पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 27th, 2014

बसला अपघात; ८ ठार 0

बसला अपघात; ८ ठार

acc
सातारा –  सातारा-मुंबई मार्गावर पारगाव खंडाळा येथे खाजगी बसला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. बस उलटल्याने तब्बल आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. उपचारांसाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजतो. बस उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळबंली होती. तसेच येथे थांबलेल्या काही गाड्यांना एक कंटेनरने धडक दिल्याने दुसरा देखील अपघात झाला. या अपघातात देखील काही जण जखमी झाले आहेत.या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे आढळून आले आहे. मागील महिन्यात देखील याच मार्गावर काही भीषण अपघात झाले होते.

February 27, 2014 in मुख्य पान
अँब्युलन्स-बस अपघात, सहाजण ठार 0

अँब्युलन्स-बस अपघात, सहाजण ठार

accident
नागपूर – नागपूर-अमरावती रोडवर खुर्सापूर गावाजवळ कोंडाळीनजिक अँब्युलन्स (क्र.एम.एच. १९९९९८) आणि बाबा ट्रॅव्हल्सच्या बसची (क्र.एम.एच.३१ सी.क्यू.६९००) समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सहाजण ठार आणि दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
बस ड्रायव्हरने जेवणासाठी ढाब्यावर जाताना लेन (मार्गिका) चुकवली आणि अपघात झाला. अपघातात अँब्युलन्समधील सहाजणांचा मृत्यू झाला. ज्यांना अँब्युलन्समधून उपचारासाठी नेत होते त्या अजय यादव यांच्यासह यादव कुटुंबातील पाचजणांचा तसेच अँब्युलन्सच्या ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू झाला.अँब्युलन्स भुसावळहून नागपूरच्या दिशेने येत होती तर बस नागपूरहून लग्नाची वरात घेऊन धुळ्याला जात होती.मृतांची नावेः अजय यादव (५८), विजय यादव (३८), नलिनी यादव (३६), अंकित यादव (३६), मंगेश यादव (३४) आणि पितांबर पाटील (२५), जखमींची नावेः रुपेश यादव आणि प्रमिला यादव

February 27, 2014 in मुख्य पान
‘सिंधुरत्न’: 'त्या' अधिकाऱ्यांचा मृत्यू 0

‘सिंधुरत्न’: ‘त्या’ अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबई बंदरापासून साधारण ५० सागरी मैलांवर काल (बुधवारी) भारतीय नौदलाच्या सिंधुरत्न पाणबुडीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत लेफ्टनंट कमांडर कपिष मुवल आणि लेफ्टनंट मनोरंजनकुमार या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सात जखमी नौसैनिकांना वाचविण्यात यश आले असून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डागडुजी-दुरुस्ती करून पाण्यावर स्वार झालेल्या आयएनएस सिंधुरत्न या रशियन बनावटीच्या किलो श्रेणीतील पाणबुडीचे परीक्षण सुरू असतानाच बुधवारी पहाटे सहा वाजता नौसैनिकांच्या कक्षातून धूर येऊ लागला. आग शमवण्याच्या प्रयत्नात नाकातोंडात धूर जाऊन नौसैनिकांचा श्वास कोंडला गेला. या अपघातानंतर लेफ्टनन्ट-कमांडर हुद्द्याचे डेप्युटी इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि लेफ्टनन्ट दर्जाचे वॉचकिपिंग ऑफिसर हे दोन अधिकारी बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू होता. मात्र, अपघातग्रस्त पाणबुडी आज (गुरुवारी) मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. दरम्यान, पाणबुडीची बारकाईने पाहणी करून अपघाताची कारणे शोधली जातील तसेच दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती नौदलाने दिली.

February 27, 2014 in मुख्य पान

राजीव हत्या: खुन्यांच्या सुटकेला स्टे

नवी दिल्ली – राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, अशी नोटीस न्यायालयाने जयललिता सरकारला बजावली आहे.
दया याचिकेवर निर्णयास विलंब झाल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राजीव हत्याकांडातील तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. या निर्णयानंतर जयललिता सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तिघा मारेकऱ्यांसह आणखी एकाची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. मुख्य न्यायमूर्ती पी. सथासिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आज (गुरुवारी) त्यावर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली. याप्रकरणी पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.

February 27, 2014 in देश-विदेश

भूमिअभिलेख उपसंचालक जाळ्यात

नागपूर – भूखंडाच्या नामांतरासंदर्भातील तक्रार निकाली काढण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख उपसंचालक दादासाहेब तळपे याला लाच लुचपत प‌‌्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. लाचेची रक्कम घरी ठेवण्यासाठी मध्यस्थी करणारा चपराशी भालचंद्र प्रल्हाद गलांडेही(२२ रा. गणेशपेठ) एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. एसीबीच्या पथकाने तळपे याच्या अमरावती मार्गावरील म्हाडा वसाहतीतील घर आणि पुण्यातील शास्‍त्रीनगर येथील घराची झडती सुरू केली आहे. लाच रुपात मोठी रक्कम स्वीकारण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे भूमीअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.
उद्योजक एन.कुमार यांची कुमार हॉटेल लिमिटेड व लिंक हाऊस इण्डस्ट्रीज आहे. अॅड.अमरेंद्रसिंग वर्मा (३२ रा.मिरे-ले-आऊट) कंपनीचे लिगल अॅडव्हायझर आहेत. २००१मध्ये कुमार यांनी सोनोने यांच्याकडून सीताबर्डीतील १५ हजार चौरसफूट भूखंड एक कोटी रुपयांमध्ये तर २००४ मध्ये उर्वरित पाच हजार चौरसफूट भूखंड ५० लाखांत खरेदी केला. हा भूखंड एन.कुमार यांच्या नावे झाला. २०१०मध्ये सोनोने यांनी भूमी अभिलेख कार्यालयात सीताबर्डीतील भूखंड आपण एन. कुमार यांना विकलेला नसून, त्यांचे नाव रद्द करावे याबाबत लेखी अर्ज केला. २०१२पासून याप्रकरणाचा युक्तीवाद चालू झाला. १० डिसेंबर २०१३ ला प्रकरणाची तारीख होती. अॅड. वर्मा तेथे गेले. त्यावेळी पाच लाख रुपये दिल्यास निकाल तुमच्या पक्षकाराच्या बाजूने लावून देतो, असे तळपे याने सांगितले. त्यानंतर १८ फेब्रुवारीला पुन्हा वर्मा तारखेवर गेले. पाच लाख रुपये दिले नाही तर निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही,अशी धमकीही त्याने दिली. वर्मा यांनी एन. कुमार यांना याबाबत सांगितले. त्यानंतर वर्मा यांनी एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक निशिथ मिश्रा ,अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक (वर्धा)अनिल लोखंडे, हेडकॉन्‍स्टेबल रमेश भोयर, शिपाई गिरीश कोरडे, नेरेंद्र पाराशर, निशिथ रंजन पांडे, मनीष घोडे, प्रदीपक कदम, रागिणी हिवाळे, प्रदीप देशमुख कोमल बिसेन यांनी बुधवारी सापळा रचला. वर्मा यांनी पैसे आणले. गलांडे यांच्यासोबत जा असे तळपे म्हणाला. वर्मा हे गलांडे याच्यासोबत म्हाडा वसाहतीत गेले. गलांडे याने रक्कम स्वीकारताच एसीबीने आधी त्याला व नंतर तळपे याला अटक केली.

February 27, 2014 in महाराष्ट्र
लोकसभा निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर 0

लोकसभा निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर

ncp
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत रणशिंग फुंकलंय. टोलमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी देत पक्षाने राष्ट्रीय राजकारणाचे गाजर दाखवले आहे. त्याचवेळी कळीच्या ठरलेल्या हिंगोली, हातकणंगले, मावळ आणि बीड या चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे पक्षाने अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत.
राष्ट्रवादीतील वजनदार नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. अखेर भुजबळांना लोकसभेची उमेदवारी देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळणार की नाही याचीही जोरदार चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी आणि उदयनराजे भोसलेंना एकमेकांची गरज असल्याने अखेर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्याचबरोबर भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल, बारामतीमधून सुप्रिया सुळे, ठाण्यातून संजीव नाईक, उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रिक्त झालेल्या आणि प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर सोलापूरमधील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणे धनंजय महाडीक यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या आनंद परांजपे यांनाही कल्याणमधील उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच उमेदवारी देण्यापूर्वीच जात प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या नवनीत कौर राणा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. नगरमधून राजीव राजळे, परभणीतून विजय भांबळे, रावेरमधून मनिष जैन, दिंडोरीतून भारती पवार, शिरूरमधून देवदत्त निकम, बुलढाण्यातून कृष्णराव इंगळे आणि जळगावमधून सतीश पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक असलेल्या चार लोकसभेच्या जागांची उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा गड असलेल्या बीडमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चुरशीच्या ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाची उमेदवारीही राष्ट्रवादीने जाहीर केलेली नाही. हिंगोली आणि मावळ या शिवसेनेच्या गड असलेल्या मतदारसंघांमधील उमेदवारही राष्ट्रवादीने घोषित केलेले नाहीत.
बारामती – सुप्रिया सुळे नाशिक – छगन भुजबळ अमरावती – नवनीत राणा-कौर सातारा – उदयनराजे भोसले परभणी – विजय भांबळे जळगाव – सतीश पाटील कल्याण – आनंद परांजपे भंडारा – प्रफुल्ल पटेल माढा – विजयसिंह मोहिते पाटील शिरुर – देवदत्त निकम बुलढाणा – कृष्णराव इंगळे उस्मानाबाद – पद्मसिंह पाटील नगर – राजीव राजळे कोल्हापूर – धनंजय महाडिक दिंडोरी – भारती पवार ठाणे – संजीव नाईक रावेर – मनीष जैन ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

February 27, 2014 in मुख्य पान
महागाव, पुसद तालुक्यात गारपीट 0

महागाव, पुसद तालुक्यात गारपीट

3
यवतमाळ  –  आठवड्यात पुन्हा तिसºयांदा वादळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिला असून आज पुसद, महागाव तालुक्यात गारपीट झाली. तर यवतमाळ, आर्णी, दिग्रस, घाटंजी, दारव्हा,कळंब तालुक्यात पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल निर्माण झाला आहे. तीनदिवसापूर्वी जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपून काढले होते. आज पुन्हा काही तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाली आहे. तर काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याची माहिती आहे. यवतमाळात ढग दाटून आल्यानंतर ५ वाजता मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
महागाव:  तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार गारपीट झाली. सेनद येथे पाच वाजता वादळ वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. तर काही घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने यात एक महिला जखमी झाली. दुपारी ३ वाजतापासून ढग दाटून आले होते. माळकिन्ही, गुंज, सवना, खडका, माळेगाव, वडद, खांबलवाडी, कापरवाडी, बोरी,शाहीइजार, काळी (दौ.)आदी ठिकाणी गारपीट झाली. वादळवाºयासह आलेल्या गारपीटीमुळे गहू, हरभरा पिक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. काळी (दौ.)जिल्हा परिषद सर्कलमध्ये गारपीटीमुळे गहू, हरबरा पिकासंह संत्रापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.
पुसद : तालुक्यात दुपारी ४ वाजता वादळी वाºयासह आलेल्या गारपीटीमुळे शेतपिकांसह घरांचे नुकसान झाले. अचानक ढग दाटून आल्यानंतर वादळवाºयासह गारपीटीला सुरूवात झाली. शेतात असलेला गहू, हरबरापिक भूईसपाट झाले आहे. काही ठिकाणचा वीज पुरवठाही वादळीपावसामुळे खंडीत झाला. सोबतच पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, कळंब, दिग्रस, दारव्हा, बाभूळगाव तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. रब्बी हंगामात गहू, हरभरा पिक उभे असून या अवकाळी पावसामुळे तोंडात आलेला घास हिरावल्या जात असल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.

दुचाकीची बसला धडक, दोन ठार

दारव्हा – दिग्रसवरून दारव्ह्याकडे येणाºया बसवर दुचाकी आदळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पळशी येथील बसस्थानकावर घडली.
नांदेड – नागपूर बस (एम.एच.  ४० / ४५७० ) दिग्रस येथून प्रवाशी घेऊन दारव्ह्याकडे येत होती. अशातच पळशी या गावाजवळ विरुद्घ दिशेने भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने बसला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. याप्रकरणाची तक्रार बसचालकाने दारव्हा पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहेपर्यंत मृतकांची नावे कळु शकली नाही.

लिंगायत जातीला आरक्षण द्या – प्रा.मनोहर धोंडे

यवतमाळ – समाजात अनेक जाती उपजाती असून शासन जातीच्या आधारावर आरक्षण देते. राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असून जाती उपजातीमध्ये ओबीसी, एससी, एनटी व एसबीसी असे चार प्रवर्ग आहे.  महसुली व शैषणिक आधारावर सवलत देण्यात येत असल्यामुळे लिंगायत उल्लेख असलेल्या ओबीसी, एसबीसी जातीला  आरक्षण देण्यात आले नाही. या जातींना आरक्षण द्यावे. अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी आज विश्राम गृहात आयोजित पत्रकार परीषदेत केली. यावेळी अभय कल्लावार, उमाकांत शेटे, विकास मुलंगे, अनिल हमदापुरे उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील राजेगाव टिटवी  येथे आज आयोजित ६ व्या लिंगायत आरक्षण परीषद मेळाव्या निमित्त ते यवतमाळात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात व परराज्यात लिंगायत समाजाचा मोठा विस्तार आहे. जाती उपजातीमुळे सवलतीचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे  समाजाचा शैषणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, स्तर उंचाविण्यासाठी शिवा संघटना स्थापण करण्यात आली. लिंगायत,  लिंगेडर, माला, जंगम, बुडगा, तेली, वाणी अशा विविध उपजातीना लिंगायत शब्द जोडून असल्याचे कारण पुढे करून सवलत देण्याचे टाळले जात आहे. याकरीता शिवा संघटना आंदोलनाच्या माध्यमातुन समाजाला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघटनेच्या आंदोलनाला यश येत असल्याचे सांगत काही जातीचा समावेश शासनाने केला असल्याचे धोंडे यावेळी म्हणाले. आता ओबीसी व एसबीसी चा आरक्षणात सहभाग व्हावा याकरीता संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन उभारणार असल्याचे धोंडे यांनी सांगितले.

जगदंबा महाविद्यालयाला ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’

यवतमाळ – येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सन २०१४ चा ‘उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले आणि प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांना पद्मविभूषण डॉ.करणसिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अर्थ-रिसर्च आर्गनायझेशन व प्लॅनिंग कमिशन (भारत सरकार) यांच्या संयुक्त पुढाकारातून दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल शांगरीला इरॉस येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य, सदर-ऐ-रियासत व जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण डॉ. करणसिंग या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याच हस्ते ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक प्राप्त झाला आहे. या यशात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापकीय मंडळ सहभागी असल्याचे मत शीतल वातीले यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले. पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले, प्राचार्य सुरेंद्र कळसपूरकर, विभागप्रमुख प्रा. हेमंत बारडकर, प्रा.महेश नालमवार व प्रा.राम सोळंकी, प्रा.राजेश हेडावू, डॉ. मिलींद सरोदे, प्रा. विजय नेवे आदि उपस्थित होते.