पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

सुहास जोशी, निशिगंधा वाड यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार 0

सुहास जोशी, निशिगंधा वाड यांना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार

Mahila-Purskar (1)
मुंबई- आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या पूर्वसंध्येस देण्यात येणा-या महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, धारीवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा धारीवाल, अभिनेत्री निशिगंधा वाड, प्रख्यात गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. संध्या जैन यांची निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात शेफ संजीव कपूर यांना देण्यात येणार आहे.
याशिवाय शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, प्रख्यात लेखिका व वक्त्या मानसी देशमुख, पुण्याच्या जागृती संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त व भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या चेअरमन जयश्री काळे, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, उद्योजिका प्रतिभा खोडके यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा सोहळा शनिवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात होणार असून त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्ण सावरा, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. वंदना चक्रवर्ती, विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, प्रख्यात उद्योगपती किशोर खाबिया, डॉ. उषा खाबिया, विश्वविख्यात बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. जयंत वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयकॉन फाऊंडेशनचे संचालक मनोज वरंदळ यांनी दिली आहे.

March 05, 2015 in मनोरंजन
वाहनाचे पहिले माती परिक्षण दाभडीत 0

वाहनाचे पहिले माती परिक्षण दाभडीत

DSC_3369
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची दाभडी गावास भेट
यवतमाळ, दि. 5 : केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावास भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी या गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आ.राजु तोडसाम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, परिविक्षाधिन आयएएस अधिकारी दिपककुमार मिना, राजु डांगे, उध्दव येरमे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय केमीकल व फर्टीलायझरच्यावतीने प्राप्त झालेल्या फिरत्या माती परिक्षण वाहनाचा शुभारंभ आर्णी येथील विश्रामगृह येथे ना. अहीर यांच्या हस्ते झाला. राष्ट्रीय आरोग्य व सुपिकता व्यवस्थापनांतर्गत सदर वाहन उपलब्ध झाले आहे. वाहनाच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रीय केमीकल व फर्टीलायझरचे सहाय्यक महाव्यवस्थापक जे.के.राठोड, व्यवस्थापक डी.एल.देशमुख, पी.डी.मांडवकर उपस्थित होते. शुभारंभानंतर सदर वाहन दाभडी या गावात आल्यानंतर वाहनाने दाभडी येथे पहिले माती परिक्षण केले. शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या शेतात मातीचे नमुने घेऊन परिक्षण करण्यात आले. दाभडी या गावात भेटीप्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटीसह गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. गावात गरीब 50 कुटुंबांना शौचालय बांधण्यासोबतच गावाच्या विकासासाठी 10 लक्ष रूपये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करतांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

March 05, 2015 in विदर्भ
होळीनिमत्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण 0

होळीनिमत्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण

2

यवतमाळ, दि. ५ : होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी होळीमध्ये लाकडांचा वापर करण्याऐवजी वृक्षपूजनाने होळी साजरी करण्याचा संदेश राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिला.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गार्डन हॉलसमोरील बगीच्यात होळी निमित्त आज गुरूवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी डॉ. राजेश अडपावार, तहसीलदार अनुप खांडे, नायब तहसीलदार दिलीप झाडे, दिलीप कडासने, अजय शेटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
होळीत लाकडे जाळल्याने पर्यावरणाचा र्‍हास होतो. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे असून होळीसारख्या सणांना नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्षपूजन केले पाहिजे, असे ना. संजय राठोड म्हणाले. त्याचप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पाण्याऐवजी कोरडे गुलालाचे रंग वापरून धुळवड साजरी करण्याचे आवाहन याप्रसंगी ना. संजय राठोड यांनी केले.

March 05, 2015 in विदर्भ
अपघात नव्हे, अनैतिक सबंधातून युवकाचा खून 0

अपघात नव्हे, अनैतिक सबंधातून युवकाचा खून

mrutak prashant randive
यवतमाळ दि. ५ – वणी येथील वणी-घुगूस मार्गावर मंदर शिवारातील पुलाजवळ उकणी येथील युवकाचा दुचाकीसह मृतदेह आढळून आला होता़ पोलीस तपासामध्ये ‘त्या’ युवकाचा अपघात नसून अनैतिक सबंधातून खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी महिलेसह तीन आरोपींना आज ५ मार्च रोजी अटक केली.
प्रशांत चिंतामण रणदिवे (३१) रा. उकणी असे मृतकाचे नाव असून निळापूर येथील आरोपी अनिल बोढाले सोबत मैत्रीचे संबंध होते़ हे दोघे महाविद्यालयीन शिक्षणापासून एकमेकाचे मित्र असल्याने त्यांचे घरी येणे-जाणे होते़ त्यातच मृतकाचे अनिलची पत्नी पुजा सोबत प्रेमसंबंध जुळले़ या अनैतिक प्रेमसंबंधामुळे गत एक महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद निर्माण झाला होता़ याचा वचपा काढण्याकरीता सहकारी वामन पाचभाई रा़शेलू व विनोद मारोती मिलमिले यांनी संगनमताने दि़२२ फेब्रुवारीला मृतकास घरी जेवण्याकरीता बोलाविले़ मृतक हा आपल्या पत्नीला बाहेर जेवण करायला जात असल्याचे सांगून निळापूर येथील आरोपी अनिल याच्या घरी गेला़ यावेळी अनैतीक संबंधावरुन वाद उत्पन्न झाला असता आरोपींनी हातोड्याने मृतकाच्या डोक्यावर सपासप वार केले़ तसेच त्याच्या गुप्तांगावरही घाव करण्यात आल्याने अनिलचा आरोपीच्या घरीच मृत्यू झाला़ तसेच मृतकाला त्याच्याच दुचाकीवर बसवून घुगूस मार्गावरील पुलाजवळ टाकून अपघाताचा देखावा निर्माण केला़ या बाबत येथील ठाणेदार असलम खान व गुन्हेशोध पथकाने आरोपी व मृतकाचे मोबाईलचे टॉवर लोकेशन व कॉल डिटेल्स मिळवून भक्कम पुरवे गोळा करून त्या दृष्टीने तपासकार्य चालविले़ ५मार्च रोजी मुख्य आरोपी अनिल बोढाले, पुजा अनिल बोढाले हे दोघे रा़निळापूर, वामन पाचभाई रा़शेलू, विनोद मिलमिले रा़विरकुंड यांना अटक करण्यात आली़ त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून न्यायालयात हजर केले असता दि़८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे़
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकार, एलसीबीचे अधिकारी पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार असलम खान, पो़लीस उपनिरीक्षक कवडू चांदेकर, दिलीप सायरे, प्रज्ञा वाडेकर, डिबी पथकाचे जमा. अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, साजिद सय्यद, विकास खडसे, प्रमोद जूनूनकर, सुधिर पांडे, शेख नफिस, आनंद अलचेवार, वाहन चालक प्रमोद जिड्डेवार यांनी परिश्रम घेतले़

March 05, 2015 in विदर्भ
मुख्यमंत्र्यांनी पिंपरी बुटी गावात घालविली रात्र 0

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी बुटी गावात घालविली रात्र

13
पिंपरीत शेतकऱ्याच्या घरी भोजन व मुक्काम
यवतमाळ, दि. 4 : शेतकरी आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यवतमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रातचांदणा व घोडखींडी येथील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1600 लोकसंख्येच्या पिंपरी बुटी येथील शेतकरी विधवा महिलांशी संवाद साधला. त्यानंतर तेथीलच विष्णुजी रंगराव ढुमणे या शेतकऱ्याकडे भोजन घेवून यांनी मुक्काम केले.
या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक ऊईके, आ.राजु नजरधने तसेच प्रधान सचिव प्रविण परदेशी, आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनीही या गावात रात्र घालविली. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या गावांना दिलेल्या भेटीप्रसंगीही हे सर्व मान्यवर उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहे. त्यामुळे येथील आत्महत्या थांबविण्यासोबतच त्यामागील कारणांचा नेमका शोध घेण्यासाठी यवतमाळ येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी 8 वाजता थेट रातचांदणा हे गाव गाठले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या घोडखिंडी व नंतर पिंपरी बुटी येथील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. वारंवार शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहे. परंतु तात्काळ दिलासा देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानातुन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या जुन अखेर पर्यंत याचे चांगले परिणाम दिसून येतील, असे मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये पाहीजे त्या प्रमाणात सिंचन विहीरींची कामे झाली नाहीत. येत्या जुन पर्यंत प्रलंबीत सर्व विहीरी पुर्ण करण्यात येणार आहे. शिवाय या विहीरींना विज कनेक्शन दिले जातील. शेतकऱ्यांनी खचुन न जाता खंबीपणे उभे राहावे. शासन पुर्ण ताकदीनीशी पाठीशी उभे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पिंपरी बुटी येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनीही आपल्या अडीअडचणी विषद केल्या. विधवा महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगूण मुख्यमंत्र्यांनी सर्वच महिलांना धीर देत त्यांच्याशी चर्चा केली. या गावात रात्री 11 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांची निवेदने स्विकारुन चर्चा केली.
पिंपरी बुटी हे यवतमाळ पासून 22 किलोंमीटर अंतरावर असलेले 1600 लोकसंख्येचे गाव आहे. गावकऱ्यांशी चर्चा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विष्णूजी रंगराव ढुमणे यांच्या घरी पालकमंत्री संजय राठोड व आ. मदन येरावार यांच्यासोबत भोजन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या बाजूस शेतकरी विष्णूजी ढोमणे बसले होते. भोजन आटोपल्यानंतर सर्वांनी श्री. ढोमणे यांच्याकडेच मुक्काम केला. ढोमणे यांच्याकडे 13 एकर कोरडवाहु शेती आहे. त्यात ते कापुस व सोयाबिन पिके घेतात. अन्य आमदार तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केले. दुसऱ्या दिवशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री परभणीकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचे भरीत, भाकरीचे साधे जेवण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुटी येथील मुक्कामात श्री. ढोमणे यांच्याघरी भरीत, भाकरीचे जेवण घेतले. जमिनीवर पंगतीत बसून त्यांनी साध्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या बाजूला शेतकरी श्री.ढोमणे तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री संजय राठोड तसेच आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके बसले होते. भरीत, भाकरीसह जेवणात दाळभाजी, ठेचा व भाताचा समावेश होतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना परभणी येथे जावयाचे असल्याने सकाळीच उठून स्नान करून पुढील कार्यक्रमास रवाना झाले.

March 05, 2015 in मुख्य पान
 निराश होऊ नका, चित्र पालटेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 0

निराश होऊ नका, चित्र पालटेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6
यवतमाळ,दि. 4 : शेती व्यवसायात उत्पादनाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक आहे. खर्चाची ही शेती अधिक नफा आणि फायद्यात कशी आणता येईल, यासाठी शासन प्रयोग राबवित आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योगांना विकण्याची व्यवस्था होणार आहे. शासन प्रामाणिक आणि संवेदनशिलपणे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. शेतकऱ्यांनी कृपया निराश होऊ नये. शासनावर विश्वास ठेवा. आजूबाजूच्यांना सांगा. येत्या काळात परिस्थिती निश्चितपणे पालटणार आहे, असा भावनिक संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील घोडखिंडी व पिंपरी बुट्टी या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मनमोकळेपणाने त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके, प्रधान सचिव प्रविण परदेशी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना वेळेवर पथपुरवठा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात विविध कारणास्तव अर्धे शेतकरी संस्थात्मक कर्ज पुरवठ्यापासून वंचित आहे. थकीत कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर ते व्याजासह भरावे लागते. सदर पुनर्गठण दिर्घ मुदतीत कसे करता येईल सोबतच यातील काही भाग शासनास भरता येईल का? याचाही विचार करावा लागेल. ग्रामीण भागात कर्ज पुरवठ्याच्या संस्था उपलब्ध नसणे हे सुध्दा शेतकऱ्यांच्यादृष्टीने त्रासदायक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या काळात पथपुरवठा संस्थांचे जाळे उभारणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासन शेतकरी तथा सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. योजनांवर खर्च होणारा जनतेचा पैसा जनतेच्या कामी योग्यप्रकारे लागतो आहे का? तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणी तपासण्यासाठी सॅटेलाईट यंत्रणा लवकरच उभी राहणार आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी दिर्घकालीन उपायांसोबतच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. येत्या जुनपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर किमान ओलावा तयार होतील यादृष्टीने विविध कामे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा माल थेट प्रक्रीया उद्योजकांना विकण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरु असल्याचे ते म्हणाले.
लवकरच प्रत्येक कुटुंबाचे सुक्ष्म सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून ज्या बाबी समोर येतील त्या आधारावर नविन योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रलंबित सिंचन विहिरी जुनपर्यंत पुर्ण करून त्यांना विज जोडण्या दिल्या जातील. यासाठी निधीची कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुट्टी येथे गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिलांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी दहा कुटुंबांना कुठलीच मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ सदर महिलांना कुठल्या योजनेतून लाभ देता येईल ते पाहण्याच्या सुचना यावेळी संबंधीतांना केल्या.

March 05, 2015 in महाराष्ट्र
शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण 0

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

IMG-20150303-WA0014 IMG-20150303-WA0015

यवतमाळ, दि. ३ – क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने तीसºया वर्गातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना झरी जामणी तालुक्यातील मांगुली येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहिती नुसार, आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील मांगुली येथील जिल्हा परिषद शाळेत योगेश संतोष ठावरी हा विद्यार्थी तीसºया वर्गात शिक्षण घेत आहे. आज मंगळवारी सकाळी शाळेच्या पटांगणात अन्य विद्यार्थ्यांसोबत तो विटुडांडु खेळत होता. अशातच विटी एका विद्यार्थ्याला लागली. त्या कारणावरून शाळेतील मारोती कुमरे नामक शिक्षकाने योगेशला बेदम मारहान करायला सुरवात केली. शाळेतून घरी परत आल्यानंतर योगेशने हा प्रकार पालकांना सांगितला. योगेशच्या पाठीवर आणि हातावर छडीने मारल्या गेल्याचे व्रण दिसून आले. या प्रकरणी मुकुटबन पोलीसांनी शिक्षकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

March 03, 2015 in विदर्भ
 काँग्रेसची मुख्यमंत्र्यासमोर निदर्शने, आप व शेतकरी बचाव समितीची नारेबाजी 0

काँग्रेसची मुख्यमंत्र्यासमोर निदर्शने, आप व शेतकरी बचाव समितीची नारेबाजी

download

यवतमाळ, दि. ३ – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आज मंगळवारी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी त्यांचा ताफा जिल्हा परिषदेत पोहोचताच काँग्रेस पदाधिकाºयांनी जोरदार निदर्शने केली. तसेच आप व शेतकरी बचाव विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत शेतकºयांना मदतीची मागणी लाऊन धरली.
विधानसभा निवडणूकीत आश्वासन देणाºया युती सरकारकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून असंमानी संकट झेलणाºया शेतकºयावर यंदाही निसर्गाने अवकृपा दाखविली आहे. खरीप हंगामात कोलमडलेल्या शेतकºयाला रब्बीतही निसर्ग रडवित आहे. अशा परीस्थितीत सरकारने शेतकºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची गरज असताना, सरकार शेतकरी विरोधी धोरण अवलंबित आहे. भूमी अधिग्रहण कायद्यात दुरूस्ती करून शासनाने शेतकºयांचा हक्क हिसकावला आहे. दुष्काळाची तुटपूंजी मदत देण्यात येत असून, मदतीलाही दोन हेक्टरची आडकाठी घालून ५० टक्के शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस, आप व शेतकरी बचाव विदर्भ समितीने आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा परिषदेत आगमन होताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आप व शेतकरी बचाव समितीच्या कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जात असताना, यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्याने कार्यकर्ते व पोलिसांची चांगलीच झटपट झाली. दुष्काळाच्या आगीत होरपळत असलेल्या शेतकºयांना २५ हजार हेक्टरी मदत देण्यात यावी, दोन दिवसापूर्वी वादळी व गारपीटीच्या तडाख्यात उद्घवस्त झालेल्या शेतकºयांना मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी लाऊन धरण्यात आली. निवेदन देतेवेळी राहुल ठाकरे, अशोक बोबडे, दिनेश गोगरकर, बाळासाहेब मांगूळकर, देवानंद पवार, नरेंद्र ठाकरे, चंदू चौधरी, माजी आ. विजया धोटे आदी उपस्थित होते.

 

March 03, 2015 in विदर्भ
विद्यार्थ्याची आत्महत्या 0

विद्यार्थ्याची आत्महत्या

40..
कळंब, दि. ३ – दहाविची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना राजूर येथे सोमवारी घडली.रविंद्र मोहन वैद्य (१६) रा. वरुड जहागिरपूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
गतवर्षी तो दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर तो यावर्षीही परीक्षेला बसला असून मामाच्या गावी राजूर येथे आला होता. अशातच २ मार्च रोजी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

March 03, 2015 in महाराष्ट्र
लाचखोर जलसंपादाचा कर्मचारी जाळ््यात 0

लाचखोर जलसंपादाचा कर्मचारी जाळ््यात

images.jpeg00
यवतमाळ , दि. ३ – शेतात ओलीतासाठी वापरल्याप्रकरणी दंड आकरण्याची भीती दाखवून शेतकºयांकडून दोन हजाराची लाच घेणाºया पुसद येथील जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयास रंगेहात अटक केली. लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी ही कार्यवाही केली.
सुभाष लखमा राठोड असे लाचखोर कर्मचाºयाचे नाव असून ते जलसंपदा विभागाच्या पुसद उपविभागातील सावंगी कॅनल येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.सावंगी परिसरातील एका शेतकºयाने पुसद येथील कालव्याचे पाणी शेतात मध्ये ओलीतासाठी वापरले होते. या बाबतची तक्रार तलसंपदा विभाग पुसद येथे करतो, दंडाची आकारणी करतो अशी भीती सदर शेतकºयांना दाखविली होती. कार्यवाही न करण्यासाठी राठोड यानी शेतकºयाकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतकºयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पथकाने आज पुसद येथील शिवाजी चौकातील अलंकार हॉटेलमध्ये सापळा रचला. यावेळी शेतकºयाकडून दोन हजाराची लाच स्विकारतांना राठोड यास रंगेहात पकडले. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, नीलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, अरूण गिरी, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार यांनी केली.

 

March 03, 2015 in विदर्भ
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सिंचनच पर्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 0

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सिंचनच पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

unnamed
यवतमाळ, दि.3 : मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रीया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. विभागातील 64 हजार विहीरींपैकी 31 हजार विहीरींची कामे पुर्ण झाली आहे. उर्वरीत विहीरींची कामे तातडीने पुर्ण करावी. या विहीरींना विद्युत विभागाने त्वरीत विज जोडण्या द्याव्या. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत सांगितले.
यवतमाळ येथे शेतकरी आत्महत्या व त्याअनुषंगाने सिंचन, कृषी, पतपुरवठा, अपुर्ण सिंचन प्रकल्प, सिंचन विहीरी याबाबत चर्चासत्राचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बैठकीस पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा डॅा.आरती फुपाटे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, जलसंपदाच्या अप्पर मुख्य सचिव मालिनी शंकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, पालक सचिव व्ही.गिरीराज, सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार, सचिव प्रभाकर देशमुख, सचिव विकास देशमुख, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, आ.मनोहर नाईक, आ.ख्वाजा बेग, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी, अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, प्रधान सचिव शैलेश शर्मा, प्रधान सचिव प्रविण परदेशी, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआल्या विभागाबाबत माहिती दिली.
चर्चासत्रातील सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोपर्यंत आपण शेतकऱ्यांना सिंचनाची हमी देणार नाही. शेतात ओलावा निर्माण करणार नाही, तोपर्यंत मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी साठे तयार करा. जेणेकरून शाश्वत शेती निर्माण होईल. विहीरीची कामे कालमर्यादेत पुर्ण करा. मोठी धरणे हे निरंतर प्रक्रीया आहे. छोटी बंधारे व विहीरी चांगले पर्याय ठरू शकतात.
मध्यप्रदेश शासनाने पाच वर्षात तीन लाख विहीरी घेतल्या. परिणामी त्यांचा कृषी विकास दर 24 टक्केपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जीव ओतून काम करण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये संवेदना निर्माण झाली पाहिजे. आपल्या भागातील शेतकरी आत्महत्या करतो ही आपल्यासाठी अशोभनिय बाब आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींनीदेखील सहभाग दाखविणे आवश्यक आहे. एकप्रकारे आव्हान म्हणून हे काम आपण हाती घेतले पाहिजे. निधीची कमतरता भासणार नाही आणि सर्वे वस्तुनिष्ठ होणे आवश्यक आहे, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल आणि त्याप्रमाणे त्यावर उपाययोजना करता येईल, असेही ते म्हणाले.
या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड, जि.प.अध्यक्षा डॅा.आरती फुपाटे, आ.मनोहर नाईक, आ.मदन येरावार, आ.राजेंद्र नजरधने, आ.राजु तोडसाम यांनी उपयुक्त सुचना केल्या. बैठकीचे सुत्रसंचालन उपायुक्त श्री.ठाकरे यांनी केले.

 

March 03, 2015 in मुख्य पान
पाच वर्षीय मुलीवर बलात्कार 0

पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

repd

मुंबई : एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना आज, सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचे अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केले होते. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केले आहे.
अनू (नावात बदल) ही मुलगी सहार परिसरात कुटुंबासोबत राहते. रविवारी सायंकाळी तिच्या आईने तिला दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवले होते. मात्र बराच वेळ झाला तरी अनू घरी परतली नाही. म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र अनू कुठेच सापडली नाही. अखेर ती हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी सहार पोलीस ठाण्यात नोंदवली. दरम्यान, क्र ाइम ब्रँच कक्ष ९ चे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वंझारे हे घाटकोपरहून दुचाकीवरून त्यांच्या घरी परतत होते. त्या वेळी त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून पाहिले, तेव्हा त्यांना अनू दिसली. त्यांनी विश्वासात घेऊन अनूकडून माहिती घेतली. तेव्हा रिक्षावाल्या काकांनी मला येथे सोडल्याचे तिने सांगितले. तिच्यासोबत काही तरी गैरकृत्य घडल्याचा अंदाज वंझारे यांना आला. क्षणाचाही विलंब न करता वाघमारे यांनी अनूला सोबत घेत रिक्षाचा शोध सुरू केला. त्यांनी आरे मार्गावरील तीन-चार रिक्षावाल्यांना थांबवून अनूला त्यांना ओळखण्यास सांगितले. मात्र त्यापैकी कोणीही नसल्याचे अनूने सांगितले. अखेर वंझारेंनी तिला आरे पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलीस नियंत्रण कक्षावर हरवलेली मुलगी सापडल्याची माहिती दिली.

 

March 03, 2015 in महाराष्ट्र
 दहावीच्या परीक्षेला सुरुवात 0

दहावीच्या परीक्षेला सुरुवात

6730_ssc-english-exam
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा सोमवारी, ३ मार्च रोजी सुरू होत आहे.
राज्यातील २१ हजार ९ शाळांमधील एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यापैकी ९ लाख ५९ हजार ४५० मुले तर ७ लाख ७३ हजार ४४८ मुलींचा समावेश आहे. राज्यात ही परीक्षा शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांकडून घेण्यात येणार असून ती एकूण ४ हजार २२२ परीक्षा केंद्रावर होईल.
यात मुंबई विभागातून एकूण ३ लाख ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यातील ३ लाख ६० हजार ८३५ हे नियमित विद्यार्थी असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६ हजार ८५८ मुले, तर एक लाख ७५ हजार ५७९ मुलींचा समावेश आहे. तर विविध शाळांमधून खासगीरीत्या परीक्षेला ३९ हजार ६३ विद्यार्थी बसणार आहेत. मुंबई विभागीय मंडळात ही परीक्षा ६२९ मुख्य परीक्षा केंद्रांवर आणि १६२ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
तर कोकण विभागातून ६०५ शाळांतील ४१ हजार ५५५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा १०३ परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. यात २१ हजार ७७८ मुले तर १९ हजार ७७७ मुलींचा समावेश आहे.
दहावीची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे. ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना यंदा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांनाही कर्णबधिर मुलांप्रमाणे एक भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात सातप्रमाणे एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यासोबत विशेष भरारी पथके आणि जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकेही नेमण्यात आली आहेत. तर राज्यातील परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. इंग्रजी, गणित या विषयाच्या पेपरच्या दिवशी बैठे पथक कार्यान्वित करण्यासाठी विभागीय मंडळाच्या माध्यमिक शिक्षणाधिका-यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

 

March 03, 2015 in मुख्य पान
शेतक-यांना पॅकेज द्या 0

शेतक-यांना पॅकेज द्या

8214_22
नवी दिल्ली- देशाच्या विविध भागांत दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी जोरदार मागणी सर्व पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गारपीटही झाली. यामुळे गहू, तांदूळ, डाळी, तूर, मूग आदी पिके नष्ट झाली आहेत. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी सर्व पक्षांच्या खासदारांनी केली.
लोकसभेतील शून्य तासांच्या प्रश्नावर भाजपाचे खासदार ओम बिर्ला म्हणाले की, अवकाळी पावसाने राजस्थानातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तर काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुडा यांनी हरयाणातील शेतक-यांची बिकट परिस्थितीची माहिती दिली. शेतक-यांना युरियाचा तुटवडा जाणवत असून खरीप पिकांना चांगली किंमत मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, अवकाळी पावसाने झालेले नुकसान पाहून उत्तर प्रदेशात तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
महाराष्ट्राचे एक हजार कोटींचे नुकसानराज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली.

March 03, 2015 in मुख्य पान
अफजल गुरुचे अवशेष परत द्या – पीडीपी 0

अफजल गुरुचे अवशेष परत द्या – पीडीपी

Afzal-Guru-Parliament-Attack
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या पीडीपी-भाजप आघाडी सरकारमधील पीडीपीच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने करुन भाजपाची कोंडी चालवली आहे.
शपथविधीच्याच दिवशी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या ठिणग्या अद्याप कायम असतानाच, आता पीडीपी आमदारांच्या एका गटाने संसद हल्ला प्रकरणात फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरुच्या मृतदेहाचे अवशेष परत करण्याची मागणी करुन नवा वाद निर्माण केला आहे.
पीडीपीच्या या आमदारांनी अफजलला फाशी देण्याचा निषेध केला आहे. अफजलला फाशी ही न्यायाची थट्टा आहे. अफजलच्या मृतदेहाचे अवशेष त्याच्या कुटुंबियांना परत करावेत अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
याआधी रविवारी शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका शांततेत पार पाडण्याचे श्रेय पाकिस्तान, दहशतवादी आणि फुटीरतवाद्यांना दिले होते.
त्यांच्या या विधानावरुन सोमवारी संसदेमध्ये विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरत यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सईद यांच्या विधानावरुन विरोधक आधीच खवळलेले असताना, आता पीडीपी आमदारांच्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पीडीपीचे नेते अशी विधाने करुन विरोधकांना आयते मुद्दे पुरवत आहेत.

 

March 03, 2015 in देश-विदेश
गोवंश हत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी 0

गोवंश हत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

pranab-mukherjee
नवी दिल्ली- गोहत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. यामुळे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. एकोणीस वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती.
गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी करण्यात आली होती. गोहत्या बंदी कायद्यासाठी ३० जानेवारी १९९६ रोजी प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता.
राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर आता स्वाक्षरी केल्याने गोवंश हत्येला बंदी घालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता हा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू होईल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

March 03, 2015 in मुख्य पान
निर्भयाप्रकरणातील आरोपी म्हणतो, निर्भयाच दोषी 0

निर्भयाप्रकरणातील आरोपी म्हणतो, निर्भयाच दोषी

Delhi gangrape case
नवी दिल्ली- निर्भयाने बलात्कार होत असताना प्रतिकार करायला नको होता. ती गप्प राहिली असती तर तिचा जीव गेला नसता, असे संतापजनक वक्तव्य या प्रकरणातील एक आरोपी मुकेश सिंग याने केले आहे.
रात्री बाहेर फिरणा-या महिलाच पुरुषांचे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचा-यांचे लक्ष्य ठरतात. त्यामुळे महिलाच दोषी आहेत, असेही सिंग याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
ही मुलाखत ८ मार्चला महिलादिनी प्रसारित होणार आहे. फाशी दिल्याने काहीही बदलणार नसून उलट महिलांसाठी आणखी धोका वाढेल कारण यापुढे महिलांना जिवंत सोडले जाणार नाही, असेही चीड आणणारे वक्तव्य त्याने केले आहे.

March 03, 2015 in मुख्य पान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा 0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा

download
यवतमाळ, दि. २ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 3.45 वाजता स्व.जवाहरलाल दर्डा विमानतळ येथे आगमन व जिल्हा परिषदेकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता रातचांदणा ता.यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता रातचांदणा येथे आगमन. 6.40 वाजता रातचांदणा येथून घोडखिंडीकडे प्रयाण. सायंकाळी 6.55 वाजता घोडखिंडी येथे आगमन. सायंकाळी 7.20 वाजता घोडखिंडी येथून पिंपरी बु. कडे प्रयाण. सायंकाळी 7.40 वाजता पिंपरी बु. ता.यवतमाळ येथे आगमन.

March 02, 2015 in महाराष्ट्र
४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा 0

४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

ssc_0
यवतमाळ, दि. २ – महाराष्टÑ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. १४८ केंद्रावर ४३ हजार ६३८ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने उद्यापासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले आहे. ३९ हजार ९१० विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार असून, ३ हजार ७२८ विद्यार्थी रिपीटर आहे. १४८ केंद्रावर कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी १५६ बैठे पथक व सात भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गणित, इंग्रजी, सायन्सच्या पेपरला केंद्रावर व्हीडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आजही अनेक केंद्रावर कॉपीचा वापर खुलेआम होत आहे. अशा उपद्रवी केंद्रावर बोर्डाची विशेष नजर राहणार असून, त्यासाठी बोर्डाने पथक कार्यान्वित केले आहे. उद्या मराठीचा पेपर असून, विद्यार्थ्यांना दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

March 02, 2015 in विदर्भ
प्लॉट विक्री व्यवहारात ४० लाखाने फसवणूक 0

प्लॉट विक्री व्यवहारात ४० लाखाने फसवणूक

download (1)
यवतमाळ, दि. २ – प्लॉट विक्रीचा खोटा करारनामा तयार करून ४० लाखाने इसमाची फसवणूक करण्यात आल्याची घटना अप्सरा टॉकीज, यवतमाळ येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण मोरे (४२) व अन्य दोघे रा. चंद्रपूर अशी फसवणूक करणाºयांची नावे आहे.
शहरातील मनीष वाघेला (३९) यांना प्लॉट खरेदी करायचा होता. दरम्यान याच कालावधीत प्रवीण मोरे व त्याच्या दोन साथीदारांनी संगणमत करून वाघेला यांना प्लॉट विकायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्लॉटची पाहणी करून सौदा केला. यावेळी करारनामा करण्यात आल्यानंतर ४० लाख रुपयांची रक्कम वाघेला यांनी मोरे याला दिली. प्लॉटचा करारनामा त्यांनी घरी गेल्यानंतर तपासला असता, तो खोटा व बनावटी असल्याचे लक्षात आले. प्लॉट विक्रीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याबाबतची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

March 02, 2015 in विदर्भ