
यवतमाळ, दि. २९ – दारव्हा – यवतमाळ मार्गावरील कामठवडा येथील गोकी नदीकाठावरील हनुमान मंदिरात पुजाराचा खून केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. सदाशिव डहाके (६०) रा.काठोडा ता. आर्णी असे मृतक पुजाºयाचे नाव आहे.
विज वितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर कौटुंबीक कलहामुळे ते घर सोडून गेले होते. डहाके यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच १० एकर शेती विकत घेतली होती. गत तीन चार वर्षापसून ते कामठवाडा येथील गोकी नदीकाठावरील जागृत हनुमान मंदिरात पुजारी म्हणून सेवा करीत होते. तर त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली हे दिग्रस येथे वास्तव्यास आहे. दरम्यान आज सोमवारी गावातील नागरिक हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता रक्ताच्या थारोळ््यात पुजाºयाचा मृतदेह आढळून आला. गावकºयांनी ही बाब उपसरपंच श्रावण धुमाजी राठोड यानी लाडखेड पोलीसाना माहिती दिली. यावेळी पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेची माहिती मिळताच दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यानीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच यवतमाळ येथील श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र श्वान पथकाही काही अंतरावरच गुरफटल्याने मारेकºयाचा शोध लागला नाही. यावेळी अंगुली मुद्रा तज्ञाला पाचारण करून घटनास्थळी आढळून आलेल्या लाकडी दांड्यावरील मारेकºयाच्या बोटाचे ठसे घेतले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून पुजाºयाचा खून कोणी व का केला हे कळू शकले नाही. चाणी कामठवाडा येथील पोलीस पाटील संतोष रामेकर यानी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Archive for December 29th, 2014
0
हनुमान मंदिरात पुजाºयाचा खून
0
महिला शेतकºयाची आत्महत्या

यवतमाळ, दि. २९ – महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे घडली. सुनिता पवार (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला शेतकºयाकडे पाच एकर शेती होती. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने नापिकीचा सामना करावा लागला. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फे डायचे या चिंतेत महिलेने आत्महत्या केली असून, महिलेवर ५० हजार रूपयांचे कर्ज आहे.
0
एअर एशियाच्या बेपत्ता विमानाला जलसमाधी?


जाकार्ता – इंडोनेशियातील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर रविवारी सकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानाचा अद्याप नेमका ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, हे विमान समुद्रात कोसळल्याचा अंदाज इंडोनेशियाने व्यक्त केला असून त्यादृष्टीनं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
मलेशियन विमान कंपनी असलेल्या ‘एअर एशिया’चे क्यूझेड ८५०१ हे विमान रविवारी पहाटे ५.२० वाजता सिंगापूरसाठी रवाना झाले होते. सिंगापूरच्या चंगी विमानतळावर ते सकाळी ८.३० वाजता उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर ४२ मिनिटांतच ते बेपत्ता झाले. खराब हवामानामुळे पायलटने विमानाचा नियोजित मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर विमानाचा रडारशी संपर्कच तुटला होता. तब्बल ३० तास उलटल्यानंतरही विमानाच्या ठावठिकाण्याबद्दल केवळ शंकाकुशंकाच व्यक्त होत आहेत. इंडोनेशिया सरकारने कालपासूनच विमानाच्या शोधाचं काम सुरू केलं आहे.
गेल्या २४ तासांतील शोधानंतर आणि विविध ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर इंडोनेशियन शोधपथक विमान समुद्रात बुडाल्याच्या निष्कर्षाप्रत आलं आहे. ‘हे विमान समुद्राच्या तळाशी असावं अशी आमची प्राथमिक माहिती आहे. आम्ही बेलीतुंग बेटाच्या पूर्व आणि उत्तरेकडील जलभागावर लक्ष केंद्रित केलं आहे,’ असं शोधपथकाचे प्रमुख सोलिस्तो यांनी सांगितलं.
वायुसेनेची विमानं, पाणबुड्या, तसेच इंडोनेशियासह मलेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया हे देश विमानाच्या शोधमोहिमेत गुंतले आहेत. अन्य देशांनीही सहकार्याची तयारी दाखवली आहे.
0
काश्मीरमध्ये तापमान गोठण बिंदूच्या खाली

श्रीनगर – संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडीची लाट कायम असून, सोमवारी रात्री काश्मीर खो-यात तापमान गोठण बिंदूच्या खाली घसरले होते. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ४.१ डिग्री सेल्सिअस आहे.
गुलमर्गमध्ये उणे ३.४, पहलगाममध्ये उणे सात तापमानाची नोंद झाली आहे. लडाख भागातील लेहमध्ये उणे १५.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जम्मूमध्ये त्यामनाने स्थिती थोडी चांगली आहे.
जम्मूमध्ये ४.३ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. बुधवारपर्यंत वातावरण असेच राहील असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे.
सध्या जम्मू-काश्मीरमध्ये चिलाई कलानचा काळ सुरु आहे. वर्षातील चाळीस दिवस कडाक्याची थंडी असते त्याला चिलाई कलान म्हटले जाते.
0
कोल्हापूरात पुन्हा ‘टोल’ फोड

कोल्हापूर- शहरातील टोल आकारणीवरून सोमवारी पुन्हा एकदा राडा झाला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयआरबीचे शहरातील सर्व टोल नाक्यांची तोडफोड केली.
आयआरबीच्या तीन कर्मचा-यांकडून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना रविवारी शाहू टोल नाक्यावर धक्काबुक्की करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोली येथील टोल वसुली नाका क्रेनने उचकडून त्यांची मोडतोड केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी शिये व शाहू टोल नाक्यांची देखील तोडफोड केली. दरम्यान या प्रकारानंतर सर्वच टोल नाक्यावरील पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
0
चीनमध्ये जी-मेलवर बंदी

बिजिंग- गुगल सर्चनंतर आता चीनमध्ये जी-मेलची सेवाही बंद करण्यात आली आहे. अर्थात यावेळी चीनने सरकारी आदेशाद्वारे बंदी न लादता वेगळ्या मार्गाचा अवलंब केला आहे.
चीनमधील जीमेल सेवेचा वापर जवळजवळ शून्य झाला आहे. याचा कारणामुळे सरकारने जीमेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी चीनने २००९मध्ये गुगल सर्च बंद केले होते. त्यानंतर चीनमधूनच जी-मेल हॅक होण्याचे प्रकार केले जात होते. जेनेकरुन इंटरनेट युझर्स जी-मेलचा वापर बंद करुन देशातील अन्य ई-मेलचा वापर करतील.
गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये जी-मेलचा वापर मर्यादीत होता किंवा काही ठिकाणी तर तो पूर्णपणे बंद होता. चीनने आपल्या फायरवॉलचा उपयोग करुन देशातील जी-मेल सेवा जवळ जवळ बंद करुन टाकली आहे. अर्थात चीनने जी-मेल बंद केल्याचा सर्वाधिक त्रास चीमधील विदेशी कंपन्यांना होणार आहे. ज्यांच्याकडून जी-मेलचा सर्वाधिक वापर केला जातो.









