यवतमाळ दि. 06 : राज्याचे सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयचे कल्याण, व व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथून सकाळी 9 वाजता आर्णीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता आर्णी येथे कंम्बलपोश दर्गा येथे भेट. सकाळी 10.30 वाजता सायतखर्डा रामपूर रस्त्याचे भुमीपूजन, सायतखर्डा येथे दलीत वस्तीमधील सिमेंट रस्त्याचे बांधकाम, स्मशान भुमीचे बांधकाम, उद्घाटन. सकाळी 11 वाजता दत्तापूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम तसेच ठक्करबापा योजनेतंर्गत रस्ता भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 12 वाजता शरद येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपूजन दुपारी 12.30 वाजता वगारा येथे तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत रस्त्याचे भुमीपूजन, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन सर्वशिक्षा अभियानातंर्गत शाळा खोलीचे बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 1 वाजता सावरगाव (मंगी) येथे कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 2 वाजता सगदा येथे रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 2.30 वाजता ठाणेगाव येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 3 वाजता राजापेठ येथे तांडा वंस्ती सुधार योजनेतंर्गत रस्ता बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 3.30 वाजता पारवा येथे दलीत वस्तीसुधार योजनेंतंर्गत रस्ता बंधकाम, कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन. सायंकाळी 4 वाजता वाढोणा येथे कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन. सायंकाळी 4.30 वाजता घटाळा येथे नाली बांधकामाचे उद्घाटन. सायंकाळी 5 वाजता मेजदा येथे ठक्करबापा योजनेतर्गत रस्त्याचे भुमीपूजन. सायंकाळी 5.30 वाजता राहटी येथे ठक्करबापा योजनेतर्गत रस्त्याचे भुमीपूजन. आदी कार्यक्रमास उपस्थित राहून सोईनुसार यवतमाळकडे प्रयाण. यवतमाळ येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथुन नागपूरकडे प्रयाण. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील कार्यक्रम आटोपून यवतमाळ कडे प्रयाण आगमन व मुक्काम.
सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथुन चंद्रपुर कडे प्रयाण. चंद्रपुर जिल्हयातील कार्यक्रम आटोपून सोईनुसार यवतमाळकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे राखीव. मतदार संघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सोईनुसार यवतमाळ येथुन धामणगांव कडे प्रयाण. व तेथुन सायंकाळी 7 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
Archive for February, 2014
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा दौरा
परसोडी ग्रामपंचायतीत ई-बँकिंग सेवेचे उद्घाटन ; ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींग राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

यवतमाळ दि. ६: राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींगची सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून दि. १० फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायतीत सकाळी १० वाजता या सेवेचे राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. याच दिवशी जिल्ह्यात २०० ग्रामपंचायतींमध्ये या सेवेचा शुभारंभ होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील राहणार आहेत. तसेच अन्य मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. ग्रामविकास विभागाने महाऑनलाईन केंद्र शासन मान्यताप्राप्त सी.एस.सी- एस.पी.व्ही या कंपनीशी त्रिपक्षीय करार केला आहे. या कंपनीने देशातील राष्ट्रीयकृत बँकांबरोबर करार केला असून आता टप्प्याटप्प्याने बँक शाखा नसलेल्या राज्यातील सर्व ऑनलाईन ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना बँक व्यवहारांसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही तर बँकच ग्रामपंचायतीत येणार आहे.
ई-पंचायत कार्यक्रमात महाराष्ट्र देशात पहिले असून ई-बँकिंग सुविधेद्वारे बँकेत खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, ड्राफ्ट बनवणे, पैसे हस्तांतरित करणे, कर्ज प्रस्ताव करणे, लाभार्थ्यांना थेट अनुदान वितरित करणे इ. प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. संग्राम कक्षामार्फत वीज, फोन, मोबाईलचे देयक भरणे, रेल्वे-बस आरक्षण करणे, मोबाईल रिचार्ज करणे यासारख्या बहुविध सुविधा देखील ई-बँकिंग सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींमध्ये यापुर्व सुरू करण्यात आलेल्या विविध सेवांमुळे २१ हजार रोजगारसंधीं निर्माण झाल्या आहेत. एकसमान माहिती तंत्रज्ञान सेवा देण्यात राज्याचा ग्रामविकास विभाग देशात पहिला आहे. ग्रामविकास विभागामार्फत विविध प्रकारच्या २० संगणकीय आज्ञावल्या उपयोगात आणल्या जात असून याद्वारे गावपातळीवरची मुलभूत माहिती संकलित होत आहे. यातून एकप्रकारे ग्रामीण महाराष्ट्राचा माहितीकोशच आकाराला येत असून गाव विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने माहितीचे हे संकलन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकिंगची सोय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतींनाही काही रक्कम सेवाशुल्क स्वरूपात मिळणार आहे. तसेच १ एप्रिल २०१३ पासून शासनाने ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणारे १९ प्रकारचे दाखले संगणकीकृत स्वरूपात देण्याचे बंधनकारक केले आहे. यातूनही ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना बँकींग सुविधा सहजपणे गावातच उपलब्ध होणार आहे. परसोडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शुभारंभाची तयारी प्रशासनाच्यावतीने जोरात सुरू आहे.
डोर्ली येथे इसमाचा खून
यवतमाळ – शहरालगत डोर्ली येथील एका इसमाचा चोरीच्या संशयावरून खून केल्याचे घटना घडली. शहर पोलिसांनी दोन आरोपी विरूद्घ गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली.
संतोष रामाजी उगलमुगले (२८) रा. डोर्ली असे मृतकाचे नाव आहे. २ फेबु्रवारी रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास संडासला जात असल्याचे कुटुंबीयाला सांगुन गेला होता. दरम्यान ३ फेबु्रवारी रोजी डोर्ली शिवारातील गोलु नागरगोजे याच्या शेतात संतोषचा मृतदेह आढळल्चाची माहिती पोलीस पाटलाने शहर पोलिसात दिली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविला. ४ फेबु्रवारी रोजी दुपारी व्हिडीओ चित्रीकरणामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाºयांनी प्राथमिक अहवालामध्ये संतोषचा मृत्यू मारहाण केल्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्यावरून पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मृतकची पत्नी व भावाची चौकशी केली असता, मृतक संतोषचे गावातील गोलु नागरगोजे याच्यासोबत दुचाकी चोरीवरुन वाद सुरु होता असे सांगितले. तसेच मृतकला दारुचे वेसन असून घटनेच्या दिवशी तो गावातीलच पानठेल्याजवळ उभा होता. तेवढ्यात दुचाकीने शिवा खेडकर व त्याचा मित्र तेथे आले व त्याला सोबत घेऊन गेले. अशातच गोलु नागरगोजे व त्याच्या एका मित्राने तेथून संतोषला गाडीवर बसवून नेले. दरम्यान सोमवारी गणेश मिसाळ याने संतोषचा मृतदेह नागरगोजेच्या शेतात असल्याची माहिती कुटुंबीयाला दिल्याचे त्यांनी बयानात सांगितले. त्यावरून शहर पोलिसांनी आरोपी नागरगोजे व त्याच्या एका साथीदाराविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री आरोपी गोलु याला अटक करुन पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माळवे, जमा. सुनिल विसपुते करीत आहे.
अपघात, सहा ठार


परभणी येथील घटना, उमरखेड मध्ये शोककळा
उमरखेड – लग्न सोहळा आटोपून परभणीवरून उमरखेड कडे परत येत असताना विरुद्घ दिशेने येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाली. ४ फेबु्रवारी रोजी रात्री १२. ३० वाजता परभणी येथून १५ किमी अंतरावर झिरो फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले. यामध्ये बंग कुटुंबातील दोन, दुकानातील मुनीम, अकोला येथील पाहुणा व अन्य दोन जणांचा समावेश असून शहरात शोककळा पसरली आहे.
शहरातील कापड व्यावसायीक भगवान बंग यांच्या मुलांचा विवाह परभणी जवळील सेलु ह्या ठिकाणी ४ फेबु्रवारी रोजी होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर काही वºहाडी एम.एच. २९ आर ६२३८ क्रमांकाच्या कु्रझरने उमरखेडकडे निघाले होते. यावेळी चालक यादव गायकवाड हा वाहन चालवित असताना विरुद्घ दिनेशने येणाºया एम.एच. २६ / एडी ०९८८ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये क्रुझर संपूर्णपणे क्षतीग्रस्त झाल्याने वाहनात बसून असलेले हरिष बंग (६०), जगदिश बंग (५८), दामोधर सारडा (५८), रामचंद्र भराडे (६५) रा. उमरखेड, रामकिशोर लोहीया (५०) रा. अकोला, रामदास सुरोशे (४२) रा. नागेशवाडी हे सहा जण जागीच ठार झाले. तर दिनेश तेला,यादव गाकवाड हे जखमी झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनेतील एक जण नागेशवाडी येथील असल्याने तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शहरातील चार जणावर हिंन्दु स्मशानभूमित अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाणे संपूर्णपणे बंद ठेऊन शोक व्यक्त केला. या दुदैवी घटनेने शहरात शोकाकुल वातावरण पसरले होते
आप’ आणि केजरीवाल यांना नोटीस
नवी दिल्ली- परदेशातून मिळणा-या निधीबद्दल माहीती देण्यास टाळाटाळ करणा-या आम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘आप’ने पक्षाला मिळणा-या निधीबद्दल कोणतीच माहिती दिली नसल्याने पक्षाच्या संस्थापक सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
न्यायालयाने पक्षाच्या संस्थापक सदस्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस बजावली आहे. यावर २८ फेब्रुवारपर्यंत उत्तर द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने चार नोव्हेंबर रोजी आपला पत्र पाठवून पक्षाला मिळणा-या निधीबद्दल आणि बँक खात्यांचे तपशील जमा करण्यास सांगितले होते. मात्र त्याला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल राजीव मेहरा यांनी दिली होती. ‘आप’ आपल्या बँक खात्यांचा तपशील देत नसल्याचे मेहरा यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीत सांगितले.
परदेशातून निधी स्वीकारुन, कायद्याचा भंग करत असल्याने आपच्या संस्थापक सदस्यासह केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल करावी या मागणीसाठी वकिल एम.एल.शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटले

कोल्हापूर- शहरातील टोल विरोधी आंदोलनाने बुधवारी पुन्हा एकदा पेट घेतला. शिरोली येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरु झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नगरसेवक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिस आणि नगरसेवक यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यात महापौर सुनीता राऊत या किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी आंदोलन करणा-या सर्व नगरसेवकांना अटक केली असून त्यानंतर पुन्हा टोलवसुली सुरु झाली आहे.
याआधी टोलविरोधात १२ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात कोल्हापूरमधील नागरिकांनी टोल नाके पेटवून दिले होते. दरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयआरबी आणि पोलिसांच्याविरोधात कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
कोल्हापूर शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे रस्ते आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीने बांधले आहेत. यासाठी २२० कोटी रुपये खर्च आला. हा खर्च ३० वर्षे टोल लावून वसूल केला जाणार होता. या विरोधात कोल्हापूरच्या नागरिकांनी सातत्याने जोरदार आंदोलन सुरु केले आहे.
बिन्नी यांनी काढला ‘आप’चा पाठिंबा
नवी दिल्ली- आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी अरविंद केजरीवाल सरकारचा पाठींबा काढून घेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे भ्रष्ट व्यक्तीपेक्षा धोकादायक असल्याचा आरोप बिन्नी यांनी यावेळी केला.
दिल्लीतील ‘आप’ सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पक्ष नायब राज्यपाल नजीब जंग यांना लिहणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांच्यावर टीका करणा-या बिन्नी यांनी बुधवारी पुन्हा एकदा त्याच्यावर तोफ डागली. केजरीवाल केवळ दिल्लीतील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेशी खोटे बोलत आहेत.
सरकारचा पाठिंबा काढून घेतला असलातरी जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. जर अण्णा हजारे यांना अपेक्षीत असलेले जनलोकपाल विधेयक सरकारने सादर केले तर आपण त्याला पाठींबा देऊ असे ते म्हणाले.दिल्ली सरकारने ४८ तासात स्वस्त वीज आणि पाणी, महिलांची सुरक्षा आणि राष्ट्रकुल घोटाळ्याच्या चौकशीकरावी अन्यथा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा बिन्नी यांनी रविवारी दिला होता.
लोकसभा दिवसभरासाठी तहकुब

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी होणा-या संसदेच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र तेलंगण आणि अन्य मुद्यावर सदस्यांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले. तर राज्यसभेतही याच मुद्दयावरून सदस्यांनी गदारोळ केला.
त्याआधी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल अशी आशा व्यक्त केली. १५व्या लोकसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जाणा-या सर्व मुद्यांवर चर्चाकरण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.हे अधिवेशन २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, तेलंगण विधेयक, व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक आणि महिला आरक्षण अशा महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे
सीबीआय भरणार ७११ जागा
नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च तपास संस्था सीबीआयमध्ये तातडीने ७११ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तर अन्य दोन हजार ६३ रिक्त जागा टप्प्याटप्प्यानुसार भरणार असल्याचे निवृत्तीवेतन आणि कार्मिम विभागाचे संसदीय व्यवहारमंत्री व्ही. नारायणसामी यांनी लोकसभेत सांगितले. सीबीआयमध्ये ७११ जागा भरण्यासाठी कार्यालयीन तयारी पूर्ण झाली आहे. तर अन्य जागा भरण्यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सीबीआयमधील विविध विभागात ८७८ पदे रिक्त असल्याचे नारायणसामी यांनी यावेळी सांगितले. यातील ५२७ सीबीआय अधिकारी, कायदे विभागात ६९ अधिकारी, तांत्रिक विभागात ५४ पदे, सचिवालयात २०६ आणि कँटीनमध्ये २२ पदे रिक्त आहेत.सीबीआयमध्ये सहा हजार ६७४ कर्मचारी वर्ग अपेक्षित असून केवळ पाच हजार ७९६ कर्मचारीच काम करीत आहेत. असे असतानाही सीबीआयने २००३ प्रकरणांमधील ८५५ प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.सीबीआयकडे २०१३ मध्ये एक हजार १३१, सन २०१२ मध्ये १०४८ आणि सम २०११ मध्ये १००३ प्रकरणांची नोंद झाली. यातील ७० टक्के प्रकरणांमधील प्रगती समाधानकारक असल्याचे नारायणसामी यांनी लोकसभेत सांगितले.सीबीआयने टूजी, राष्ट्रकूल यासारख्या अनेक बड्या घोटाळ्यांची चौकशी केली. त्यांना मनुष्यबळ कमी पडत असल्याचे नारायणसामी यांनी सांगितले.
अपघातात दोन ठार
यवतमाळ – जिल्ह्यात विविध अपघातातमध्ये दोन जण ठार झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. राळेगाव तालुक्यातील वाढोणा बु. येथे अज्ञात वाहनाने निलेश भाईमारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कवडू नथ्थुजी निम्मनवार (५०) रा. टकळी यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला. तसेच यवतमाळ येथील कोहीनुर सोसायटी जवळ एम.एच. २९ टी ३२५३ क्रमांकाच्या वाहनाने अब्दुल सत्तार रा. तायडे नगर यांना धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
प्रविण दिवटेसह १० जणाविरूद्घ गुन्हा
यवतमाळ – गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या नितीन निघोट याच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असून माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यासह १० जणाविरुद्घ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर उर्वरीत नऊ जण फरार आहे.
नितीन किसन निघोट रा. विसावा कॉलनी पिंपळगाव या माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आहे. घटनेपासून तो फरार होता. अशातच सोमवारी रात्री दत्त चौकातील भाजी मंडीमध्ये लोखंडी रॉडने हल्ला केल्याने नितीन हा गंभीर जखमी झाला. येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविले. पुर्ववैमनस्यातून बदला घेण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे बोलल्या जात आहे. याप्रकरणी पुष्पा किसन निघोेट यानी वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी किशोर पंडीत, गोलु पारधी, विक्की किनाके, विकास पाटील, प्रविण दिवटे अन्य पाच ते सहा जणाविरुद्घ भादंवि कलम ३०७, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान काल रात्री पंडीत याला अटक केली असून उर्वरीत आरोपी फरार आहे. अधिक तपास वडगाव रोडचे ठाणेदार विपीन बसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय शिरभाते करीत आहे.
पुरूष गटात हरियाणा तर महिला गटात एमडी स्पोर्ट्स पुणेची बाजी
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप
यवतमाळ – नवजयहिंद क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा स्थानिक बालाजी सोसायटी येथील मैदानात पार पडल्या. स्पर्धेत पुरूष गटात हरियाणाचा बाबा हरदास संघ तर महिला गटात एमडी स्पोटर्स पुणे ने प्रथम पारितोषिक पटकाविले. हरियाणा संघाचा प्रमोद कुमार तर पुणेची पुजा शेलार यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. यावेळी विजेत्या चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आ.प्रा. वसंतराव पुरके, खा.भावनाताई गवळी, माजी आ. अरूण अडसड, जि.प. अध्यक्ष प्रविण देशमुख, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, जि.प. सदस्य राहुल ठाकरे, सिमा तेलंगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे रामदास दरणे आदि उपस्थित होते. पुरूष गटात अंतिम सामन्यात हरियाणाच्या बाबा हरदास क्लबने पटियालाच्या संघाला २९ विरूध्द ६ गुणांनी पराभव करीत धुळ चारली. तर महिला गटात पुणेच्या एमडी स्पोटर्स संघाने अटीतटीच्या सामन्यात पंजाबच्या राणा स्पोटर्स क्लबचा पराभव केला. शिवाय स्पर्धेत विजेत्या संघासह द्वितीय, एअर इंडीया मुंबईच्या संघाला तृतिय व साई गुजरात संघ चतुर्थस्थानी राहिलेल्या संघांना रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच मॅन आॅफद सिरीज ठरलेल्या एमडी क्लब पुणेच्या पुजा शेलार हिला स्कुटी देऊन गौरविण्यात आले. बिएमडब्ल्यु पटीयाला संघातील रोहीत कुमार, राणा स्पोर्टर्स पंजाबच्या मोती चंदल, एअर इंडीया मुंबईच्या राहुल चौधरी, साई गुजरातचा रवी, अशोक संघ कलकत्त्याची पिंकी राय, पालम स्पोेटर्स दिल्लीची भावना, विदर्भ नागपूर संघाची साक्षी झेंडे, आणि महिला आश्रम पुणेची अंकीता मोहड यांना बक्षिस वितरीत करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता स्वागताध्यक्ष आ.संदीप बाजोरीया, नवजयहिंद मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे, अरूण राउत, सतिश भोयर, राजु डांगे, बाळासाहेब चौधरी, राजु जॉन, बाळासाहेब दौलतकार, प्रशांत वानखडे, चंद्रशेखर परडखे, प्रकाश दौलतकर, शंकर कुमरे, सुधिर गदरे, शंकर नागोसे, भिमराव मडावी, अनील काळे, सुरेश जवंजाळ, विष्णू बेहरे, प्रभाकर सावरकर, लक्ष्मण वेलादे, इंगळे, पप्पु तोंदवाल, अजय शेंडे, अरुण शेंडे, अरुण गवळी, प्रदिप वानखडे, हरिहर देशुख, कैलास राठोड, सुनील वानखडे, अमोल बोदडे, विलास कीनवटकर, लक्ष्मण पवार, कैलास शिंदे, सचिन दरेकर, डॉ. सुभाष डोंगरे, दिलीप मुनगीनवार, विनोद देशमुख, शाम पाचपोर, प्रा. विकास टोणे, शैलेश वानखडे यांच्यासह कार्यकत्र्यांनी सहकार्य केले.
‘लव्ह इन रिलेशनशिप’चा वाद पोलिस ठाण्यात; प्रियकराविरूद्घ बलात्काराचा गुन्हा
यवतमाळ – शहरातील संभाजी नगरामध्ये राहणाºया एका युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळयात ओढून तीच्यासोबत शारीरीक सबंध प्रस्तापित केले. प्रियकर युवकाच्या कुटुंबीयाने त्याची दुसºया युवतीसोबत सगाई केल्याने तीन-चार वर्षापासून सुरु असलेले ‘लव्ह इन रिलेशनशिप’ संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहलचा असून पोलिसांनी प्रियकराविरूद्घ बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
धामणगाव मार्गावरील राधाकृष्ण नगरीमध्ये ३५ वर्षीय भारती (काल्पनिक नाव) नामक महिला वास्तव्यास आहे. चार वर्षापूर्वी आजाराने पतीचे निधन झाल्याने ती मुला-मुलीसोबत राहत होती. अशातच मुलगा सतत आजारी राहत असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील डॉक्टरकडे महिन्यातून तीन ते चार वेळा न्यावे लागत होते. त्यामुळे सदर महिला संभाजी नगरातील संतोष राठोड (३३) या युवकाची कार नेहमी भाड्याने करीत होत्या. या महिलेच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती झाल्यावर सदर युवकाने तीला प्रेमाच्या जाळ््यात ओढून लग्नाची आमिष दाखविली. त्यानंतर तीच्या सोबत शारीरीक सबंध प्रस्तापित करून लैंगिक शोषण केले. त्यांच्या प्रेमकाहानीची भनक दोघांच्याही कुटुंबाला लागली. त्यामुळे युवकाच्या आई-वडीलाने त्याचा विवाह दुसºया युवती सोबत करून देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी विवाहयोग्य स्थळही शोधले होते. यावेळी संतोष याने सदर महिलेला सोबत नेऊन विवाह जुळलेल्या कुटुंबीयाची भेट घेऊन प्रेमाची माहिती देऊन विवाह मोडला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयाने महिलेची समजूत काढून संतोषचा पुन्हा दुसºया युवतीसोबत विवाह जुळवून साक्षगंध केले. यावेळी संतोषने पूर्णपणे सबंध तोडावे असे त्यावेळी ठरले होते. मात्र तो पुन्हा या महिलेच्या घरी जाऊन तीच्यावर पत्नीसारखा हक्क गाजवून जबरीने अत्याचार करून मारहाण करीत आहे. त्यामुळे त्याचा ‘लव्ह इन रिलेशनशिप’चा वाद पोलिस ठाण्यात पोहचला. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संतोष राठोड याच्याविरूद्घ भादंवि कलम ४१७, ३७६, ५०४, ५०६,२९४ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार पंजाब डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजस्वीनी गिरसावळे करीत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर गुन्हा
यवतमाळ – भारतीय जनता पक्षाचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी हे भ्रष्ट नेते असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. भाजपा शहराध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल याच्यांविरूद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
‘आप’चे संस्थापक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी हे सर्वात भ्रष्ट नेते आहेत असा आरोप केला. त्यांचे विरुद्घ उमेदवार उभा करून त्यांना संसदेत प्रवेश करु देणार नाही असे अपमानजनक वक्तव्य करून बदनामी केली. या वक्तव्याने भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त केला. भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भुतडा यांनी आज ४ फेबु्रवारी रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुख्यमंत्री केजरीवाल याच्यांविरूद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
लाचखोर गटविकास अधिकाºयास अटक
यवतमाळ – अंगणवाडी बांधकामाचे मुल्यांकन व तंटामुक्त समिती अंतर्गत निधीच्या गैरप्रकार मिटविण्यासाठी ग्रामसेवकाकडून तीन हजाराची लाच घेणाºया नेर येथील प्रभारी गटविकास अधिकाºयांस रंगेहात पकडून अटक केली. यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी १२.३० वाजता पंचायत समितीमध्ये ही कार्यवाही केली असून कर्मचाºयांमध्ये खळबळ माजली आहे.
सखाराम जयवंत इसलकर (५०) असे लाचखोर अधिकाºयाचे नाव आहे. नेर पंचायत समितीमध्ये ते विस्तार अधिकारी (पंचायत) असून त्याच्याकडे प्रभार आहे. गणेश सुर्यभान सुगदे (४०) हे नेर पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक आहे. चिकणी डोमगा येथील तंटामुक्त समितीच्या निधीमध्ये गैरप्रकार व मांगला देवी येथे येथील अंगणवाडी बांधकामाची तक्रार पंचायत समितीकड ेदिली होती. या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी इसळकर याच्याकडे होती. ग्रामसेवकाने सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी व बांधकामाचे मुल्यांकण करण्याची विनंती इसळकर यांच्याकड े केली. यावेळी ग्रामसेवकाला एकविरा कॉलनीमध्ये घरी भेटण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी चौकशीचे प्रकरण निपटविण्यासाठी व मुल्यांकण करूण देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ग्रामसेवकाने दोन हजार रुपये दिले. उर्वरीत तीन हजार रुपये आणून देण्याचे सांगितले होते. या प्रकरणाची तक्रार ग्रामसेवकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून ३ फेबु्रवारी रोजी पडताळणी दरम्याण प्रभारी गटविकास अधिकाºयाने लच मांगितल्याचे उघड झाले. त्यावरून आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नेर येथील कार्यालयात सापळा रचून गटविकास अधिकारी इसलकर यांना तीन हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपअधिक्षक सतीश देशमुख, जमादार सुशिल झघेडगेकर, दिपक इवाने नंदकिशोर शुक्ला, गजानन राठोड, अमोल महल्ले, निलेश पखाले, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, सुधाकर कोकेवार यांनी केली.
फेसबुकचा आज दहावा वाढदिवस ; जगभरातील एक अब्ज २० कोटी नेटयुझर्सना एकत्र
मुंबई- लोकसंख्येच्या विचार केल्याच चीन आणि भारत यानंतर याचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षे जगभरातील एक अब्ज २० कोटी नेटयुझर्सना एकत्र आणणा-या फेसबुकचा आज (चार फेब्रुवारी) दहावा वाढदिवस आहे.चार फेब्रुवारी २००४ रोजी मार्क झुकरबर्क आणि त्याच्या काही सहकार्यांनी फेसबुकची सुरुवात केली होती. आज दहा वर्षानंतर फेसबुक हा नेट आणि स्मार्टफोन युझर्सच्या जगण्यातील एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.हार्वड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या संकेतस्थळानेनंतर अनेक विक्रम नोंदवले. मार्क आणि त्याच्या काही सहकार्यांनी महिन्याला केवळ ८५ डॉलर्स असलेला सर्व्हर विकत घेऊन फेसबुकची सुरुवात केली होती.
भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरु होणार ?
कराची – पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पुन्हा क्रिकेट मालिका सुरु करण्यास भारताने अनुकूलता दाखवली आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी तयार आहेत असे पीसीबीचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु व्हावी यासाठी श्रीनिवासन अत्यंत गंभीर आहेत. आमच्या पसंतीच्या त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. श्रीनिवासन यांच्याकडून आम्हाला सध्या तोंडी आश्वासन मिळाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये खात्रीलायक मालिका खेळवली जावी यासाठी आम्हाला लिखित आश्वासन हवे आहे असे अशरफ यांनी सांगितले.भारतामध्ये पाकिस्तानकडून सातत्याने होणा-या दहशतवादी कारवायांमुळे भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले आहे. आयसीसीच्या उत्पनामध्ये जास्त वाटा मिळावा यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताने एक प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला पाकिस्तान, श्रीलंकेने विरोध केल्यानंतर बीसीसीआयने त्रयस्थ ठिकाणी मालिकेचा प्रस्तावाला सकारात्मक संकेत दिले आहेत.
बांगलादेशात ११ जणांना जलसमाधी, ५० बेपत्ता
ढाका – बांगलादेशमधील सुमनगंज जिल्ह्यातील सुरमा नदीमध्ये नाव उलटल्याने झालेल्या अपघातात ११ जणांना जलसमाधी मिळाली तर ५० हूनही अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बोटीला अपघात झाला. सकाळी तीन वाजेपर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नावेमध्ये १५ ते २० मुले आणि महिलांचा समावेश होता.नावेला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे अपघाचतून बचावलेल्या नागरिकांनी सांगितले. सुमारे ४० ते ४५ लोकांना पोहून किना-यावर पोहोचण्यात यश मिळाले मात्र ५० हूनही अधिक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहीती अधिका-यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माथूर
नवी दिल्ली- सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असणा-या सातव्या वेतन आयोगाच्या नेमणुकीला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. माजी न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या वेतन आयोगाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंजूरी दिली.
सातव्या वेतन आयोगाला दिलेल्या मंजुरीचा फायदा ५०लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी तर तीस लाखाहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. आयोगाचे अध्यक्षपद माजी न्यायमूर्ती ए. के. माथूर यांना सोपविण्यात आले आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहेत.
यापूर्वी मनमोहन सिंग यांनी मंजुरी दिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची एक जानेवारी २००६ मध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती.
दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे
मुंबई- दहावी-बारावीच्या परीक्षेवर मुख्याध्यापक- शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
मुख्याध्यापक संघ महामंडळ, विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षकेतर समन्वय समितीच्या मुख्य पदाधिका-यांनी बालभवन मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण आंदोलन मागे घ्यावे राज्यातील कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील ‘कायम’ हा शब्द मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ काढण्यात येणार असून त्यासाठीची कार्यवाही आपल्याकडून पूर्ण झाली असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज, सचिव अरूण थोरात, सुभाष माने यांनी दिली.मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्र्यांसमोर दिलेल्या निवेदनात विविध प्रकारच्या १६ मागण्या सादर केल्या होत्या. त्यापैकी शालेय पोषण आहारासाठी मुख्याध्यापक संघ तसेच शिक्षण संचालक कार्यालयाने तयार केलेला मसुदा स्वीकारणे, यासाठीची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकावर व पोषण आहार निर्मिती व वाटपाची जबाबदारी बचत गटांवर देण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. तर मुल्यांकनास प्राप्त झालेल्या विनाअनुदानित शाळांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची ग्वाहीही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी दिली असल्याचे रेडीज यांनी सांगितले.












