पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 27th, 2014

 पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची झी २४ तास वृत्तवाणीला भेट 0

पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची झी २४ तास वृत्तवाणीला भेट

unnamed

IMG-20141225-WA0086
उमरखेड (यवतमाळ) – येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय यशवंतराव चव्हाण  मुक्त विद्यापिठा अंतर्गत बी.ए. एमसीजे (जनसंज्ञापन व वृत्तपत्रविज्ञा पदवी) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षीकाची भाग म्हणून मुंबई येथील झी २४ तास या वृत्तवाहीणीच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.
माध्यमशास्त्र अभ्यासक्रमात प्रात्याक्षीकाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाच्या वतीने अभ्यासदौºयाचे नियोजन केल्या जाते. यावेळी मुंबई येथे मराठी वृत्तवाहीनीच्या मुख्य कार्यकालयात भेट आयोजित करण्यात आली होती. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने या दौºयामधून विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. त्यांच्या ज्ञानात भर पडावी शिवाय प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी हा अभ्यास दौरा होता. यामध्ये २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रात्यक्षीकाच्या नजरेतून दुरचित्रवाणी व स्वर साधना सादरीकरणाची माहिती व मिडीयातील प्रत्यक्ष कामकाज कशा प्रकारे चालते हे विद्यार्थ्यांनी जाणुन घेतले. गणेश रुपाळे असोसिएट प्रोड्यूसर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रयात चालत असलेल्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली. वृत्तनिवेदन अजित चव्हाण, अनुपमा खानविलकर, रुषीकेश देसाई, भुषण करंदीकर यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाºयानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी या अभ्यास दौºयाला मान्यता देवून उपकृत केल्याबद्दल अभ्यासकेंद्राच्या वतीने प्रा. बि. यु. लाभशेटवार यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार, प्रा. संतोष मुडे, प्रा.सिध्देश्वर जगताप, प्रा.पी.पी. शिंदे यांच्यासह प्रशांत आयचित, अविनाश मुन्नरवार, मनोज जैस्वाल, अविनाश खंदारे, शिवशंकर शिंदे, सुरेश वाघ, कृष्ण पाचकोरे, गजानन गिरी, रंजना धामनकर, प्रतीक्षा चिकणे, अश्विनी केवटे, रेखा वाघमारे, शिवानी तामसकर, सचिन खाडे, श्रीराम पदमावार, फीरोज अन्सार, संजय सलेवाड, शेख इरफान, उमेश थोटे, येज्ञेश वाघ, संतोश जाधव, विवेक पडघणे, लक्ष्मीकांत जोशी उपस्थित होते.

 

December 27, 2014 in महाराष्ट्र
तरुणाचा मृतदेह आढळला, खूनाचा संशय 0

तरुणाचा मृतदेह आढळला, खूनाचा संशय

IMG-20141227-WA0025-1
यवतमाळ – आर्णी येथील दत्तरामपूर ले आऊटच्या बंद मंदिराच्या बाहेर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दत्तरामपूर येथील मिलिंद संभाजी भारती यांच्या ले आऊटमधून गणपत वाघमारे हा शेतात जात होता. अशातच मंदिराच्या बाहेर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर तरुण ३० ते ३२ वर्षाचा असून त्याच्या जवळ कोणताही पुरावा आढळला नाही. त्याने निळ््या रंगाचा जिन्स पॅन्ट, पांढºया रंगाचा कापडी बेल्ट लावलेला आहे. कथीया रंगाचा शर्ट त्याने परिधान केला असून त्याच्या हातावर निलेश असे नाव नोदवून आहे. अद्यापपर्यंत मृतकाची ओळख पटली नसून तरुणाचा खून करून फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ओळख पटविण्यासाठी मृतदेह ठेवण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

December 27, 2014 in विदर्भ
बोअरवेल पलटी; एक ठार, दोन जखमी 0

बोअरवेल पलटी; एक ठार, दोन जखमी

Mahur
माहूर – सारखणीवरून फुलसावंगीकडे जात असलेल्या बोरवेल चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर झाले आहे. ही घटना २६ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता तालुक्यातील कुपटी घाटात घडली.
बोहरवेल वाहन क्रमांक एपी २९ /बीडी ७७५८ च्या चालकाचा ताबा सुटल्याने कुपटी घाटात वाहन पलटी झाले. या अपघातात परमेश्वर शंकर मेश्राम रा. आमडी ता. किनवट घटनास्थळीच ठार झाला. सचिन मडावी याच्यासह अन्य एक जण जखमी झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थवरून पळ काढला. या घटनेची तक्रार करण लोवे (२२) रा. आमडी याने पोलिसात केली असून, चालक लक्ष्मण रेड्डी याच्याविरुद्घ माहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डॉ. अरूण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

December 27, 2014 in मुख्य पान
थंडीची लाट : पारा @ ८ अंशावर 0

थंडीची लाट : पारा @ ८ अंशावर

124459-ocodle
यवतमाळ – जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, पारा ८ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीने चांगलाच कहर केला असून, पारा सातत्याने घसरत आहे. यंदाचे निचांकी तापमान जिल्हावासीयांना त्रस्त करीत आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना सर्दी-पडसे, ताप आदी आजार बळावू लागल्याने डॉक्टरांची मात्र चांदी होत आहे. थंडीपासून उब मिळावी म्हणून ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दिवसभर गारवा कायम राहत आहे तर सकाळ, संध्याकाळ हुडहुडी भरत आहे. बदललेल्या वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्मिळ होत आहे. हिवाळ््याच्या सुरूवातीचा दीड महिना थंडीच्या प्रतीक्षेत गेला. मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून सुरू झालेली थंडीची लाट कायम आहे.

December 27, 2014 in विदर्भ
वृध्द मातेने थंडीत कुडकूडत काढली रात्र, मुलानेच मातेला घराबाहेर हाकलले 0

वृध्द मातेने थंडीत कुडकूडत काढली रात्र, मुलानेच मातेला घराबाहेर हाकलले

download (6)
यवतमाळ – नेर तालुक्यातील पांढरी येथील सुन व मुलानेच वयोवृध्द मातेला घराबाहेर हकलुन दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलासह सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील पांढरी येथे वयोवृध्द महिला सावित्री हरिभाऊ धवने (७०) ही एकटीच राहते. तीचा मुलगा श्रीराम हरिभाऊ धवने (२५) व सुन रंजना श्रीराम धवने (२३) हे नादगाव (खंडेश्वर) तालुक्यातील शिवणी रामपूर येथे वास्तव्यास आहे. दरम्यान काल २६ डिसेंबर रोजी धवने दाम्पत्य पांढरी येथे आले होते. त्यानी रात्री १२ वाजता राहते घर आम्हाला दे अशी मागणी करून वाद करून वयोवृध्द मातेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातून हाकलून दिले. आपल्या पुत्राचे हे निंदनिय कृत्य बघून तीने घराच्या आडोश्याला थंडीत कुडकूडत रात्र काढली. आज शनिवारी पोलीस स्टेशन गाठून आपल्या पुत्र व सुनेची तक्रार केली. सदर मुलगा सध्या शिवणी येथे राहत असून घरावर ताबा मिळविण्यासाठी आईलाच मारहाण केली व घराबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असे नमुद केले आहे. या प्रकरणी श्रीराम व रंजना याच्याविरूद्घ भादंवि ३२३, ५०४, ५०६ गुन्हा दाखल केला.

December 27, 2014 in विदर्भ
टिंम्बरमार्टला आग 0

टिंम्बरमार्टला आग

OLYMPUS DIGITAL CAMERA
यवतमाळ – वणी येथील यात्रा मैदानाजवळ असणाºया पठान टिंम्बरमार्टला रात्री ११.३० वाजता अचानक आग लागल्यामुळे लाकडी फर्नीचरासह तिथे असलेले लाकूड-फाटे पूर्णत: जळून खाक झाले असून अंदाजे २५ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे़
दिपक टॉकीज परिसरातील यात्रा मैदानाजवळ पठान टिंम्बरमार्ट हे फर्नीचर तथा लाकडी साहित्याचे दुकान आहे़ या दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ यामुळे संपूर्ण साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडले़ ही बाब नगर परिषदेचे सभापती विजय नागपूरे यांना कळताच त्यांनी तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण केले़ आगीला विझविण्यात रात्री उशीरा यश आले असून नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे़

December 27, 2014 in मुख्य पान
बँकेची ३० लाखांची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक 0

बँकेची ३० लाखांची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक

27122014-md-ng-1-10518-1-large
नाशिकरोड – बुलडाण्यातील साखरखेर्डा गावाजवळ स्टेट बँकेच्या वाहनावर हल्ला करून ३० लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील तिघांना नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संशयितांना पकडण्यात यश आल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांना सोपे ठरणार आहे. संशयितांकडून गावठी पिस्तुल, चार काडतुसे, रोकड तसेच पीकअप व्हॅन जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
स्टेट बँकेच्या साखरखेर्डा येथील शाखेत आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी चिखली शाखेतून दर तीन दिवसांनी रोकड आणली जात असते. शुक्रवारी दुपारी साखरखेर्डा शाखेचे रोखपाल विजयसिंह सिकरवार, शिपाई नंदकिशोर जाधव, चिखली बँकेचा सुरक्षा पी. जी. शिंदे आणि वाहनचालक लोखंडे ३० लाखांची रोकड घेऊन चिखलीहून साखरखेर्ड्याकडे चालले होते. क्रमांक नसलेल्या पीकअप व्हॅनमधून काही दरोडेखोर त्यांचा पाठलाग करीत होते. साखरखेर्ड्याच्या अलीकडेच अर्धा किलोमीटरवर दरोडेखोरांनी त्यांची कार अडविली. फावड्याचे दांडे आणि टिकावाने कारवर हल्ला केला. रोखपाल, सुरक्षारक्षकासह सर्वांनाच बेदम मारहाण केली. त्यानंतर कारमधील रोकड लूटून त्यांनी पोबारा केला. या घटनेमुळे केवळ बुलडाण्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली. घटनेबाबत कळताच बुलडाणा पोलिसांनी नाकाबंदी करून एका संशयिताला अटक केली. दरोडेखोर जिल्ह्याबाहेर पळून जाण्याची शक्यता अधिक असल्याने राज्यभरातील पोलिसांना सतर्क राहण्याबाबत कळविण्यात आले होते.
लूट करणाऱ्या टोळीतील तिघे नाशिकरोडच्या मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर थांबल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याने दिली. सकाळी नऊच्या सुमारास नाशिकरोड आणि उपनगर पोलिसांनी परिसरातील लॉजचे झडतीसत्र सुरू केले. एका लॉजमधील रजिस्टर तपासताना त्यांना तिघांची नावे आणि पत्यांसंदर्भात संशय आला. शिवाजी सारबाजी भागडे (२८,जालना), ज्ञानदेव नामदेव खरात (२४, वीरगाव) आणि गोविंद जगनराव डोंगरे (२८, सावरगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, २६ हजार ५०० रुपयांची रोकड, आणि पीकअप व्हॅन (एम.एच.१६ झेड ७००७) जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्हॅन बुलडाण्यातील गुन्ह्यात वापरण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नाशिककडे येताना गाडी एका ठिकाणी फसली. पकडले जाऊ नये यासाठी लुटलेली रोकड एका शेतामध्ये लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. संबंधितांवर आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. संशयितांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

December 27, 2014 in मुख्य पान
गुजरातमधून मराठी व्यापा-याला हाकलले 0

गुजरातमधून मराठी व्यापा-याला हाकलले

06_12_2014-6bag8-c-2
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये सोने-चांदीवर प्रक्रिया करणा-या मराठी व्यापा-याला मारहाण करून तेथून हाकलण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.गुजरातच्या गोध्रामध्ये सोने-चांदीवर प्रक्रिया करणा-या मराठी व्यापा-यांना गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व्यापा-यांकडून गुजरात सोडण्यासाठी आणि या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी त्रास दिला जात आहे. यातूनच साता-यातील शशिकांत फडतरे या मराठी व्यापा-याला तेथील व्यापार गुंडाळून कुटुंबासह गुजरात सोडावे लागले.
गुजरातमधील गोध्रा येथे महाराष्ट्रातील अनेक व्यापारी सोने-चांदीवर प्रक्रिया करण्याचा व्यापार करतात. एकटय़ा गोध्रामध्ये या मुख्य व्यापा-यांची ही संख्या दहाहून अधिक आहे. साता-यातील फडतरे यांचेही अनेक वर्षापासून येथे दुकान आहे. मात्र आजूबाजूला असणा-या दुकानदारांनी काही क्षुल्लक कारणावरून त्यांना अनेकदा शिवीगाळ आणि मारहाणही केली होती.
गुजरात सोडा, नाही तर तुम्हाला ठार मारू’ अशा धमक्या दिल्या. काही दिवसांपूर्वीच येथील १० ते १५ जणांनी फडतरे यांना पुन्हा मारहाण करत गोध्रा सोडण्यास जबरदस्ती केली. यामुळेच आपल्याला गुजरात सोडावे लागल्याची माहिती फडतरे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
‘आपण गुजरातमध्ये राहून व्यापार करत असताना कधीही वाईट वागलो नाही. कोणाशीही वाद केला नाही. कारण, माझे घर तेथील व्यापारावर चालत होते. मात्र माझा व्यापार बंद करण्यासाठी ज्या मंडळींनी जबरदस्ती केली, तशीच इतर मंडळी तेथे असलेल्या मराठी व्यापा-यांनाही त्रास देत आहेत. यामुळे माझ्यासह अनेकांचे व्यापार अडचणीत आले आहेत. आम्हाला तिथेच व्यापार करण्यासाठी सुरक्षा द्यावी’, अशी मागणीही फडतरे यांनी यावेळी केली.

December 27, 2014 in मुख्य पान
‘देशभक्त नथुराम गोडसे’वरील बंदीचा निर्णय २९ डिसेंबरला 0

‘देशभक्त नथुराम गोडसे’वरील बंदीचा निर्णय २९ डिसेंबरला

naturam
मुंबई – ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या बंदीविषयी न्यायालयीन कक्षा तपासण्यात येणार आहे. चित्रपटावर बंदी घालण्यात यावी की नाही, यासाठी न्यायालयीन कक्षा तपासण्याचे पुणे नगर न्यायालयाने ठरवले आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या २९ डिसेंबर रोजी होणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या विरोधात ही याचिका असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी चित्रपट बंदीच्या मागणीसाठी पुणे न्यायालयात याचिका केली आहे. महात्मा गांधी हिंदूविरोधक आणि गोडसे देशभक्त असल्याचे चित्रीकरण चित्रपटात असल्याचे व्यक्तव्य महासभेचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
याचिकेची सुनावणी घ्यावी की नाही, याबाबत न्यायकक्षा तपासण्यात येणार असल्याचे नगर न्यायाधीश एम. आय. मोडक यांनी सांगितले. त्यानंतरच याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडता येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, या याचिकेचा विषय पुणे न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील वाजिद खान यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतचा निर्णय येत्या २९ डिसेंबर रोजीच्या सुनावणीत होणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ३० जानेवारी रोजीच चित्रपट प्रदर्शित करण्याचा महासभेचा मानस आहे.

भिवंडी लाकूड गोदामाला आग, आठ जणांचा मृत्यू 0

भिवंडी लाकूड गोदामाला आग, आठ जणांचा मृत्यू

fire
ठाणे – भिवंडीतील माणकोली गावातील मढवी कंपाऊंड परिसरातील लाकूड भंगाराच्या गोदामाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती.
या आगीत होरपळून आठ कामागारांचा मृत्यू झाला आहे. तीन कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
मध्यरात्री तीनच्या सुमारास अचानक एका गोदामामध्ये आग भडकली ही आग वेगाने बाजूला लागून असलेल्या तीन गोदामांमध्ये पसरली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवल आहे.
या आगीत आणखी किती जिवीतहानी झाली याची खातरजमा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गोदामामध्ये शोधकार्य सुरु आहे. रात्रीच्यावेळी या गोदामामध्ये नेमके किती कामगार झोपले होते ते स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या आगीत होरपळून मरण पावलेल्या सात मृतांची ओळख पटली असून, कालिया गोमती रायदात (२०), राजू पतेत्री चव्हाण (३५), मुन्नीबाई यादव (२६), मराई (३०), अजय (३८), गौरी चव्हाण (२८) निरज (२१) अशी या मृतांची नावे आहेत. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली ते स्पष्ट झालेल नाही. अग्निशमन दलाच्या जवनांनी सुरुवातीला पाच मृतदेह बाहेर काढले. मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आणखी तीन मृतदेह सापडले. त्यामुळे या आगीमध्ये नेमका किती जणांचा मृत्यू झाला ते अजून स्पष्ट झालेले नाही.

December 27, 2014 in मुख्य पान