पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 31st, 2014

शौर्य, ध्येय, कर्तव्य – भीमा – कोरेगावची अनिर्णीत लढाई 0

शौर्य, ध्येय, कर्तव्य – भीमा – कोरेगावची अनिर्णीत लढाई

bhima koregaon thambha

1

 

पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशवा याच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेची आणि ब्रिटीश सैन्याची लढाई घडून आली. या लढाईविषयी उपलब्ध मराठी संदर्भ ग्रंथांमधून जी काही माहिती मला मिळाली, त्या माहितीच्या आधारे या लढाईचे विश्लेषण करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करण्यात आला आहे.
भीमा – कोरेगाव
पार्श्वभूमी :दुसरा बाजीराव पेशवा याने स. 1817 च्या उत्तरार्धात इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. यावेळी खडकी आणि येरवडा येथे ब्रिटीश आणि मराठी फौजांचा सामना घडून आला व पेशवा पुणे सोडून गेला. बाजीरावाने पुणे सोडल्यामुळे इंग्रजांनी पुणे शहर आपल्या ताब्यात घेतले व शनिवारवाड्यावर आपले निशाण फडकावले. इंग्रजी फौजांशी निर्णायक झुंज न घेता बाजीराव आपल्या सैन्यासह पुण्याच्या सभोवती घिरट्या घालत असताना भीमा नदी जवळ कोरेगाव येथे त्याची व इंग्रजी फौजांची एक लढाई घडून आली. इतिहास ती कोरेगावची किंवा भीमा – कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.
बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. का बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली.
घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला.
दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले.
ब्राम्हणवाड्याहून पेशवा पुन्हा पुण्याच्याच रोखाने निघाला तो ता. 30 डिसेंबर 1817 रोजी चाकण येथे आला. मात्र तेथून बापूच्या सूचनेमुळे असो किंवा स्वतःच्याच लहरीप्रमाणे असो पुण्याकडे न जाता जवळपासच पण दुसऱ्याच कोणत्यातरी स्थळाकडे चालू लागला. बाजीराव पुण्यास जाणार, त्याचेबरोबर चांगला फौजफाटा असणार, तिथे कदाचित त्याला आणखी लोक सामील होणार आणि आपला पुण्यावरचा ताबा सुटणार अशी भीती वाटून इंग्रजांची एक फौज शिरूरहून कॅ. Staunton ह्याचे नेतृत्वाखाली पुण्याकडे निघाली. पुण्यास कर्नल बर होता, पण त्याच्याकडे सैन्यही फारसे नव्हते आणि युद्धसामग्रीही बेताचीच होती. कॅप्टन Staunton ची फौज ता. 1-1-1818 रोजी कोरेगावास पोचली तेव्हा पेशव्यांच्या फौजेचा तळ तेथे आधीच पडलेला होता. तिचे आधिपत्य अर्थात बापूकडेच होते. बापूने पेशव्यास साताऱ्याकडच्या मार्गाला लावले आणि स्वतः कोरगावी इंग्रजांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली. बापूने प्रथम तोफांचा मारा करण्याचे योजिले, परंतु इंग्रजांनी आडोशाच्या सुरक्षित जागा शोधल्यामुळे ते गोळ्यांच्या टप्प्यात येत नाहीत हे लक्षात येताच त्याला युद्धतंत्र बदलावे लागले. बंदुका आणि तलवारी हाती घेऊन मराठे पुढे धावले. इंग्रजांनी चांगला प्रतिकार केला ह्यात शंका नाही. तथापि ह्या ठिकाणी इंग्रजांना काय किंवा मराठ्यांना काय मोठे निकाली युद्ध कोणालाच करायचे नव्हते. इंग्रजांना हे मार्गातील संकट पार करून पुढे पुण्याकडे जावयाचे होते, तर बापूला त्यांना अडवून धरून पेशव्यास दूर जाण्यास अवसर द्यावयाचा होता. दोघांचेही हेतू सिद्धीस गेले. ता. 4 जानेवारी 1818 च्या एका बातमीपत्राप्रमाणे त्या तारखेपर्यंत बाजीराव फुलगावला मुक्कामाला आलेला होता.
भीमा – कोरेगाव येथे पेशव्याची आणि ब्रिटीश फौजेची लढाई घडण्यापूर्वीच्या घटनांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड – दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ब्रिटीश सैन्याचा एखाद्या ठिकाणी ठासून उभा राहून पराभव करण्याची त्याची इच्छा होती कि नव्हती या वादात या ठिकाणी तरी शिरण्याचे काही प्रयोजन नाही परंतु, इंग्रजांच्या सैन्याशी मोठी लढाई देण्याचे तो टाळत होता हे एक उघड गुपित आहे. कोरेगावची लढाई घडून येण्यापूर्वी बाजीराव जुन्नरच्या आसपास ब्राम्हणवाडा येथे मुक्कामास होता. तेथून तो पुण्याच्या दिशेने निघाला असला तरी पुण्याला जाण्याची त्याची इच्छा कितपत होती याविषयी शंकाच आहे. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. अर्थात, हे कार्य दुसऱ्या कोणत्यातरी सरदारावर देखील सोपवले असावे. असो, ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याचं दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती असेच म्हणावे लागते. मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय ! या ठिकाणी असलेल्या इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते. जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता. हे सर्व लक्षात घेता पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.
पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन च्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूर येथील ब्रिटीश फौज आपल्यावर चालून येईल अथवा त्या फौजेचा पुण्याला जाण्याचा बेत असावा अशी कल्पना मराठी सरदारांना होती कि नाही याविषयी ठामपणे सांगणे शक्य नाही. कारण, त्यांना जर तशी काही कल्पना असती तर भीमा – कोरेगाव नजीक त्यांनी नदीउतार रोखून धरण्याचा किंवा नदी पाठीशी घालून भीमा – कोरेगाव हे स्थळ काही काल आपल्या ताब्यात ठेऊन शिरूरच्या फौजेचा मार्ग रोखून धरण्याचा बंदोबस्त केला असता. परंतु त्यांनी असे काहीच केल्याचे दिसून येत नाही. यावरून शिरूर येथील इंग्रजी फौजेच्या बेताची त्यांना फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही. इकडे शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथील ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाला होते. साधारण 35 – 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. सातारचा छत्रपती प्रतापसिंह यावेळी बाजीरावासोबत होता कि मराठी सैन्यासह तो आधीच पुढे गेला होता याची चर्चा या ठिकाणी तशी अप्रयोजक आहे. कारण छत्रपती लढाईच्या ठिकाणी हजर असला काय आणि नसला काय दोन्ही सारखेच होते. असो, रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे 9 – 10 वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. माघार घेण्याचा किंवा पुढे पुण्याला जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. कारण, मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. दोनपैकी काय खरे असेल ते असेल, पण हे निश्चित कि कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही.
कोरेगावात इंग्रज आणि मराठी सैनिकांची हातघाईची लढाई झाली कि नाही किंवा झाली असल्यास ती कधी झाली ? तसेच बापू गोखल्याने कोरेगाव ताब्यात घेण्यासाठी किती हल्ले चढवले व इंग्रजांनी ते कसे परतवून लावले याविषयी सध्या तरी लिहिणे मला शक्य नाही. कारण तितकी माहिती याक्षणी माझ्याकडे नाही. पुढेमागे याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी या लढाईचे तपशीलवार वर्णन जरूर देईन. या ठिकाणी लढाईनंतर नेमके काय घडून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे व माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे अनुमान बांधता येते कि सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा – कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! याचे कारण म्हणजे, युद्ध संपल्यावर सामान्यतः विजयी पक्ष रणांगणाचा ताबा घेतो ते या ठिकाणी घडून आले नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगी विजयी पक्षाला रणभूमी ताब्यात घेण्यात यश मिळत नाही किंवा काही कारणास्तव युद्धभूमी ताब्यात न घेता विजयी पक्षाला त्या ठिकाणाहून निघून जावे लागते हे गृहीत धरून देखील कोरेगाव येथे मराठी किंवा इंग्रजी फौजेचा विजय झाला असे ठामपणे म्हणता येत नाही. समजा, मराठी सैन्य जिंकले असे म्हणावे तर मुठभर इंग्रज फौजेची त्यांनी कत्तल वा लूट का केली नाही हा प्रश्न उद्भवतो. इंग्रजांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल. कदाचित ब्रिटीश पक्षाच्या वतीने असेही समर्थन करता येईल कि, पूर्ण रात्र प्रवास केल्याने आणि दिवसभर युद्धाचा ताण पडल्यामुळे पराभूत मराठी सैन्याचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नसावे. परंतु, हा मुद्दा देखील तितकासा पटण्यासारखा नाही. किंबहुना काहीकाळ हा मुद्दा जर मान्य केला तर पुढचा प्रश्न उद्भवतो कि, प्रतिहल्ल्यात किंवा माघार घेणाऱ्या मराठी सैन्याची त्यांनी कितपत हानी केली ? लढाईची उपलब्ध वर्णने लक्षात घेतली असता भीमा नदी पाठीशी घेण्यात दोन्ही पक्षांना अपयश आल्याचे दिसून येते. किंबहुना दोघांनाही नदी पाठीशी घेणे त्यावेळी जमले नाही. हे ध्यानात घेता कोरेगावातून माघार घेणाऱ्या व नदीपार करून पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल उडवण्याची संधी इंग्रजांनी का दवडली याची उकल होत नाही. म्हणूनच इंग्रज किंवा मराठी फौजा कोरेगाव येथे निर्णायक विजय मिळवू शकल्या नाहीत असे म्हणावे लागते.
महार रेजिमेंट
सूर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असताना बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 – 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेच साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते. असो, कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत.
कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.

December 31, 2014 in मुख्य पान
वसतिगृहात विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म 0

वसतिगृहात विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म

mu0218
अमरावती – शहरातील कंवरनगर भागातील एका आदिवासी वसतिगृहात सप्टेंबर महिन्यात दाखल झालेल्या एका युवतीने मुलीला जन्म दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी समोर आला. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
धारणी तालुक्यातील ही युवती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कंवरनगर परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये सप्टेंबर महिन्यात आली. नजीकच्या एका कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. सोमवारी दुपारच्या सुमारास वसतिगृहामध्ये असताना तिला अचानक भोवळ आली. वसतिगृह अधीक्षकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारपूस केली असताना ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणी करण्यात आली. ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. सोमवारी सायंकाळी सिझरीन करीत प्रसूती करण्यात आली. मुलगी झाली. अवघे १२०० ग्रॅम वजनाचे बाळ असल्याने त्याला विशेष कक्षात ठेवण्यात आले. सदर मुलगी बेशुद्ध असल्याने या प्रकरणातील रहस्य अद्याप कायम आहे. हा प्रकार समोर येताच नगरसेवक राजू मसराम, राजेश्वर इवनाते, रामेश्वर उईके, डॉ. प्राची आतराम यांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरले. सप्टेंबरमध्ये दाखल झालेल्या या मुलीचे गर्भारपण अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसे सुटले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र वसतिगृह प्रशासनाने टोलवाटोलवी करीत वेळ मारून नेली. यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करण्यात न आल्याची माहिती फ्रेजपुरा पोलिसांनी दिली.

December 31, 2014 in मुख्य पान
पोलिस करणार तरुणांत जनजागृती 0

पोलिस करणार तरुणांत जनजागृती

big-show
औरंगाबाद – नव्या वर्षात नेटवर्क वाढविण्यासाठी तरुणांत जनजागृती करणे, बिट सिस्टीम सुधारणे, गुन्हेगारांची कार्यपद्धती विभाग अपडेट करण्याचा निर्धार पोलिस खात्याने नव्या वर्षात केला आहे.
पोलिस खात्यात आरोपींची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांचा मोठा वापर करण्यात येतो. बहुतांश वेळा हे खबरी गुन्हेगारच असतात. पोलिसांना केलेल्या मदतीचा अनेक वेळा त्यांच्याकडून गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे खबरी म्हणून गुन्हेगार पोसण्यापेक्षा शहरवासियांमध्ये गुन्हेगारी रोखण्याबाबात जनजागृती करण्यावर नव्या वर्षात भर दिला जाणार आहे. या प्रवाहात प्रामुख्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना सामाविष्ट करून घेण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत बिट वाटून दिले आहेत. पोलिस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बिटचे प्रमुख त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात पोलिस कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बिट सिस्टीम प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. याचा फायदा पोलिस ठाण्यांना होणार असून त्यांचावरील भार हलका होण्यास मदत होणार आहे.
नव्या वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पीएसआय व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सायबर पथक निर्माण करण्यात येणार आहे. छोट्या स्वरुपाच्या तक्रारी हे सायबर पथक सोडवणार असून मोठ्या तक्रारी आयुक्तालयातील सायबरसेल सांभाळणार आहे. पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची कार्यपध्दती ( मोडस ऑपरेंडी ब्युरो ) हा विभाग कार्यरत आहे. या विभागाचे संगणकीकरण करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन या विभागाला आधुनिक करण्याचा संकल्प आहे.

December 31, 2014 in मुख्य पान
 लाच घेताना लिपिक पकडला 0

लाच घेताना लिपिक पकडला

download
नगर – पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिकाला १५ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. महादेव भागाजी बनकर असे या लिपिकाचे नाव असून, मेडिकल बिलातील त्रुटींची पूर्तता करून मेडिकल बिल नाशिक येथे पाठविण्यासाठी खात्यातील कर्मचाऱ्याला लाच मागितली होती.
पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्याने मेडिकल बिल बनकर याच्याकडे जमा केले होते. परंतु, या बिलातील त्रुटींटची पूर्तता करण्यासाठी व नाशिक येथे पाठवून देण्यासाठी बनकरने १५ हजार रुपयांची मागणी केली. ही तक्रार नगरच्या अँटी करप्शन ब्युरोकडे केल्यानंतर बुधवारी दुपारी नगर-औरंगाबाद रोडवरील सिंचन भवनसमोरील टी सेंटरसमोर सापळा रचण्यात आला. या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसै स्वीकारताना पंचासमक्ष बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय मुतडक, सुनील पवार, प्रमोद जरे, नितीन दराडे, श्रीपादसिंग ठाकून, एकनाथ आव्हाड, कल्हाण गाडे, राजेंद्र सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

December 31, 2014 in मुख्य पान
विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी, सात प्रवाशांचे मृतदेह सापडले 0

विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी, सात प्रवाशांचे मृतदेह सापडले

aerial

जकार्ता – इंडोनेशियाच्या जावा समुद्रात जलसमाधी मिळालेल्या एअर एशियाच्या विमानाचे आणखी काही अवशेष समुद्राच्या तळाशी आढळले आहेत. सोनार उपकरणाच्या सहाय्याने या विमानाचा समुद्रात शोध घेतला जात आहे. या उपकरणाला बुधवारी समुद्राच्या तळाशी या विमानाचे काही अवशेष आढळल्याची माहिती इंडोनेशियाच्या शोधपथकाच्या अधिका-यांनी दिली. तसेच या भागातून आणखी काही मृतहेदही ताब्यात घेण्यात आले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून एअर एशियाच्या ‘क्यू झेड ८५०१’ या विमानाचा शोध सुरु होता. अथक शोधमोहिमेनंतर मंगळवारी अखेर जावा समुद्रात शोधपथकाला विमानाचे काही अवशेष आढळले तसेच तीन मृतदेहही आढळले. सध्या मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरु आहे मात्र खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. वादळी वारे आणि पावसामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
‘आम्ही सध्या हवामान साफ होण्याची वाट पाहत आहोत. मोठ्या लाटा आणि धुंवाधार पावसामुळे शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. आतापर्यंत सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मंगळवारी विमानातील तीन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते तर आज सकाळपासून चार मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
१६२ प्रवाशांना घेऊन एअर एशियाचे क्यू झेड ८५०१ (एअर बस ए-३२०-२००) हे विमान रविवारी सकाळी सुराबया विमानतळावरुन सिंगापूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. मात्र उड्डाणानंतर काही काळातच हे विमान रडावरुन बेपत्ता झाले. गेल्या तीन दिवसांपासून या विमानाचा शोध सुरु होता. अखेर मंगळवारी या विमानाचे अवशेष तसेच काही मृतदेह समुद्रात तरंगताना आढळल्याने या विमानाला जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
या विमानात एक ब्रिटीश, मलेशियन, सिंगापूरचा प्रत्येकी एक नागरिक, तीन दक्षिण कोरियाचे, १४९ इंडोनेशियाचे नागरिक होते तर सात क्रू मेंबर होते. प्रवाशांमध्ये सतरा मुलांचा समावेश हा. यामध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता.

आता पूनम पांडेला वाद नकोत 0

आता पूनम पांडेला वाद नकोत

Poonam Pandey
मुंबई – मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणा-या पूनम पांडेचे नाव कोणी उच्चारले किंवा वाचनात आले तर, समोर येते तिची वादग्रस्त इमेज. पूनम पांडे आणि वाद हे ठरलेले समीकरण.
तोकडया कपडयांमध्ये अंगप्रदर्शन आणि बोल्ड विधानांनी पूनमने नेहमीच स्वत:ला प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत ठेवले. पण आता पूनमला या वादांचा कंटाळा आला आहे. एकवेळ अशी होती की, मला वाद हवे होते. पण आता भरपूर काम मिळाल्यामुळे मला काहीही वादग्रस्त करण्याची आवश्यकता उरलेली नाही.
मला जे हवे होते ते मी वादांमधून मिळवले. त्यामुळे मला आता वादग्रस्त इमेजची गरज नाही असे पूनमने सांगितले. बॉलिवूडनंतर पूनम आता टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
एका तेलगु चित्रपटाच्या पत्रकारपरिषदेदरम्यान पूनमने आता आपल्याला वादग्रस्त इमेजमधून बाहेर पडायचे असल्याचे सांगितले. मालिनी अँण्ड कंपनी असे पूनमच्या तेलगू चित्रपटाचे नाव आहे. याआधी नशा चित्रपटाव्दारे पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

‘पीके’ची चौकशी होणार नाही – मुख्यमंत्री 0

‘पीके’ची चौकशी होणार नाही – मुख्यमंत्री

pk
मुंबई – आमिरच्या खानच्या वादग्रस्त पीके चित्रपटाची चौकशी होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. देशभरात ‘पीके’विरोधात होत असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची चौकशी होईल असे गृहमंत्री राम शिंदे यांनी विधान केले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी हे विधान फेटाळून लावले.
‘पीके’बाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही. तसेच राज्यात सर्वत्र पीकेचे शो सुरु राहतील.तसेच याचित्रपटाचे शो सुरळीत सुरु रहावेत यासाठी आवश्यक संरक्षणही पुरवले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, ‘पीके’विरोधात सुरु असलेल्या निदर्शनावरुन दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पीके’ चित्रपटात कोणत्याही धर्माचा अवमान करण्यात आलेला नाही असे हिरानी यांना सांगितले होते.

December 31, 2014 in मुख्य पान
नववर्षाचे स्वागत उत्साहात 0

नववर्षाचे स्वागत उत्साहात

 

 

 

New year celebrations in AhmedabadStudents welcome new year

जगभरात नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात येत आहे. नववर्ष सर्वांना सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देण्यासाठी, सहर्ष स्वागताची तयारी सुरु असताना नववर्षाच्या मजा आणि मस्तीची काही क्षणचित्रे…

December 31, 2014 in मुख्य पान
‘न्यायिक नियुक्ती आयोग’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी 0

‘न्यायिक नियुक्ती आयोग’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

supreme-court
नवी दिल्ली – सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसंदर्भातील ‘न्यायिक नियुक्ती आयोग विधेयका’ला बुधवारी राष्ट्रपतीं प्रणव मुखर्जीनी मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे यापूर्वीची कॉलेजियम पद्धत रद्द झाली आहे.
यंदाच्या ऑगस्टमध्ये संसदेने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक मंजूर केले. त्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
या विधेयकामुळे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या न्यायिक आयोग करेल. या आयोगात सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती, कायदामंत्री आणि दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असणार आहे.

December 31, 2014 in मुख्य पान