
यवतमाळ – शेतात वीज जोडणी करण्यासाठी खरेदी केलेले साहित्य जप्त करून कार्यवाही टाळण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाºया राळेगाव वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक केली.
अशोक वामन खोब्रागडे असे लाच मागणाºया कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. मंगेश श्रीधर एंबडवार (३४) रा. अंतरगाव ता. राळेगाव याने दोन वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदली होती. शेतामध्ये ओलीत करावयाचे असल्याने लाईनची व्यवस्था करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी एमएसईबी कार्यालय राळेगाव येथे अर्ज केला होता. परंतु अद्यापही शेतात लाईनची व्यवस्था केली नाही. त्यामुळे त्यांनी शेतात १ इलेक्ट्रिकवर चालणारी मोटार व इलेक्ट्रिक जोडण्यासाठी लागणारे केबल व साहित्य आणून शेतात ठेवले होते. त्यानंतरही सदर शेतकºयाने वीज जोडणी लवकरच देण्याची विनंती केली होती. एमएसईबीचे कनिष्ठ अभियंता अशोक खोब्रागडे, लाईनमन पुरुषोत्तम कुमरे याने शेतातून साहित्य जप्त करून चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी २० हजार लाचेची मागणी केली. एंबडवार यांनी ९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून या विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, खोब्रागडे, कुमरे या दोघांनी १५ हजार लाचेची मागणी केली होती. त्यावरून आज २४ मार्च रोजी खोब्रागडे यांना अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, किरण खेडकर यांनी केली.
Archive for March, 2014
0
लाचेची मागणी,वीज अभियंत्यास अटक
0
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

*सहा लोकसभा निवडणूकांचा समावेश * महत्वाचे दूरध्वनी व उपयुक्त माहिती
यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गेल्या सहा लोकसभा निवडणूकांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारींचा समावेश असलेली पूर्वपीठिका जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह परिविक्षाधीन आयएएस अधिकारी राधाविनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे,
जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसिलदार राजेंद्र अडपावार आदी उपस्थित होते.सदर पूर्वपीठिकेत सन 1991 पासून झालेल्या सहा लोकसभा निवडणूकींची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यात मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतदानाचा समावेश आहे. यासह होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानेही उपयुक्त अशी माहिती आहे. विशेष म्हणजे पुर्वी स्वतंत्र असलेल्या यवतमाळ व वाशिम या लोकसभा मतदारसंघाची स्वतंत्र माहिती देण्यात आली आहे. सद्या असलेली मतदारांची संख्या, निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी काय करावे, काय करू नये याबाबत उपयुक्त मार्गदर्शिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी, निवडणूक आयोग नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई, मिडीया सेंटर आदींचे महत्वपूर्ण दुरध्वनी क्रमांकही पूर्वपीठिकेत देण्यात आले आहे. सदर पूर्वपीठिका मागील लोकसभा निवडणूकांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी, निवडणूक विश्लेषक, निवडणूकीसंर्भात माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
0
विदर्भाला सर्मथन द्या, अन्यथा ‘नोटा’ चा वापर ; विदर्भ कनेक्टचा उमेदवारांना इशारा

नागपूर : राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा न दिल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी नकाराधिकाराचा अधिकार असलेल्या ‘नोटा’ (None of the above) या प्रभावी पर्यायाचा विचार करण्यात येईल, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी चळवळीने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी व त्यांच्या राजकीय पक्षांनी येत्या २६ मार्चपर्यंत विदर्भाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा ‘विदर्भ कनेक्ट’शी जुळलेल्या सर्व विदर्भवादी संघटना एकत्रित येऊन संपूर्ण १0 लोकसभा मतदार संघात ‘नोटा’ चा प्रचार आणि प्रसार करतील, असा इशारा ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अँड. मुकेश सर्मथ यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिला. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी कुणालाही मतदान करायचे नसल्यास मतदाराला यावेळी प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने ‘नोटा’ (यापैकी कोणताही नाही) हे बटन दाबण्याचा अधिकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज अधिक बुलंद करण्याच्या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ या चळवळीने ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. अँड. सर्मथ यांनी यावेळी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परंतु निवडणुकीच्या वेळेस या राजकीय पक्षांना त्याचा विसर पडतो. अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत विदर्भातील मतदारांची होत असलेली फसवणूक यापुढे ही जनता सहन करणार नाही, म्हणूनच आम्ही लोकशाहीतील या परिणामकारक आयुधाचा वापर करायचे ठरवले आहे आणि तसे जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत. या मोहिमेंतर्गत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनात शपथपत्र लिहून घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे उमेदवारांनी किंवा त्यांच्या राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यास मतदारांनी मतदान यंत्रातील ‘नोटा’चे बटन दाबावे असे आवाहनही या पत्रपरिषदेत करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘जनमंच’ या स्वयंसेवी संस्थेने अलीकडेच नागपुरात घेतलेल्या जनमत चाचणीत ५ लाख ४७ हजार लोकांनी विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला. तसेच अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतही बहुतांश नागरिकांनी सर्मथनार्थ कौल दिला. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणा राज्याची निर्मिती केली. परंतु विदर्भाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे हेतुपुरस्सर टाळत आहे. विदर्भातील जनतेचा कौल लक्षात घेता, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भ राज्य व्हायला हवे, या हेतूने ‘विदर्भ कनेक्ट’ ही लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. या चळवळीत जुळलेल्या नागरिकांचा कुठलाही राजकीय स्वार्थ किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रपरिषदेला वेळी विदर्भ कनेक्टचे सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विष्णू मनोहर, कोषाध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, कार्यकारिणी सदस्य अँड. स्मिता सरोदे-सिंगलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0
लतादिदी नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये – मेधा पाटकर

औरंगाबाद – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर सर्वजण प्रेम करतात. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये, अशी अपेक्षा आम आदमी पार्टीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केली. गुजरातचा विकास झाला, हे फसवे चित्र आहे. दंगलीसह अन्य वास्तव वेगळेच आहे, ते त्यांनी पाहावे. लतादिदिविषयी असलेल्या प्रेमापोटीच ही अपेक्षा करत असल्याचेही पाटकरांनी नमूद केले. दरम्यान, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे; तसेच काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांच्या शेतजमिनी झालर क्षेत्र आरक्षणातून कशा वगळल्या गेल्या, असा सवालही त्यांनी केला.
सन्मित्र कॉलनी येथे आम आदमी पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष लोमटे, जालन्याचे उमेदवार दिलीप म्हस्के, अण्णासाहेब खंदारे, मनिषा चौधरी, अजमल खान आदी उपस्थित होते. गारपिटीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणी सापडला असून, आत्महत्या होत आहेत. त्यांच्यात मोठा आक्रोश असतानाच प्रस्थापित राजकीय पक्षाचे नेते जाहीर सभावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. संवेदनाशून्य राजकारण होत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली. भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या १७ वर्षांत अदानी यांना कोट्यवधी रुपये मिळवून देण्यासाठी मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये, अशी अपेक्षाही पाटकरांनी व्यक्त केली. साखर कारखाने विक्रीत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले, परंतु हे प्रकरण विरोधकांनी लावून धरले नाही, असा आरोपही केला. चुनवा नही चुनौती है, असा नारा त्यांनी देत कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर करणाऱ्या बरोबरच जनतेच्या गाठीभेटीवरच अधिक भर द्यावा, आंदोलनाचे राजकारण करावे, असे आवाहन केले. या सभेत आपने ४४६२ रुपयांचा निधी गोळा करण्यात आला.
0
हितेश भगतचा कोल्हापूरात मृत्यू

कोल्हापूर – मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला त्याचा मुलगा हितेश भगत याचा कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही. १३ जून २००८ रोजी अलिबाग येथून परत येत असताना सुरेश भगतच्या स्कॉर्पिओला संशयास्पद अपघात झाला होता. त्यात तो जागीच ठार झाला होता. त्याचा मृत्यू हा अंडरवर्ल्ड विश्वात चर्चेचा विषय ठरला होता. सुरेश भगतची मालमत्ता आणि मटक्याचा व्यवसाय ताब्यात घेण्यासाठीच त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. याप्रकरणात पत्नी जया भगत, मुलगा हितेश भगत या दोघांसह सहा जणांना दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
0
दोन गतिमंद विद्यार्थिनींवर बलात्कार

मुंबई- मानखुर्द येथील दोन गतिमंद विद्यार्थिनींवर शाळेतील शिपायानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी शिपायाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गतिमंद विद्यार्थिनींच्या समुपदेशनादरम्यान हा प्रकार उजेडात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी दिली.
गतिमंद विद्यार्थिनींवर शिपायाकडून बलात्कार
राजेश दत्तात्रय तरे (३८) असे अटक आरोपीचे नाव असून, तो ट्रॉम्बे येथील परमेश्वर मंदिराजवळील केणी निवास येथील रहिवासी आहे. तो तेथीलच एका गतिमंद मुलांच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला आहे. गतिमंद विद्यार्थ्यांची शाळा व वसतिगृह ट्रॉम्बे परिसरातच आहे. १६ व १८ वयोगटांतील दोन गतिमंद मुलींवर त्याने बलात्कार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी आणखी काही मुलींसोबतही त्याने असा प्रकार केला आहे का, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. आरोपी तरे याने एका विद्यार्थिनीवर चार महिन्यांपूर्वी शाळेतील शौचालयात बलात्कार केला होता. तर दुस-या मुलीशीही त्याने शौचालयातच अश्लील चाळे करून अनैसर्गिक कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’च्या ‘चुनौती’ या प्रकल्पांतर्गत गतिमंद मुलींचे समुपदेशन करण्यात आले. त्यात विनिता खेडकर व जिलेल लॉरेन्स या दोन समुपदेशकांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बलात्काराच्या दोन्ही घटना उजेडात आल्या. त्यानंतर या दोन्ही समुपदेशकांनी याबाबत शाळेच्या प्रभारी माधुरी रामेकर यांना सांगितले. त्यांनी शुक्रवारी रात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिपाई तरे याला अटक केली.
0
डहाणू टँकर अपघातातील मृतांचा आकडा १०

डहाणू- डहाणूतील चारोटी नाक्यावर झालेल्या टँकर अपघातातील मृतांचा आकडा १० वर पोहचला आहे. गुजरातकडून मुंबईकडे निघालेला रिलायन्स कंपनीचा पेट्रोल टँकरचालकाचा ताबा सुटून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाक्यावर पलटी झाला. टॅँकर पलटी झाल्यानंतर जोरदार स्फोट झाला. यात टँकरचालकासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे ग्रमिण रुग्णालयात दाखल केलेले अंजली बोभा (१४) आणि सुनिल उंबरसडा (३०) अशी त्यांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्यापही १३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले ठाणे ग्रामिणचे पोलिस हवालदार भुषण शंके (३३) यांनी प्रसंगावधान राखून अनेकांचे जीव वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0
इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या फरार आरोपीसह इंडियन मुजाहिदीनच्या चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव वकास असल्याचे विशेष पोलिस पथकाचे आयुक्त एस. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले.
पाकिस्तानचा फरार आरोपी वकास याचा मुंबईतील झवेरी बाजारमधील १२ जुलै २०११ मध्ये झालेल्या बाँबस्फोटासह अनेक बाँबस्फोट प्रकरणात हात आहे. राजस्थानच्या जोधपूर भागात ते पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवण्याचा त्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.वकास हा पाकिस्तानी दहशतवादी सप्टेंबर २०१० मध्ये असदुल्ला अख्तर उर्फ हद्दी याच्यासह भारतामध्ये पहिल्यांदा आला होता. हद्दीला इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ याच्यासह अटक केली होती. वकास हा स्फोट घडवून आणण्यात तरबेज आहे. जामा मशीद (सप्टेंबर २०१०), वाराणसी (डिसेंबर २०१०), मुंबई (जुलै २०११), पुणे (ऑगस्ट २०१२) व हैदराबाद (फेब्रुवारी २०१३) येथे झालेले बाँबस्फोट वकास यानेच घडवून आणल्याचा दाट संशय आहे.
0
जसवंत सिंग अपक्ष निवडणूक लढणार

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी बारमेरमधून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी अखेर बंडाचा झेंडा उभारला असून सोमवारी ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: जसवंत सिंग यांनीच ही घोषणा रविवारी केली.
मात्र अजूनही सिंह यांचं तळ्यात- मळ्यात सुरु आहे. आपण आपल्या सहका-यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पक्षाने दखल घेतली नाही तर सोमवारी अर्ज भरणार असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या भाजप या पक्षात बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप जसवंत सिंग यांनी केला आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेत देत त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.बारमेरमधून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असताना आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम चौधरींना पक्षाने उमेदवारी दिली. आपल्या बाबतीत पक्षाने दुसर्यांदा असे केले असल्याचे जसवंतसिंग म्हणाले. पक्षाने दोनदा दगाफटका केल्याने आता तडजोडीची कुठलीच शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
महिलांनी पोलिसाला बदडले
जळगाव – वॉरन्ट बजावण्याचा बहाणा करीत ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी गेलेला पोलिस कर्मचारी दुसऱ्याच महिलेच्या घरात शिरला आणि त्याच्या असभ्य वर्तणुकीमुळे बिल्डींगमध्ये गुरुवारी रात्री एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे बिल्डींगमधील संतापलेल्या महिलांनी संबंधित पोलिसांला बेदम चोप दिला. अखेर बचावासाठी त्या पोलिसाला महिलांसमोर सपशेल शरणागतीच पत्करावी लागली.
सूरज पाटील असे पोलिसाचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकात कार्यरत आहे. तो गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शिरसोली नाक्यावरील एका अर्पाटमेंन्टमध्ये वॉरन्ट बजावण्यासाठी गेला. वॉरन्ट हे फक्त निमित्त होते. मात्र, त्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या व शहरात प्रसिध्द असलेल्या एका महिलेला भेटण्याच्या उद्देशाने तो याच भागात एकासारख्या दिसणाऱ्या रुबी अपार्टमेंटमधील दुसऱ्याच फ्लॅटमध्ये घुसला. त्या फ्लॅटमधील महिलेला सूरजने अश्लील भाषेत शिवीगाळही केली. संबंधित महिलेचा पती घरात असतांना सूरज थेट किचनमध्ये गेला. तेथे त्याने महिलेसोबत अश्लिल चाळे केले. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली आणि लगेच जमाव जमा झाला. जमावाला पाहून भांबावलेल्या सूरजने समन्सचा बहाणा केला. तसेच बोंब कराल तर मी आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. या प्रकाराने संतप्त महिलांनी सूरजला चोप दिला आणि त्याला घरात कोंडूनही ठेवले.
0
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी २९ उमेदवारांचे ४३ अर्ज

यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज शनिवारी २९ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसाअखेर उमेदवारी दाखल करणाºयांची संख्या ४४ इतकी झाली असून या उमेदवारांनी एकून ७२ अर्ज दाखल केले आहे.
आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये ना अॅड.शिवाजीराव शिवरामजी मोघे (इंडीयन नॅशनल कॉंगेस-४), खा भावना पुंडलीकराव गवळी (शिवसेना-४), माजी सहकार आयुक्त बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), माजी पोलीस महानिरीक्षक मोहन मल्लु राठोड (भारीप बहुजन महासंघ-१), अॅड. नरेश फुलसिंग राठोड (आम आदमी पार्टी-३), प्रशांत पंढरीनाथ सुर्वे (अपक्ष-१), रामकृष्ण पुंडलीकराव सावके(भारतीय कम्युनिष्ट पक्ष-१), दिनेश फुलसिंग राठोड (अपक्ष-१), नरेश महादेवराव गुघाने (अपक्ष-१), राजानंद श्रावणजी गणवीर (अपक्ष-१), विनोद नारायण चव्हाण (अपक्ष-१), हेमेंद्र राजेश्वर ठाकरे (अपक्ष-१), रामराव सवाई पवार (अपक्ष-१), उत्तम भगाजी कांबळे (प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी-३), अबरार अहेमद मेहबुब खान (वेलफेअर पार्टी आॅफ इंडीया-१), शेख मेबबुब शेख छोटू (बहुजन समाज पार्टी-१), शामकुमार बापुराव लोखंडे (अपक्ष-१), राजु उर्फ भरतराजे उध्दवराव पाटील (मनसे-१), इंदुवर काशिराम राठोड (बहुजन मुक्ती पार्टी-१), गोविंद देवाजी चव्हाण (अपक्ष-१), अहेमद परवेज इकबाल (समाजवादी पार्टी-२), रघुनाथ शंकरराव शेळके (आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी-१), अशोक शंकरराव शेंडे(अपक्ष-२), सुधाकर नामदेव घायवान (रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया-१), बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), राजेंद्र विठ्ठल गायकवाड (लोकशासन-१), प्रकाश चिमणाजी धोत्रे (अपक्ष-१), ज्ञानेश्वर शंकरराव राठोड, सुरजुसे सुरेश श्रावणजी (अपक्ष-१), पुरूषोत्तम डोमाजी भजगवरे (राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस पार्टी-१) यांचा समावेश आहे. शुक्रवार २१ मार्च पर्यंत सुरेश राजाराम मुखमाले, बंडू गणपत मेश्राम, उपेंद्र बाबाराव पाटील , इंदूवर काशीराम राठोड , प्रकाश रघुनाथ राऊत, महादेव हरीभाऊ ताटके, जांबुवंतराव बापुराव धोटे , उल्हास वसरामजी जाधव, प्रशांत पंढरीनाथ सुर्वे, पवार रमेश गोरसिंग, मनिष रामकृष्ण ढाले, मुधकर रंगलाल पवार, रमेश विठोबा गुरनुले , शेख जब्बार शेख युनुस, ज्ञानेश्वर तुकाराम मेश्राम, युनुस शेख अ.गनी, संदीप अनंतराव देवकते यांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत ४४ उमेदवारांनी ७२ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज १४ उमेदवारांनी ४४ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण १३१ उमेदवारांनी ३४६ अर्ज नेले आहे.
0
सोनिया गांधी यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

अमेरिकी कोर्टाचा झटका
वृत्तसंस्था, जालंधर – शीखविरोधी दंगलीच्या वेळी सोनिया गांधी अमेरिकेत होत्या. या केसप्रकरणी अमेरिकेतील एका कोर्टाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधा यांना आपल्या पासपोर्टची एक प्रत सात एप्रिलपर्यंत कोर्टात जमा करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
शीख फॉर जस्टीस (एसएफजे) या संघटनेने सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही सोनिया गांधी यांना सप्टेंबर २०१३ मध्ये समन्स बजावण्यात आले होते. दंगल झाली तेव्हा सोनिया या न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन-केटरिंग कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होत्या, असा दावा एसएफजे संघटनेने केला आहे. यावर सोनिया यांनी, आपण २ ते ९ सप्टेंबर २०१३ काळात अमेरिकेत नव्हतो, असे कोर्टाला सांगितले; तर, कोर्टाने गांधी यांना समन्स बजावले तेव्हा त्या अमेरिकेतच होत्या, असा दावा या संघटनेने केला आहे. सोनिया यांनी त्या या वेळी अमेरिकेत नसल्याचे आवश्यकक पुरावे कोर्टाला दिलेले अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टाने सोनिया यांना सांगितलेले एवढे कारण पुरेसे ठरत नसल्याचे सांगून, त्यांनी आपल्या पासपोर्टची कॉपी जमा करण्यास सांगितले आहे.गांधी यांनी त्यांच्या पासपोर्टची प्रत दिलेल्या मुदतीत जमा न केल्यास त्यांच्याविरुद्ध शीखविरोधी दंगलीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्यांना संरक्षण देत असल्याच्या आरोपाखाली खटला चालविण्याची मागणी केली जाईल, असे या संघटनेचे कायदे सल्लागार गुर्पतवंत सिंग यांनी सांगितले.
0
माणसाला येतात १ हजार अब्ज वास, संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली – छोट्याशा गोष्टीचा वास येणाऱ्याला त्याचे नाक किती खूर आहे, असे नेहमी बोलले जाते. मात्र, प्रत्येक माणसाचेच नाक खूर असते आणि जवळपास एक हजार अब्ज प्रकारचे वास आपल्याला जाणवू शकतात, असे एका संशोधनामध्ये समोर आले आहे. आतापर्यंत आपल्याला १० हजार प्रकारचेच वास जाणवतात, असा अंदाज होता. मात्र, ही क्षमता किती तरी पटीने अधिक असल्याचे या संशोधनामध्ये समोर आले आहे.
‘हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट’च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामधून हा निष्कर्ष समोर आला आहे. या संशोधनातील निष्कर्ष ‘सायन्स’ या नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. या पूर्वी १९२०च्या दशकामध्ये संशोधन करण्यात आले होते आणि त्यानुसार माणसाची वास घेण्याची क्षमता दहा हजार वासांपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यासाठी कोणताही पुरावा किंवा आकडेवारी नव्हती. डोळ्यांमध्ये प्रकाश स्वीकारणाऱ्या तीन यंत्रणा एकत्रित काम करतात, त्यामुळे आपण एक कोटी प्रकारच्या रंगांमधील फरक समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या नाकामध्ये वास स्वीकारू शकणाऱ्या ४०० यंत्रणा असतात, त्यामुळे ही क्षमता किती तरी अधिक असण्याचा अंदाज होता, असे लेस्ली वॉसहॉल यांनी सांगितले. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या १२८ वासांची मिश्रणांमधून फरक ओळखण्याचे आव्हान काही स्वयंसेवकांना देण्यात आले होते. त्यांपैकी प्रत्येकांना या वासांची २६४ मिश्रणे ओळखण्यास सांगण्यात आले होते.
0
केजरीवालांच्या रोड शोला नागरिकांकडून काळे झेंडे

फरिदाबाद – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या फरिदाबादमधील रोडशो दरम्यान तेथील स्थानिक नागरिकांनी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला.
शनिवारी सकाळी केजरीवाल आणि त्यांचे समर्थक फरिदाबादला पोहोचल्यानंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी केजरीवालांना काळे झेंडे दाखवले तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. काळे झेंडे दाखवणे हा प्रकार आपल्या देशात काही नवीन नाही. विरुद्ध पक्षाकडून असे नेहमीच केले जाते. केजरीवाल हे असे नेते आहेत जे चांगल्या प्रकारे सरकार चालवू शकतात असे आपच्या एका समर्थकाने यावेळी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल फरिदाबादम आणि गुडगावमध्ये रोड शो करणार आहेत. रविवारी योगेंद्र यादव यांना उमेदवारी देण्यात आलेल्या गुडगावमध्ये केजरीवाल यांचा रोड शो होणार आहे.
0
संजय दत्त पुन्हा तुरुंगात

मुंबई – पॅरोलची मुदत संपल्याने अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा येरवडा तुरुंगात दाखल झाला आहे. पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला पॅरोल देण्यात आली होती. तब्बल दोनवेळा पॅरोलची मुदत वाढवल्याने जोरदार टीकाही झाली होती. मुंबई १९९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला सगल तीन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. संजय दत्त २१ डिसेंबर २०१३पासून पॅरोलवर तुंरुगाबाहेर आहे.दरम्यान, तुरुंगात जाताना मुंबईतील घराबाहेर आणि येरवडा तुरुंगाबाहेर निदर्शने करण्यात आली.
0
धावत्या लोकलमध्ये महिलेची हत्या

मुंबई – विरार – चर्चगेटदरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये शनिवारी एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
पन्ना अंधेर असे या महिलेचे नाव आहे. वसई पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. लोकल विरारहून चर्चगेटच्या दिशेने जात असताना वसई स्थानकादरम्यान मालडब्यातील भाजी विक्रेत्या पन्ना यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. यानंतर हल्लेखोराने ताबडतोब तेथून पोबारा केला.हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पन्ना यांना तात्काळ वसई येथील रवी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घडलेल्या प्रकारामुळ लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
टँकर स्फोट, सात ठार

मुंबई – अहमदाबाद मार्गावरील डहाणू – चारोटी नाक्याजवळ शनिवारी दुपारी टँकर उलटल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.केमिकल घेऊन जाणारा हा टँकर डहाणू-चारोटी नाक्याजवळ अचानक उलटला आणि त्याने पेट घेतला. आग लागल्याने खबरदारी म्हणून दोन्ही मार्गांवरची वाहतूक १०० मीटर अंतरावर थांबवण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगतची दुकानेही बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
सांस्कृतिक नेतेगिरी
काल तू म्हणालास ,
जात म्हणजे थुकायचं डबडं
धर्म म्हणजे हाडीताप
लोकशाही , शेळीचं शेपूट
विद्रोह , ठिणग्यांचं मोहोळ
बांधिलकी , सुसंस्कृत कपडेलत्ते
अस्मिता , हाडामांसाचं बहरलेलं झाड
आणखी न समजणारं बरंच बोललास .
आम्ही जामखुश ,
आम्हास तू प्यार झालास ,
आज गेलास तू
प्रस्थापित कॉलनीतच राहायला
जातीपेक्षा प्रवृत्ती महत्वाची
धर्मातील विसंगती टाळू शकतो
विद्रोह म्हणजे भडक स्टेटमेंट
बांधिलकी , नर्मदेचा गोटा
अस्मिता , बिनपाऱ्याचा आरसा
संयम , विनय , मनस्वी , तामसी वगैरे
शब्द लागलास बरळायला
तू बदलल्याचा प्रश्न आहेच !
त्याहून दिशेचा मोठा प्रश्न आहे
विष आणि विषत्व वेगळं नसतं रे !
आम्ही तुझ्याशी नातं तोडीत आहोत
तू आमचा होतास , हे ही
विसरून जात आहोत
आमची रेशनकार्डे आम्ही
वेगळी करीत आहोत ….
अरुण काळे
आज पन्नास वर्षांनी …
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले .
ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भर्त्सना
सहन केलीस
तरीही तू पुढेच चाललास
पाठीमागे उधाणलेला समुद्र .
तुझ्या आवाजात आवाज मिळविणाऱ्या बेफाम लाटा
तुला झेलणाऱ्या कुरवाळणाऱ्या ‘
अशाही लाटा आल्या : तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या
पण तू तर त्यांनाच गिळलस.
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
यु झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत .
तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्या गुलामांच्या पायातल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.
तुझे शब्दच असे की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात
तुझा संघर्षच असा की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
ओरबाडलास भूतकाळ , शिलगावलीस मने
मुक्त केलीस हिसकावलेली शस्त्र अन पुकारलेस युद्ध
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश : डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा
ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी : तेही थंड झालंय
आणि तू , तू पेटवतोयस मला
आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे .
ज. वि .पवार
0
काँग्रेसची २६ उमेदवारांची यादी जाहीर ; सामाजिक न्यायमंत्री मोघे यांना यवतमाळ-वाशीमची उमेदवारी

नवी दिल्ली – केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांच्या पाचव्या यादीत माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना निवडणूक रिंगणात उतरविले. राज्यामध्ये यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी जाहीर केलेल्या २६ उमेदवारांच्या यादीत पश्चिम बंगालचे २१, बिहार आणि पंजाबचे प्रत्येकी दोन तर महाराष्ट्राच्या एका उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे.
यवतमाळ-वाशीममधून शिवाजीराव मोघे यांच्या उमेदवारीची घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांची दावेदारी नाकारण्यात आली आहे. राज्यातील नांदेड आणि औरंगाबाद या दोन मतदारसंघांतील उमेदवारांची नावे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. काँग्रेसने वाराणशी मतदारसंघातही नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.
जेटलींविरुद्ध अमरिंदर सिंग मैदानात
पंजाबच्या अमृतसरमधून भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याविरोधात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा केला आहे. आनंदपूर साहिब मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांना रवनीतसिंग बिट्टू यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. सोनी राज्यसभेच्या सदस्य आहेत. पश्चिम बंगालमधून मानस भुरिया आणि अब्दुल मन्नन या अनुभवी नेत्यांना मैदानात उतरविताना काँग्रेसने जाधवपूर मतदारसंघातून प्रसिद्ध चित्रकार समीर एैच यांना उमेदवारी दिली आहे. बिहारमध्ये जदयुमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले खासदार पूरनमासी राम यांचा मतदारसंघ बदलण्यात आला असून, त्यांना वाल्मिकी नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याजागी गोपालगंज मतदारसंघातून ज्योती यांना तिकीट देण्यात आले आहे.









