पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

गोहत्येप्रकरणी पहिला गुन्हा 0

गोहत्येप्रकरणी पहिला गुन्हा

images
नाशिक – महाराष्ट्र सरकारनं गोकायदा वंशहत्या बंदीचा लागू केल्यानंतर या कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात या गुन्ह्याची नोंद झाली असून दोन गायींच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपींच्या दुकानातून १५० किलो मांसही जप्त करण्यात आलं आहे.

मालेगावातील एका दुकानात गायीच्या मांसाची बेकायदा विक्री सुरू असल्याची तक्रार बुधवारी संध्याकाळी आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे आली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक संबंधित दुकानावर पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच दुकानवाले पळून गेले. स्थानिकांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी आहे. गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा असून त्यासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद आहे.

March 26, 2015 in मुख्य पान
खुनातील आठ आरोपींना जन्मठेप 0

खुनातील आठ आरोपींना जन्मठेप

images4
यवतमाळ, दि. २६ – ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावर येथील एका युवकाचा शारदार शस्त्राने वार करून खुन केल्याप्रकरणी आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला. राजू दुर्गाप्रसाद गुप्ता (४०), गेंदलाल दुर्गाप्रसाद गुप्ता (४६), जावेद शहा बशीर शहा (३२), शेख हमीद शेख अफजल (३३), अब्दुल राशीद शेख अफजल (३३), मुस्ताक शहा मदार शहा (३८), फरहान शहा मुक्कदर शहा (२८), शेख लालु शेख अप्पु कुरेश (२८) सर्व रा. सावर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
१० नोव्हेंबर २०११ रोजी मृतक अजय उर्फ केटू स्वरुपसिंग चव्हाण रा सावर याच्यासोबत आरोपी राजू याने माझ्या घरा समोर शिवीगाळ का केली या कारणावरून वाद केला. त्यानंतर राजूने आपल्या जवळील धारदार शस्त्राने अजयच्या गळ््यावर वार केले. तर उर्वरीत सातही आरोपींनी धारदार कुºहाड, चाकु, लोखंडी पाईप यासह अन्य शस्त्रांनी वार केल्याने अजय जागीच ठार झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मृतकचा भाऊ विजय चव्हाण याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपींनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्राने खुन केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम १४३, १४७,१४८, १४९, ३०२, ३४१, १२० (ब), ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, १३५ मुंबई पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी आरोपींना अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले व तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश डि.व्ही. ठाकरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी फिर्यादी विजय चव्हाण, साक्षीदार राजू व्यास, वैद्यकीय अधिकारी त्रिशुल पडोळे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळू गायगोले याच्यासह एकुण १२ जणांची साक्ष तपासण्यात आली. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आठही आरोपींना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने पि.व्ही. गाडबैले यांनी काम पाहीले.

March 26, 2015 in मुख्य पान
व्हिएतनाममध्ये औद्योगिक दुर्घटना, १४ ठार 0

व्हिएतनाममध्ये औद्योगिक दुर्घटना, १४ ठार

Industry
हानोय – मध्य व्हिएतनामच्या औद्योगिक परिसरात लोखंडी गजाचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा मजूर ठार झाले असून, ३० मजूर जखमी झाले आहेत.
हा तिन्ह प्रांतातील वंग अंग आर्थिक क्षेत्रात बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. काही मजल्यांचे हे लोखंडी गजाचे बांधकाम होते. दुर्घटनास्थळी बचाव मोहिम सुरु असून, व्हिएतनामचे सैन्य पथक आणि पोलिस या बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.
अजूनही काही मजूर ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. बांधकाम स्थळी हजारो कामगार काम करत आहेत.

 

March 26, 2015 in देश-विदेश
पंतप्रधानांशी खुल्या चर्चेस आम्ही तयार – अण्णा हजारे 0

पंतप्रधानांशी खुल्या चर्चेस आम्ही तयार – अण्णा हजारे

images (3)
पुणे – भू संपादन कायद्याविरोधात भाजपा सरकारविरोधात निर्दशने करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कायद्याताली वादग्रस्त कलमांसंबंधी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
भू संपादन कायद्याविरोधात गडकरींनी विरोधी पक्षांना चर्चेचे निमंत्रण दिल्याप्रकरणी अण्णांना विचारले असता ते म्हणाले, गडकरी यांचा गृहपाठ कच्चा आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसह या कलमांवर खुली चर्चा करण्यास तयार आहोत.
‘लोकांनाही ही खुली चर्चा पाहू द्या आणि या कायद्यातील मुद्दे समजून घेऊ दे’, असे अण्णा यांनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना भू संपादन कायद्याबाबत खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले होते.

 

March 26, 2015 in मुख्य पान
भारताचा दारुण पराभव, विश्वचषकातील आव्हान संपुष्टात 0

भारताचा दारुण पराभव, विश्वचषकातील आव्हान संपुष्टात

AP3_26_2015_000078B
सिडनी- विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताचा दारुण पराभव झाला. यासोबतच भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यापासून भारताने विजयी मालिका कायम ठेवली होती. मात्र उपांत्यफेरीच्या सामन्यात ही मालिका अखेर खंडित झाली. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत सातव्यांदा अंतिम फेरी गाठली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३२९ धावांचे मोठे आव्हान गाठताना भारताला ४६.५ षटकात केवळ २३३ धावा करता आल्या. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात किल्ला लढवत महेंद्रसिंग धोनीने भारताच्या विजयाच्या आशा थोड्या पल्लवित केल्या होत्या. मात्र तो बाद झाला आणि विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. धोनीने ६५ चेंडूत ६५ धावा केल्या.
यापूर्वीच्या सात सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणारे भारताचे फलंदाज आणि गोलंदाज ऑस्ट्रेलिया संघापुढे निष्प्रभ ठरले. सात सामन्यांमध्ये ७० बळी घेणा-या भारतीय गोलंदाजाची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र चांगली झाली नाही. वेगवान मारा कऱणा-या मोहम्मद शामीला या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही. उमेश यादवने चार गडी बाद केल्याने ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाले होते.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्ही़ड वॉर्नरला (१२) बाद करुन भारताला पहिले यश झटपट मिळाले. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (१२) धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. मात्र स्मिथ आणि फिंचने दुस-या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक १८२ धावांची भागीदारी केली.
शानदार शतक साकारुन ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देणारा स्टीवन स्मिथ (१०५) धावांवर बाद झाला. स्मिथने ९३ चेंडूत (१०५) धावा केल्या. स्मिथच्या शतकी खेळीत अकरा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. उमेश यादवने स्मिथला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
स्मिथ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेल आणि फिंचने तिस-या विकेटसाठी झटपट ३५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच अश्विनने त्याला (२३) धावांवर रहाणेकरवी झेलबाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या फिंचला (८१) धावांवर उमेश यादवने शिखर धवनकरवी झेलबाद झाला.
स्टीवन स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला होता. मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच पाठोपाठ ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कही (१०) धावांवर बाद झाला. त्याला मोहितने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. मात्र फॉकनर (२१) आणि वॉटसनने (२८) फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली. याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३२९ धावांचे अवघड लक्ष्य दिले होते.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन ४५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जॉन्सनच्या उसळत्या चेंडूवर हूक मारण्याचा मोह कोहलीला आवरता आला नाही. तर हेझलवूडच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनने (४५) मॅक्सवेलकडे झेल दिला.
अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे ४४ धावा करुन तंबूत परतला. त्याने पाचव्या विकेटसाठी कर्णधार धोनीसह ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेला रविंद्र जाडेजाही अवघ्या १६ धावा करुन धावबाद झाला.
त्यानंतर सुरेश रैना (७) फॉकनरच्या चेंडूवर हॅडिनकडे झेल देत बाद झाला. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात भक्कम पाय रोवून उभा असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी (६५) धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजयाचा अर्धा गड जिंकला.
आर अश्विन पाच धावांवर त्रिफळाचीत बाद झाला. तर मोहित शर्मा आणि उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी परतल्याने भारताचा डाव ४६.५ षटकात २३३ धावांमध्ये आटोपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- सात बाद ३२८
भारत- ४६.५ षटक सर्वबाद २३३
सामनावीर- स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

March 26, 2015 in क्रीडा
रामनवमी शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी होणार 0

रामनवमी शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी होणार

download (1)
यवतमाळ ,दि. २६ – यवतमाळला सांस्कृतीक वैभवात थर घालणारी रामनवमी शोभायात्रा शनिवार २८ मार्च रोजी निघणार आहे. या शोभायात्रेच्या भव्य आयोजनासाठी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती सज्ज झाल्याची माहिती आयोजन समितीचे राम लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामनवमीला दु. २ वा. जयहिंद चौकातील राममंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल तत्पूर्वी विश्वहिंदू परिषदेचे केंद्रीय विनायक देशपांडे आणि प्रांत कोषाध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामरथावरील श्रीराम मुर्तीचे पुजन होईल. शोभायात्रेकरिता यावर्षी रबराचा नवीन आकर्षक रथ साकारण्यात आला आहे. यवतमाळातील तरुण, तरुणी उदयास आलेले ‘शिवसमर्थ ढोल – ताशा पथक’ यावर्षी शोभायात्रेत सहभागी होवून रोहर्षीक वादन करणार आहे. टाळ मृदुंगाचा गजर करीत भजनी मंडळ व लेझीम पथकासह, दिंड्या, रामयणकालीन प्रसंगावर आकर्षक झॉकी, सामाजिक प्रबोधनात्मक विविध चित्ररथ व कला क्रिडागुणांचे सादरीकरण करणारे आखाडे, भन्नाटी, लाठ्याकाठ्या, दांडपट्टा व वाद्यवृंदाचा समावेश या शोभायात्रेत करणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रेवर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. संत सेना चौकात शोभायात्रा समारोपप्रसंगी ५१ विवाहीत जोडप्यांच्या हस्ते श्रीरामाची सामुहिक आरती होणार आहे. संपूर्ण शोभायात्रे दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी ४०० बजरंग दलाचे कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत. यवतमाळ करांनी या शोभायात्रेत सहकुटूंब सहभागी होवून शोभायात्रेची शोभा वृद्घींगत करावी असे आवाहन विजय सिंघानिया, राम लोखंडे, मनोज औदार्य, अनुप चमेडीया, अजय चव्हाण व शोभायात्र समितीने केले आहे.

March 26, 2015 in विदर्भ
स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ 0

स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ

download
यवमाळ दि. २६ – स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना आज दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामाजवळ सकाळी उघटकीस आली. अनैतिक संबधातून घडलेला हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या शासकीय गोदामाजवळ मोकळी जागा आहे. या ठिकाणचा शौचालयासाठी वापर केला जातो. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास तेथून जात असताना, त्याला एका हिरव्या पनीत काहीतरी बांधून असल्याचे दिसून आले. त्याने जवळ जाऊन पाहल्यानंतर त्याला पनीत स्त्री जातीचे अर्भक आढळले. याची चर्चा सर्वत्र पसरातच बघ्यांची गर्दी झाली. शहारात तीन पोलीस स्टेशन असल्यामुळे पुन्हा हद्दीचा वाद झाला. शिवसनेचे पराग पिंगळे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे जमादार घटनास्थळी आले. हिरवी पन्नी शासकीय रुग्णालयाची असल्यामुळे बाळाने कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन्म दिला असावा, असा तर्क काहीनी लावला. सोबतच पिवळी बॅग असल्यामुळे बॅगमध्ये बाळाला आणल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. स्त्री चा तिरस्कार आजही होत असून, तिची निर्घूनपणे हत्या करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत वडगावरोड पोलीस स्टश्ोनला तक्रार देण्यात आली आहे. अनैतिक संबधातून बाळ जन्मलेले असावे व पाप लपविण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

 

March 26, 2015 in विदर्भ
 शेतकºयाने घेतला विषाचा घोट, वाटेत मृत्यू 0

शेतकºयाने घेतला विषाचा घोट, वाटेत मृत्यू

images
पांढरवकडा, दि. २४ – निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी राहत आहे. बोरगाव येथील शेतकºयाने कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेऊन रस्तयाने पायी चालत असताना विष प्राशन केले. रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज मंगळवारी २४ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली.
तानबा वाघू तोडसाम (४०) रा. बोरगाव (कडू) असे शेतकºयाचे नाव आहे. यावर्षी गारपिट व अतिवृष्टीने हाती आलेले पिक मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. तीन महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असून त्यासाठी पैसे कुठून आणायचे, सावकार व बँकेचे कर्ज कसे परत करायचे, कुटूंबाचा गाडा कसा हाकायचा यासह विविध प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकले आहे. नैराश्याच्या गर्तत सापडलेल्या या शेतकºयाने पांढरकवडा गाठले. शहरातील लोहार लाईनमधील एका कृषी केंद्रातून किटकनाशक औषध विकत घेतले. तेथून रस्त्याने पायी जात असतानाच किटकनाशक प्राशन केले. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच सदर शेतकºयाला उपजिल्हा रुग्णालयात नेत होते. अशातच वाटेतच शेतकºयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

March 24, 2015 in मुख्य पान
वणी तालुक्यात वाघाची दहशत, दोन कालवडी ठार 0

वणी तालुक्यात वाघाची दहशत, दोन कालवडी ठार

download (1)
वणी, दि़२४ – तालुक्यामध्ये वाघाने गत काही महिन्यापासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे़ यामुळे शेतकरी शेतमजूरासह नागरिकात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ दि़२३ मार्चला मध्यरात्री शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन कालवडीचा वाघाने फडशा पाडला़
वणी, झरी व मारेगांव या तीन्ही तालुक्यामध्ये जंगलव्याप्त परिसर मोठा आहे़ गत एक वर्षापासून सातत्याने होत असलेले वाघ्रदर्शन तसेच मानवप्राण्यावर होणारे हल्ले नियमित झाले आहे़ झरी जामणी तालुक्यामधील दुभाटी पोड येथील महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली़ वाघाने अनेक पशुधनाचा फडशा पाडला़ यामुळे शेतकरी शेतमजूर वर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे़ जंगलालगत असलेल्या शेतामध्ये शेतीकामाकरीता जाण्यास मजूरवर्ग धजावत नाही़ तालुक्यात आठ-दहा दिवसाच्या अंतराने पशूधनावर वाघाचे हल्ले सुरूच आहेत़ दहेगांव येथील भाऊराव बापूराव गोहोकार व दिलीप मारोती महाकुलकार या शेतकºयांची जणावरे शेतातील गोठ्यात बांधण्यात येतात़ मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करुन दोन कालवडीचा फडशा पाडला़ ही बाब सकाळी संबंधीत शेतकºयांना माहित होताच त्यांनी ग्रामस्थांना सांगीतले़ तसेच वनविभागाला सुचित करण्यात आले़ परंतू तीन्ही तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देवून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती़ मात्र ठोस उपाययोजना वनविभागाकडून होतांना दिसत नाही़ यामुळे परिसरातील, नागरिक, शेतमजूर व शेतकरी प्रचंड दहशतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़

March 24, 2015 in विदर्भ
नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 0

नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Rane-Form
मुंबई- कोण आला रे कोण आला .. काँग्रेसचा वाघ आला. काँग्रेस पक्षाचा विजय, नारायण राणे आगे बढो .. हम तुम्हारे साथ है.. अशा गगनभेदी घोषणांनी वांद्रे पूर्व परिसर दणाणून गेला. सर्व जातीधर्मातील लोकांच्या उपस्थितीत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या मनात जिंकण्याचा निर्धार, अशा उत्साही वातावरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (गवई) गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पहिल्या मिरवणुकीतच वांद्रे पूर्वचे वातावरण पूर्णपणे काँग्रेसमय होऊन गेले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती मिळताच या भागातील सर्व जाती, धर्म आणि वेगवेगळ्या प्रांतातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले. खेरवाडी नाक्यावरून मिरवणुकीने नारायण राणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले तेव्हा काँग्रेसच्या झेंड्यांनी वातावरण फुलून गेले होते. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या मिरवणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार नसीम खान, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, आमदार जनार्दन चांदूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे राजेंद्र गवई, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (गवई गट)चे हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती, तसे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक नारायण राणे यांना शुभेच्छा देत होते. अनेकांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन राणे यांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक कार्यालयाजवळ मिरवणूक पोहचली तेव्हा खेरवाडी, भारत नगर, बेहराम पाडा, एमआयजी कॉलनी, शासकीय वसाहतीतील हजारो लोक जमा झाले होते. सर्वांना अभिवादन करून नारायण राणे यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

March 24, 2015 in मुख्य पान
आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या फोडू! 0

आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या फोडू!

2015-03-24~1-15_ns
मुंबई : ‘अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत तर दिसेल तिथे मंत्र्यांच्या गाड्या फोडू’, असा इशारा माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनी दिला आहे. सोमवारी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाला उद्देशून शेंडगे बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर हजेरी लावली.
विधान परिषदेत खडाजंगी… धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून
आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करीत विराधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. सभागृह कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. राज्य सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून धनगर आरक्षणावर चर्चा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

 

March 24, 2015 in मुख्य पान
फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू 0

फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळले, १४८ जणांचा मृत्यू

main
पॅरिस, दि. २४ – स्पेनहून जर्मनीला जाणारे एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळले असून विमानात १४२ प्रवासी व ६ कर्मचारी असे एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे.
स्पेनमधील बार्सिलोना येथील १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेने निघाले होते. विमानात एकूण सहा कर्मचारी होते. फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना आल्स पर्वताजवळ विमानाचा रडार यंत्रणेची संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता. यानंतर काही वेळाने विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता.हे विमान आल्स पर्वत रांगाच्या परिसरात कोसळले असून विमानाचे अवशेष आढळल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली आहे. विमान ज्या भागात कोसळले तू भाग दुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विमानातील १४८ प्रवासी जीवंत असण्याची शक्यता फार कमी आहे अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्यूअल वॉल्स यांनी केले आहे. अपघाताचे नेमके कार अद्याप समजू शकलेले नाही.
एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील जर्मन विंग्स या कंपनीचे होते. जर्मन विंग्स ही जर्मनीतील सर्वात स्वस्त सेवा देणारी एअरलाइन्स कंपनी आहे. अपघातातील जीवितहानी विषयी कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही या अपघाताची माहिती घेत आहोत असे ट्विट कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

March 24, 2015 in मुख्य पान
शेतक-यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत 0

शेतक-यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत

download
नवी दिल्ली, दि. २४ – अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हवालदील झालेल्या राज्यातील शेतक-यांना अखेर केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांना अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले होते. या नैसर्गिक आपत्तीने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले होते. नुकसानामुळे कर्जबाजारी झालेल्या काही शेतक-यांनी आत्महत्यादेखील केली होती. अखेर केंद्रासातील मोदी सरकारने शेतक-यांच्या मन की बात ओळखून राज्यासाठी मदत जाहीर केली. दिल्लीत दुष्काळ व अवकाळी पावसने झोडपलेल्या राज्यांसाठी बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

 

March 24, 2015 in मुख्य पान
केडीएमसी कडून बिल्डरांना नोटिस 0

केडीएमसी कडून बिल्डरांना नोटिस

unnamed
कल्याण,(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर विभागाने ज्या बिल्डरांनी पाणीपट्टी भरलेली नाही अशा बिल्डरांच्या विरुध्द कार्यवाही सुरु केली आहे.मनपा ने बिल्डरांना नोटिस दिली असुन त्या नोटिसमध्ये लिहीले आहे की, पाणीपट्टी नाही भरली तर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणीचे सप्लाय बंद करण्यात येईल व बांधकामाची परवानगी घेण्यासाठी अर्धा कर भरावे लागेल.मनपाने या जाहीर केलेल्या यादीत नामवंत बिल्डरही आहेत.
कर वसुल करण्यासाठी मनपा ने अभय योजना सुरु केली असुन,त्यात ९८ करोड रुपयांची वसुली केली आहे.पण या योजनेत बिल्डरांचा फारसा योगदान मिळाले नाही.मनपाच्या या निर्णयामुळे बिल्डरांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.मनपाने नोटिस दिलेल्या कल्याणचे नामवंत बिल्डररांची यादी…..
– निर्मल लाइफ स्टाइल – सचिन देशमुख, सुरेश वाधवा.
– माइल्टोन – शयरीकांत शितोळे, जोहर झोझवाला, अंजना चव्हाण, पुंडलिक मिरकुटे.
– राईसी डेव्हलपर्स – मनोज कुमार पुनामिया, लता पुनामिया, संदिप कुमार सिंग, शंकर म्हात्रे, अशोक शिंदे, मोहम्मद यूसुफ असे अनेक नामवंत बिल्डरांचे नाव समाविष्ट आहेत.
मनपाने सांगितले की,या बिल्डरांनी लवकरात लवकर बाकी असलेली रकम भरावे,नाही तर मनपा कडून कार्यवाही करण्यात येईल.

March 23, 2015 in मुख्य पान
एकाच कुटुंबातील तिघींची निघृण हत्या 0

एकाच कुटुंबातील तिघींची निघृण हत्या

images..

बुलडाणा- बुलडाणा जिल्हयातील सावणा येथे सासू, पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलीचा निर्घृण खून करुन संतोष भाडाईत हा नराधम फरार झाला आहे. चिखली तालुक्यातील सावणा येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. विमल बळीराम गाढवे, गीता संतोष भाडाईत आणि आरती संतोष भाडाईत अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमल गाढवे यांची मुलगी गीता हीचा १० वर्षांपुर्वी तालुक्यातील इसोली येथील संतोष भाडाईत याच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून गीता आणि संतोष हे गीताच्या आईकडेच राहत होते. संतोष आणि गीताला आठ वर्षांची आरती नावाची मुलगी होती.
सोमवारी रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले असताना संतोष याने या तिघांची निर्घृण हत्या केली व तो पसार झाला. विमल आणि त्यांची मुलगी बाहेर येत नसल्यामुळे मंगळवारी सकाळी शेजारी त्यांना बघायला गेले असता सदर प्रकार उघडकीस आला.
याबाबत गावच्या पोलीस पाटलाने माहिती देताच पोलीस अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

March 23, 2015 in मुख्य पान
तुमची गाऱ्हाणी, आता थेट मोदींच्या कानी! 0

तुमची गाऱ्हाणी, आता थेट मोदींच्या कानी!

modi540_3
नवी दिल्ली – ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या प्रक्रियेत देशातील जनतेला साथीला घेण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. यापुढं सरकारमधील भ्रष्टाचार व अन्य प्रशासकीय कामांविषयीच्या लोकांच्या तक्रारी थेट मोदींपर्यंत पोहोचणार आहेत. त्या तक्रारी पोहोचविण्याची सोय असलेले नवे वेबपोर्टल उद्या खुद्द मोदी यांच्याच हस्ते कार्यान्वित होणार आहे.
प्रो-अॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन अर्थात ‘प्रगती’ असं या वेबपोर्टलचं नाव असेल. मनमोहन सिंग यांच्या काळात ‘पीएमओ सीपीग्राम्स’ नावानं लोकांच्या तक्रारीसाठी पोर्टल चालविले जात असे. मात्र, त्यात स्पष्टता नसल्यानं त्या माध्यमातून तक्रारी करणं कटकटीचं काम होतं. मोदी सरकारनं हे पोर्टल बदलून त्याऐवजी जास्त सोपं व सुटसुटीत पोर्टल आणलं आहे. ‘प्रगती’मध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. पोर्टलमधील भ्रष्टाचाराच्या कॉलममध्ये आणखी नऊ प्रकारच्या भ्रष्टाचारांना स्थान देण्यात आलं आहे. टेलिकॉम, रेल्वे, वित्तविभाग, ऊर्जा, पेट्रोलियम, अवजड उद्योग, नगरविकास, परिवहन, ग्राम विकासासह अन्य काही विभागाविषयी तक्रारी करण्याची सुविधाही यात आहे.
विभाग आणि भ्रष्टाचाराच्या वर्गवारीमुळं जनतेला आपल्या तक्रारी नेमकेपणानं सरकारपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. सरकारच्या एखाद्या विभागात नेमका कोणता व कसा भ्रष्टाचार होतोय याची तक्रार दाखल करता येणार आहे. अन्याय, अत्याचाराच्या तक्रारींची अल्पसंख्याक, एससी/एसटी, मागासवर्ग, महिला, बालक, अपंग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पोलिसांशी संबंधित स्तंभात भ्रष्टाचार, अत्याचार व निष्क्रियता असं वर्गवारी करण्यात आली आहे. जनतेकडून आलेल्या तक्रारींवर केंद्रीय तसेच मुख्य सचिवांना विशिष्ट वेळेत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. सरकारकडून सोडविण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या बुधवारी घेणार असल्याचं समजतं.

March 23, 2015 in मुख्य पान
खासगी बँकांचे दंडही महागणार 0

खासगी बँकांचे दंडही महागणार

abank
१ एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी
मुंबई वृत्तसंस्था – आगामी आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील बँकांनी विविध दंड आणि शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्र या बँकांनी बचत खात्यातील किमान ठेवींचे बंधन ग्राहकांनी न पाळल्यास दंडाची रक्कम वाढविण्याचे ठरविले आहे. बचत खात्यांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
बचत खात्यांमध्ये किमान रकमेची मर्यादा पाळली न गेल्यास बँकांनी ग्राहकांकडून दंड आकारावा, या आशयाची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी केली होती. त्यासाठी एक एप्रिल २०१५ ही तारीखही निश्चित करण्यात आली होती. खात्यातील किमान रकमेविषयी बँकांनी ग्राहकांना एसएमएस ​किंवा ई-मेलद्वारे माहिती देण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. ग्राहकांना योग्य त्या सूचना देऊनही त्यांना किमान रक्कम खात्यामध्ये राखण्यास अपयश आल्यास किंवा किमान मर्यादेपेक्षा खात्यातील रक्कम कमी राहिल्यास नंतर खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून वळती करून घेण्याचेही आदेश बँकांना देण्यात आले आहेत.
‘ग्राहकांच्या बचत खात्यातील किमान रकमेचे दर तिमाहीनंतर होणारी तपासणी आणि त्यातून वसूल करण्यात येणारा दंड काही नवीन नाही. मात्र, या दंडाच्या शुल्कामध्ये घट करण्यात आली, तर त्याचा परिणाम बँकांच्या आर्थिक शिस्तीवर पडणार आहे. सध्या विविध बँकांकडून १०० ते ४,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. संबंधित ग्राहकाच्या प्रकारानुसारच आता ही वाढीव रक्कम आकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘एचडीएफसी बँके’तर्फे किमान रकमेची मर्यादा न पाळली गेल्यास स्लॅबप्रमाणे दंड आकारणार आहे. नव्या नियमावलीनुसार बँकेतर्फे १५० ते ६०० रुपयांदरम्यान दंड आकारण्यात येणार आहे. ग्राहकांच्या प्रकारानुसार या दंडामध्ये बदल करण्याचे अधिकारही बँकांनी राखून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर काही बँकांनी लॉकरच्या रकमेतही दुप्पट वाढ केली आहे. चुकीचा पत्ता अथवा संबंधित व्यक्ती जागेवर नसणे आदी कारणांस्तव चेकबुक आणि अन्य कागदपत्रे पुन्हा बँकेच्या पत्त्यावर आल्यास ‘एचडीएफसी बँके’तर्फे दंड आकारण्यात येणार आहे. या शिवाय ऑनलाइन बँकिंगसाठी नव्याने देण्यात येणाऱ्या ‘पिन’साठीही पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत. खात्यांमधील किमान रकमेची मर्यादा न पाळल्यास खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठ्या ‘आयसीआयसीआय बँके’तर्फेही शहरी भाग आणि महानगरांसाठी शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे. ग्रामीण भागाला अद्याप दंड आकारण्यात येणार नाही. कोटक महिंद्र बँकेने १ जानेवारीपासूनच दंडाचे नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे. अॅक्सिस बँकेनेही यापूर्वीच दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक शंभर रुपयांना पाच रुपये दंड किंवा सरसकट ३५० रुपये यापैकी जो कमी तो दंड आकारण्यात येणार आहे.

March 23, 2015 in अर्थ
आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) रद्द 0

आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) रद्द

hc-social-media-icons-istock-23515213
नवी दिल्ली – फेसबुक, टि्वटर या सोशल नेटवर्कींग साईटसवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटकेचा अधिकार देणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी) कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्यामुळे यापुढे इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटक करता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येणा-या काळात परिणामकारक ठरणार असून, यामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य, मोकळीक मिळणार आहे. ६६ (अ) कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करु हा केंद्र सरकारचा युक्तीवाद पटणारा नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आयटी कायद्यातील हे कलम रद्द केले. अनेक राज्यांमध्ये आयटी कायद्यामधील या कलमाचा पोलिसांकडून गैरवापर झाल्याने विविध स्वयंसेवी संस्था, नागरी हक्क संघटनांनी या कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.कलम ६६ (अ) स्वांतत्र्य आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य या लोकशाही अधिकारांच्या मूळावर आघात करणारे आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने त्याचवेळी एखाद्या मजकूरामुळे सामाजित शांतता बिघडणार असेल किंवा, दुस-या देशांबरोबरच्या संबंधांवर परिणाम होणार असेल तर, असा मजकूर ब्लॉग करण्याचा सरकारचा अधिकार अबाधित ठेवला आहे.

March 23, 2015 in मुख्य पान
गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा 0

गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा

gutkha-paan
गुटख्यावर बंदी असतांनाही चोरीछुपे गुटखा विक्री करण्यावर आता टाच येणार आहे. गुटखा विक्री आता अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे.एवढंच नाहीतर गुटखा विकणार्‍याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.तसंच लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आघाडी सरकारनं राज्यात गुटखाविक्रीवर बंदी घातली होती. पण चोरून गुटख्याची विक्री सुरूच होती. त्यामुळे आता अधिक कडक शिक्षेची घोषणा सरकारनं केलीय.

March 23, 2015 in महाराष्ट्र
बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत -इतिहासकार डॉ. चहल 0

बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत -इतिहासकार डॉ. चहल

2015-03-23~2003-2-20PHO253_ns
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही, तर इतिहासाचे संशोधन करीत असताना त्यांनी अनेक नवीन सिद्धांतही मांडले आणि ते विकसित केले आहेत. त्यांच्या सिद्धांताला इतिहासाच्या क्षेत्रात आज जगभरात मान्यता मिळाली असून इतिहासाचा अभ्यास करीत असताना या सिद्धांतांचा विचार करावा लागत आहे, असे प्रतिपादन इतिहासकार व हरियाणा कुरुक्षेत्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रो. डॉ. एस.के. चहल यांनी शुक्रवारी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ‘इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. चहल मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. व्यासपीठावर डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते.
डॉ. चहल म्हणाले, भारताचा इतिहास लिहिला गेला तेव्हा त्यात दलित व महिलांना कुठलेच स्थान मिळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या प्राचिन इतिहासावर बरेच संशोधन केले. केवळ संशोधनच केले नाही, तर इतिहासाचे लेखन करताना नवीन सिद्धांत विकसित केले. त्यांच्या इतिहास लेखणीचा नायक हा सर्वसामान्य व्यक्ती होता. दलित होते. शोषित होते. महिला होत्या. ‘शुद्र पूर्वी कोण होते’, ‘रिडल्स आॅफ हिंदुईझम’, ‘द अनटचेबल’ यासारख्या अनेक ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथाद्वारे त्यांनी प्राचिन भारतातील जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला. क्रांती अणि प्रतिक्रांतीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी इतिहासातील नवे सिद्धांत निर्माण केले. भारताच्या फाळणीवर प्रकाश टाकणारा थॉट्स आॅन पाकिस्तानसारखा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रासह भारतीय राजकारण, संविधानाची निर्मिती यासोबतच भारताच्या इतिहास संशोधनातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले.

March 23, 2015 in मुख्य पान