पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

अखेर नाराजी दूर ; गांधीनगरमधून निवडणूक लढवणार - अडवाणी 0

अखेर नाराजी दूर ; गांधीनगरमधून निवडणूक लढवणार – अडवाणी

index
नवी दिल्ली – अखेर लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले. दिवसभरातील भेटी आणि चर्चेनंतर अडवाणी यांनी गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी अडवाणी गांधीनगर ऐवजी मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या अडवाणींची अखेर समजूत काढण्यात पक्षातील नेत्यांनी बुधवारी रात्रीपासून त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मतदारसंघाच्या निवडीचा अधिकार पूर्णपणे अडवाणींना असल्याचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी गुरुवारी सांगितले.गुजरातमधील गांधीनगर अथवा मध्यप्रदेशातील भोपाळ यापैकी त्यांना हव्या त्या मतदार संघातून अडवाणी निवडणूक लढवू शकतात. तो अधिकार त्यांना आहे, असे सिंग यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढवणार असल्याचेे जाहीर केले. त्याआधी गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास अडवाणींनी राजी व्हावे यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी अडवाणींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुषमा स्वराज आणि अरुण जेठली यांनीही अडवाणी यांची भेट घेतली होती.

March 20, 2014 in देश-विदेश
इशान भागवते ठरला ‘ गुगल बॉय ’ 0

इशान भागवते ठरला ‘ गुगल बॉय ’

unnamed
यवतमाळ – जगदंबा अभियात्रीकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी इशान निखील भागवते हा गुगलर स्पर्धेत अव्वल ठरला आहे. त्याला महाविद्यालयात गुगल बॉय या पदविने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच गुगलर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये प्रथम फेरीत दहा मिनीटात दहा प्रश्न व्दितीय फेरीत दहा मिनीटात पंधरा प्रश्न आणि तृतीय फेरीत दहा मिनीटात वीस प्रश्न सोडवायचे होते. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर सर्च करुन ती उत्तरपत्रिकेत लिहीण्याची ही स्पर्धा होती. यामध्ये महाविद्यालयातील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वात कमी वेळात जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडविल्यामुळे इशान भागवते याला महाविद्यालयाचे सचिव शितल वातीले यांच्या हस्ते रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्याला सन्मानित करण्यात

March 20, 2014 in महाराष्ट्र
लिपस्टीकचा परिणाम हृदयावर 0

लिपस्टीकचा परिणाम हृदयावर

makeup-21
सौंदर्य प्रसाधनांचे अनेक दुष्परिणाम आता पुढे यायला लागले आहे. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी काही रसायने चक्क कर्करोगाला निमंत्रण देणारी असतात हे कळल्यापासून तर शास्त्रज्ञांनी लोकांना सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत अतिशय सावध राहण्याचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या कॅलिङ्गोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संबंधात लिपस्टीकवर काही संशोधन केले तेव्हा असे आढळले की, लिपस्टीकमध्ये वापरल्या जाणार्‍या काही द्रव्यांमुळे हृदयविकार जडू शकतो किंवा स्नानू शैथिल्याचा विकार होऊ शकतो. लिपस्टीक मध्ये वापरले जाणारे हे द्रव्य हॅन्डवॉश आणि त्याच कामासाठी वापरल्या जाणार्‍या काही साबणांमध्येही वापरले जात असते. हे द्रव्य म्हणजे ट्रायक्लोसान. ट्रायक्लोसानमुळे हृदयाच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे सिद्ध करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी केवळ ट्रायक्लोसानचा हृदयावर काय परिणाम होऊ शकतो याची चाचणी घेतली तेव्हा असे आढळले की, हृदय या द्रव्याच्या संपर्कात केवळ २० मिनिटे आले तरी हृदयाच्या कार्यकलापावर २५ टक्के परिणाम होतो. म्हणजे लिपस्टीक आणि हॅन्डवॉशमध्ये वापरले जाणारे हे द्रव्य किती धोकादायक आहे हे यावरून लक्षात येते. त्या परिणामांचा हा सज्जड पुरावाच आहे. असे असले तरी या संशोधनाच्या आणि निष्कर्षाच्या बाबतीत सौंदर्य प्रसाधनांची इंडस्ट्री सावध झालेली आहे.
अमेरिकेत सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिपस्टीकचा वापर मोठा आहे आणि त्यातल्या या द्रव्याच्या संदर्भात अशा प्रकारचे निष्कर्ष जाहीर झाले तर लिपस्टीकच्या विक्रीवर मोठा गंभीर परिणाम होईल अशी भीती या उद्योगातल्या जाणकारांना वाटायला लागली आहे. म्हणून या उद्योगात काम करणार्‍या काही संशोधकांनी ट्रायक्लोसानच्या संबंधातील या संशोधनाला आक्षेप घेतला आहे. कॅलिङ्गोर्निया विद्यापीठा तील शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढताना दोन चुका केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रायक्लोसानचा हृदयाच्या स्नायूंवर होणारा परिणाम पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठातल्या संशोधकांनी उंदरांचा वापर केला आहे. म्हणजे हा प्रयोग उंदरांवर केला आहे. तो करताना ट्रायक्लोसान ची मात्रा जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ट्रायक्लोसान त्यापेक्षा कमी प्रमाणात वापरले जात असते आणि विशेष म्हणजे ही लिपस्टीक ओठाला लावली जात असते. तिचा हृदयाशी काही संबंध येत नाही.
ओठापासून हृदय खूप लांब असते. तेव्हा ट्रायक्लोसानच्या हृदयावर होणार्‍या परिणामां बाबतचे हे निष्कर्ष अतिशयोक्तीपूर्ण आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांना हा आक्षेप मंजूर नाहीत. उंदरांवर प्रयोग करताना मात्रा जास्त वापरली आहे परंतु निष्कर्ष लवकर हाती यावेत म्हणून ती जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ती कमी असते ही गोष्ट खरी, परंतु एकदा ओठाला लिपस्टीक ङ्गासली की, तिचा परिणाम केवळ २० मिनिटे नव्हे तर २४ तास रहात असतो आणि तो कमी असला तरी अधिक काळ होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओठाला लावलेल्या लिपस्टीकचा हृदयाशी काही संबंध नाही हे म्हणणे चूक आहे. ओठाला लावलेली लिपस्टीक केवळ हृदयापर्यंतच नव्हे तर तिथून झिरपत झिरपत शरीराच्या सगळ्याच अवयवापर्यंत जात असते. म्हणजे ती हृदयाला तर त्रासदायक ठरतेच, तर शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंनाही शिथिलता आणत असते.

वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण 0

वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण

images.jpeg1
सध्याच्या जगात इंटरनेटशिवाय जगणे अशक्य बनले आहे. सध्याच्या जगातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर अवलंबून आहे. घरबसल्या सर्व कामे इंटरनेटवरून सहजशक्य होतात. त्यामुळे मोबाइल रिचार्ज, रेल्वेची व विमानाची तिकिटे, ई-कॉमर्स आदी सर्व व्यवहार इंटरनेटवर सहजगत्या करतात येतात. तसेच जगातील विविध विषयांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे क्लिक करताच माहितीचा धबधबा कोसळतो. यामुळे व्यक्तीचे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.
सध्या रुग्ण किंवा सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला झालेल्या आजाराची माहिती पहिल्यांदा इंटरनेटवर घेतात. त्यानंतर ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे येत्या काही वर्षात इंटरनेट डॉक्टरची जागा घेण्याची शक्यता आहे. कारण आजारी असलेले बहुतांश लोक आपल्याला होणारा त्रास अन्य नेटिझन्सशी शेअर करीत आहेत. तसेच या नेटिझन्सकडून आजारावर विविध सल्ले मागत असल्याचे आढळले आहे. गेल्या दशकात इंटरनेटचा वापर आरोग्यविषयक कामासाठी अधिक होऊ लागला. २००१ ते २०१३ या काळातील रुग्णांच्या मुलाखती घेण्यात आल्या. २००० पूर्वी बहुतांश व्यक्ती आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन माहिती घेत असत. मात्र त्यानंतर ते अन्य रुग्णांशी आपल्या आजाराविषयी चर्चा करून उपचाराची दिशा ठरवू लागले, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक स्यू झिआब्लँड यांनी सांगितले.
रुग्णांना केवळ माहिती ऐवजी आता वास्तविक सल्ल्याची आणि आधाराची अधिक गरज आहे. दरवर्षी कोटयवधी जण ऑक्सफर्डच्या www.healthtalkonline.org या वेबसाइटला भेट देतात. तेथे अन्य रुग्णांकडून ते आपल्या आजाराविषयी माहिती घेतात. चित्रपट, अ‍ॅनिमेशन, ध्वनी, चित्र, व्यक्तिगत अनुभव यांच्या माध्यमातून रुग्णांना त्याच्या आजाराची माहिती रंजकपणे मिळू शकते. यामुळे रुग्णांना आपल्या आजारावर उपचार करण्याची मानसिकता तयार होते. तसेच डॉक्टरला उपचारात मदत करू शकतात.इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन डॉक्टरही रुग्णांसाठी उपयुक्त वेबसाइट पाहण्याची शिफारस करत आहेत. मात्र इंटरनेटवरून माहिती घेऊन डॉक्टरशी चर्चा केल्याचे दुष्परिणाम डॉक्टर व रुग्ण संबंधावर होऊ शकतात, अशी भीतीही रुग्णांच्या मनात असते.जनरल प्रॅक्टिशनर आणि परिचारिका हे रुग्णांना इंटरनेटचा वापर करायला सांगतात. तसेच त्यांच्या रुग्णांना आपल्या आजाराविषयी अन्य रुग्णांशी चर्चा करायचा सल्ला देतात, असे झिआब्लॅँड यांनी सांगितले.

बेपत्ता विमानाचा तालिबानी भागातून प्रवास 0

बेपत्ता विमानाचा तालिबानी भागातून प्रवास

images111
क्वालालंपूर- दहा दिवसांपूर्वी बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अजूनही कायम आहे. या विमानाने बेपत्ता झाल्यानंतर तालिबानी भागातून प्रवास केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी हे विमान अवघ्या पाच हजार फूट उंचीवरून उडवण्यात येत होते. दरम्यान, विमानातील संदेशवहन यंत्रणा बंद झाल्यानंतर या विमानाच्या सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्याचा पुरावा सापडला आहे.
या बेपत्ता विमानाचा शोध २६ देशांच्या शोध पथकांद्वारे घेतला जात आहे. तरीही या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. या विमानाच्या कॉकपिटमधून सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्यानंतर या विमानाची स्वयंचलित प्रणाली कार्यरत करण्यात आली, असे एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी याह्या यांनी सांगितले.या विमानाचे वैमानिक कॅप्टन जहारी अहमद शहा आणि प्रथम अधिकारी फारिक अब्दुल हमीद यांच्यावर संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. सहवैमानिकाच्या अखेरच्या संभाषणानंतर १२ मिनिटांनी विमानाच्या संदेशवहन यंत्रणेने शेवटचा संदेश पाठवला. या विमानाच्या प्रमुख वैमानिकाच्या अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटरची तपासणी सुरू केली आहे. विमानाची संदेशवहन यंत्रणा बंद करण्याचे काम केवळ अत्यंत प्रशिक्षित वैमानिकच करू शकतो. त्यामुळेच हे विमान रडारवर दिसू शकले नाही, असे मलेशियाच्या अधिका-यांनी सांगितले.

March 18, 2014 in देश-विदेश
अनामत रक्कम वाढवूनही, उमेदवार संख्या घटेना 0

अनामत रक्कम वाढवूनही, उमेदवार संख्या घटेना

download (1)
नवी दिल्ली– निवडून येण्याची शक्यता नसलेल्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांची अनामत रक्कम पाचेश रुपयांवरुन पंचवीस हजार रुपये केली. मात्र रक्कम वाढवूनही उमेदवारांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत्या अनामत रक्कमेबरोबर उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे.
१९९८ मध्ये ४,७५० उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये हेच प्रमाण ७,५१४ होते. महत्वाचे म्हणजे ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होते. सर्वाधिक ८० खासदार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये एकहजारहून अधिक उमेदवार निवडणूक लढवतात. त्याखालोखाल मध्यप्रदेश बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
२००९ मध्ये महाराष्ट्रातून ८१९ उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात होते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे उमेदवारांचे सरासरी प्रमाण १७ होते. देशातील सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण १४ आहे. मात्र तामिळनाडूमध्ये हेच प्रमाण जास्त आहे. ३९ खासदार असलेल्या तामिळनाडूमध्ये २००९ मध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून २१ उमेदवार रिंगणात होते. २०१४ मध्ये आप सारख्या पक्षांमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जाती-धर्माच्या आधारावर मते खाऊन एखाद्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक जण निवडणूक रिंगणात उतरतात. प्रसिध्दीसाठी इच्छुक असणा-यांसाठी २५ हजार ही आता जास्त रक्कम राहिलेली नाही असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी सांगितले.

‘संदूक’मधून सुमीत राघवनचं मराठी चित्रपटांत पदार्पण 0

‘संदूक’मधून सुमीत राघवनचं मराठी चित्रपटांत पदार्पण

unnamed
मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत उमटवलेला ठसा तसेच बॅाक्स आॅफिसवर मिळवलेले घवघवीत यश त्यामुळे हिंदीतले अनेक मराठी चेहरे मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. गेली काही वर्षे हिंदीत रमलेला सुमीत राघवनही आता मराठी चित्रपटांत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘ओरँजेन एंटरटेनमेंट’चे विशू गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती असलेल्या ‘संदूक’मधून सुमीत मराठी चित्रपटांत प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार असून आजवर अनेक यशस्वी मराठी चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेला अतुल काळे याचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभणार आहे.
१९४०च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ विनोदी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवरून पदार्पण केलेला आणि नंतर हिंदीत आपला ठसा उमटवणारा सुमीत राघवन ‘संदूक’मधून प्रथमच मराठीत नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून सुमीतला शरद पोंक्षे, अरुण नलावडे यांसारख्या कसदार अभिनेत्यांची भक्कम साथ लाभणार आहे. ‘मातीच्या चुली’, ‘दे धक्का’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘तिचा बाप त्याच बाप’ आणि ‘असा मी अशी ती’ यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर ‘संदूक’मधून प्रथमच गतकाळ उभा करणारा दिग्दर्शक अतुल काळे म्हणतो, “‘संदूक’ हे माझं ब-याच वर्षांपासूनचं स्वप्न आहे. शक्य असतं तर माझा पहिला चित्रपट म्हणून ‘संदूक’च बनवणं मला आवडलं असतं. माझं हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी १२ वर्षं लागली आहेत. त्यामुळे मी अर्थातच आनंदी आहे आणि आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ या स्वप्नाला लाभणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. सुमीतशी माझी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मैत्री असून ‘संदूक’साठी अन्य कोणत्याच नावाचा विचार करणं मला अशक्य होतं.” यासंदर्भात सुमीत म्हणतो, “‘संदूक’ माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. दुसरं म्हणजे माझा बालपणापासूनचा मित्र अतुल काळे याच्या दिग्दर्शनात मला काम करायला मिळणार आहे. आणि हा खूप भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. माझ्या समविचारी सहका-यांसोबत लवकरात लवकर चित्रीकरण सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे. इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, असं मी म्हणेन.” विशू गायकवाड म्हणाले, “३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या येड्यांची जत्रा या आमच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आमची ‘ओरँजेन एंटरटेनमेंट’ ही कंपनी चांगल्या संहितेच्या शोधात होती. गेली दोन वर्षे आम्ही शोधात होतो, पण आता ‘संदूक’ ज्या प्रकारे आकाराला येतोय, ते पाहाता प्रेक्षकांना हाही चित्रपट आवडेल, याची आम्हाला खात्री आहे. ‘संदूक’मध्ये सकस आशय आहे, विनोदाचा शिडकावा आहे, अॅक्शन आहे, पण याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट १९४०च्या दशकातील आहे. ‘संदूक’ची सर्वांनाच भुरळ पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.” ‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशिष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी लिहिली असून हृषिकेश जोशी याचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी पार पाडणार असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे असेल. गुरू ठाकूरच्या गाण्यांना अजित-समीर ही संगीतकार जोडी संगीतबद्ध करणार असून वेशभूषा महेश शेर्ला यांची, तर अॅक्शन संकल्पना प्रद्युम्नकुमार यांची असणार आहे.

March 18, 2014 in मनोरंजन

अतुल कुलकर्णीची पुणे ते गोवादरम्यान ‘हॅप्पी जर्नी

 

अतुल कुलकर्णी हा परिपूर्णतेसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. प्रत्येक चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी आणि त्या भूमिकेत पूर्णपणे उतरण्यासाठी तो जीवाचे रान करतो. त्याच्या या झपाटलेपणालाही एक सूत्र आहे आणि आपल्या या कलेत सर्वोत्तम उतरवण्यासाठी आवश्यक समर्पणही आहे. ‘हॅप्पी जर्नी’ या नवीन चित्रपटातील त्याच्या नव्या भूमिकेतही हीच बाब नव्याने समोर आली आहे. ‘हॅपी जर्नी’ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून त्याचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, गोवा, वेल्हे आणि मांणगाव अशा विविध ठिकाणी केले जात आहे. या नव्या चित्रपटासाठी एक विशेष गाडी(हाऊस ऑन व्हिल्स) तयार केली गेली आहे. इमरान यांनी एका टेम्पो ट्रॅव्हलरचे रूपांतर अत्यंत कौशल्याने एका ‘काफिल्या’मध्ये केले आहे. इमरान यांनी प्रख्यात कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले आहे. अतुल कुलकर्णीला काही ही गाडी चालवता येत नव्हती. पण चित्रपटात मात्र त्याला ही गाडी मोठ्या प्रमाणावर चालवायची होती. आपल्या अभिनयात सहजता यावी आणि कोणत्याही अडचणीत गाडी चालवता यावी, यासाठी अतुलने गाडीचे प्रशिक्षण घेतले. केवळ प्रशिक्षण घेऊनच तो थांबला नाही तर ती आरामात चालवता यावी, म्हणून अतुलने पुणे ते गोव्यादरम्यान या गाडीतून अनेक फे-याही मारल्या. रस्त्यात काही ठिकाणी थांबून त्याने भरपूर सराव केला. अतुलने आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेतली. आजच्या कलाकारांमध्ये अत्यंत अभावाने आढळणारा असा हा गुण आहे. दिग्दर्शकाने या चित्रपटातील गादी चालवण्याच्या दृश्यांच्या चित्रीकरणाला गोवा येथे सुरूवात करेपर्यंत अतुल ही गाडी चालविण्यामध्ये वाकबगार झाला होता. चित्रपटाशी संबंधीत सर्वच तंत्रज्ञांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद असा धक्का होता. प्रिया बापट आणि पल्लवी सुभाष या सहकलाकारांबरोबरचे चित्रीकरण त्यामुळे अधिक सुलभ झाले. हा चित्रपट सप्टेंबर २०१४ मध्ये प्रदर्शित होत आहे.

March 18, 2014 in मनोरंजन

कारागृहातील कैद्याचा मृत्यू

यवतमाळ – येथील कारागृहामध्ये असलेल्या कैद्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी ५.३० वाजता घडली. सुनील हरिभाऊ सानप (४१) रा. टाकळी धरण असे मृतकाचे नाव आहे. प्राणघातक हल्ला प्रकरणात तो अनेक दिवसापासून फरार होता. १३ मार्च रोजी ग्रामिण पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली होती. अशातच १५ मार्च रोजी प्रकृती बिघडल्याने त्याला येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज रविवारी सकाळी ५.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.

रविशंकर यांची मोदींवर स्तुतीसुमने 0

रविशंकर यांची मोदींवर स्तुतीसुमने

download (2)
बेंगळुरू – ‘चांगली अर्थव्यवस्था आणि चांगले राजकारण यांना सांधणारा एकमेव दुवा म्हणजे चांगले प्रशासन हाच आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ते सिद्ध करून दाखवेल,’ अशी आशा राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद यांनी येथे व्यक्त केले.
‘सेंटर फॉर एंटरप्रेन्युअल एक्सलन्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज फोरम’मध्ये रविशंकर प्रसाद बोलत होते. भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.’आपण उद्योजकतेविषयी बोलता, धोरणात्मक पुढाकाराविषयी बोलता… नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्याला वाढीची चांगली संधी देण्याचे आश्वासन देतो. आपण देशातील मंदी, निराश वातावरणाविषयी बोलता पण भाजपशासित राज्यांचा विकासदर १० टक्क्यांहून अधिक असताना देशात मात्र असे वातावरण का आणि कसे आहे?’ उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करण्याची ग्वाहीही प्रसाद यांनी दिली. भारतासारख्या देशाचा पंतप्रधान लोकप्रिय नेताच असला पाहिजे. त्याने योग्य आणि ठाम निर्णय घेतले पाहिजेत.

March 17, 2014 in देश-विदेश
नागपुरात बॉम्बची निर्मिती 0

नागपुरात बॉम्बची निर्मिती

cropRunTime
नागपूर – कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘शोल्डर फायर बॉम्ब’ची निर्मिती आता नागपुरात होत आहे. तोफगोळा निर्मितीत अग्रेसर असलेल्या येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीला हे महत्त्वाचे काम मिळाले आहे. १८ मार्चच्या ऑर्डनन्स फॅक्टरी दिनानिमित्ताने ही महत्त्वाची घडामोड आहे.
लष्कराच्या तिन्ही दलांसह सर्वच सुरक्षा दलांना युद्धसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीला २१३ वर्षे जुना इतिहास आहे. आज देशात ४१ फॅक्टरी आहेत. मात्र, त्यामध्ये येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीची सर्व प्रकारच्या हार्डवेअर निर्मितीसाठी स्वतंत्र ओळख आहे.अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी ही विविध प्रकारच्या तोफगोळ्यांच्या हार्डवेअर निर्मितीसाठी ओळखली जाते. याच फॅक्टरीला आता ८४ मि.मी. तोफगोळ्यांची ऑर्डर मिळाली आहे. हे तोफगोळे खांद्यावरील रायफलद्वारे डागले जातात. यामुळेच त्याला ‘शोल्डर फायर रिकॉयलेस रायफल’ म्हणतात. ७०० ते १ हजार मीटरपर्यंत याची मारक क्षमता असते. वर्षाला असे ६० ते ८० हजार गोळे अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार होत आहेत.लष्करातील तोफखाना विभागातील सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या १०५ मीमी तोफेचे गोळेदेखील नागपुरात तयार होतात. मात्र, येथील वैज्ञानिकांनीच त्यावर अतिरिक्त संशोधन करून त्याची मारक क्षमता १७ वरुन २०.५ कि.मी.पर्यंत नेली. यामुळे या श्रेणीत असा गोळा तयार करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. ‘हाय एक्स्ल्पोसिव्ह एक्सटेन्डेड रेंज’ अर्थात ‘हीर’ नाव असलेल्या या तोफगोळ्याचे ५००-५०० चे दोन पायलट लॉट तयार असून ते लवकरच चाचणीसाठी लष्कराकडे पाठविले जात आहेत.
उद्या शस्त्र प्रदर्शन
देशातील पहिल्या ऑर्डनन्स फॅक्टरीतून १८ मार्च १८०२ ला उत्पादन सुरू झाले. त्यानिमित्ताने हा दिवस ऑर्डनन्स फॅक्टरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी ९ मार्च १९६६ ला सुरू झाली. ऑर्डनन्स फॅक्टरी दिनानिमित्त अमरावती मार्गावरील येथील फॅक्टरीत मंगळवारी, १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय अन्य कार्यक्रमदेखील आठवडाभर होत आहेत.

March 17, 2014 in महाराष्ट्र
पृथ्वीभोवती कचरा,अवकाश मोहिमांना आडकाठी 0

पृथ्वीभोवती कचरा,अवकाश मोहिमांना आडकाठी

earth day
लंडन – अवकाश मोहिमांच्या संख्येमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे, त्याचबरोबर अवकाशातील कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे अवकाशातील कचऱ्याची समस्या अत्यंत तीव्र होणार असून, त्यामुळे भविष्यात अवकाश मोहिमा आखणेच अशक्य होणार आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
युरोपीय अवकाश संस्थेच्या संशोधकांनी हा इशारा दिला आहे. ‘पृथ्वीभोवतीच्या अवकाशामध्ये सध्या वेगाने फिरत असलेल्या छोट्या तुकड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अवकाशामध्ये निर्धोक अशी छोटी जागाही उपलब्ध नाही. त्यातच अवकाशातील या कचऱ्याची निर्मिती सातत्याने होतच आहे. सध्याचा अवकाश कचरा निर्मितीचा वेग सुरूच राहिल्यास, अवकाशातील टकरींची शक्यता २५ टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या लगतच्या कक्षेमध्ये यानाचे प्रक्षेपण करणे, अशक्य होणार आहे,’ असे युरोपीय अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रामुख्याने दोन्ही धृवांवरील ८०० ते ९६५ किलोमीटरच्या कक्षेमध्ये सर्वाधिक कचरा असल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. मृत उपग्रह किंवा मोठे तुकडे पकडून ते पृथ्वीच्या वातावरणापर्यंत आणण्याची गरज आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर ते आपोआप जळून खाक होतील, असे सांगता भविष्यातील योजना कशा पद्धतीने काम करेल, हेच त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अवकाशामध्ये वेगाने फिरत असणाऱ्या एखाद्या शेंगदाण्याच्या आकाराचा तुकडाही हातबॉम्बच्या स्फोटापेक्षा जास्त हानी करू शकतो. त्यातच, कॉफीच्या कपाचा आकार असणारे सुमारे १७ हजारांपेक्षा जास्त तुकडे सध्या दिसून आले आहेत. या तुकड्यांना एकत्र करत नष्ट करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने मृत उपग्रहांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी पाच ते दहा उपग्रह नष्ट केले, तरी या कचऱ्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले.

खा. आनंदराव अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार

अमरावती – अमरावती लोकसभा मतदार संघाचे विद्यामान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात एका महिला उमेदवाराने विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिली. एका वृत्तवाहिनीने रविवारी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
सर्वांसमोर विनयभंग कसा – खा. अडसूळ
वृत्तवाहिनीचा कार्यक्रम हा जाहीरपणे सुरु असताना अनेक नागरिक तेथे उपस्थित होते. सर्वांसमोर विनयभंग कसा शक्य आहे असा सवालही खा. अडसूळ यांनी उपस्थित केला. पोलिसांनी कार्यक्रमाची चित्रफीत जप्त केल्यास खरे काय ते स्पष्ट होईल् असेही ते म्हणाले.

March 17, 2014 in महाराष्ट्र
केजरीवाल काँग्रेसचे एजंट- रामदेवबाबा 0

केजरीवाल काँग्रेसचे एजंट- रामदेवबाबा

Kejriwal_sl_23_10_2010
नागपूर- आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल म्हणजे केजरी’बवाल’ असल्याची कोटी करून, ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी केला.योग महोत्सवानिमित्त रविवारी नागपुरात आलेल्या रामदेवबाबांनी ‘मिनी रोड शो’द्वारे ‘डोअर टू डोअर’ फिरून सत्ता परिवर्तनाचे नागरिकांना आवाहन केले.
भ्रष्टाचार रोखणे, गोरक्षा आदीशी संबंधित ९ मुद्दे बाबांनी उपस्थित केले आहेत. त्यावर भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांनी पहिली स्वाक्षरी केली.केजरीवाल यांचे संकल्प अंमलात येण्यापूर्वीच संपुष्टात आले व ते केजरी’बवाल’ झाले. सर्वसामान्यांच्या आशेवर त्यांनी पाणी फेरले. त्यांच्या कथनी आणि करणीत बरेच अंतर आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केल्यानंतरही सर्वाधिक भ्रष्ट काँग्रेसची साथ ते देत आहेत. पंजाविना झाडू चालू शकत नाही, हे त्यांनी सिद्ध केले, अशी टीका त्यांनी पत्र​परिषदेत केली.अरविंद केजरीवाल बोफोर्स, टू जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आदर्श, ऑगस्टा वेस्ट लँड आदी घोटाळ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. रॉबर्ट वड्रा, ए. राजा, कनिमोझी यांना ते विसरले. त्यांचा एकमेव निशाणा म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, असे सांगून रामदेवबाबांनी मोदी यांच्यासह भाजपची जोरदार वकिली केली.अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधले असता, ‘गिधड की जब मौत आती है तो वह गाँव की तरफ भागता है’ असे सांगून बाबा म्हणाले, ‘काँग्रेसच्या स्पीड ब्रेकर, एजन्टच्या रूपात केजरीवाल यांना समोर केले आहे.

March 17, 2014 in महाराष्ट्र
देशात रंगपंचमीचा उत्साह 0

देशात रंगपंचमीचा उत्साह

download
मुंबई – होळी रे होळी पुरणाची पोळी..’ होळी हा सण मुंबईसह देशभरात रंगपंचमीची मोठी धामधूम सुरु आहे. संपूर्ण देशभरात रंगपंचमीचे रंगमय वातावरण पसरले आहे. रुसवे फुगवे विसरुन एकमेकांवर रंगांची उधळण केली जात आहे.
लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत नेते लोकही या धुळवडीत सामील झाले आहेत. त्याचबरोबर मराठी कलाकार, बॉलीवूडचे कलाकारही रंगांच्या या खेळात धुंद होऊन मोठ्या उस्साहात नाच, गाणी करत हा सण साजरा करत आहेत.दिल्लीतही राजकीय नेत्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनीही कार्य़कर्त्यांसोबत होळी साजरी केली. पर्यावरणास हानीकारक ठरणार नाही असे नैसर्गिक रंग वापरुन ब-याच ठिकाणी धुळवड साजरी केली जात आहे. त्याचप्रमाणे काहींनी तर यावेळी गारपिटग्रस्तांना मदतनिधी देण्याचाही निर्धार केला आहे.रंगपंचमीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीचा खर्च ३० हजार कोटी? 0

आगामी लोकसभा निवडणूकीचा खर्च ३० हजार कोटी?

download (1)
नवी दिल्ली – यावर्षीची निवडणूक ही भारतीय इतिहासातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सुमारे ३० हजार कोटीहूनही अधिक खर्च होण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे. संस्थेने केलेल्या अभ्यासानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये राजकीय पक्ष, सरकार आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणा-या खर्चाचा समावेश आहे.
‘सेंटर फॉर मिडीया स्टडीजने’ केलेल्या सर्वेक्षणात करोडपती उमेदवार, कॉर्पोरेट जगत आणि कंत्राटदारांकडून निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाईल असे आढळले आहे. आगामी निवडणुकीसाठी ३० हजार कोटींच्या खर्चापैकी सात ते आठ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी होईल. यापैकी साडेतीन हजार कोटी रुपये निवडणूक आयोगाकडून खर्च केली जाईल. यात नेमका किती खर्च होईल हे मतदान सुरु झाल्यानंतरच स्पष्ट होईल.यावर्षीच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात निवडणूक आयोगाने वाढ करुन ७० लाख इतकी ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून चार हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. १९९६च्या निवडणूकीत दोन हजार ५०० कोटी रुपये इतका खर्च झाला होता. तर २००४ मध्ये हाच खर्च १० हजार कोटींपर्यंत पोहोचला.

राष्ट्रीय स्तरावर ‘आप’चा प्रभाव नाही 0

राष्ट्रीय स्तरावर ‘आप’चा प्रभाव नाही

images
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा फारसा प्रभाव पडणार नाही असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने मोठे यश मिळवले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर ‘आप’ने सरकार स्थापन केले होते. मात्र त्यांना त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर जी आश्वासने त्यांनी दिली होती, ती त्यांना पूर्ण करता आली नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सरकार स्थापन करणे ही वेगळी जबाबदारी आहे आणि दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीत सत्तेत असताना ‘आप’ने काहीच काम केले नसल्याची टीका त्यांनी केली.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा फारसा प्रभाव पडणार नाही.

March 17, 2014 in देश-विदेश
लोकसभा निवडणुक उमेदवाराची मालमत्ता केवळ ७५० रुपये 0

लोकसभा निवडणुक उमेदवाराची मालमत्ता केवळ ७५० रुपये

images1

तिरुवनंतपूरम- लोकसभेवर निवडूण येणा-या करोडपती खासदारांची संख्या दिवसेदिवस वाढत असतानाच केवळ ७५० रुपयांची मालमत्ता असलेला एका व्यक्तीने लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
केरळमध्ये दहा एप्रिल रोजी होणा-या मतदानासाठी सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया(कम्युनिस्ट) पक्षाच्या या उमेदवाराने केरळमधील कोट्टायम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिजू असे या उमेदवाराचे नाव आहे. बिजूने उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रोख रक्कम केवळ ५०० रुपये तर एका सहकारी बॅकेत असलेल्या खात्यात २५० रुपये असल्याचे म्हटले आहे.४६ वर्षीय बिजू यांच्याकडे घर, गाडी अथवा दागदागिने असी कोणतीही मालमत्ता नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.एसयुसीआयच्या आणखी एका उमेदवार शाजार खान यांची मालमत्ता केवळ एक हजार ५०० रुपये आहे. खान यांनी तिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एक मोटरसायकल आणि बँक खात्यातील रक्कमेसह २६ हजार ८०० रुपयांची मालमतात आहे. खान यांच्याकडे दागिने अथवा अन्य कोणतीही मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.केरळमधील लोकसभेच्या २०जागांसाठी दहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

March 17, 2014 in देश-विदेश
गुगलचे होळीसाठी रंगीबेरंगी डूडल 0

गुगलचे होळीसाठी रंगीबेरंगी डूडल

google-doodle
मुंबई – विविध रंगाची उधळण केला जाणारा होळी हा सण फक्त भारतातच नाही तर परदेशातही ठिकठिकाणी साजरा केला जातो. मग गुगलही याला अपवाद कसे काय ठरु शकेल?
होळीच्या निमित्ताने गुगलच्या होमपेजवर खास रंगीत डूडल बनवण्यात आले आहे. डूडलमध्ये रंगाची उधळण करणारी पिचकारी दाखवण्यात आली आहे. याआधी गुगलने २००१ मध्ये होळीसाठी विशेष डूडल तयार केले होते. त्यानंतर २०१० आणि २०११ मध्ये गुगलने रंगीबेरंगी डू़डल तयार केले होते.याआधीही गुगलने जागतिक महिलादिनी गुगलकडून खास डूडल तयार करण्यात आले होते. यामध्ये विविध देशातील महिलांच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ तयार केला होता.

नायजेरियातील हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू 0

नायजेरियातील हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू

terrorist-360x251
कदुना – नायजेरियात बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन गावांतील १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ४०हूनही अधिक अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी उग्वार संकवाई, उग्वाम गता आणि छेनशी या गावातील लोकांवर गोळीबार केला. यामध्ये १००हून अधिक मृत्यूमुखी पडले तर काही जणांची घरेही जाळून टाकण्यात आली.नायजेरियातील हल्ला झालेल्या या गावांमध्ये जमिनीच्या मुद्द्यावरुन सतत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. मात्र शुक्रवारी आणि शनिवारी झालेला हल्ला हा फार मोठा होता. या हल्ल्यातील जखमींची संख्याही मोठी आहे.

March 17, 2014 in देश-विदेश