
मुझ्झफरनगर- मुझ्झफरनगर मधील नावला गावात एका सात वर्षाच्या चिमुरडीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी अमित कुमार याला अटक करण्यात आली आहे.
अमित कुमार हा शेतात नोकर म्हणून काम करत होता. मानसुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावला गावातून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आधिकारी डी. के. मित्तल यांनी दिली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने आपल्या मुलीला घरातून पळवून शेजारच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडिलांनी केली.
पिडीत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Archive for March, 2015
0
नोकराकडून मुलीवर बलात्कार
0
भिंत कोसळून दोन ठार

दहिसर – दहिसरमधील शांतीनगर भागात पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीची एका इमारतीची संरक्षण भिंत चाळीवर कोसळली. या दुर्घटनेत एका कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.
शांतीनगरमध्ये बांधकाम सुरु असणा-या इमारतीसाठी काल सायंकाळी रेतीचे ट्रक खाली करण्यात आली. चाळीला लागून असणा-या भिंतीजवळच हे ट्रक खाली करण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास रेतीच्या भारामुळे चाळ आणि बांधकमाच्या साइटच्या दरम्यान बांधण्यात आलेली भिंत कोसळली. भिंत कोसळ्याने चाळीतील सर्व घरे रेतीखाली गाडली गेली. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे चाळीतील काही रहिवाशी ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढिगा-याखालून दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
0
काँग्रेसचे 20 माजी आमदार भाजपच्या वाटेवर – रावसाहेब दानवे

मुंबई – राज्यातील पाच अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असून येत्या आठवड्याभरात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास 25 माजी आमदार पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
भाजप-शिवसेना युतीचं सरकार मजबूत असल्याचा दावा करत मित्र पक्ष असलेला पक्षामध्ये सुरंग लावायचा नाही अथवा त्यांची माणसे फोडायची नाहीत असं आम्ही ठरविले आहे. त्यामुळे इतर पक्षांतून भाजपला पोषक असणारी, संघटनेला बळ देणारी माणसं जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. वाशिम मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांच्यासह पदाधिकार्यांनी काल (शनिवारी) दानवे यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युती होणार, हे मी आधीच स्पष्ट केलं होतं. पण वरच्या पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर युती करावयाची की नाही याचे अधिकार स्थानिक पदाधिकार्यांकडे आहेत. युतीमध्ये स्थानिक पातळीवर योग्य जागावाटप होतं काय, यावरही या युतीचे भवितव्य अवलंबून राहील, असं दानवे म्हणाले.
0
केबल चॅनलच्या ऑफीसला आग

सोलापूर – शहरात सात रस्ता भागात मिलियन स्केअर या बहुमजली इमारतीतील सोलापूर इन केबल न्यूज या स्थानिक न्यूज चॅनलच्या ऑफिसला आज पहाटे अचानक आग लागली. यात भीमा रिद्धी डिजिटल या केबल नेटवर्कची कंट्रोल रूम जळून खाक झालं आहे. या आगीत सुमारे पाच कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी 7 नंतर महापालिका अग्निशमन दलाचे दहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
0
तिघींचा खून; अाराेपी पाेलिसांच्या ताब्यात

चिखली- विभक्त राहणारी पत्नी, मुलीसह सासूचा खून करणारा अाराेपी संताेष भाडाईतला अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. त्याने २४ मार्चच्या मध्यरात्री अापल्या सासूरवाडीत येऊन चॅनलवर माेठ्या अावाजात गाणे लावून या तिघींचा खून केल्याची कबूली दिली अाहे.
चिखली तालुक्यातील सवणा येथे विमलबाई गाढवे, गीता संतोष भाडाईत आणि आरती भाडाईत या तिघींचा निर्घृण खून झाला हाेता. गीताचा नवरा व विमलबाईचा जावई संताेष यानेच हे खून केल्याचा पाेलिसांना संशय हाेता. दरम्यान, संताेष गावात आल्याचे समजताच पोलिसांनी शुक्रवारी दुपारी इसोली येथे त्याला अटक केली. दारूच्या आहारी गेलेल्या संतोषचे सासू विमलबाई यांच्याशी नेहमी खटके उडत होते. त्यातून त्याने घरातील लोखंडी फावड्याच्या दांड्याने सासू, पत्नी, मुलगी या तिघींनाही संपवून मुंबई गाठली होती. पत्नी व सासूला ठार मारल्यानंतर आपली मुलगी जोरजोराने रडत होती. त्यामुळे नाइलाजाने तिलाही ठार मारावे लागले. मात्र, मुलीला मारल्याचा आता पश्चाताप होतोय, असे संतोषने कबूली जबाबात सांगितले.
0
मेधा पाटकरांचा आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा

नवी दिल्ली – आम आदमी पक्षामध्ये सुरु असलेल्या केजरीवालशाहीला कंटाळून आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना ज्या पध्दतीने पक्षातून काढण्यात आले त्याचा मेधा पाटकर यांनी निषेध केला असून, त्यांना अन्यायी वागणूक देण्यात आली असे पाटकर यांनी म्हटले आहे. पाटकर यांनी मागच्यावर्षी आपच्या तिकीटावर मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली होती.आपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या शनिवारच्या बैठकीमध्ये गृहयुध्दाने टोक गाठले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांची बाजू ऐकून न घेता बहुमताच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये लोकशाहीची हत्या झाली असे बैठकीतून बाहेर आलेल्या योगेंद्र यादव यांनी सांगितले. बैठकीपूर्वी यादव-भूषण यांचे नेतृत्व मानणा-या कार्यकारीणीच्या सदस्यांना आतमध्ये न सोडल्यामुळे योगेंद्र यादव बैठकस्थळीच धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी बैठक स्थळी योगेंद्र यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती.
0
जागतिक क्रमवारीत सायना नंबर १

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने भारतासाठी चमकदार कामगिरी करणारी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शनिवारी नवा इतिहास रचला.
सायना जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा इंडियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यफेरीत पराभव झाल्याने सायनाला कारकीर्दीत प्रथमच अव्वल स्थान मिळाले आहे.त्याचबरोबर सायनाने उपांत्यफेरीच्या सामन्यात जापानच्या यूई हाशीमोटोचा २१-१५,२१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करुन इंडियन ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी गाठली.
अशी कामगिरी करणारी सायना पहिली भारतीय महिला असली तरी, अव्वल स्थानावर पोहोचणारी ती दुसरी भारतीय आहे. याआधी प्रकाश पदुकोण यांनी पुरुष बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत पहिले स्थान भूषवले आहे.लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेत्या सायनाने कारकीर्दीत १४ आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवली आहेत. प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
0
पोहरादेवी येथील रामनवमी उत्सवास ना. संजय राठोड यांची भेट
यवतमाळ, दि. २८ – बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे आयोजित रामनवमी उत्सवास आज शनिवारी राज्याचे महसूल राज्यमंत्री, यवतमाळचे पालकमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन श्री संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
देशभरातील लाखो भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. ना. संजय राठोड यांनी यावेळी उत्सवात सहभागी भाविकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर ना. राठोड यांनी संत रामराव
महाराज यांचे आशीर्वाद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, दिग्रस तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, जि.प.सदस्य दिवाकर राठोड, उप तालुका प्रमुख सुभाष जाधव, डी.पी.चव्हाण, नामदेव राठोड, घनश्याम राठोड, मोहन नंदूरकर, कोदेलाल राठोड, राजू देशमुख आदी उपस्थित होते. पोहरादेवी येथे देशभरातून येणार्या भाविकांसाठी ना.संजय राठोड यांच्या वतीने टेन्ट उभारण्यात आले होते. या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह, रूग्णवाहिका आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथेही ना. संजय राठोड यांनी भेट देऊन भाविकांशी चर्चा केली.
0
डोर्ली येथे युवकाचा खून

यवतमाळ , दि. २८ – पूर्ववैमनष्यातून एका युवकाचा खून केल्याची घटना २७ मार्च रोजी रात्री डोर्ली येथे घडली. पंकज नंदकिशोर नागरगोजे रा.डोर्ली असे मृतकाचे नाव आहे . आरोपी संदिप उर्फ सोनु रामजी उगलमुगले (२५) रा. डोर्ली याने पूर्ववैमनष्यातून वाद केला. त्यानंतर डोक्यावर दगडानेमारुन पंकजला जागीच ठार केले. याप्रकरणी पुरुषोत्तम नंदकिशोर नागरगोजे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0
आपमध्ये ‘राडा’, यादव, भूषण यांची हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. २८ – आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज युद्धभूमीचे स्वरूप आले होते. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचे भवितव्य ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत त्या दोघांचीही कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत आपल्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून बाहेर हाकलण्यात आल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे.
शनिवारी पार पडलेल्या बैठकीची सुरूवातच वादळी झाली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल बैठकीसाठी उपस्थित राहिले खरे, मात्र योगेंद्र यादव आणि पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आत प्रवेशच दिला गेला नाही. यामुळे नाराज झालेले यादव हे धरणे आंदोलनास बसले, अखेर थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
त्यानंतर बैठकीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रा. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांनीही पक्षाच्या सर्व पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत आमचे कुठलेही म्हणणे ऐकून घेतले नाही, बाऊन्सर्सनी आम्हाला व कार्यकर्त्यांना मारहाण करत बाहेर काढले, असा आरोप यादव यांनी केला. ही लोकशाहीची हत्या असल्याचेही ते म्हणाले.दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला आहे.
0
लाचखोर वनपालासह एकास अटक

यवतमाळ, दि. २७ – सागवाण झाडाची मोक्का पाहणी करून पंचनामा तयार करून देण्यासाठी शेतकºयाकडून पाच हजाराची लाच घेणाºया पांढरकवडा येथील वनपालासह एका खाजगी व्यक्तीस अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी पांढरवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात ही कारवाई केली.
गौतम मारोती पुनवटकर (५६) असे लाचखोर वनपालाचे नाव असून ते पांढरवकडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत आहे. तर अंबादास भीमराव मेश्राम (३५) रा. राजनी ता. झरी जामणी असे शेतकºयाजवळून लाच घेणाºया व्यक्तीचे नाव आहे. पांढरवकडा तालुक्यातील एका शेतकºयाने शेतातील सागवान कटाई केलेल्या झाडाची मोक्का पाहणी करून पंचनामा करावा यासाठी पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज केला होता. मात्र तेथे कार्यरत वनपाल गौतम पुनवटकर यानी मोक्का पाहणी व पंचनामा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम खाजगी इसम अंबादास मेश्राम यांचे मार्फत देण्याचे ठरले होते. दरम्यान या शेतकºयाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेतक्रार दिली. त्यावरून आज पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पथकाने सापळा रचून वनपाल पुनवटकर व मेश्राम याना पाच हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, पोलीस निरीक्षक नरेंद्र इंगोले, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, गजानन राठोड, अमित जोशी, निलेश पखाले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, सुधाकर मेश्राम, गिरी, कोकेवार यांनी केली.
0
अपघातात शिक्षकासह पत्नी ठार

पुसद ,दि. २७ – भरधाव टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता माहुर पुसद रोडवरील इंद्रानगर फाट्याजवळ घडली.
स्थानिक ओमनगर श्रीरामपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रघुनाथ हिरासिंग राठोड (४५) व त्याच्या पत्नी कांता रघुनाथ राठोड (४०) हे दाम्पत्य आपल्या गावी वाकद येथे दुचाकीने जात होते. अशातच इंद्रानगर फाट्याजवळ भरधाव टिप्पर क्रमांक एम.एच.३० ए ९१५१ ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये राठोड दाम्पत्य दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला. यावेळी टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
अमोल शेरकरला १० वर्षांची शिक्षा

पुणे – पुण्याच्या स्प्रिंगडेल शाळेच्या मुलींना घर ते शाळा असे बसमधून ने-आण करणा-या बस अटेंडंट अमोल शेरकरला मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली आहे. कोर्टाने अमोल शेरकरला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
सिंहगड इन्स्टिट्युटच्या स्प्रिंगडेल शाळेत केजीच्या विद्यार्थीनीवर जबरदस्ती झाल्याचे प्रकरण उघड झाले आणि मुख्याध्यापिकेने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बस अटेंडंट अमोल शेरकर (वय २५, रा. वडगाव बुद्रुक, मूळ गाव पंढरपूर) आणि बस ड्रायव्हर विनायक कारंडे (वय २५, रा. वडगाव बुद्रुक, मूळचा सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. दोघांवरही बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ कलम ५,६,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुलांना ने-आण करणाऱ्या बसमधील बस अटेंडंट अमोल शेरकरने चालू बसमध्ये पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. बसवरील ड्रायव्हर विनायक कारंडे याने या प्रकाराची माहिती असतानाही तोंडावर बोट ठेवले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्याध्यापिकेकडे लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला होता. कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेऊन सुनावणीअंती अमोल शेरकरला दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा ठोठावली.
0
बांगलादेशमध्ये चेंगराचेंगरी, दहा यात्रेकरु ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाका येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावर पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दहा हिंदू यात्रेकरु ठार झाले. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे तर अनेक जण जखमी झाले.
सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. नदीच्या तटावर अस्तमी स्नानासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दहा यात्रेकरुंचा मृत्यू झाला. हे सर्व यात्रेकरु ५० हून अधिक वयाचे होते. मृतांमध्ये सात महिला होत्या अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली.तर या दुर्घटनेत ३० भाविक जखमी झाले. या जखमी भाविकांवर उपचार करण्यासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या स्वयंसेवक तसेच पोलिसांची संख्या कमी असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप काही यात्रेकरुंनी केला. ढाकामधील ब्रम्हपुत्रानदीच्या काठावर असलेले लागलबंध हे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नेपाळ, भारत, तसेच बांगलादेशातील मोठ्या प्रमाणात भाविक येथे पवित्र स्नानासाठी येतात.
0
अटलबिहारी वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वाजपेयींना शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी एक मंडप उभारण्यात आले होते. येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रसिद्धीमाध्यमांना कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवण्यात आले होते.
अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची घोषणा गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती. तेव्हा ते फक्त थोडेसे हसले होते. परंतू दोन दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रपती स्वतः घरी येऊन त्यांचा हा सन्मान करणार आहेत, असे सांगितले तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अटलजी गेल्या काही वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना अल्झायमर डिमेंशिया झाला आहे.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करताना वाजपेयींनी दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९९६ मध्ये आलेले त्यांचे सरकार फक्त तेरा दिवस टिकले. त्यानंतर १९९८ मध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा वाजपेयींना संधी दिली. त्यांच्या या सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.
0
धनगर आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

विधानपरिषदेत आज (शुक्रवारी) धनगर आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देणं घटनाबाह्य आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
यापूर्वी सत्तेवर असणार्या सरकारने आरक्षण दिले असते तर, आता ही वेळच आली नसती, असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले आहे. मात्र, आता आरक्षण मिळवायला किती वेळ लागणार असून, हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार, अशा प्रश्नांनी विरोधकांनी सरकारला घेरलं. तसंच आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरूवात केल्यावर विरोधकांनी तांत्रिक मुद्दे काढत गोंधळ घातला. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आरक्षणासंदर्भात कालावधी निश्चत करण्याची सूचना दिली आहे.
0
श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नागेश गोरख तर सचिवपदी नीलेश फाळके


यवतमाळ, दि. २७ – यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दै. हिंदुस्थानचे आवृत्ती प्रमुख नागेश गोरख यांची तर सचिवपदी दै. सकाळचे उपसंपादक नीलेश फाळके यांची अविरोध निवड झाली.
जिल्हाध्यक्ष नितिन पखाले, सचिव राजकुमार भितकर यांचा कार्यकाळ संपली. त्यामुळे आज २७ मार्च रोजी अध्यक्ष व सचिवपदाच्या निवडीसाठी पत्रकार भवनमध्ये सभेचे आयोजन केले होते.यावेळी गोरख व फाळके यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ पत्रकार गणेश बयास तर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिरुद्घ पांडे, रघुविरसिंह चौहाण यांनी काम पाहीले. यावेळी मावळते अध्यक्ष नितिन पखाले यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.
0
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा राजीनामा

नवी दिल्ली- ‘आप’मधील केजरीवाल समर्थक व विरोधकांमधील मतभेद अधिक तीव्र होत आहेत. आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा गुरुवारी राजीनामा दिला.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित केली होती. त्यात पक्षात समेट घडवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
भूषण आणि यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्याच्या निर्णयावर केजरीवाल ठाम होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रशांत भूषण यांनी पक्षाविरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
0
शालीमार एक्स्प्रेसमध्ये टीसीवर हल्ला

नाशिक, दि. २७ – तिकीट मागितले म्हणून प्रवाशांनी टीसीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शालीमार एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिकीट निरीक्षक चुनीलाल गुप्ता यांना उपचारांसाठी तातडीने इगतपुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भूसावळ येथे ड्युटीवर असलेले गुप्ता बुधवारी रात्री तिकीट तपासण्यासाठी हावडा ते लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेसच्या डब्यात चढले. नाशिकरोडहून रात्री साडेबाराच्या सुमारास गाडी सुटल्यानंतर त्यांनी दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना दार लावून घेण्यास सांगत तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तिकीट दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर गुप्तांनी त्यांना जनरल बोगीत जाण्यास सांगितले असता त्या प्रवाशांना राग आणि एकाने गुप्तांच्या चेहे-यावर वस्त-याने वार केले. त्यामुळे गुप्ता जबर जखमी झाले आणि जबर गोंधळ उडाला. गाडी देवळाली स्टेशनजवळ पोहोचताचे ते दोघे आरोपी उडी मारून फरार झाले. इतर प्रवाशांनी गुप्तांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
राष्ट्रीय बंजारा टायगर्स तीव्र आंदोलन छेडणार

ठाणे, (सतिष राठोड)
बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी राष्ट्रीय सामाजिक संघटना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा ५ वा वर्धापन दिन सोहळा २५ मार्च रोजी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात आला असून त्याचबरोबर १८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमितीच्या वतीने झालेल्या मोर्चाचे सरकारने उत्तर न दिल्यामुळे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून बंजारा समाजाच्या अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात केले आहे, जर सरकारने बंजारा समाजाच्या मागण्यांचा विचार येत्या १५ दिवसात केला नाही तर राष्ट्रीय बंजारा टायगर्स
या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर रास्ता रोको,तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आत्मारामजी जाधव यांनी केले आहे.अशी माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे, कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी डाॅ. अश्विनी जोशी,जिल्हाधिकारी ठाणे,यांना निवेदनाद्वारे दिली असुन बंजारा समाजाच्या मागण्यांविषयी १५ दिवसात विचार केला नाही तर तीव्र आंदोलन रा.बंजारा टायगर्सच्या वतीने छेडण्यात येईल. निवेदन देतांना डाॅ.अरविंद पवार,डाॅ.बी.आर.राठोड,कृष्णा चव्हाण,विनोद राठोड, बालाजी चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.










