पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July, 2014

कळंबच्या चोरट्याकडून आठ दुचाकी जप्त

यवतमाळ – यवतमाळसह वर्धा शहरातून दुचाकी चोरणाºया चोरट्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज वणीतून अटक केली. शेख रिजवान उर्फ टोनू अब्दूल रज्जाक (२०)रा. हलबीपुरा कळंब असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सदर युवक कळंब येथून यवतमाळ, वर्धेमध्ये यायचा वाहनधारकांवर पाळत ठेवून दुचाकी लाबवयाचा. शहरात गत महिन्यात अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. दुचाकी चोरटा वणीत असल्याची ‘टिप’ विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथक दोन दिवसापासून त्याच्या मागावर होते. अखेर आज चोरटा पथकाला आढळून येताच शिताफीने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, किंमत अडीज लाख रुपये आहे. शासकीय रुग्णालयातून २, न्यायालय परिसर १ व वर्धा येथून २ अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पुन्हा काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. तसेच ज्यांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी खरेदी केल्या त्यांचाही तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय डगले,ऋृषी ठाकूर, गजानन डोंगरे, विशाल भगत, प्रदीप नाईकवाडे, हरिष राऊत, गणेश देवतळे यांनी केली.

 

July 20, 2014 in मुख्य पान
दुबार पेरणीच्या संकटाने शेतकºयाची आत्महत्या 0

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकºयाची आत्महत्या

photo 001

नेर (यवतमाळ) – दुबार पेरणीही वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील शेतकºयांने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी घडली. वासुदेव आत्माराम नेवारे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
गेल्या दिड महिन्यात पावसाने मोजून चार ते पाच वेळाच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकºयांची पीके करपल्या गेली. दुबार, तिबार पेरणी करूनही पावसाचा पत्ताच नसल्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावल्या गेले आहे. ब्राम्हणवाडा येथील नेवारे या शेतकºयाने सुरूवातीला पेरणी केल्यावर पाउस न आल्याने बियाणे उगवलेच नाही. दुबार पेरणीसाठी मांगलादेवी येथील युनियन बँकेकडे कर्जासाठी प्रकरण दाखल केले. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने बँकेने कर्ज नाकारले.कर्ज नद मिळाल्याने दुबार पेरणी कशी करावी अशी चिंता शेतकºयाला सतावत होती. या विवंचनेत आज नेवारे यांनी हनुमान टेकडी जवळ सुरू असलेल्या बांधकामातील गजाला गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी, २ मुले व १ मुलगी असा आप्तपरीवार असून, शासनाने मृतकाच्या कुटूबिंयाना मदत करावी अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल घावडे यांनी केली आहे.

July 20, 2014 in मुख्य पान
महामंडळाच्या बस झाल्या भंगार 0

महामंडळाच्या बस झाल्या भंगार

DSCN1812
चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे वाचले प्राण
नेर (यवतमाळ) – आगारातील भंगार बसचा फटका येथील प्रवाशांना बसला असून, चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे प्राण वाचल्याची घटना आज रविवारी घडली. या घटनेतून एसटी प्रशासनाने बोध घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
आगारातील एम. एच. २० डी ८६१६ क्रमांकाची बस आज नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवून कामरगाव येथे गेली. प्रवासी घेवून परतत असताना, खरडगाव जवळील पुलाजवळ बसच्या टायरचे एक्सल तुटले. व चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस शेतात शिरली. बस पलटी होत असताना चालकाच्या सतर्कतेमुळे २१ प्रवाशांचे प्राण वाचले. आगारातील अनेक बसेस भंगार अवस्थेतील असून, खिळखिळ््या बसेसमुळे अपघाताची शक्यता असताना एसटी प्रशासनाने गंभिरतेने घेतले नाही. आज घडलेल्या अपघातातून प्रशासनाने बोध घेवून भंगार बसेस बंद कराव्या अशी मागणी संजय ठाकरे, नितीन मोहरकर, नितीन चव्हाण आदींनी केली आहे.

July 20, 2014 in मुख्य पान

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

यवतमाळ – अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील येलदरी येथे घडली. सुरेश पोहणकर, असे मृताचे नाव आहे. पोहणकर हे आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने सुरेश पोहणकर यांचा मृत्यू झाला. साहेबराव शामराव गोलाईतकर (४४) रा. वानोळा यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

July 16, 2014 in मुख्य पान

वीज वितरण अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून तंत्रज्ञाची आत्महत्या

यवतमाळ – वीज वितरण कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञाने आत्महत्या केल्याची घटना दिग्रस येथे घडली. विजय व्यवहारे असे मृताचे नाव आहे.  वीज वितरण कंपनी दिग्रसचे कनिष्ठ अभियंता अक्तर सलीम अक्तर मन्नान यांच्या जाचापायी आपल्या पतीने आत्महत्या केल्याची तक्रार मृतक तंत्रज्ञाच्या पत्नीने पोलिसात केली आहे.
हेमा विजयराव व्यवहारे यांनी पो.स्टे. दिग्रस येथे दिलेल्या तक्रारीनुसार विजय व्यवहारे हे १२ वर्षापासून शहर विभागात कार्यरत होते. परंतु शहर विभागात जास्त वर्ष झाल्यामुळे त्यांनी   सहाय्यक यांच्याकडे विनंती अर्ज सादर केल्याने त्यांची बदली तुपटाकळी येथे झाली होती. कनिष्ठ अभियंता अक्तर सलीम यांनी त्यांना वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत होते तसेच त्यांना रात्री बेरात्री कॉल करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सुटी असतानासुद्धा कामावर बोलावून वेठीस धरीत असल्याचा आरोप तक्रारीतून केला. या घटनेची माहिती अक्तर यांना दिल्यानंतर उद्धट शब्द वापरल्याचा आरोप केला आहे. हेमा व्यवहारे यांच्या तक्रारीवरून आज दिग्रस पोलिसांनी अक्तर सलीम अक्तर मन्नान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

July 16, 2014 in मुख्य पान

शिवसेनेकडून वैदीकांच्या पुतळ््याचे दहन

हाफीज सईद मुलाखत व कश्मीर वक्तव्याचा निषेध
यवतमाळ – २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर मार्इंड हाफीज सईदची मुलाखत घेउन, कश्मीर संदर्भात बेजबाबदार वक्तव्य करणाºया वेदप्रकाश वैदीक यांचा जिल्हा शिवेसनेने निषेध नोंदवित आज बुधवारी दत्त चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळला.
गेल्या काही दिवसापुर्वी वेदप्रकाश वैदीक यांनी पाकिस्थानात जाउन, दहशवादी हल्ल्याशी संबधीत असलेल्या हाफीज सईदची मुलाखत घेतली. तसेच कश्मीर संदर्भात बेजबाबदार विधान केले. याबाबतचे छायाचित्र देशभरातील वृत्तपत्रात प्रसिध्द  झाल्याने याचे पडसाद यवतमाळात उमटले असून, आज जिल्हा शिवसेनेने दत्त चौकात वैदिक यांच्या विरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविला.  जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, राजेंद्र गायकवाड, तालुका प्रमुख किशोर इंगळे, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्या नेतृत्वात वेदप्रकाश  वैदीक यांच्या प्रतिकात्मक पुतळ जाळण्यात आला. यावेळी संजय रंगे, सुरेश ढेकळे, राजू टोंबरे, संतोष गदई, गिरीष व्यास, अरूण वाकडे, प्रमोद जाटे, काजल काबंळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

July 16, 2014 in मुख्य पान

शेतकºयाकडील दीड लाख लुटले

यवतमाळ  –  बँकेतून पैसे काढून गावाकडे जाणाºया शेतकºयाची दुचाकी अडवून मारहाण करून १ लाख ६८ हजार रुपये लुटल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजता महागाव तालुक्यातील माळेगाव घाटात घडली. सातघरी येथील शेतकरी लखीराम गणू राठोड यांनी काळी दौ. येथील कृषी केंद्र चालकाकडून बियाणे, रासायनीक खत  खरेदी केली होती. उधारीचे ६० हजार रुपये देण्यासाठी व पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदी करण्यासाठी  महागाव येथील युनियन बँकेतून  १ लाख ६८ हजार रुपये काढले होते. पिशवीमध्ये पैसे ठेऊन कबिदास पवार यांच्यासोबत एम.एच. २९ / एक्स ९५०७ मोटरसायकलने गावाकडे जात होते. अशातच माळेगाव घाटात  आरोपी रमेश भाटू राठोड, राहुल रमेश राठोड रा. हुडी ता. पुसद यानी दुचाकी अडवून शेतकºयाला खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर सदर रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.

July 16, 2014 in मुख्य पान

मालकासोबत इमानदारी; रस्त्यात मात्र चोरी!

टायरचोरीचे कनेक्शन मद्रास, हैद्राबादमध्ये ; २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
यवतमाळ  – महाराष्टÑासह इतर राज्यातून टायर चोरून मध्यप्रदेशात नेणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर  येथे जेरबंद केले. यातील तीन आरोपी चालक असून मालकाने दिलेला माल इमानदारीने नियोजित ठिकाणी पोहोचवित होते. मात्र परतीच्या प्रवासामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चाके व इतर साहित्य चोरी करीत असल्याची कबुली दिली. मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यांतही या टोळीचे नेटवर्क असून, आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करून २१ जुलैपर्यंत पोलीस कोेठडी मिळविली.
तीन महिन्यांपूर्वी लाडखेड येथील बसस्थानकासमोर उभ्या अससेल्या कन्टेनरची १५ चाके चोरट्यांनी चोरून नेले होते. सदर चोरी या टोळीने केली असावी, या संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घनश्याम गाझी जाटम रा. डोंगरपुरा जि. बाझापूर, अरारफ खान वहित खान रा. मोना जि. ग्वालीयर, अनिस खान रसूल खान रा. मगेरा जि. शिप्रा, इस्ताप रशिल खान रा. मोना जि. ग्वालीयर (मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहे. त्यापैकी तीन जण ग्वालीयार येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत होते. दोन दिवसांपूर्वी आर्णी व अन्य भागातून चार चाकी वाहनाचे टायर चोरून नेत असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून  एम एच ०६/ २१६२ क्रमांकाचा ट्रक व १३ टायर जप्त केले. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. या आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपीपैकी तीन जण ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत असून दोन जण हेल्पर म्हणून काम करत असल्याचे उघड तपासात निष्पन्न झाले.  ग्वालीयर येथून ट्रान्सपोर्ट कंपनीमधून साहित्य घेऊन ते मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यात जातात. इमानदारीने नियोजीत ठिकाणी सर्व माल पोहचवून परतीच्या प्रवासात येताना ते चोरी करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. महामार्गावर थांबून असलेले अपघातग्रस्त वाहनासह अन्य ट्रक, कारचे चक्के, बॅटºया डिजल आदि साहित्य  चोरी करण्याचा गोरखधंदा ते करीत होते. यामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येऊन आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश तोगडवार करीत आहे.

July 16, 2014 in मुख्य पान

सुधीर कोठारी यांची हुकुमशाही भ्रष्टाचार झाकण्यासाठी माझा बळी – अनंता साटोणे

– २८ जुलैपासून आमरण उपोषण

प्रतिनिधी / नागपूर

वर्धा जिल्हा अंतर्गत येणाºया हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी  हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत असलेल्या अनंता साटोणे यांना समितीने तडकाफडकी बडतर्फ केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्वरित बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजू न केल्यास वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ जुलैपासून साटोणे हे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा समितीचे पीडित कर्मचारी अनंता साटोणे यांनी आज पत्रपरिषदेद्वारे दिला.

अनंता साटोणे हे १६ आॅक्टोबर १९९७ साली हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत झाले. त्यांनी कामावर असताना वरिष्ठांनी सांगितलेले कामे प्रामाणिकपणे केली. परंतु हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी मनमानी करीत कोणतेही कारण नसताना ७ जुलै २०१४ रोजी बडतर्फ करण्याची कारवाई केली.

वास्तविक अनंत साठवणे यांनी २००० पासून पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी व २००८ पर्यंतचे एरियर्स देण्यात यावे. तसेच सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनंता साटोणे यांनी केली होती. यासाठी वरिष्ठांकडे अर्ज विनंत्या केल्या होत्या. आपल्याला न्याय मिळण्यासाठी अनंता साटोणे यांनी प्रयत्न केले असता सभापती सुधीर कोठारी यांनी कोणतेही महत्वाचे कारण नसताना बडतर्फीची कारवाई केली आहे.

यापूर्वीही सुधीर कोठारी हे नगराध्यक्ष असताना त्यांनी घराचे प्रकरण उकरून काढून व अतिक्रमण करून घर बांधले असल्याचा आरोप करीत घर पाडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी पाठविण्यात आले होते. परंतु या गोष्टीला विरोध करताच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी असताना अनंता साटोणे यांना बडतर्फ केले होते. कोठारी यांची ही ‘मेरी मर्जी’चा कारभार असून त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये व आपला हक्कही मागू नये यासाठी ही सूडभावनेतून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप अनंता साटोणे यांनी केला आहे.

२२ फेब्रुवारी २०१३ रोजी ड्युटीचा वेळ संपताच सायंकाळी ७.१५ वाजता अनंता साटोणे हे घरी गेले. यांचा कामाचा वेळ सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत आहे. २२ फेब्रुवारी बाजार निरीक्षक येथील वीज पुरवठा खंडित झालेला होता. बाजार निरीक्षक राठोड यांनी यासंदर्भात साटोणे यांना कळविले. माहिती मिळताच साटोणे बाजार निरीक्षक कार्यालयात हजर झाले व राठोड यांची भेट घेतली. यादरम्यान राठोड यांनी कुठलाही विचार न करता साटोणे यांना अश्लिल शिविगाळ केली व कुठल्याही प्रकरणात फसवून बडतर्फ करणार असल्याची धमकी दिली. यासंदर्भात राठोड यांनी समिती तयार करून खोटानाटा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला व त्या आधारे ७ जुलै २०१४ रोजी साटोणे यांना बडतर्फे करण्यात आले. कुठल्याही कृषी उत्पन्न समितीने आपल्या कर्मचाºयांवर उत्पन्नाच्या ३५ टक्के खर्च करावा असा राज्य शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांवर मात्र ८ टक्के खर्च करीत असल्याचे साटोणे यांनी सांगितले. या समितीच्या सभापतीने कर्मचाºयांचे शोषण करायला प्रारंभ केला असून त्यांनी समितीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांच्या इशाºयावरून साटोने कुठलेही कारण समोर करून बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप साटोणे यांनी केला. हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजु न केल्यास साटोणे हे २८ जुलैपासून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सुधीर कोठारीची मनमानी

बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांचा मनमानी कारभार सुरू असून कर्मचाºयांना दहशतीत ठेवण्यासाठी त्यांना बडतर्फ करणे, याशिवाय बाजार समितीतील अनेक कर्मचाºयांना घरकामगारासारखे घरातील वैयक्तिक काम करण्यासाठी राबविण्यात येत आहे.

 

July 16, 2014 in मुख्य पान

वीज पडून महिलेचा मृत्यू , नऊ मजूर जखमी

वणी – तालुक्यातील भालर शिवारामध्ये वीज पडून ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून नऊ मजूर जखमी झाल्याची घटना दि़१३ जुलै ला ४.१५ वाजता घडली़
भालर शिवारातील विठोबा हेपट यांच्या शेतात काम करणाºया दहा मजूरांवर वीज पडल्यामुळे ज्योती शिवा दोडके ही ३३ वर्षीय महिला जागीच मृत्यूमुखी पडली़ वीजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की, शेतात काम करणारे शेतमालक विठोबा हेपट, अर्चना अशोक गोहोकार, लता नथ्थू टेकाळ, मंजूषा तुळशीराम गोहोकार, योगीता लक्ष्मण दोडके, मंदा विठोबा हेपट, शिवा दोडके हे जखमी झाले असून संगीता मारोती गोहोकार हीची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणावरुन तीला उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे़
गत ४० दिवसापासून शेतकरी वर्ग पावसाची आतूरतेने वाट पाहत होते़ भालर शिवारातील हेपट यांनी काही प्रमाणात सिंचन करुन बियानांची लागवड केली होती़ शेतीच्या कामाकरीता मजूरवर्ग शेतात राबत असतांना ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस पडत असतांना ही घटना घडली़ या घटनेमुळे भालर गांवात शोककळा पसरली आहे़

July 13, 2014 in मुख्य पान

ट्रेलरखाली चिरडल्याने दोन युवकांचा मृत्यू

 

यवतमाळ  – दुचाकीने गावाकडे जात असताना ट्रेलरने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.४५ वाजता नागपूर बायपास(कळंबचौक) येथे घडली. सचिन मधुकर बोरकर (२६), विष्णू गुलाब भोसेकर (३०) दोघेही रा. कळंब माथा असे मृतांचे नाव आहे.
सचिन व विष्णू यवतमाळात एक वाहनावर काम करीत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते कळंब येथे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच. २९/ वाय ७२१)निघाले. नागपूर बायपासवर दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. ही बाब ट्रेलर (क्रमांक एम.एच.३१/ वाय८४९१)चालकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रेलरने दोन्ही युवकांना जवळपास ५० मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. नागपूर बायपासवर कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलीस शिपायाच्या लक्षात ही घटना आली. त्याने शिट्टी वाजवून ट्रेलरचालकाला थांबविले असता समोरचे दृष्य बघून चालकालाही धक्का बसला. हा अपघात नेमका कसा झाला, त्यालाही कळले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोनही युवक कळंबकडे जात असताना दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. त्यातच युवकांचा चिरडल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळताच ठाणेदार दिलीप चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास वांदीले, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघात स्थळावर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. सदर ट्रेलर हा पांढरकवडा येथून जालन्याकडे जात होता.  शंकर बोरकर याने या घटनेची तक्रार शहर पोलिसात दिली. त्यावरून ट्रेलरचालक विठ्ठल किसन राऊत रा. रुंदावन टाकळी ता. पांढरकवडा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावाकडे जाणाºया युवकांवर काळाने झडप घातली. याघटनेने कळंब शहरात शोककळा पसरली होती.

July 13, 2014 in मुख्य पान
  टोयाटोची दुचाकीला धडक, तिन जखमी 0

टोयाटोची दुचाकीला धडक, तिन जखमी

IMG-20140713-WA0019
आर्णी  – यवतमाळ वरून आर्णीकडे येणाºया टोयाटो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी ६ वाजता येथील वीज उपकेंद्राजवळ घडली.
दिलीप देविदास भरबडे, अश्विन अशोक तीजारे, दिनेश राजेंद्र डेहणकर सर्व रा. कापरा ता. यवतमाळ  असे जखमींची नावे आहेत. ते आपल्या दुचाकीने (एम.एच. २९ / एजी ३८६३) आर्णीवरून यवतमाळकडे जात होते. अशातच समोरून येणाºया टॉयाटो वाहनाने (एम. एच. १२/ डिई १९८३ ) वीज उपकेंद्राजवळ धडक दिली. यामध्ये तीघेंही जखमी झाले असून रुग्णालात उपचार  सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.

वर्षभरात भारतीयांची कोट्यावधींची मालमत्ता चोरीला 0

वर्षभरात भारतीयांची कोट्यावधींची मालमत्ता चोरीला

theft
नवी दिल्ली – संपूर्ण देशभरातून गेल्या वर्षभरात १३ हजार २१९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या २०१३ च्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या दहा वर्षातील ही दुसरी सर्वात मोठी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी एक हजार ७६२ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिवसेंदिवस वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे चोरी गेलेल्या वस्तूंच्या मालमत्तेच्या किंमतीत वाढ होत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. वाहनांची चोरी मोठ्य़ा प्रमाणात होते. चोरी केलेल्या मालमत्तेत तीस टक्के वाहनांचा समावेश असतो. कोलकाता, चेन्नई आणि मुंबईतील एकूण मिळून वाहने एकट्या दिल्ली शहरात आहेत. असे पोलिस अधिकारी म्हणाले. रोख, दागिने आणि वाहने यांची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते.
२०१२ मध्ये २१ लाख, सात हजार १९४ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली त्यापैकी एक लाख, ४१ हजार ७९३ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. गेल्या दहा वर्षात चोरी केल्या जाणा-या मालमत्तेत ६६१.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण कमी म्हणजेच -४८.३ टक्के इतके आहे.
संपूर्ण राज्याचा विचार केला, तर २०१३मध्ये राज्यातून ४ हजार ३१५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला होती. त्या तुलनेत ३१९ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अवघा ७.४ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोव्यामध्ये २०१३ मध्ये तीन हजार ४८ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेली होती. तर तामिळनाडूमध्ये २०१३ मध्ये ७३.६ टक्के चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली. त्यापाठोपाठ सिक्कीम(५१.९), आंध्र प्रदेश(५१.७) आणि राजस्थान(५०.७) टक्के मालमत्ता २०१३ मध्ये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. गोव्यामध्ये २०१३ मध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ ०.१ टक्के मालमत्ता पोलिसांना हस्तगत करण्यात आली.

ताडदेव येथे भिंत कोसळून दोन ठार 0

ताडदेव येथे भिंत कोसळून दोन ठार

wall-collaps
मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी चांगलाच तडाका दिला. कुलाबा, शिवडी, मालाड येथे पडझडीच्या घटना ताज्या असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताडदेव येथील व्हाईट हाऊस बारच्या मागील इमारतीचा भाग कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.
मुंबई सेंट्रल पश्चिम येथील व्हाईट हाऊस बारच्या मागे एक मोडकळीस आलेली इमारत आहे. या इमारतीच्या आडोशाला तीन जण झोपले होते. रात्री एक वाजताच्या सुमारास अचानक या इमारतीचा १० फुट उंचीचा भाग कोसळला. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जुना भाग कोसळल्याने त्याच्या ढिगा-याखाली दबलेल्या जितेंद्रकुमार विश्वेश्वर प्रसाद सिंग (४५) आणि मनोजकुमार बलराम सिंग (३५) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर यात मनीष कुमार सिंकदर सिंग हा जखमी झाला. जखमी मनीषला उपचाराकरता महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी मनीषवर उपचार करून त्याला घरी सोडले. तर मृत जितेंद्रकुमार आणि मनोजकुमार या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्या दोघांचे मृतदेह अंत्यविधीकरता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ताडदेव पोलिस करत आहेत.

अमरनाथ यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू 0

अमरनाथ यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू

Amarnath Yatra at Baltal
श्रीनगर- अमरनाथ यात्रेत जाणा-या तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामुळे यंदा या यात्रेत बळी गेलेल्या यात्रेकरूंची संख्या २५ वर गेली आहे. वडोदरा येथील सरोजिनी जी यांचा शनिवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर दोन पुरुष यात्रेकरू शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. या यात्रेकरूंची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, २८ जूनपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत दोन लाख भाविकांनी ‘बाबा अमरनाथ’ यांचे दर्शन घेतले आहे.

लोकसभेचा हिशेब चुकता करा!, मगच विधानसभा बोला

मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
यवतमाळ – विधासभा मतदारासंघासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आलेले मनसेचे सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी आज शुक्रवारी स्थानिक विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश आ. शिंदे यांनी दिल्यावर कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा हिशेब चुकता करा, नंतरच विधानसभा बोला, असा सूर आवळला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यांना उमेदवाराने पैसे न दिल्याने निवडणुकीचे कर्ज कार्यकर्त्यांना फेडावे लागत असून, कार्यकर्ते दुरावल्या गेल्याने आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना नेत्यांपुढे व्यक्त केल्या.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मनसे चांगली वाढत असल्याचे पाहूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सभेसाठी होकार दिल्याने व यवतमाळात प्रथमच राज ठाकरे यांची सभा होत असल्याने सच्चे कार्यकर्ते जाम खूश होते. अभूतपूर्व अशी सभा यवतमाळात झाल्यानंतर मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने कामाला लागले. मतदारसंघात दोन जिल्हे असल्यामुळे उमेदवाराने यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दिली. प्रचारासाठी, आॅटो, लाऊडस्पिकर, कार्यकर्त्यांना चहा, पाणी आदी खर्च केला.  लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यानंतर उमेदवार यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलाच नाही. कार्यकर्ते लोकांचे देणे बाकी असल्याचे फोन लावत असताना, पैसे देण्याचे उमेदवाराने टाळले. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्षात हालचाली सुरू झाल्या असताना, मनसेही विधानसभा काबीज करण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्याच्या दौºयावर निघाली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणिस आ. शिशिर शिंदे, माजी आ. जयप्रकाश बावीस्कर व शिरीष सावंत जिल्ह्याच्या दौºयावर काल गुरुवारपासून आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी पुसदमध्ये बैठक घेतली. आज शुक्रवारी यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विश्रामगृहात घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च उमेदवाराने आमच्या बोकांडी बसविला आहे. याचा हिशेब आधी चुकता करा, त्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे बोला. असा सूर आवळल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी, सागर पुरी, आनंद एंबडवार, अनिल हमदापुरे, संजय बोकसे, मंगेश रुईकर वणीसाठी जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता काळे, दिग्रससाठी विकास पवार, केळापूर-आर्णीसाठी जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. याचा अहवाल राज ठाकरे यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच   उमेदवारांची घोषणा होणार आहे.

July 13, 2014 in मुख्य पान

मुख्यमंत्री मनसे ठरविणार- आ. शिंदे

२०० जागा लढण्याचा निर्धार
यवतमाळ – लोकसभेतील पराभवाला खचून न जाता पक्ष विधानसभा डोळ््यासमोर ठेवून कामाला लागला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उभारी आली असून, मनसेच राज्याचा मुख्यमंत्री ठरविणार असल्याचा विश्वास सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी ते आज शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ते विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यात मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असून, २०० मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे. निवडणुका म्हटल्या की जय-पराजय निश्चितच आहे. मात्र, लोकसभेच्या पराभवामुळे मनसे खचली नसून, मनसेकडे राज ठाकरे सारखे कणखर नेतृत्व असल्यामुळे भविष्यात पक्षाची वाटचाल चांगली जाणार आहे. पक्ष निवडणुकी पुरताच नसून, जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढणारा पक्ष असल्याचे यावेळी आ. शिंदे म्हणाले. विधानसभा काबीज करण्यासाठी निवडणुकीत मनसे वेगळे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी मनसेची असून, माझ्या दौºयामध्ये मनसेला जिल्ह्यातील तीन मतदारसंघ पोषक असल्याचे पाहणीत आले. मात्र, त्या मतदारसंघाचे नाव सांगण्याचे आ. शिंदे यांनी टाळले. आज यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील कार्यकत्यांच्या बैठकी घेण्यात आल्या असून, इच्छूक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी लांबलचक यादी आहे. मुंबई येथे अहवाल सादर केल्यानंतर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात मनसेमध्ये गटबाजी असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी माझ्या पाहणीत आढळून आले नसल्याचे सांगितले. यावेळी माजी आ. जयप्रकाश बावीस्कर, सरचिटणिस शिरीष सावंत उपस्थित होते.

July 13, 2014 in मुख्य पान
व्हिएतनाममध्ये हेलिकॉप्टरला अपघात , १६ जणांचा मृत्यू 0

व्हिएतनाममध्ये हेलिकॉप्टरला अपघात , १६ जणांचा मृत्यू

8c05img_201562_235523452_240x180
हनोई (वृत्तसंस्था) – पॅराशूट प्रशिक्षण सरावादरम्यान व्हिएतनामच्या लष्कराचे हेलिकॉप्टर राजधानी हनोई येथे कोसळून झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये एकूण २१ जण होते.
लष्कराचे डेप्युटी कमांडंट लेफ्टनंट कर्नल व्हो व्हॅन ट्युआन यांनी सांगितले, की प्राथमिक तपासात रशियन बनावटीच्या ‘एमआय १७१’ या चॉपर हेलिकॉप्टरचा हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान चांगले होते; तसेच यात काही घातपाताची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हेलिकॉप्टर ज्या थॅच या उपनगराच्या पसिरतात पडले तेथील स्थानिक महिला रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले, की हेलिकॉप्टरचा विचित्र आवाज ऐकून मी बाहेर आले त्याच वेळी हेलिकॉप्टर कोसळले आणि क्षणार्धात पेटले. हेलिकॉप्टर बाजारात वर्दळीच्या ठिकाणी तसेच घरांवर कोसळू नये यासाठी वैमानिकाने हेलिकॉप्टरची दिशा बदलून ते शेताकडे वळविले. अपघातस्थळावरून मदतीसाठीच्या हाका ऐकून स्थानिक रहिवासी मदतीसाठी तिकडे धावले, असे या महिलेने सांगितले.

July 07, 2014 in मुख्य पान
पुणे विद्यापीठाला 'सावित्रीबाई फुले' यांचे नावः सरकारचा निर्णय 0

पुणे विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले’ यांचे नावः सरकारचा निर्णय

8770
मुंबई – पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज, सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्याच्या पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे विद्यापीठाच्या सिनेटने यापूर्वी अशाप्रकारचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारच्या जच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षापासून होत असलेली नामकरणाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे.
पुणे शहर ही शिक्षणाची पंढरी समजली जाते. त्यामुळे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी विविध संघटना आणि व्यक्तींकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही अशी मागणी केली होती.
पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे तर जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा ठराव पास झाल्याने राज्याच्या पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

यवतमाळ शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा

OLYMPUS DIGITAL CAMERA
यवतमाळ –  यावर्षी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे यवतमाळ शहर व परिसरातील गावांना  पाणीपुरवठा करण्यात येणाºया निळोणा धरणातील पाणीउपसा करण्यायोग्य साठा संपुष्टात येत असल्यामुळे १० जूलै पासून शहर व परिसरातील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
१० जूलै पासून पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १० जूलै रोजी कळंब चौक, पाटीपुरा, अंबिका नगर, राजाराम नगर, सुराना लेआऊट, पांढरकवडा रोड, सेवा नगर, तायडे न गर, बाबा नगर, इंदिरा नगर, तारपुरा, इस्लामपुरा, कुंभारपुरा, नवाबपुरा, शारदाचौक, छोटी गूजरी, मारवाडी चौक, सरदार चौक, शनी मंदीर चौक, मारवाडी पूरा, मेन मार्केट, माळी पूरा, गौरक्षण, इंदीरा मार्केट, सिव्हील लाईन, पेशवे प्लॉट, अप्सरा भाजी मंडी, हनूमान आखाडा परिसर, जूनी धमर्शाळा, भावे वाडा, गांधी नगर, गौतम नगर, वंजारी फैल, गौदामफैल, जाजू चौक, शिंदे नगर, मिलींद सोसायटी, बाजोरीया नगर, विदर्भ हाऊसिंग, जामनकर नगर, विवेकानंद  कॉलनी, रामकृष्ण मठ, आदिवासी सोसायटी, अमराईपूरा, बोबडे किराणा परिसर, बॉम्बेटेलर्स परिसर, ग्रामपंचायत भोसा अंतग्रत वसाहती, ताजगोपाल नगर, डेहनकर लेआऊट, अरुणोदय सोसायटी, प्रभात  नगर, बिलाल सोसायटी, भारत नगर, कोहीनूर सोसायटी या परिसरात गोदणी रोडवरील पाण्याच्या टाकी द्वारे २१ इंची झोनसाठी पाणीपुरवठा होईल.
११ जूलै रोजी  विदर्भ हाऊसिंग, महेंद्र चौक, टिळक वाडी, दत्त चौक,  शिन्दे प्लॉट, समथर्वाडी, गिलाणी नगर, आनंद नगर, शाम सोसायटी, वेदधारीणी, उमरसरा, बालाजी सोसायटी, सूचक नगर, शिरे लेआऊट, शास्त्री सोसायटी, हनूमान नगर, राजहंस कॉलनी, भाग्योदय सोसायटी, अयोध्या नगर, गणेश नगर, शितल सोसायटी, धनश्री, महालक्ष्मी, महादेव नगर, ओम कॉलनी, आनंद कॉलनी, जि.प. कॉलनी, आर्णी रोड, शिवाजी नगर, वैद्य नगर, काळे लेआऊट, उमरसरा ग्रामपंचायत वसाहत, महाजन लेआऊट, चापडोह पुर्नवसन. तसेच दर्डा नगर पाण्याच्या टाकीद्वारे  कृषी नगर, ओम कॉलनी, श्रध्दा नगर, गुरुकृपा नगर, निरोही नगर, मुलकी, रामकृष्ण नगरी, जांब रोड, वरचा सर्व भाग, समता नगर, शारदा  नगर, बेले लेआऊट, पृथ्वीराज नगर, तुळजानगरी, उज्वल नगर, सुभाष नगर, कूंदन नगर, ग्रिनपार्क सोसायटी, एकलव्य नगर, प्रजापती नगर, राठोड लेआऊट, शांती नगर वडगांव , कोल्हे लेआऊट, श्रीकृष्ण नगर, दर्डा नगर, पुष्पकूंज, अंजनेय सोसायटीमध्ये पाणी पुरवठा केल्या जाईल.
१२ जूल ैरोजी दर्डा नगर येथील पाण्याच्या टाकीद्वारे सिंघानीया नगर, नेताजी नगर, सुककर्ता नगर, पटवारी कॉलनी, संभाजी नगर, अंबाजी नगर, बोरुंदीया नगर, महात्मा फुले बनकर लेआऊट, रेणूका नगरी, महाविर नगर, नवाब बाबा मठ परिसर करीम नगर, रुग्णालय सोसायटी या परिसरास तर १३ जुलै रोजी वाघापूर आणि पिंपळगाव टाकीद्वारे वाघापूर टेकडी, आठवले लेआऊट, वाघाई नगरी, नवरंग सोसायटी, वाघापूर गावठाण, बांगर नगर, गिरी नगर, वि ठठलवाडी, लोखंडे प्लॉट, शिरभाते प्लॉट, जि.प. कॉलन, राजेंद्र नगर, वारंगे नगर, गोदाम फैईल, तलाव फैईल, सेमीनरी लेआऊट, गजानन नगर, साई नगर, चोखानी जिनींग पिंपळगाव,महिला तंत्र निकेतन, आय.टी.आय. राज रतन नगर, गिरीजा नगर, तात्रिक सोसायटी, मोहा, चांदोरे नगर, सुरेश नगर, पिंपळगाव वसाहत पुर्ण, आदी भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याच क्रमाणे तिसºया दिवशी प्रत्येक भागात पाणीपुरवठा होईल असे कायर्कारी अभियंता महाराष्टÑ जिवन प्राधीकरण व जलव्यवस्थापन यांनी कळविले आहे.

July 07, 2014 in मुख्य पान