नगर – सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास नासलेल्या दुधाने अभिषेक घालण्याचे आंदोलन संभाजी ब्रिगेडने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे केले. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालास योग्य भाव जाहीर करावेत, जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, आदी मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
शेतमालाला चांगला भाव मिळत नाही, पाऊसही अत्यल्प होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे. कर्ज व नापिकीला कंटाळून सहा ते सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दूध पावडरची निर्यात बंद झाल्याने दुधाचे दर पडले आहेत, कापसाचेही दर घसरले आहेत, कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने दोन हजारांच्या पुढे भाव मिळत नाही, अशी परिस्थिती असताना सरकार मात्र शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, सुधीर भद्रे, अशोक कोकाटे, विजय खेडकर, दिलीप कांकरिया, शंकर पवार, मारुतराव ससे, प्रवीण कोकाटे, सचिन नालकुल, संदीप काळे, मयूर पवार आदी उपस्थित होते.
Archive for December 20th, 2014
0
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक
0
देवयानी खोब्रागडेंना कामावरून हटवलं

नवी दिल्ली – माध्यमांमध्ये केलेली परस्पर वक्तव्य परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना भोवली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना कामावरून हटवत त्यांच्याकडील काम काढून घेतलं आहे. न्यूयॉर्कमध्ये घारातील मोलकरणीचा कमी पगार आणि व्हिसातील गैरप्रकारामुळे देवयानी यांना गेल्या वर्षी अमेरिकेत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवयानी यांनी न्यूयॉर्कमधील घटनेबाबत वक्तव्य केलं होतं. यावर परराष्ट्र मंत्र्यालयानं आक्षेप घेतला. देवयानी यांनी वक्तव्य करण्याआधी परवानगी घेतली नव्हती, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच देवयानी यांनी आपल्या मुलांचे अमेरिकी पासपोर्ट असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाला दिली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या परराष्ट्र मंत्रालयानं देवयानी यांना हटवण्याचं हे ही एक कारण असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
१९९९ बॅचच्या आयएफएस अधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा अर्जातील खोट्या माहितीच्या आरोपावरून गेल्या डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. निवस्त्र करून देवायानी यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यांना गुन्हेगारांसोबत जेलमध्ये ठेवण्यात आलं होत. पण या घटनेमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले होते. अडीच लाख डॉलरच्या जातमुचलक्यावर त्यांना मुक्त करण्यात आलं होतं. यानंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासातून गेल्या जानेवारीला मायदेशात परराष्ट्र मंत्रालयात देवयानी यांची संचालकपदावर बदली करण्यात आली होती.
0
केंद्रीयमंत्री गडकरी यांना १० हजार रु. दंड

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केलेल्या फौजदारी अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दिल्लीतील स्थानिक कोर्टाने गडकरी यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची सुनावणी शनिवारी होती. या सुनावणीच्या तीन दिवस आधी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गडकरींना दिले होते. हे प्रतिज्ञापत्र केजरीवाल यांच्या वकिलाकडे तीन दिवस आधी पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ते शनिवारीच मिळाले, असे सांगत कोर्टाने गडकरींना १० हजार रुपयांच्या दंडाच्या बदल्यात अखेरची संधी दिली आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ मार्च २०१५ रोजी ठेवली.
‘आप’च्या केजरीवाल यांनी देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीत आपले नाव समाविष्ट करून आपली प्रतिमा मलीन केली आहे, असे सांगत गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता.
0
चार नगर परिषदमध्ये सभापतींची निवड

यवतमाळ, दि. २० – आर्णी नगर परिषदेसाठी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया आज पार पडली. कॉंग्रेसचे बहुमत असलेल्या नगर परिषदेत जैसे थे स्थिती ठेवून एक वर्ष पूर्ण झालेल्या सभापतींना पुन्हा संधी देण्याचा निर्णय शिवाजीराव मोघे यांनी घेतला. नगराध्यक्ष आरीज बेग, कॉंग्रेसचे गटनेते अनिल आडे व शिवसेनेचे गटनेते प्रवीण मुनगीनवार यांनी संयुक्तरित्या सर्व सभापतीसह समिती सदस्यांची यादी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहणारे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे यांच्याकडे दिली.
अविरोध व शांततापूर्ण झालेल्या या निवडीत उपाध्यक्ष निता ठाकरे यांची शिक्षण, नियोजन व विकास समितीपदी पदसिद्ध सभापती म्हणून तर शाईन अनवर पठाण सार्वजनिक बांधकाम सभापती, गणेश हिरोळे आरोग्य सभापती, श्रावण किसन मडावी पाणीपुरवठा सभापती, गौसिया अक्रम शहा महिला व बालकल्याण सभापती व अनिता भगत यांची महिला व बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे उपस्थित होते.
उमरखेड नगर परिषद
उमरखेड- येथील नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मानकर आणि नगराध्यक्षा उषा आलट यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
पाणीपुरवठा सभापतीपदी बालाजी देशमुख, अरोग्य सभापतीपदी बालय्या दुर्गमवार शिक्षण सभापतीपदी गटनेते नंदकिशोर अग्रवाल, बांधकाम सभापती नगरसेविका वंदना धाडगे, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रंजना लांबटीळे आणि नियोजन समितीचा कारभार उपाध्यक्षा नजमाबी दौलत खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सत्ताधारी गटाने बांधकाम व पाणीपुरवठा या विषयाच्या सभापती पदावर बदलुन दोन नव्या चेहºयांना संधी देण्यात आली. विषय समित्या निवडीसाठी सभागृहात नगरसेवक संतोष जैन, शैलेंद्र मुंगे, भारत खंदारे, रामराव भुरके, साजीद जहागीरदार इनायत उल्ला खान, चंद्रशेखर जयस्वाल, सुरेश माहेश्वरी, माजी नगराध्यक्ष अर्चना नाईक, लक्ष्मी ठाकरे, गौसिया बेगम अहेमदखान, हुमेरानाज रिफत अन्सारी, पुष्पा चव्हाण उपस्थित होते. सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित होते.
नेर नगरपरिषदच्या महिलाराज
नेर – नेर नबाबपूर नगरपरिषदच्या विषय व स्थायी समितीची निवडणूक पार पडली. शिवसेनेने आपले वर्चस्व याही निवडीत दाखवले असून, महिला राजने आपले अस्तीत्व कायम ठेवले. समितीच्या अखेर आपला ठसा कायम ठेवून महिला राजचा झेंडा ठेवला. या निवडणूकीत चार जागावर महिला तर केवळ दोन जागेवर पुरूष उमेदवारांना स्थान मिळाले. मात्र अनेकांनी स्थान मिळवण्यासाठी केलेली धडपड मात्र शेवटपर्यंत कायम राहिली.
आज दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहन जोशी मुख्याधिकारी अतूल पंत यांच्या उपस्थितीत स्थयी व विषय समिती सभापतीची निवड अविरोध झाली यात बांधकाम समितीपदी शालि गुल्हाणे, शिक्षण सभापती रश्मी पेटकर, आरोग्य सभापतीपदी वनीता मिसळ, महिला व बालकल्याण सभापती पदी वैष्णवी गुल्हाणे, महिला व बाल कल्याण सभापती उपसभापती माया राणे तर पाणी पुरवठा सभापती पदी मोहन भोयर इत्यादीची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी आपल्याकडे कायम ठेवले विशेष म्हणजे प्रत्येक सभापतीला आपल्या न्यायपुर्ण हक्क देण्याची बाब नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी कायम ठेवली. यावेळी नगरसेवक संजय दारव्हटकर, विनोद जयसींगपूरे, रुपाली दहेकर, संध्या चिरडे, भाऊराव ढवळे, शकील बानो नासी, प्रतिभा बगमारे, तनविर खा पठाण, दाऊद इब्राहीम नुर, सुनिल खाडे, इरफान अकबाणी, सुभाष भोयर इत्यादी उपस्थित होते. यानिवडणूकीत शिवसेना, राकाँ किंवा कॉग्रेस उमेदवाराला संधी देईल अशी चर्चा होती. तशा पध्दतीने काही नावेही येत होती मात्र शिवसेनेने आपल्या नगर सेवकांचे संख्याबळ लक्षात घेता इतर पक्षाला स्थान दिले नाही. या नगर परिषदे मध्ये शिवसेनेचे १० व अपक्ष २ असे १२ नगर सेवकांचे संख्याबळ असून, राकाँकडे ४ तर काँग्रेसचे दोन असे संख्या बळ असल्याने शिवसेनेने आपल्या वरचस्व ठेवला.
घाटंजीत विषय समितीची निवड अविरोध
घाटंजी – येथील नगर परिषदच्या विषय समिती सभापती निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सर्वच सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज असल्याने निवड अविरोध झाली.
बांधकाम सभापती म्हणून अकबर तंवर, आरोग्य सभापती किशोर दावडा, महिला व बाल कल्याण सभापती इंदु परतेकी, शिक्षण सभापती संदिप बिबेकार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसुल अधिकारी संदिप महाजन व प्रभारी मुख्याधिकारी विर यांनी काम पाहीले.
0
बियाणे कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा

यवतमाळ – शेतकºयाला बोगस बियाणे देणाºया औरंगाबादच्या व्हर्जीन सिड प्रा. लि. च्या जनरल मॅनेजरविरुध्द पोलिसांनी दोन वर्षानंतर गुन्हा नोंद केला आहे. विष्णू जोशी असे या जनरल मॅनेजरचे नाव आहे. सण २०१२ मध्ये जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाचे सुभाष उलेमाले (५३) यांनी याबाबत दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. शेतकºयाने या कंंपीनचे कापूस बियाणे खरेदी केले होते. पेरणी केल्यानंतर ते उगवलेच नव्हते. त्यामुळे सदर बियाणे नित्कृष्ट असल्याबाबतची तक्रार शेतकºयाने केली होती. जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाने बियाण्याची तपासणी केली असता ते दोषपूर्ण आढळून आले. कंपीनने शेतकºयाची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर दोन वर्षानी पोलिसांनी जनरल मॅनेजरविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
0
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तीन जण जखमी

यवतमाळ,दि. २० – कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर तीन जण जखमी झाले. हि घटना आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भारी विमानतळाजवळ घडली. अविनाश शिवाजी कुकडे (२६) रा. आठवडी बाजार असे मृतकाचे नाव असून, निखील गुगरे (२०) रा. तारपूरा गंभिर तर विजय कुलसंगे रा. वरूड ता. देवळी व शेख इस्त्राईल अशी जखमीची नावे आहे.
अविनाश, निखील, विजय हे तिघे यवतमाळवरून एम. एच. २९ पी ६६७७ क्रमांकाच्या दुचाकीने चापडोह येथे जात होते. दरम्यान खडकीवरून भरधाव वेगाने येणाºया एम. एच. ३१ एयच १३०५ क्रमांकाच्या अॅल्टो वाहनाने समोरासमोर धडक दिली. या धडकेत अविनाश जागीच ठार झाला असून, निखील गंभिर तर विजय व अॅल्टो वाहनाचा चालक शेख इसराईल हे दोघे जखमी झाले. त्यांना येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूर हलविले. या अपघातामध्ये दुचाकी चकनाचूर झाली असून, अॅल्टोचेही नुकसान झाले आहे. याबाबत मृतकाचा भाऊ विश्वनाथ कुकडे (३९) रा. आठवडीबाजार यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
शेतकरी विधवा मांडणार सरन्यायाधीश दत्तू यांच्या समोर व्यथा

यवतमाळ दि. २० – विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणे शक्य नसल्याने गेल्या २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती. काळजाचा थरकाप उडविणाºया या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्वत:हून दखल घेतली.
विदर्भ जनांदोलन समितीच्या प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरील पीक कर्जही पूर्णपणे किंवा अंशत: माफ करावे, तसेच या शेतकºयांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकºयांना अन्न, आरोग्य व शिक्षण सुरक्षा मिळावी यांची दखल घेत, विदर्भ जनांदोलन समितीच्या हवाला देत १ डिसेंबर रोजी पुण्याचे वकील राकेश उपाध्याय यांनी याचिका सादर केली. तेंव्हा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अॅड. राकेश उपाध्याय यांना आपण ही बातमी वाचुन व्यथित झालो असे म्हटले. इंदोरे या शेतकºयाच्या आत्महत्येची स्वत:हूनच दखल घेण्याची आमची इच्छा होती. तशी पावलेही आम्ही उचलली होती. पण, आता याप्रकरणी याचिका दाखल झाली असल्याने आम्ही हा मुद्दा विशेष सामाजिक न्याय पीठाकडे सोपविला आहे. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, न्या.ए.के. सिकरी आणि न्या.आर.के. अग्रवाल आदि पाठपुरावा करणार आहे. याबाबत अधिक तपशील द्यावा अशी सूचनाही सरन्यायाधीश दत्तू यांनी दिल्याचे अॅड. राकेश उपाध्याय यांनी विदर्भ जनांदोलन समितीचे निमंत्रक किशोर तिवारी यांना दिली आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांची दैनावस्था व शेतकºयांना खचवले मनोबल उंचावण्यासाठी आहे हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, पीक कर्जही माफ करावे, शेतकºयांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही. त्यासाठी केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारला निर्देश देण्यात दिले नाही तर विदर्भाच्या शेतकरी विधवा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची भेट घेऊन आपल्या अडचणी व दुख मांडतील अशी माहितीही किशोर तिवारी यांनी या वेळी दिली. याचिकाकर्त्याने यावेळी एका सर्वेक्षणाचाही हवाला दिला. दरवर्षी शेतकºयांवरील कजार्चा डोंगर वाढतो. यामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. या व्यवस्थेत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमार आणि अनैसर्गिक मृत्युलाही सामोरे जावे लागते. ही आर्थिक विषमताच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरली आहे. इतकेच काय, तर ज्या भागात दुष्काळ नाही आणि चांगले पीक होते, तिथेही अल्पभूधारक शेतकºयांपेक्षा बेकायेदशीर सावकार आणि मध्यस्थांचाच फायदा होतोे, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे.
0
आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन

यवतमाळ , दि. २० – भारताविषयी गरड ओकणाºया कट्टर आतंकवादी हाफीज सईद याच्या विरोधात अभाविपने निदर्शने देऊन प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन केले.
पाकीस्तान येथील पेशावर येथे सैनिकी मुलांच्या शाळेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात १६० जणाचा मृत्यू झाला आहे. भरतात दुसºया दिवशी शाळेमध्ये मौन ठेऊन श्रद्घांजली अर्पण केली. पाकीस्तानमध्ये मोकाट फिरत असलेला आतंकवाद्याने भारताकडून बदला घेऊ अशी धमकी दिली आहे. सदर हल्ल्याची जाबाबदारी तालीबानी संघटनेने घेतल्यानंतर हाफीज सईद हा भारताला जबाबदार धरत आहे. तसेच २६/११च्या हल्ल्यातील मुख्य सुत्रधार आतंकवादी लकवी व त्याच्या साथीदाराला पाकीस्तान सरकारने जामिन दिला आहे. या घटनांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध करून आतंकवादी हाफीज सईद याच्या प्रतिक्रात्मक पुतळ््याचे दहन येथील दत्त चौकात केले. यावेळी विक्रमजीत कलाणे, मंजुषा खर्चे, संकेत कोल्हे, आकाश खांदवे, कार्तीक शिरे, प्रसन्ना कोसट्टीवार, अमन यादव, शुभम मोरे, अश्वजीत शेळके याच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
0
कोळपे मल्टीस्टेटचा उमरखेड मधून पोबारा, ९ ग्राहकांना गंडविले

उमरखेड, दि. २० – स्थानिक बसस्थानका समोरील कॉम्प्लेक्समध्ये पुणे येथील कोळपे पाटील मल्टी को-आॅपरेटीव्ह सोसायटीची शाखा उघडण्यात आली होती. मल्टीस्टेटने उमरखेडमधून पोबारा केल्याने गुंतवणूक दारात खळबळ उडाली आहे.
अन्य बँके पेक्षा अधिक व्याज दराचे प्रलोभन दाखवून ग्राहक तयार करण्यात आले. ग्राहकांना विश्वासात न घेता कोळपे मल्टीस्टेटच्या कर्मचाºयांनी पूर्व सूचना न देता या ठिकाणावरून पोबारा केल्याने ग्राहकात विविध चर्चेला उधाण आले आहे. अनिल कलाने यांनी ७१ हजार पाचशे रुपयाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार काल पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून बँक प्रतिनिधी अतुल अन्नदाते, व्यवस्थापक, अध्यक्ष कोळपे पाटील रा. पुणे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून कोळपे पाटील या मल्टीस्टेट सोसायटीने शहरात बस्तान मांडले होते. व्याजदर अधिक देण्याचे प्रलोभन दिल्याने शेकडो गुंतवणुकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, याचे बळी शहरातील गुंतवणुकदार ठरले आहे.










