोन प्राध्यापकांचा मृत्यू
नाशिक – नाशिकच्या सटाणा महाविद्यालयामध्ये गुरुवारी सकाळी नेपाळी सुरक्षारक्षकाने कु-हाडीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे.
बालबहादूर सिंह असे या हल्लेखोर सुरक्षारक्षकांचे नाव आहे. सकाळी महाविद्यालयाच्या आवारातच त्याने प्राचार्य दिलीप शिंदे, प्राध्यापक सुनील सागर, प्राध्यापक प्रफुल्ल ठाकरे आणि शिपाई दीपक मगरे यांच्यावर हल्ला केला. सर्व जखमींना उपचारांसाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे .हल्लेखोर बालबहादूर सिंहला विद्यार्थ्यांनी आवारातच पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नोकरीत कायम करण्याबरोबर पगार वाढवून द्यावा अशी या हल्लेखोराची मागणी होती.मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाने त्याची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे संतापलेल्या बालबहाद्दूर सिंहने प्राचार्यांवरच हल्ला केला. गेल्या सात वर्षांपासून तो या महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे.
आंध्रतील १८ खासदार निलंबित
नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर होताच लोकसभेला अक्षरश: युध्दभूमीचे स्वरुप आले. तेलंगण विधेयकावरुन जोरदार गदारोळ सुरु असतानाच, तेलंगण समर्थक आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. दरम्यान लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी गोंधळ घालणा-या आंध्रप्रदेशच्या १८ खासदारांना नियम ३७४ अंतर्गत निलंबित केले आहे.
मिरचीपूड फेकणारे खासदार एल राजगोपाल यांच्यासह ध्वनीक्षेपक तोडणारे टीडीपीचे खासदार एम. वेणूगोपाल रेड्डी यांना निलंबित केले आहे. यांच्यासह सब्बम हरी, अनंथा व्यंकटरामी रेड्डी, रायपती संबासिवा राव, एसपीवाय रेड्डी, एम श्रीनिवासुलु रेड्डी, व्ही अरुण कुमार, ए साई प्रताप, सुरेश कुमार शेतकर, केआरजी रेड्डी, बापी राजू कनुमुरी आणि सुखेंदर रेड्डी (सर्व काँग्रेस) तसेच निरामली सिवाप्रसाद, निम्माला क्रिस्तप्पा, के. नारायणा राव (सर्व टीडीपी) आणि वाय एस जगनमोहन रेड्डी, एम राजामोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.
लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत या खासदारांमध्ये मारामारी झाली. या दरम्यान विजयवाडाचे निलंबित खासदार एल. राजगोपाल यांनी संसदेत मिरचीपूडचा स्प्रे फवारल्याने काही खासदारांची तब्येत बिघडली. त्यामुळे संसदेत रुग्णवाहिका बोलवून या खासदारांना रुग्णालयात नेण्यात आले. स्प्रे फवारणा-या राजगोपाल यांना अन्य खासदारांनी मारहाण सुरु केल्यानंतर संसदेतील कर्मचा-यांनी मध्ये पडून त्यांची सुटका केली. हा गोंधळ सुरु असताना टीडीपीचे खासदार के. नारायण राव चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी तेलंगण विधेयकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याने सीमांध्र भागातील तीन काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. लोकसभेत स्वतंत्र तेलंगणचे विधेयक येताच विरोधक खासादारांनी हे विधेयक हिसकावून फाडून टाकण्याचाही प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुक, उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख
कोलकाता- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या वैयक्तिक निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपयांवर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यापूर्वी उमेदवारांना २५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा होती.
पश्चिम बंगालचे सह मुख्य निवडणूक अधिकारी सायबल बर्मन यांनी ही माहिती दिली. २०११ मध्ये याबाबतचा निर्णय झाला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.नवीन निर्णयावर अनेक पक्ष नाखूश असून त्यांनी ही मर्यादा पुन्हा वाढवण्याची मागणी केली आहे, असे निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्चविषयक स्पेशल ड्युटी ऑफिसर अमित रॉय चौधरी यांनी सांगितले.उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसाठी भरारी पथक, सांख्यिकी भरारी पथक, व्हिडीओ भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. ही सर्व पथके खर्च निरीक्षकांच्या अखत्यारित काम करतील, असे रॉयचौधरी यांनी सांगितले.









