
दिग्रस, दि. २२ – इसमाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याची घटना मोख येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नसून, दिग्रस पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करून अज्ञात मारेक्याचा शोध सुरू केला आहे.
तालुक्यातील मोख शिवारात असलेल्या विनोद नारायण चव्हाण यांच्या शेतातील विहिरीमध्ये पोत्यात मृतदेह बांधून असल्याचे ग्रामस्थांना आढळून आाले. त्यानंतर पोलीस पाटील प्रल्हाद चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिग्रस पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नसून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात मारेकºयाने मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकला असावा, असा तर्क पोलिसांनी लावला असून, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकºयाचा शोध घेण्यासाठी चौफेर तपास सुरू केला असून, या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान दिग्रस पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजंय जगदाळे करीत आहे.
Archive for March, 2015
0
खून करून मृतदेह विहिरीत फेकला
0
वाघाने पाडला बैलाचा फडशा

आर्णी (यवतमाळ), दि. २२ – शेतात असलेल्या बैलावर झडप घालून फडशा पाडण्यात आल्याची घटना माळेगाव येथील गौरी नारायण चव्हाण यांच्या शेतात घडली.
वाघ बैलाचा फडशा पाडत असल्याचे दिसताच महिलेने आरडा ओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वनपाल अधिकारी चव्हाण मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यापूर्वी गावातील संतोष पोहरे, नाना चौधरी यांच्यावर शेतात जात असताना अस्वलाने हल्ला चढून गंभीर जखमी केले होते. मागील दोन महिन्यापूर्वी केळझरा, सावळी, नाईकनगर, भानसरा या परिसरात शेतकºयांना शेतात वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. वन विभागाच्या अधिकाºयांनी त्या ठशाचे निरीक्षण करून पट्टेदार वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वनविभागाने महिला शेतकºयाला नुकसान भरपाई देवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
0
आर्णीत अर्थसंकल्पाची होळी
यवतमाळ,दि. २२ – केंद्र सरकारद्वारा अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी केली.
काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजप बहूजन समाज विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. सरकारने सबसीडी,जीडीपी दर २.१ काडून १.७ ठेवला आहे. त्यातही कपात केली असून कुटूंब नियोजन ५५१० कोटीची तरतुद गेल्यावर्षाच्या तुलनेत कमी केली. दारीद्रय निर्मुलन व गृहनिर्माण गरीब वस्ती ३९४ कोटी कपात केली. आदिवासी उत्थानाच्या रक्कमेतून ५०० कोटींची कपात केली. अनुसुचित जातीच्या योजना खर्चात १२,००० कोटीची कपात केली आहे. त्यामुळ हा अर्थसंकल्प बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून आज आर्णी येथील शिवनेरी चौकात अर्थसंकल्पाची होळी केली. यावेळी गजानन गोडवे, उमेश घायवट, सैयद मुजफ्फर, कृष्णा सोळंके, फकीरा बेडके, उस्मान शेख, रूपेश राऊत, मधुकर हरकरे, अमोल खडसे, राहुल मुनेश्वर, आसीफ माकोडे, सुनील रसाळ, प्रकाश वरटकर, अमजद पठाण, सुरेश मडावी सहभागी झाले होते.
0
भाजप आमदाराचा मुलगा शिपाई होणार

जयपूर -सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज करतोय हे ऐकल्यावर भारतात कोणालाही धक्काच बसेल. पण ही सत्यघटना आहे. राजस्थानमध्ये भाजप आमदार हिरालाल वर्मा यांचा मुलगा हंसराज याने राजकारणात प्रवेश करण्याऐवजी चक्क अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चतुर्थ श्रेणीत शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे.
आठवी पास हंसराज याला स्वतःच्या राजकीय सामर्थ्याचा गैरवापर करुन मोठे करण्याऐवजी कुवतीनुसार योग्य ती नोकरी करण्याची सूचना हिरालाल वर्मा यांनी केली होती. या सूचनेनुसार हंसराजने सरकारी नोकरीसाठी नियमानुसार अर्ज केला आहे. सलग दोनवेळा टोंक जिल्ह्यातून आमदार झालेल्या हिरालाल वर्मा यांनी मुलगा पात्रतेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन शिपाई झाल्यास आनंद वाटेल असे सांगितले.
प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे काम करावे असा विचार करणा-या हिरालाल वर्मा यांनी मुलाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. सध्या हंसराज निवाई येथे एका खासगी दवाखान्यात दरमहा पाच हजार रुपये पगाराची नोकरी करत आहे. सरकारी नोकरी मिळाल्यास त्याच्या वैयक्तिक आर्थिक सुरक्षेत वाढ होईल. महत्त्वाचे म्हणजे ही प्रगती हंसराज स्वतःच्या प्रयत्नांनी करेल त्यामुळे मुलाच्या अर्जाचे पुढे काय होते याकडे वडील या नात्याने मी उत्सुकतेने बघत असल्याचे हिरालाल वर्मा म्हणाले.
0
पंचांमुळे भारत जिंकला – बांगलादेश पंतप्रधान

नवी दिल्ली – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत भारताने बांगलादेशचा थोडयाथोडक्या नव्हे तर, तब्बल १०९ धावांनी दारुण पराभव केला. मात्र आपला पराभव टीम इंडियाने नव्हे तर, पंचांनी केला अशी बांगलादेशमध्ये अनेकांची भावना आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचीच ‘री’ ओढत पराभवासाठी पंचांना जबाबदार धरले आहे. पंचांनी चूक केली नसती तर, भारताला बांगलादेशला हरवता आले नसते.
पंचांच्या चूकीमुळे भारताला उपांत्यफेरी गाठता आली असे शेख हसीना यांनी म्हटले आहे. शुक्रवारी आयसीसीचे बांगलादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता.
त्यांनी खराब पंचगिरीवरुन आयसीसीचे अध्यक्षपद सोडण्याचीही धमकी दिली आहे. पंचांचे निर्णय आधीपासूनच फिक्स वाटत होते. आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मला जे काही सांगायचे आहे ते मी पुढच्या बैठकीत बोलणारच आहे असे कमाल यांनी सांगितले.
रोहित शर्मा (९०) धावांवर असताना रुबेल हसनच्या कमरेच्या थोडयावर आलेल्या फुलटॉस चेंडूवर झेलबाद झाला. मात्र पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. रोहितने या जीवदानाचा फायदा उचलत आणखी ४७ धावांची भर घातली त्यामुळे भारताला तीनशेचा टप्पा ओलांडता आला. पंचांनी संशयाचा फायदा फलंदाजाला दिला तर, त्यासाठी पंचांना सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही तसेच भारतानेही सरस कामगिरी केली मात्र बांगलादेशला अजून हे सत्य पचवता आलेले नाही.
0
हाशीमपूर हत्याकांड, यूपीच्या १६ पोलिसांची सुटका

नवी दिल्ली – देशाचे राजकारण हलवून सोडणा-या हाशीमपूर हत्याकांड प्रकरणात २८ वर्षानंतर निकाल आला असून, दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्याअभावी १६ आरोपींची सुटका केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय जिंदाल यांनी उत्तर प्रदेश पोलिस दलातील पीएसीच्या १६ जवानांची हत्येच्या आरोपातून सुटका केली. हाशीमपूर हत्याकांडात ४० हून अधिक मुस्लिमांची हत्या झाली होती.
१९८७ साली मेरठ शहरात दंगल उसळलेली असताना शोध मोहिमे दरम्यान पीएसीच्या जवानांनी हाशीमपूरयेथून मुस्लिमांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी १९९६ साली गाझियाबादच्या मुख्य न्याय दंडाधिका-यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कुटुंबियांनी निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २००२ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी दिल्ली तीस हजारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. १९ आरोपींपैकी तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला.
0
शेतक-यांना नुकसान भरपाई द्या – सोनिया गांधी

भिवानी – बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-याला मदत करण्याची जबाबदारी केंद्रात आणि हरयाणात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारची आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. आज आपला अन्नदाता संकटात सापडला आहे.
शेतक-यांची सध्याची अवस्था पाहता त्याला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधींनी शनिवारी हरयाणाचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थिती समजून घेतली. काँग्रेसने सध्या शेतक-यांच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकालाही काँग्रेसने जोरदार विरोध केला असून, संसदीय मार्गाने आणि रस्त्यावर या विधेयकाविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे. या विधेयकाविरोधात सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत.
0
माहुर येथे पाचव्या धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

माहुर (नांदेड) दि. २१ – जे वकळ एकाते त्यावर विश्वास ठेऊ नका. जे केवळ धर्मग्रंथात लिहीले आहे. म्हणून त्यावर विश्वार ठेऊ नका जे बुध्दीला पटते त्यावर विश्वास ठेवा. बुध्दीप्रमाणे वाद हीच बुद्घधम्माची शिकवण आहे असे प्रतिपादन समता परिषदेचे अध्यक्ष अप्पाराव मैंद यांनी केले.
बौद्घभूमि परिसर माहुर येथे आज शनिवारी २१ मार्च रोजी आयोजीत पाचव्या धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सकाळी भदंत बी. अश्वजीत यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मफेरी काढण्यात आली. पंचशिल धम्मध्वारोहनानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरूवातीला वामनदादा कर्डक संगीत अकादमी किनवट द्वारा प्रा. सुरेश पाटील यांनी अभिवादन गित सादर केले. उद्घाटन समारंभाच्या प्रास्तविकातून गोकुलदार वंजारे यांनी धम्माचे आचरण साधे मानव जिवन जगण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तर जेतवनचे सदस्य प्राचार्य के.व्ही. मुनेश्वर यांनी बौद्घ धम्म दु:ख निवारण्याचा मार्ग असल्याचे सागितले. माहुरचे माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी वाचण संस्कृतीवर भर देऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर , कॉ. गोविंद पानसरे, शाहीर साबळे यांना आदरांजलीचा ठराव पारीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन उत्तम कानिंदे यांनी तर आभार श्रीरंग जगताप यांनी मानले. सयोजन व्ही.के. सिरसाट यांनी केले होते. यावेळी जयवंत पाटील, नगर परिषद सभापती राज गंधेवाड, धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, निमंत्रक गोविंद मगरे, स्वागताध्यक्ष मनोज किर्तने, मिलींद सर्पे उपस्थित होते. यावेळी भदंत प्रा. सुमेथबोधी महाथेरो, भदंत विपशी स्थवीर, भदंत धम्मवश थेरो, भदंत अश्वजीत, भदंत राहुल आचार्य यांनी धम्मदेसना दिली. संचालन सुरेश पाटील यांनी तर आभार प्रल्हाद भवरे यांनी मानले.
0
शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा पकडला

यवतमाळ, दि. २१ – काळ््याबाजारात जात असलेला शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा पांढरकवडा – कळंब बायपासवरील व्हेअरहाऊसमध्ये आज शनिवारी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एसडीपीओच्या पथकाने ही कारवाई केली असून, सोनू बेग (२८) रा. कळंब चौक याला ताब्यात घेण्यात आले आहे.
शालेय पोषण आहार योजनेत प्रचंड गैरप्रकार होत असल्याची आरोड नेहमीच होते. जिल्’ातील शाळांना दरमहा धान्याचा पुरवठा करण्यासाठी येथील पांढरकवडा – कळंब बायपासवरील व्हेअरहाऊसमध्ये धान्याचे पोते ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या गोदामात धान्याची दरमहा अफरातफर केली जात होती. धान्य पांढºया पोत्यात भरून त्याची काळ््याबाजारात खुलेआम विक्री केल्या जात होती. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने व्हेअरहाऊसवर धाड टाकली. यावेळी धान्याची अफरातफर करताना पथकाने रंगेहात पकडले. एक हजार कट्टे जप्त करण्यात आले असून, सोनू बेग याला ताब्यात घेण्यात आले आहे. धान्याचा विषय जिल्हा पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पथकाने जप्त केलेला माल जिल्हा पुरवठा विभागाच्या स्वाधिन केला आहे.
0
यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक 27 ला

यवतमाळ. यवतमाळ शहरातील सर्व पत्रकारांना सूचित करण्यात येत आहे कि, यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेची निवडणूक येत्या 27 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता येथील पत्रकार भवनात होईल. त्यामुळे ज्या पत्रकारांनी सदस्यता शुल्क 150 रुपये देऊन सदस्यत्व घेतले नाही, त्यांनी 27 मार्चच्या दुपारी 12 वाजे पर्यंत सदस्यत्व घेवुन पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत भाग घ्यावा. 27 च्या 12 वाजेनंतर सदस्यत्व घेता येणार नाही याची नोंद वी. कारण या वेळेच्या अर्धा तासानंतर निवडणूक होणार आहे. त्यामुळे खालील ठिकाणी सदस्यत्व शुल्क भरून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी ही नम्र विनंती.
बीरेंद्र चौबे मो.नं. 9890417177 (नवभारत कार्यालय, तिरंगा चौक यवतमाळ)
नागेश गोरख मो. नं. 9423131710 (हिन्दूस्थान कार्यालय, चिंतामणी
कॉम्प्लेक्स, दारव्हा रोड, यवतमाळ)
0
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

जम्मू- कथुआ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी सांबा जिल्ह्यातील लष्करी तळाजवळ जोरदार गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
सकाळी पाच वाजून ५० मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी सांबामधील लष्करी तळाजवळील गोळीबार केला. यामध्ये एक नागरिक जखमी झाला. पपू यादव असे या नागरिकाचे नाव असून त्याला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुरक्षा अधिका-यांनी सांगितले.
गेल्या २४ तांसात दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. या दहशतवाद्याने मेशावर भागातील बुचारी येथील लष्कर ६६३ युनिटजवळही ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला. संपूर्ण परिसराला सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला असून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. जम्मू-पठाणकोट महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
शुक्रवारीच फियादीनच्या दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यामध्ये तीन सुरक्षा रक्षक, दोन नागरिक ठार झाले तर ११ जण जखमी झाले. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.
0
राज्यभरात नववर्षाचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई – चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नववर्षातील पहिला दिवस. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण जल्लोषात, मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नववर्षानिमित्त शोभायात्रा उत्साहात पार पडत आहेत.
हिंदू नववर्षाआरंभी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष भरभराटीचे, आरोग्यदायी आणि आनंदी जावो असे पंतप्रधानांनी ट्विटवर म्हटले आहे.
गुढीपाडव्यासोबतत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी उगडी, चेती चंद, नवरेहच्याही नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
0
पालकमंत्री संजय राठोड यांनी उभारली जनतेच्या समृद्धीची गुढी

यवतमाळ, दि. २१ – मांगल्याचं प्रतीक असलेला गुढीपाडवा जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंदासह आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज शनिवारी चैत्र प्रतिप्रदेनिमित्त कुटुंबासमवेत येथील टिळकवाडीस्थित आपल्या घरी गुढी उभारली. हे नवीन वर्ष तमाम जनतेला अधिक सुखकारक ठरून, सध्या निसर्गाच्या लहरीपणाने संकटात असलेल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातही सुखाची पेरणी करेल, असा आशावाद यावेळी ना. संजय राठोड यांनी व्यक्त केला.चैत्र महिना हा मराठी महिन्यातला पहिला दिवस असून अनेक चांगल्या कामांची सुरूवात, नवीन संकल्प हे आजच्या दिवसापासून केले जातात. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि येथील शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या कल्याणाची कामे आपल्या हातून सदैव घडावी यासाठी ईश्वराने आपल्याला काम करण्याची अधिक ऊर्जा द्यावी आणि जनतेचे प्रेम व सहकार्य असेच मिळत राहावे, अशी प्रार्थना याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केली. यावेळी ना. संजय राठोड यांच्या सहचारिणी सौ. शीतल, मुलगी दामिनी, मुलगा सोहम यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य, शिवसेनेनचे पदाधिकारी, शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
0
पाकिस्तान पराभूत, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी

अॅडलेड, दि. २० – विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे. आता सेमी फायनलमध्ये २६ मार्च रोजी कांगारुंची गाठ भारताशी पडणार आहे. कप्तान स्मिथ आणि शेन वॅटसनने प्रत्येकी अर्धशतक झळकावले आणि २१४ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. वॅटसन व नंतर मॅक्सवेल या दोघांचाही एकेक झेल वहाबच्या गोलंदाजीवर पाकच्या क्षेत्ररक्षकांनी टाकला, अन्यथा सामन्यात अधिक रंगत आली असती. चार बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडणा-या हेझेलवूडला समानावीराचा किताब देण्यात आला.
वर्ल्डकपमधील तिस-या क्वार्टर फायनलमध्ये पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली आणि पाकिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१४ धावांचे माफक आव्हान असले तरी पाकची गोलंदाजी काही चमत्च्याकार करेल का याची उत्सुकता होती.
पाकिस्तानने नाणेेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्फराज अहमद आणि अहमद शेहजाद ही सलामीची जोडी अवघ्या २४ धावांमध्येच तंबूत परतली. सर्फराज १० तर शेहजाद ५ धावांवर बाद झाला. यानंतर हारिस सोहेल व कर्णधार मिसबाह उल हक या जोडीने पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसबाह ३६ धावांवर असताना बाद झाला. यानंतर हारिस सोहेल ४१ धावांवर बाद झाला. उमर अकमल, शाहिद आफ्रिदीही स्वस्तात माघारी परतले. वहाब रियाझ आणि एहसान आदिल या तळाच्या फलंदाजांनी १६ व १५ धावांची खेळी करत पाकिस्तानला २०० चा टप्पा गाठून दिला. शेवटी ४९.५ षटकांत २१३ धावांवर पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियातर्फे जॉस हॅझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मिशेल स्टार्क व ग्लॅन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन तर मिशेल जॉन्सनने एक विकेट घेतली. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सर्व फलंदाज झेलबाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर नमवत भारत फायनलमध्ये प्रवेश करतो याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.
0
शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात औषधांचा घोटाळा

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या साईबाबा रुग्णालयात औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी तीन कर्मचा-यांना निलंबित केले आहे.
मच्छिंद्र थोरात (मटेरीयल मॅनेजर), प्रकाश दिघे (फार्मासिस्ट), आणि दिलीप अदिच्च्या उर्फ शर्मा (स्टोअर मॅनेजर) अशी या तिघांची नावे असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
याप्रकरणी संस्थानकडे तक्रार मिळाल्यानंतर औषधांचा साठा आणि रेकॉर्डची तपासणी केली असता प्राथमिक टप्प्यात औषधसाठा तसेच टेंडरींगमध्येही तफावत असल्याचे आढळून आल्याने या तिघांना निलंबित केले आहे.
श्रीरामपूर येथील स्पिरीट पुरवठा करणा-या कंत्राटदारानेही रुग्णालयात स्पिरीट पोहचवण्यासाठी संस्थानच्या वाहनांचा दुरुपयोग केल्याचेही निदर्शनास आले आहे. संस्थानच्या वार्षिक ताळेबंद तपासणीनंतरच या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ते उघड होईल, असेही जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. यात हलगर्जीपणा केल्यास उच्च न्यायालयात खटला दाखल करु असे कुलकर्णी यांनी सांगितले.
0
जनता एक्सप्रेस घसरली, ३० ठार

लखनऊ -उत्तर प्रदेशमधील बचारवन रेल्वे स्थानकाजवळ डेहराडून-वाराणसी जनता एक्सप्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये ३० जण ठार तर १५० जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ पासून ५० किमी अंतरावर असेल्या बचारवन रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे लखनऊचे विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी सांगितले. घटनास्थळी रेल्वे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे लखनऊ-वाराणसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडूनदोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल आणि अजय शुक्ला यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.
0
काळ्या पैशासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली- काळ्या पैशाला आवर घालणारे विधेयक शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केले. यामध्ये परदेशात काळा पैसा दडवणा-यांवर कायदेशीर कारवाईच्या कडक उपाययोजना असून यात तीन ते १० वर्षापर्यंत तुरुंगवास आणि २५ लाख ते एक कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
बेनामी परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता (नवीन कर तरतूद) विधेयक, २०१५ यामध्ये ज्यांच्याकडे परदेशी मालमत्ता आहे अशांना पहिल्या वेळेस तीन ते १० वर्षाची शिक्षा किंवा कर आणि दंड भरून कायदेशीर कारवाईतून सुटण्याचा मार्गही सुचवण्यात आलेला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास हा कायदा एक एप्रिल २०१६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
0
शाहीर साबळे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गाणे आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांचे शुक्रवारी परळ येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
आपल्या शाहीरीतून प्रबोधन करणा-या शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मोठे योगदान दिले होते.
शाहीर साबळे उत्तम कवी, गीतकार, ढोलकीवादक, नाटककार होते तसेच ते उत्तम गायकही होते. १९२३ साली सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील पसरणी गावात त्यांचा जन्म झाला होता. मराठी चित्रपट-नाटय सृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत.
0
भारताची सेमीफायनलमध्ये धडक, बांग्लादेशवर १०९ धावांनी विजय

मेलबोर्न, दि. १९ – रोहित शर्माच्या (१३७) दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचे सर्व फलंदाज १९३ धावांवर बाद झाले. उमेश यादवने ४ तर शमी व जडेजाने प्रत्येकी २ आणि मोहित शर्माने १ बळी टिपत बांग्लादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत भारताने हा सलग सातवा सामना जिंकला असून कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा शंभरावा विजय आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाशी भारताची सेमी फायनलमध्ये गाठ पडेल.
तत्पूर्वी रोहित शर्मा व सुरेश रैनाच्या खेळीच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.












