
दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – अंगणवाडीचे बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी फेट्री ग्रामपंचायतच्या सदस्याला दहा हजार रुपये लाच स्विकारली. येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली.
रामकृष्ण भुंजगा धनगर (५५)असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. फेट्रा ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाबाबत तक्रारी न करणे, केलेली तक्रार मागे घेणे व बांधकाम सुरळीत चालु ठेवण्याकरीता धनगर यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे बांधकामाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आज पथकाने येथील मानोरा चौकातील बाजोरीया हॉटलमध्ये सापळा रचला. यावेळी ग्रामपंचायत सदस्याने दहा हजार रुपये स्विकारून पॅन्टच्या खिशात टाकले. यावेळी तक्रारकर्त्याने इशारा करताच सदर पथकाने सदस्याला अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हेकर, नंदकुमार जामकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, विशाल धलवार, अमोल महल्ले, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, नरेंद्र इंगोले यांनी केली.
Archive for November, 2014
0
ग्रामपंचाय सदस्य एसीबीच्या जाळ््यात
0
शेतकºयांनी ठोकले वीज वितरणला कुलुप

घाटंजी -(तालुका प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकरी संकटात असून भारनियमनामुळ े कृषी पंपाना विजपुरवठा नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज कंपनीचे अभियंता गैरहजर असल्याने संतप्त शेतकºयांनी कर्मचाºयांना बाहेर हाकलुन कार्यालयाला कुलुप ठोकले.
ग्रामीण भागातील गावामध्ये येथील वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो. मात्र वीज वितरण कंपनीच्या तुघलकी कारभार सुरू असून भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तसेच शेतकºयांना कृषी पंपाना सुरळीत विज पुरवठा केल्या जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पिकाला रात्रीच्यावेळी जाऊन पाणी द्यावे लागते. गत काही महीन्यापासून भारनियमना व्यक्तीरीक्तही वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके सुकत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. दरम्यान आज तालुक्यातील शेतकºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज अभियंता गैरहजर असल्याने समस्या सांगायची कुणाला असा प्रश्न उपस्थित करून सदर अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. यावेळी अधिकाºयाने मी माझ्या पदाचा राजीनामा दिला, तुम्हाला जे करायचे ते करा असे उध्दट उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयातील कर्मचाºयांना बाहेर हकलुन कुलुप ठोकले व पोलीस ठाण्यात चाब्या जमा केल्या. यावेळी गुणवंत नाखले, सुरेश ठाकरे, सुदाम इंगोले, श्रीकांत कस्तुरे, गजानन पेंचलवार, रामधन चव्हाण, परिश्रीत विरंदडे, राजू मानकर उपस्थित होते.
0
अखेर त्या विवाहीतेचा मृत्यू
दिग्रस (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यतील हरसूल येथील जळालेल्या नवविवाहीतेचा आज यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी सदर महीलेच्या पतीसह सासूला जवकरच अटक करणार असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
निकीता गिरीष दुधे असे विवाहित महिलेचे नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान निकिताला जळालेल्या अवस्थ दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र ती ७७ टक्के जळाली असल्याने तीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पवन तायडे याने दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी आरोपी पती गिरीष दुधे, सासू सुरेखा दुधे याच्याविरूद्घ भादंवि कलम ४९८ (अ), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज ७ नोव्हेंबर रोजी निकीताचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरूद्घ पुन्हा ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
0
लाचखोर दंततंत्रज्ञास अटक

यवतमाळ (स्थानिक प्रतिनिधी) – कृत्रिम दात बसऊन देण्यासाठी एक हजार रुपये लाच स्विकारताना येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दंततंत्रज्ञास रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने आज सकाळी रुग्णालयात ही कार्यवाही केली आहे.
संजय बापूराव फेदुजवार (४४) असे लाचखोर कर्मचाºयांचे नाव असून ते दंततंत्रज्ञ पदावर कार्यरत होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आलेल्या एका रुग्णास कृत्रिम दात तयार करून बसवुन देतो असे म्हणून एक हजाराची लाच मागीतली. या प्रकरणाची तक्रारही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून आज पथकाने रुग्णालयातील दंत विभागात सापळा रचला होता. यावेळी फेदुजवार याना एक हजार रुपयाची तक्रारदाराकडून लाच स्विकारताच रंगेहात पकडले. या घटनेने रुग्णालयातील कर्मचाºयामध्ये खळबळ उडाली आहे.
0
केंद्रीय मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार पक्का असतानाच सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री श्रीपाद यस्सो नाईक यांची खराब कामगिरी पाहता त्यांचे खाते बदलण्याची शक्यता आहे. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे बदल अपेक्षित आहेत. एकंदर सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल असे दिसते. यात पर्रीकरांखेरीज यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत, मुख्तार अब्बास नक्वी, अनुराग ठाकूर आणि हंसराज अहिर या भाजपा नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. हरियाणा किंवा राजस्थानातून एखाद्या जाट नेत्याला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
जलस्रोत आणि गंगा स्वच्छता विभागाचे प्रमुख आलोक रावत यांची प्रशासकीय सुधार आयोग या कमी महत्त्वाच्या विभागामध्ये बदली केली आहे. त्यांच्या जागी आता शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदासोबतच गंगा योजनेचे प्रमुखपदही दिले जाण्याची शक्यता आहे. प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. परंतु पदोन्नतीत त्यांना संसदीय कामकाज किंवा अन्य खाते सोडावे लागू शकते. सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.
0
नौदलाचे जहाज बुडाले, एक ठार, चार बेपत्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय नौदलाचे ‘टॉर्पिडो रिकव्हरी व्हेसल’ हे छोटे जहाज गुरुवारी विशाखापट्टणम बंदराजवळ समुद्रात बुडाले. या अपघातात जहाजावर तैनात असलेलला एक नाविक मृत्युमुखी पडला असून अन्य चार नाविक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. जहाजावर २८ कर्मचारी होते. त्यापैकी २३ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
युद्धनौका आणि पाणबुड्यांनी सरावादरम्यान डागलेले तोफगोळे शोधण्याचे काम या जहाजाकडे सोपविण्यात आले होते. नेहमीप्रमाणे हे जहाज तोफगोळे (टॉर्पिडो) शोधण्याच्या कामात असताना अचानक एका कक्षात पाणी घुसले आणि काही मिनिटातच जहाज समुद्रात बुडाले. हे जहाज डमी तोफगोळे गोळा करून परत येत असताना त्यात पाणी घुसले. विझाग पोस्टपासून अनदाजे १० ते १५ कि. मी. अंतरावर हे जहाज बुडाल्याचे कळते.
0
हलक्या बॅटने खेळण्याचा फायदा नाही – सचिन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – अडीच दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनला जेव्हा जेव्हा दुखापतींनी सतावले तेव्हा तेव्हा सचिनच्या दुखण्यामागे तो वापरत असलेली जड बॅट कारण असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला.
सचिनला अनेक क्रिकेट तज्ञांनी हलक्या वजनाची बॅट वापरण्याच सल्ला दिला. मात्र सचिनला स्वत:ला हलक्या बॅटने खेळणे कधीही मानवले नाही. जेव्हा जेव्हा सचिनने बॅट बदलून खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या फटका खेळण्याचा (टाईमिंग) वेळेवर परिणाम झाला.
मला अनेकांनी हलकी बॅट वापरण्याचा सल्ला दिला पण मला त्याचा कधीही फायदा झाला नाही असे सचिनने त्याच्य ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
जेव्हा मी फटका खेळायचो तेव्हा त्या फटक्यामध्ये ताकत येण्यासाठी मला वजन लागायचे. यात टाईमिंग महत्वाचा होता असे सचिनने म्हटले आहे. सहजतेने फलंदाजी करता येणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. जो पर्यंत मला फलंदाजी करताना सहजता वाटते तो पर्यंत मी कुठे खेळतोय, कोणाविरुध्द खेळतोय हे महत्वाचे ठरत नाही असे सचिनने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
0
विमानाला म्हशीची धडक

सुरत (प्रतिनिधी) – सुरतहून दिल्लीकडे निघालेल्या विमानाचे टेकऑफ होत असताना सुरत विमानतळावर स्पाइसजेट कंपनीच्या प्रवासी विमानाला म्हशीने धडक दिली. यावेळी विमानात एकूण १४६ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
स्पाइसजेट कंपनीचे बोइंग ७३७- ८०० हे विमान उड्डाण क्रमांक एसजी- ६२२ द्वारे सुरतहून सायंकाळी सात वाजता दिल्लीला निघाले होते. यात १४० प्रवासी आणि सहा विमानातील कर्मचारी होते. विमान टेक ऑफ करत असताना धावपट्टीवर आलेली म्हैस विमानाच्या इंजिनाला धडकली. यात सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी विमानाच्या इंजिनाचे मात्र मोठे नुकसान झाले. यानंतर हे विमान रद्द करुन रात्री अकरा वाजता पर्यायी विमानाने सर्व प्रवाशांना दिल्लीला रवाना करण्यात आले.
धावपट्टीवर पुरेसा प्रकाश होता. मात्र बाजूच्या मैदानातील अंधारातून अचानक एक म्हैस पुढे आली आणि तिची विमानाला धडक बसली. वैमानिकाच्या ते लक्षात आले परंतू विमानाच्या वेगामुळे ही धडक टाळणे अशक्य झाल्याचे स्पाइसजेट कंपनीने सांगितले.
यापूर्वी जुलै २००९ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानाला नागपूर विमानतळावर डुकराची धडक बसली होती. तर मार्च २०१० मध्ये मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्यांवर आलेल्या कुत्र्यांमुळे सुमारे अर्धा तास विमानांचे उड्डाण थांबवावे लागले होते.
सुरतच्या या अपघातामुळे विमानतळाच्या धावपट्टी भागात म्हैस पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी दिले आहेत.
0
वॉट्स अॅपवर नो उल्लू बनाविंग, मेसेज वाचल्याचे कळणार

मुंबई – वॉट्स अॅपवर आलेला मेसेज वाचलाच नाही असं यापुढे सांगता येणार नाही. वॉट्स अॅपमधील नवीन फिचरनुसार एखाद्या व्यक्तीने मेसेज पाठवल्यास आपण तो वाचला की नाही हे त्या व्यक्तीला समजणार आहे. काही वॉट्स अॅप युजर्सच्या मोबाईलवर ही सुविधा सुरुदेखील झाली आहे.
अवघ्या काही वर्षांमध्येच लोकप्रिय मेसेजिंग अॅपचे बिरुद मिरवणा-या वॉट्स अॅपने आता नवनवीन फिचर्स द्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वी वॉट्स अॅपवर एखाद्या व्यक्तीने मेसेज केला व तो मेसेज संबंधीत व्यक्तीला मिळाला हे दर्शवण्यासाठी राखाडी रंगातील दोन टीक मार्क यायचे. मात्र तो मेसेज संबंधीत व्यक्तीने वाचला की नाही हे समजू शकत नव्हते. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडायचा. यावर वॉट्स अॅपने तोडगा काढला आहे. आता वॉट्स अॅपवर मेसेज रिड केल्यास राखाडी रंगातील दोन टीक मार्क निळ्या रंगात बदलणार आहे. तसेच पाठवलेल्या मेसेजवर दीर्घ काळ प्रेस करुन ठेवल्यास मेसेज इन्फोद्वारेही मेसेज रिड झाल्याची माहिती मिळेल. अद्याप ही सुविधा सर्व युजर्सना मिळालेली नाही. लवकरच वॉट्स अॅपकडून अपडेट दिली जाणार असल्याचे समजते. भारतात वॉट्स अॅपचे सात कोटी युजर्स असून या नवीन फिचरमुळे वॉट्स अॅपवर ‘उल्लू’ बनवणे कठीण होणार ऐवढे मात्र नक्की.
0
उपमुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात केंद्रात मंत्रिपद द्या – शिवसेना

मुंबई – राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर भाजपाने केंद्रात आणखी एक मंत्रिपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने केल्याचे समजते. शिवसेनेच्या या मागणीमुळे भाजपाचीही कोंडी झाली असून आता यावर भाजपा शिवसेनेपुढे नमते घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा आणि शिवसेनेमधील चर्चेचे गु-हाळ अद्यापही सुरुच असून युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्रीपद व ९ ते १० मंत्रिपद हवे आहे. तर भाजपाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सध्या शिवसेनेची दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपद देत नसाल तर केंद्रात आणखी एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विस्तारामध्ये आपल्या पदरात एखादे मंत्रिपद पाडून घ्यावे अशी रणनिती शिवसेनेने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. तर भाजपाने याविषयावर शिवसेनेला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेेची मागणी मान्य केल्यास तेलगू देसम, अकाली दल हे पक्षही भविष्यात अशी मागणी करु शकतील अशी भिती भाजपा नेत्यांना वाटत आहे.
0
काँग्रेसचा विधिमंडळ नेता हायकमांड निवडणार

मुंबई- काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत अखेर विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या हायकमांडना देण्यात आले. राज्यातील विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ नेता पदाच्या शर्यतीत अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री असल्याने अखेर विधिमंडळ नेता निवड करण्याचा सर्वाधिकार काँग्रेसचे हायकमांड घेतील असा निर्णय घेण्यात आला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांच्या निरीक्षणाखाली ही बैठक झाली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण विधिमंडळ नेते पदाच्या शर्यतीत नसल्याचे गुरुवारी सकाळी सांगितले. मात्र काँग्रेस पक्षातील अनेक जेष्ठ नेते आणि मंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे या शर्यतीत आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
नवनिर्वाचित ४२ आमदारांपैकी ३९ आमदार आणि २२ विधान परिषदेत असलेले आमदार या बैठकीला उपस्थित होते. कालिदास कोळंबकर, सुरुपसिंह नाईक आणि आरिफ मोहम्मद नसीम खान काही कारणास्तव बैठकीला हजर राहू शकले नाहीत.
0
केंद्रीय मंत्रीमंडळाचा रविवारी विस्तार

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रीमंडळाचा येत्या रविवारपर्यंत विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह सहा नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांना खूष करण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह मनोहर पर्रिकर यांना मंत्रीपद मिळणारच अशी जोरदार चर्चा आहे.
पर्रिकर यांनी बुधवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. तर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यापेक्षा देश मोठा असल्याची प्रतिक्रिया पर्रिकर यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर दिली. पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर आंध्र प्रदेशात तेलगु देसम पार्टीशी युती असल्याने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचेही नाव चर्चेत आहे. येत्या दोन दिवसात तुम्हाला मंत्रीमंडळ विस्ताराची बातमी ऐकायला मिळेल, असे नायडू म्हणाले. तर बिहार, राजस्थान मधील भाजपचे काही नविन चेहरे आणि टीडीपी व शिवसेनेलाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रपती भवनात भेट दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठीच मोदी तेथे गेले होते, अशी दिल्लीत चर्चा आहे. मात्र गुरु नानक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते राष्ट्रपती भवनात गेले होते, असे कारण पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सध्या २२ कॅबिनेट आणि २२ राज्य मंत्री यात १० स्वतंत्र पदभार असलेल्या मंत्र्यांचाही समावेश आहे. यातील नितिन गडकरी, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, निर्मला सिथारमण आणि पियुष गोयल या भाजप नेत्यांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
अरूण जेटली यांच्याकडे वित्त आणि संरक्षण तसेच नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबच गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ग्राम विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे.
तर रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा आणि न्याय मंत्रालयाबरोबरच दळवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचाही कारभार आहे. तसेच माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आहे.
अतिरिक्त पदभार असल्याने संबंधित मंत्रालयांच्या कामकाजावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणे या मंत्र्यांना अशक्य झाले आहे. यामुळे पंतप्रधानांना मंत्र्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
0
ऑनर किलिंगचा प्रकार, माहूरात घडलेले दुहेरी हत्याकांड
निलोफरचे वडील, काका आणि चुलत भाऊ अटकेत
यवतमाळ – माहुर येथे घडलेले दुहेरी खून प्रकरण हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केला आणि या ऑनर किलिंग साठी सुपारी देणाऱ्या मयत निलोफर च्या नातलगांसह ५ जणांना अटक केली आहे. या दुहेरी खून प्रकरणी आता अटक आरोपीतांची संख्या ११ झाली आहे.
१० सप्टेम्बर २०१४ रोजी माहूर च्या रामगढ किल्ल्यात २२ वर्षीय निलोफर बेग या पुसद येथील युवती सह तिचा प्रियकर शाहरुख फेरोज खान पठाण वय २३ या युवकाचा असे दोन मृतदेह मिळाले. जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या दुहेरी हत्याकांडा मुले पोलीसान समोर मोठे आव्हान होते. सुता वरून स्वर्ग गाठण्यात ख्याती असलेल्या पोलिसांनी या प्रकरणी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले. पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अण्णा डोईफोडे पोलिस कर्मचारी बळीराम दासरे, सय्यद फहीम, दत्तराम चव्हाण, सुधाकर कदम, पिराजी गायकवाड, शिंदे, दत्ता जाधव या टीम ने परिश्रम घेऊन अगोदर ५ जणांना पकडले त्यांची नावे राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर वय 20, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन व 38,रंगराव शामराव बाबटकर वय 25, शेषराव उर्फ पिंटू शामराव बाबटकर वय 19 आणि कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे वय 25 अशी आहेत. या प्रकरणातील रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर यास माहूर पोलिसांनी पकडले.
५ नोहेंबर रोजी रात्री अण्णा डोईफोडे आणि त्यांच्या टीमने पुसद येथील सयद अन्वरअली सयद अथरअली, माहूर येथील खैसर मिर्झा बहादूर मिर्झा, फुल सांगवी ता. महागाव येथील मिर्झा खालेद बेग मिर्झा कमर बेग, विकार अहमद नवाब अहमद, नवाबजानी कमर बेग या पाच लोकांना पकडले. आज या पाच जणांना माहूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता या निलोफर आणि शाहरुख या प्रेमी युगल हत्याकांडात अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
प्राप्त माहिती नुसार मोठे खलबत रचून, अत्यंत सुनियोजीत कट रचून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. आपल्या खानदानीच्या तोडीचे खानदान (कुटुंब) शाहरुखचे नाही या साठी आपल्या मुलगी निलोफर सह शाहरुख चा काटा काढण्यात आला. निलोफर आणि शाहरुख दोघे तंत्निकेतन पुसद येथे पदविका अभ्यासक्रमाला सोबत होते. अगोदर एकदा निलोफरने शाहरुख ची तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा शाहरुख च्या काकाने हे प्रकरण मिटवले होते. तंत्निकेतन पदविका अभ्यासक्रमत निलोफर उत्तीर्ण झाली आणि शाहरुख नापास झाला. निलोफर पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होती. शाहरुख च्या काकाने निलोफरच्या घरा समोर पुसद मध्ये घर घेतले होते. शाहरुख तेथेच राहत होता.
निलोफरने एकदा तक्रार केल्या नंतर सुद्धा शाहरुखने तिच्या सोबत सुत जमवलेच आणि दोघांचे प्रेम प्रकरण हळू हळू आकार घेत होते. निलोफर च्या कुटुंबियांना हि प्रेम कहाणी पसंद नव्हती. या दोघांचा काटा काढण्यासाठी एक शाश्वत खलबत रचले गेले. त्यात निलोफर च्या कुटुंबाने कोठेच भ्रमणध्वनी चा वापर केला नाही. प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन हा कट रचण्यात आला. दरम्यान शाहरुखला यवतमाळ येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश मिळाला.
९ सप्टेम्बर २०१४ शाहरुख यवतमाळ येथुन आपल्या चारचाकी गाडीत आला आणि नेहमी प्रमाणे सोयीस्कर माहूर गडावर प्रेमाच्या आण भाका घेण्यासाठी गेला. अगोदरच नियोजन असल्याने निलोफरचे काही नातलग नांदेडला आले. आणि ९ सप्टेम्बरला सायंकाळी पुसद पोलिस ठाण्यात निलोफारची मिसिंग (हरवल्याची) तक्रार दाखल झाली. दुसऱ्या दिवशी निलोफर आणि शाहरुखचे मुडदे सापडले. असा सुनियोजित कट रचून प्रेमी युगला चे खून.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हे दुहेरी खून प्रकरण उगडकीस आणले. या खुना साठी अगोदर अटक केलेल्या ५ जणांना माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. ती. खराटे यांनी ७ नोहेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. काळ पकडलेल्या ५ जणांना आज माहूर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली. पकडण्यात आलेला विकार अहमद हा या दुहेरी खून प्रकरणाचा फिर्यादी आणि निलोफर चा चुलत भाऊ आहे. मिर्झा खालेद बेग हे निलोफरचे वडील आहेत. नवाब अली हे तिचे काका आहेत. सय्यद अन्वरअली हा सरकारी कंत्राटदार आहे. यानेच माहूर पोलिस ठाण्याची इमारत बांधली असल्याचे सांगण्यात आले. तर खैसर मिर्झा हा अन्वरअली चा सहकारी कंत्राटदार आहे अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात सुद्धा ऑनर किलीग घडते हे या प्रेमी युगलाच्या दुहेरी हत्याकांडातून दिसले, हेच खरे.
0
आ. राठोड यांच्या वाहनाला अपघात, १ गंभीर, ४ जखमी
नेर – यवतमाळवरून शिर्डी येथे जाणाºया आ. संजय राठोड यांच्या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकरने जबर धडक दिल्याची घटना आज दुपारी ३ वाजता फुटका माथा जवळ घडली. सुदैवाने या वाहनात आ. राठोड नव्हते. यात एक जण गंभीर असून, ४ जण जखमी आहे. जखमींना यवतमाळ रुग्णालयात हलविण्यात आले.
आ. संजय राठोड यांचा परिवार व नातेवाईक टोयटो फारर्चुनर वाहनाने शिर्डी येथे दर्शनाकरिता जात होते. यातील मागील वाहन क्र. एमएच २९ एक्स १११ या वाहनाला समोरून येणाºया गॅस टँकर क्र जीजे १२- २३४८ ने जबर धडक दिली. यात उमेश हांडा (४०) रा. यवतमाळ हा गंभीर जखमी असून, चालक शंकर मानकर (५५), देविदास जाधव (४१), प्रवीण चव्हाण (२४), अशोक राठोड (४०) सर्व रा. यवतमाळ जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बाबू पाटील जैत, स्रेहल भाकरे, भारत मसराम, भाऊराव ढवळे, प्रमोद राणे यासह शेकडोंनी घटनास्थळी धाव घेतली अपघात झाल्यानंतर आमदाराच्या परिवारातील व नातेवाईकांना शिर्डी दौरा रद्द करून यवतमाळ येथे परत गेले. अपघातानंतर लगेच टँकर चालक हिरालाल यादव (गांधीधाम) गुजरात याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे

नवी दिल्ली- लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे मत महासचिव दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून सूत्रे स्वीकारावीत असे सिंह म्हणाले. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला वाटते की राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. विशेष म्हणजे याआधी सिंह यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे तर सोनिया गांधी यांनी ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे नेतृत्व करावे असेही ते म्हणाले.
0
विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा

मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास कोणतीही अडचण नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विशेष अधिवेशनापूर्वी होईल. त्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गांधीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारला येत्या पंधरा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनाही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यातील जनतेसाठी विधानसभेत काम करणार आहे. विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांकरता काँग्रेस निश्चितच सरकारला पाठिंबा देईल. मात्र सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणा-या गोष्टी सरकारकडून होणार असतील, तर त्याला सभागृहाबरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरूनही विरोध केला जाईल. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, सर्व समाजघटकांना दिलेली आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास आपोआप हे पद काँग्रेसला मिळण्यात काही अडचण येणार नाही. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक सक्षम नेते या पदासाठी दावेदार आहेत. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, त्यानुसार नेत्याची निवड होईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारने आता राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे प्रश्न बाजूला राहू नयेत. सध्या कापूस केंद्रांची आवश्यकता आहे. ती तातडीने सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. सध्या व्यापारी कापूस उत्पादक शेतक-यांची लूट करत आहेत, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे झालेले नुकसान, कोकणातील भातशेतीचे झालेले नुकसान, डेंग्यूवर नियंत्रण आदींबाबत लवकर निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षाही या वेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे भाजपशी साटेलोटे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे साटेलोटे असल्याचे आता जनतेसमोर आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीनेही तातडीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचे बोलले जात होते. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंब्यावरून त्यांचे साटेलोटे असल्याचे शिक्कामोर्तब झाले, अशी टीकाही या वेळी ठाकरे यांनी केली.
0
हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट

मुंबई – अभिनेता हृतिक रोशन व त्याची पत्नी सुझान खान या दोघांच्या घटस्फोटाला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने अखेर आज मान्यता दिली. दरम्यान या दोघांच्या दोन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा तसेच पोटगीबाबत सुनावणी सुरू असून अद्याप निर्णय बाकी आहे.
हृतिक व सुझान यांच्यात काही काळापासून बेबनाव सुरू होता. काही महिन्यापूर्वी हृतिकने आपण व सुझान वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हे दोघे पुन्हा एकत्र यावेत, त्यांच्यातील तणाव निवळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केला, मात्र ते असफल ठरले. अखेर आज वांद्रे न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली असून ते दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
0
सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे – उद्धव

मुंबई – नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहे, जनतेस गृहीत धरून राज्य करता येणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून नव्या भाजपा सरकारला समजुतीच्या चार गोष्टी सांगतानाच राज्य अखंड ठेवावे व जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या कालच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले, मात्र त्यावेळी सरकारला त्यांच्या जबाबादारी आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत. नवे सरकार हे नव्या नवरीसारखे असते. सासूची मर्जी सांभाळण्यासाठी प्रथम नववधू जबाबदारीने वागते, मात्र काळ पुढे सरकल्यावर सून सासूबाईंना वरचढ होते. महाराष्ट्राची जनता ‘खाष्ट’ नसली तकी उत्तमु सासू असल्याचे सांगत सासूबाईंना खुश करावेच लागेल. सासूपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न झालाच तर नव्या सरकारचे कान पकडण्याची ताकद जनतेकडे आहेच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवरायांनी जसे हिंदवी स्वराज्य खर्या अर्थाने रयतेचे राज्य बनविण्याचा प्रयत्न केला तसाच राज्यकारभार नवे मुख्यमंत्री करतील अशी आशा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
0
हत्याकांडाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – राज

अहमदनगर – जवखेड येथे झालेले हत्याकांड अतिशय भीषण असून यातील गुन्हेगारांच्या शोधासाठी व तपासासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुराव करणार आहे, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. जवखेडा येथे ११ दिवसांपूर्वी झालेल्या दलित हत्याकांडातील पीडित जाधव कुटुंबियांची राज ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सदर प्रकार अतिशय दुर्दैवी असून त्या गुन्हेगारांचा शोध लावून त्याना कठोर शासन व्हावे यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचा तसेच या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नवे मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले नेते असून ते चांगला कारभार करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. नव्या सरकारपर्यंत आधीच शुभेच्छा पोचवल्याचे सांगत शपथविधीला अनुपस्थित राहिलो याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असेही ते म्हणाले. दरम्यान या हत्याकाडांतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आदोलकांनी रस्त्यावरील गाड्या व दुकानांच्या काचा फोडत निषेध व्यक्त केल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे.













