पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

आसारामबापू प्रकरणातील साक्षीदारावर अ‍ॅसिड हल्ला 0

आसारामबापू प्रकरणातील साक्षीदारावर अ‍ॅसिड हल्ला

asaram-bapu-arrest_123
सुरत – लैंगिक शोषण प्रकरणात तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार दिनेश वागचंदानी यांच्यावर रविवारी अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला.
वागचंदानी हे मोटारसायकलवरुन त्यांच्या घरी जात असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंगात असलेले आसारामबापू यांच्याविरुद्ध दिनेश यांनी साक्ष दिली होती. साक्षीदारांवर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधील राकेश पटेल या साक्षीदारास चाकूने जखमी करण्यात आले होते.आसाराम बापू यांना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

March 17, 2014 in मुख्य पान
नार्वेकरांचा शिवसेनाला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीत प्रवेश 0

नार्वेकरांचा शिवसेनाला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीत प्रवेश

rahul-narvekar-1
मुंबई- बदललेल्या शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वोकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तसेच त्यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आल्याचे घोषणा पवार यांनी केली.
त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नर्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीसाठीची उमेदवारी परस्पर माघीर घेतली नसल्याचे नार्वेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उमेदारीमागे घेत असल्याची कल्पना पक्षप्रमुखांना असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत घोडेबारा होऊ नये यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी प्रवेश करताना नार्वेकर यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. पक्षात घुसमट होत असल्याने पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हाता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळाल्याचे नार्वेकर म्हणाले. शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचे आपण बळी ठरत होते. तसेच पक्ष नेतृत्वाकडून हवी तशी साथ मिळाली नसल्याचे ते म्हणालेे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचेे पुण्यातील सर्व उमेदवार २६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

March 17, 2014 in महाराष्ट्र
होळी 0

होळी

1_n

March 16, 2014 in मुख्य पान

वाहतुक पोलिसासोबत झटापट

यवतमाळ  – जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायासोबत दुचाकीस्वारांनी झटापट केल्याची घटना शनिवारी दुपारी १.२५ वाजता विठ्ठलवाडी येथे घडली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस शिपायी दिवाकर जोशी हे आपल्या सहकार्यासह लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन धारकांविरुद्घ कार्यवाही करण्यासाठी गेले होते. अशातच विठ्ठलवाडी फाट्यावर एका दुचाकीवरुन दोन जण जात होते. त्यांना थांबवुन दुचाकीचे कागदपत्र व लायसन्स संदर्भात विचारणा केली. त्यावरून ईम्तीयाझ इब्राहीत खॉ (३०) व अन्य एक रा. बोरी अरब यांने सदर  शिपायासोबत झटापट करुन अश्लिल शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी जोशी याच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहे.

जिल्हा बार असोशिएशच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. चव्हाण

यवतमाळ – यवतमाळ जिल्हा बार असोशिएशनची वार्षिक निवडणूक १५ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेश चव्हाण हे विजयी झाले असून दोन सचिव  व अंकेक्षकांची अविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष, सचिव, सभासद, अंकेक्षकपदाची १५ मार्च रोजी निवडणूक आयोजीत केली होती.अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. राजेश चव्हाण,अ‍ॅड. अरुण मोहड, अ‍ॅड. दिपक चांभारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर चार सभासदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले. दोन सचिवांसाठी दोनच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली. यामध्ये अ‍ॅड. चव्हाण यांना १५३ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर त्याचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. चांभारे यांना ८३ व अ‍ॅड. मोहोड यांना ५८ मते मिळाली. अ‍ॅड. डि.बी. गायकवाड, अ‍ॅड. सुरज जयसिंगपुरे यांची अविरोध निवड झाली. सभासद म्हणून अ‍ॅड. निरंजन दाढे, अ‍ॅड. शिवाजी गाडे, अ‍ॅड. अमान पठाण, अ‍ॅड. आनंद रुईकर व अंकेक्षक म्हणून अ‍ॅड. भारत सोधी यांची निवड  झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. रविशेखर बदणोरे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. अजय चमेडीया  यांनी काम पाहिले.

वन विभाग होणार ‘स्मार्ट’

नाशिक – कूर्मगतीने चालणाऱ्या कामकाज पद्धतीला फाटा देऊन वन विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ‘स्मार्ट’ पर्याय शोधण्यात आला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन आणि जीपीएस यंत्रणेद्वारे कनेक्ट केले जात असून याद्वारे प्रत्यक्ष जंगलात असलेली सद्यस्थिती कळून चुकणार आहे.
घनदाट जंगल आणि वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात नक्की सद्यस्थिती काय आहे, हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही काही वेळा माहिती नसते. तसेच, वनकर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर आहेत की नाही, याचीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसते. या सर्व प्रश्नांवर वन विभागाने ‘स्मार्ट’ तोडगा काढला आहे. त्यानुसार फिल्डवर काम करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. जीपीएस यंत्रणेवर आधारित हे सॉफ्टवेअर या कर्मचाऱ्यांना अपडेट ठेवणार आहे. नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. अभयारण्य किंवा जंगलामधील अतिक्रमण, शिकार, वणवा, वृक्षलागवड किंवा वृक्षतोड निदर्शनास आल्यानंतर वनरक्षक तेथील फोटो काढून तो या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकेल. त्यामुळे संबंधित घटनेचे निश्चित ठिकाण (अक्षांश आणि रेखांशांद्वारे) समजू शकेल. हा फोटो किंवा ही माहिती वन विभागाच्या कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत सॉफ्टवेअरद्वारे सहज पाहता येऊ शकेल. तसेच, वनरक्षक या सॉफ्टवेअरद्वारे प्रथमिक माहिती अहवालही (एफआयआर) विभागाला देऊ शकणार आहेत. जीपीएस यंत्रणा आणि नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वन विभागाच्या कार्यालयातील अधिकारीही थेट फिल्डशी कनेक्ट होतील. यामुळे वनरक्षकांचे सध्याचे ठिकाण, तेथील सद्यस्थिती क्षणार्धात समजेल. यामुळे वन विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकपणा येईल.संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील भागातील वनरक्षकांना प्रथम हे सॉफ्टवेअर दिले जात आहे. नाशिक जिल्ह्यातही पेठ, बारे, उंबरठाण या भागातील १२५ वनरक्षकांच्या स्मार्टफोनमध्ये हे सॉफ्टवेअर दिले जाणार असल्याची माहिती माहिती नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली आहे. येत्या मार्चअखेरीपर्यंत अधिकाधिक वन कर्मचाऱ्यांना ते देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

March 16, 2014 in महाराष्ट्र

पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

इस्लामाबाद -पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवर अधूनमधून होणारे हल्ले सुरूच असून शनिवारी रात्री सिंध प्रांतातील लरकाना परिसरातील एका मंदिरावर कट्टरपंथी मुस्लिमांनी हल्ला चढवला. संतप्त जमावाने मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. या घटनेमुळे लरकानामध्ये प्रचंड तणाव पसरला असून येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
‘कराची पोस्ट’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने केलेल्या ट्वीटनुसार, शनिवारी रात्री काही संतप्त लोकांनी हिंदू समाजाच्या घरांना घेराव घातला. या लोकांनी हिंदूंच्या मालमत्तेवर हल्ले केले आणि जवळच असलेल्या मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. मनोरुग्ण असलेल्या एका हिंदू तरुणाने कुराणाची पाने जाळल्याचा आरोप करत हे हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जाते.या हिंसाचाराची माहिती मिळताच पाकिस्तानी पोलीस व रेंजर्स घटनास्थळी धावले. पोलिसांनी अश्रूधूर सोडून व हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. परिस्थिती चिघळू नये म्हणून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे गव्हर्नर इशरतुल खान यांनी शांततेचे आवाहन केले असून मंदिरावर हल्ले करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी तरुण व सुजाण नागरिकांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करणे हे इस्लामविरोधी असल्याचे ट्वीट बहुतांश तरुणांनी केले आहे. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीह होत आहे.

March 16, 2014 in देश-विदेश

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू

ठाणे – समतानगर भागातील सुंदरबन पार्कमधील गुलमोहर सोसायटीच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून एका वृध्द दांम्पत्याचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
सकाळी सहाच्या सुमारास नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग भडकली. वेगाने ही आग अन्य मजल्यांपर्यंत पसरली. अग्निशमन दलाने आता आगीवर नियंत्रण मिळवले असून, इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरु सुटका केली आहे. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.अग्निशमन दलाच्या बारा गाडयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव चौगुले (८४), निर्मला चौगुले (७८) या दांम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. विक्रमादित्य सावे (५५) आणि त्यांची पत्नी रंजना सावे (५५) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

March 16, 2014 in महाराष्ट्र
वाराणासीत नरेंद्र मोदी विरुध्द केजरीवाल 0

वाराणासीत नरेंद्र मोदी विरुध्द केजरीवाल

downloadnaren
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल वाराणासीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
नरेंद्र मोदी वाराणासीमधुन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवालही तेथूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रविवारी संध्याकाळी बंगळुरुमध्ये होणा-या आपच्या सभेमध्ये अरविंद केजरीवाल यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.अनेक जण मला मोदींविरोधात निवडणूक लढवणार का ? म्हणून विचारत आहेत. मी आज संध्याकाळी सभेमध्ये यावर बोलेन असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

March 16, 2014 in देश-विदेश
केंद्रात पुन्हा युपीए सरकार- राहुल गांधी 0

केंद्रात पुन्हा युपीए सरकार- राहुल गांधी

22rahul-gandhi11
नवी दिल्ली-  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होईल आणि केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार येईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
सध्या विविध जाहीर होणारे ओपिनियन पोल म्हणजे एक मोठा विनोद असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २००९ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या २०६पेक्षा अधिक जागा मिळतील. याआधीही २००४ आणि २००९मध्ये ओपीनीनय पोलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल असे सांगण्यात येत होते. मात्र पत्यक्षात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याची आठवण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी करुन दिली.या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपासून डीएमके आणि तृणमूल काँग्रेस पक्ष वेगळे झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, जेएमएम, आरएलडी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काँग्रेस पक्षाची आघाडी असल्याचे राहुल यांनी सांगितले.जर पुन्हा तृणमूल अथवा डेएमके सोबत आघाडी करावी लागली तर आम्ही नक्की त्याच्यासोबत आघाडी करु असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि राजकीय विचारांशी जवळीक असणा-या पक्षांना आम्ही सोबत घेऊ.

पाणी

हा घनघोर इतिहास नाही पाण्याचा : माणसांचाही
माणूस का शिकत नाही पाण्याचा इतिहास
यांना कुणी तरी शिकवारे पाण्याचा इतिहास
इतिहास विसरतो त्याला घडवता येत नाही इतिहास
कुणी तरी लिहा रे पाण्याचा इतिहास
पाण्याला खेळू द्या रं मोकळ
पाण्याचा खेळ करणारे बंद करा वाटर किंग्डम पार्क
का गाजावताय स्वामित्व पाण्यावर
का केल पाणी बाटलीत बंद
का चाललाय पाण्याचा धंदा
कुणी उभे केले हे पाणी सम्राट
पाण्याचा पैसा
पैश्याच पाणी
पाण्यासारख्या पैश्यावर उद्या हे विकत घेतील
विहिरी, तलाव, नद्या सागर
पाणी रे पाणी तेरा कितना पैसा
पैसेवाला पाणी पिणार
बिनपैसेवाला तडफडून मरणार
पाण्याचे आटताहेत साठे जगभर
पाण्याला शोधले जातील पर्याय
पाण्याला पर्याय असते पाणी निष्कर्ष आल्यावर
अंतराळातून शोध घेतला जाईल पाण्याचा
बिनपाण्याचा देश करेल स्वारी पाण्याच्या देशावर
वाहतील रक्ताचे पाट पाण्यासारखे
जो जिता वही सिकंदर
आपल्या लोकांना वाचवण्यासाठी
एक एक देश करीत राहतील पादाक्रांत
त्यातून येईल तिसरे चौथे पाचवे महायुद्ध
ते टाळायला हवा असेल एक बुद्ध

मोतीराम कटारे
( पाणी या दीर्घ कवितेतील अंश )
लोकहो तुम्हीच आहात गुन्हेगार ‘ या कवितासंग्रहातून

शिक्षकाची प्रेयसीच्या घरी आत्महत्या

झरी जामणी (यवतमाळ) – धानोरा येथील विवाहीत शिक्षकाने प्रेयसीच्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पाटण पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्घ गुन्हा दाखल केला.
गंगाराम आनंद बरपटवार (५०) रा. धानोरा असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून तो जिल्हा परिषद शाळा खडकडोह येथे कार्यरत होता. झरी येथील एका विधवा महिला कोडपाखिंडी येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असताना त्याची ओळख झाली होती. काही दिवसाने त्याच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने बरबटवार हे गत १७ वर्षापासून महिलेच्या घरी राहत होता. अशातच काही दिवसापासून त्याच्यात भांडण-तंटे सुरु होते. दोन दिवसापूर्वी त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी महिला या शिक्षकाला अपमानास्पद व अर्वाच्य भाषेत बोलली होती. त्यामुळे वाईट परिणाम होऊन बरपटवार याने प्रेयसिच्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही बाब निदर्शनास येताच प्रेयसीने शिक्षकाच्या मुलाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली. कुटुंबीय व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाटण पोलिस ठाण्यात नेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली. अन्यथा अत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी पाटणचे ठाणेदार मसराम, मुकुटबनचे ठाणेदार असलम खान यांनी नातेवाईकांची समजुत काढली. याप्रकरणी प्रतीक गंगाराम बरपटवार याने पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये सदर महिलेच्या तक्रारीवरून बरपटवार याने आत्मत्या केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी प्रयेसिविरुद्घ आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास ठाणेदार मसराम करीत आहे.

लाकडे तोडण्याची वेळ आता गेली ! 0

लाकडे तोडण्याची वेळ आता गेली !

20140315_134957
यवतमाळ – भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते. मात्र सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून होळी साजरी केली जाते. पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. यावर्षी होळीच्या दिवशी वृक्षतोड थांबवावी म्हणून वनविभागाने जनजागृती सुरु केली आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्ष पुजन करण्याची वेळ आली असे फलक शहरात लावले आहे.
होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. होळीच्या पर्वावर होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी, लाकडांची होळी न करता वृक्षपूजन करून होळी साजरी करा असे आवाहन वनविभागाने केले आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्षपूजन करण्याची वेळ आली आहे असा संदेश देणारे फलक शहरातील शासकीय कार्यालयासह सार्वजनीक ठिकाणी वनविभागाने लावले आहे. वृक्ष वल्ली अम्हा सोयरी असा संदेश संत तुकारामांनी दिला. त्याच संदेशाला अनुसरुन आज ‘वृक्ष देवो भव’ हा नवा मंत्र आत्मसात करून सार्वांनी वाटचाल केल्यास निसर्ग संवर्धनास मोलाचा हातभार लागेल. होळी सणला वृक्षपुजन केल्यास आपल्या जगण्यासाठी प्राणवायु देणाºया वनाराईची कत्तल तर कमी होईलच शिवाय भावी पिढीलाही पर्यावरण संरक्षणाचा संदेश मिळेल. होळीच्या दिवशी लाकडांची होळी न करता सार्वजनिक ठिकाणावरील काडी कचरा गोळा करुन त्याची होळी करावी. तसेच होळीच्या दिवशी एक झाड लावावे, तसेच उन्हाळ््यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा. असे आवाहन उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा व दारव्ह्याचे वनपाल श्रीराम कडूकार यांनी केले.

लुटमार प्रकरणी पाच आरोपींना अटक

यवतमाळ – भांबराजा-हिवरी मार्गावर इंडीगो वाहन अडवून चालकाला चाकुच्या धाक दाखवून मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी ४८ तासात पाच आरोपींना अटक केली.
प्रफुल भगवान येलम (२०), रुपेश नरेश तंटक (२१), आकाश इिलीप शेंडे (२१), मंगेश मारोतराव शिरभाते (२०), अविनाश उर्फ चिमणा वासुदेव अजमिरे (२२) सर्व रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. दुर्गेश आनंद ठाकरे (४२) रा. शिवाजी नगर यवतमाळ हे १३ मार्च रोजी दुपारी इंडीगो कारने आर्णीवरून यवतमाळकडे येत होते. अशातच भांबराजा ते हिवरी रस्त्यात अचानक पाच जणांनी कार अडवून ठाकरेसह एकाला चाकुचा धाक दाखवून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच लुटण्याचा प्रयत्न करून सदर युवक दोन दुचाकीवरुन पसार झाले. यावेळी ठाकरे यांनी एका दुचाकीचा (एम.एच. २९ / एच. ४१८० )क्रमांक पाहिला होता. याप्रकरणी ठाकरे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सदर क्रमांक नमुद केला. त्यावरून पाचही आरोपीविरुद्घ भादंवि कलम १४७, १४९, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करुन दुचाकी कुणाच्या नावाने आहे याबाबत माहिती मांगतली. या कार्यालातून प्राप्त माहितीच्या आधारावरुन पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावुन पाचही आरोपींना अटक केली. ही कारवाई ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार, जमा. भक्तराज बन्सोड, महेश फुनसे करीत आहे.

‘व्हॉट्सअॅप’वरील चॅटिंग धोकादायक 0

‘व्हॉट्सअॅप’वरील चॅटिंग धोकादायक

WhatsApp-300x300
सध्या तरुण पिढीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. फेसबुकनंतर आलेले ‘व्हॉट्सअॅप’ तरुण-तरुणींमध्ये प्रसिद्ध झाले आहे. उठण्या-झोपण्यापासून सर्व जण आपली माहिती मित्र, मैत्रिणींना शेअर करत असतात. मात्र अँड्रॉइड फोनमधील ‘व्हॉट्सअॅप’ वापरणा-यांना थोडे सावध व्हावे लागणार आहे. कारण तुम्ही ‘व्हॉट्सअॅप’वर चॅटिंग करताना कोणीही तुमच्या चॅट अकाउंटमध्ये ‘लॉगइन’ करून तुमचे संभाषण पाहू शकणार आहे.
पोर्तुगाल येथील सुरक्षा सल्लागारांच्या मते, अँड्रॉइड फोनच्या एसडी कार्डवर ‘व्हॉट्सअॅप’ संदेश साठवले जातात. मात्र अँड्राइड फोनमध्ये विविध अॅप्सची माहिती शेअर केली जात असल्याने कोणतेही अॅप ती माहिती वाचू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘व्हॉट्सअॅप’चा डेटाबेस एसडी कार्डवर केला जातो. अँड्रॉइड वापरणा-यांनी एसडी कार्ड वापरण्याची परवानगी दिल्यास ते अॅप्लिकेशन कोणीही वाचू शकतो, असे बास बोस्केर्ट यांनी ब्लॉगवर लिहिले आहे.
एखाद्याचा ‘व्हॉट्सअॅप’ डेटाबेस पाहायचा असल्यास तो साठवण्यासाठी जागेची गरज भासणार आहे. दुसरे म्हणजे तो डेटाबेस संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशनची गरज लागणार आहे. प्ले स्टोर किंवा एपीके फाइलद्वारे एकदा अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते अॅप फोनला नेटवर्क आणि एसडी कार्ड वापरण्यासाठी परवानगी मागते.
बोस्केर्ट यांनी हॅक करण्यासाठी वेब सव्र्हर सेट केला आणि नंतर फोनमध्ये विशेष परवानगी मागणारे अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले. मात्र अँड्रॉइड फोनची ऑपरेटिंग सिस्टीम फोनमधील विविध विभाग वापरण्याची परवानगी त्या अॅप्लिकेशनला देतो. त्यामुळे अँड्रॉइडधारक कोणतीही माहिती अॅपद्वारे आरामात शेअर करू शकतात, असे त्यांनी सांगितले. ‘व्हॉट्सअॅप’ची जुनी आवृत्ती खूपच असुरक्षित होती. एकदा वेब सव्र्हरवर अपलोड केल्यानंतर या जुन्या ‘व्हॉट्सअॅप’मधील माहिती कोणीही वाचू शकत होते. तसेच ‘व्हॉट्सअॅप’च्या नवीन आवृत्तीतही संगणकीय प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. खरे तर फेसबुकला ‘व्हॉट्सअॅप’ विकत घेण्याची काहीच गरज नव्हती, असे बोस्कर्ट यांनी गमतीने म्हटले आहे.

प्रतिभावंत कवी सुधीर मोघे यांचे निधन 0

प्रतिभावंत कवी सुधीर मोघे यांचे निधन

moghe
पुणे : प्रतिभावंत कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांचे शनिवारी दीर्घ आजारपणाने निधन झाले.काही दिवसांपूर्वी त्यानी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. शनिवारी दुपारी अडीजच्या सुमारास मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, शब्द धून, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले होते. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.

March 15, 2014 in मनोरंजन
केजरीवाल यांना न्यायलयाकडून दंड 0

केजरीवाल यांना न्यायलयाकडून दंड

download
नवी दिल्ली- सुनावणी दरम्यान न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल दिल्लीतील न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांना दंड ठोठावला आहे.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचे पुत्र अमित यांनी केजरीवाल आणि सिसोदीया यांच्यारविरोधात दिल्लीतील न्यायालयाने खटला दाखल केला होता. मात्र या खटल्याच्या सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दोन हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

March 15, 2014 in देश-विदेश
दिल्ली सामूहिक बलात्कार- दोघांच्या फाशीला स्थगिती 0

दिल्ली सामूहिक बलात्कार- दोघांच्या फाशीला स्थगिती

index
नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयने या दोघांच्या फाशीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
न्यायालयाने मुकेश आणि पवन गुप्ता या दोघांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. १३ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चौघा आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.या प्रकरणी सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

March 15, 2014 in मुख्य पान
जॅक न लावता कंन्टेनरचे चाकाची चोरी 0

जॅक न लावता कंन्टेनरचे चाकाची चोरी

Exif_JPEG_420
लाडखेड (यवतमाळ) –  रात्रीच्यावेळी बसस्थानकासमोर उभ्या केलेल्या कंन्टेनरचे १५ चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री एम.एच. ४०/ वाय ८४८० क्रामंकाचा कन्टेंनर येथील बसस्थानकासमोर उभा होता. अशातच रात्रीच्यावेळी चोरट्याने कंन्टेंनरला जॅक ऐंवजी दगडाचा वापर करून १५ चाके व  डिक्स (किंमत पाच लाख) चोरुन नेले.आज सकाळी ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, गजानन शेजुलकर, नागोराव मेश्राम, अनील आडे, दिपक शेंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी ‘लोकशासन आंदोलन’ 0

सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी ‘लोकशासन आंदोलन’

IMG_4786
यवतमाळ  –  जिल्ह्यातील बेघर, भूमिहीन, वैयक्तीक सहकारी जमिन मागणी अर्ज भरुन जिल्हा कार्यालयात देण्यासाठी १४ मार्च रोजी पोस्टल ग्राऊंड येथे लोकशासन आंदोलनाचे आयोजन केले होते. याबाबत परवानगी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारल्याने न्या. कोळसे पाटील यांनी मोर्चा ऐंवजी सभेला परवानगी मिळविली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक  कष्टकरी, नागरिक, महिला सकाळपासून पोस्टल मैदानावर जमले होते. दुपारी २ वाजल्यानंतरही आंदोलनाचे अध्यक्ष न्या. कोळसे पाटील आले नव्हते त्यामुळे नागरिक भर उन्हात बसुन होते. त्यानंतर काही वेळातच सभेच्या ठिकाणी येताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी आंदोलनात राजकीय पक्ष व प्रशासनावर घाणाघात केला. यावेळी त्यानी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करुन त्याना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.