पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December, 2014

रावते, देसाई, कदम, शिंदे कॅबिनेटमंत्रीपदी 0

रावते, देसाई, कदम, शिंदे कॅबिनेटमंत्रीपदी

2014-12-05~01_ns
मुंबई – विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळयात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांना राज्यपाल सी . विद्यासागर राव यांनी गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपाच्या ५ कॅबिनेट व सेना-भाजपाच्या प्रत्येकी ५-५ राज्यमंत्र्यांना सुध्दा शपथ देण्यात आली. शिवसेनेच्या १० तर भाजपाच्या १० मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ शिंदे आणि डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली तर भाजपाकडून गिरीश बापट, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, मराठवाडयातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावणकुळे आणि अर्जूनी मोरगावचे आमदार व नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजकुमार बडोले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

राज्यमंत्री – (शिवसेना )
संजय राठोड
दादा भुसे
विजय शिवतारे
दीपक केसरकर
रवींद्र वायकर

राज्यमंत्री – (भाजप  )
राम शिंदे
विजयकुमार देशमुख
अंबरीश राजे आत्राम
रणजित पाटील
प्रविण पोटे

December 05, 2014 in मुख्य पान
ट्रकची कारला धडक , काँग्रेस तालुकाध्यक्षासह सहा जण जखमी 0

ट्रकची कारला धडक , काँग्रेस तालुकाध्यक्षासह सहा जण जखमी

index
पांढरकवडा – गोंदीयावरून पाटणबोरी येथे  परत येणाºया  कारला ट्रकने जोरदार धडक दिली. आज सकळी ११.३० वाजता झालेल्या अपघातात  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर अण्णानालमवार याच्या परिवारातील सहा जण जखमी   झाले आहे.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर अण्णा नालमवार, पत्नी लक्ष्मी नालमवार, मुलगा श्रीनिवास नालमवार, सुन मिनाक्ष नालमवार, अनुप नालमवार, युग श्रीनिवास नालमवार हे लग्न सोळ््यासाठी गोंदिया येथे गेले होते. तेथून  आपल्या कारने एम.एच. २९ / एडी ६६८८ ने पाटणबोरीकडे परत येत होते. अशातच पांढरकवडा येथे चालक उतरला आणि तेथून श्रीनिवास नालमवार हा गाडी चालवित होता. अशातच नागपूर-हैद्राबाद राष्टÑीय महामार्गावरील हॉटेल गणेशच्या जवळ श्रीनिवास याने कार वेगात चालवून ट्रकला आोव्हरटेक केला. यावेळी वाहनावरील ताबा सुटल्याने कार उभ्या ट्रकवर आदळली. यामध्ये नालमवार परिवारातील सहाही जण जखमी झाले. त्याच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून यवतमाळ येथे हलविले.

December 05, 2014 in मुख्य पान
विदर्भ राज्यासाठी पदयात्रा आजपासून 0

विदर्भ राज्यासाठी पदयात्रा आजपासून

vidarbha_map
यवतमाळ  – यवतमाळ जिल्हा वकील संघ, विदर्भ राज्य आंदोलन समिती, जनमंच, शेतकरी संघटना, नवराज्य निर्माण महासंघ, सर्व विदर्भवादी संघटनेच्या वतीने विदर्भ राज्य निर्मीतीसाठी ६डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये यवतमाळ ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालयापासून ६ डिसेंबर रोजी सकाळी या पदयात्रेची सुरूवात होणार आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप, अर्थशास्त्री श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह जेष्ठ वकील या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविणार आहे. त्यानंतर चिंतामणी देवस्थान कळंब येथे मुक्काम करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी कळंब ते भिडी, ८ डिसेंबर रोजी भिडी ते वर्धा, १० सेलु ते खडकी, ११ डिसेंबर रोजी खडकी ते बुट्टीबोरी आणि १२ डिसेंबर रोजी बुट्टीबोरी ते नागपूर मार्ग चिटणीस पार्क अधिवेशन पर्यंत ही पदयात्रा काढणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अ‍ॅड. अजय चमेडीया, अ‍ॅड.विरेंद्र दरणे, अ‍ॅड. अमोल बोरखडे, अ‍ॅड. रविशेखर बदनोरे, अ‍ॅड. हेमंत भुमरे, अ‍ॅड. शेळके, अ‍ॅड. कुचनकर, अ‍ॅड. लोणकर, अ‍ॅड. काझज्ञी, अ‍ॅड. पोपटीया, अ‍ॅड. किरण जैस्वाल, अ‍ॅड गोडे, अ‍ॅड. मुन्ना ठाकरे, विजय एंम्बडवार, कृ ष्णराव भोंगाडे, अरूण जोग, अशोक कपिले, नसीम पटेल, रूपेश घोसे, सुभाष पातालबंसी, विजय निवल, परसराम पारधी, राजेश श्रीवास, पाराचंद चिमुरकर, अ‍ॅड. राजेश चव्हाण, लकी लष्करी, विलास नवाडे, दिनेश चौधरी यांनी केले आहे.

December 05, 2014 in मुख्य पान
इसमाचा खून; आरोपीस जन्मठेप 0

इसमाचा खून; आरोपीस जन्मठेप

images
यवतमाळ  – कळंब येथील एका इसमाचा खून करणाºया आरोपीस  जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मुख्य सत्र न्यायाधिश सविता बारणे यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला. जावेद खा सुलतान खा (४४) रा. कळंब असे आरोपीचे  नाव आहे.
जावेद खा सुलतान खा हा गावातीलच  सुनिता  विजय  निशानदार या महिलेला काम असेल तेव्हा पैशाची मदत करीत होता. त्यामुळे तीला कुठेही भेटायला बोलावत होता. अशातच २८ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आरोपी जावेद खा हा सदर महिलेसोबत बोलत होता. हा प्रकार महिलेचा पती विजय यादव निशानदार याच्या निदर्शनास आला. त्यामुळे जावेद ने विजयसोबत वाद करून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बांधून दुचाकीवरून शिगणापूर रोडवरील एमएसीबी पावर हाऊसजवळील खतीब याच्या शेतातील विहीरीत फेकुन दिले. त्यामुळे पाण्यात बुडून विजयचा मृत्यू झाला. ही बाब आरोपीने मृतकाच्या पत्नीला येऊन सांगितली व याबाबतची माहिती कोणाला सागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार सुनिता निशानदार या महिलीने कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी जावेद खा विरूद्घ भादंवि कलम ३०२, ५०६, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ठाणेदार बाळु गायगोले यानी आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. मुख्य सत्र न्यायाधिश सविता बारणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादीची साक्ष महत्वपूर्ण ठरली असून दोषी आढळून आल्याने आरोपी जावेद खा याला जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील निती दवे यांनी काम पाहीले.

December 05, 2014 in मुख्य पान
  गृहविभागाकडून पोलिसांची थट्टा, अधिकाºयांना गुलाब जामुन, शिपायाला वटाणे भात 0

गृहविभागाकडून पोलिसांची थट्टा, अधिकाºयांना गुलाब जामुन, शिपायाला वटाणे भात

IMG-20141205-WA0069_resizedIMG-20141205-WA0071_resized
नागपूर (विशेष प्रतिनिधी)- हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वर्ध्या येथून  नागपूरला आलेल्या पोलिस हवालदार-चालक सुधाकर गंथळे यांचा थंडीने गुरूवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने सदर पोलिसांना सोई सुविधा पुरविण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहे. त्यावरून बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना चारद व ब्लॅकेट वाटप केल्या. तसेच नास्त्याची व्यवस्थाही करण्यात आली. यामध्ये अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, पोहे, समोसाची व्यवस्थ केली. तर पोलीस शिपायांना मसाला भात असा दुजाभाव करण्यात आला. चक्क गृहविभागाकडूनच पोलिसांचाची थट्टा केली आहे.
८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरूवात होणार आहे. २६ डिसेंबर पर्यंत चालणाºया या अधिवेशनासाठी विदर्भातून पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. गुरूवारी वर्धा येथील सुधाकर गंथळे या पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना करण्याचे आदेश गृह विभागाला दिले. त्यावरून नागपूर येथे तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ब्लॅकेट व चादरचे वाटप केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी नास्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. पोलीस अधिकाºयांसोबत शिपायी खांदाला खांदा लाऊन रात्र अन्  दिवस कर्तव्य पार पाडत आहे. मात्र तेथे पोलीस अधिकाºयांसाठी गुलाब जामुन, चमचम, पोहे, समोसे आदी मेनु ठेवला. तर पोलीस शिपायांसाठी फक्त मसाले भात देण्यात आला. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी असून गृह विभागनेच थट्टा चालविल्याचे बोलल्या जात आहे.

December 05, 2014 in मुख्य पान
आधार हेल्थ फाऊंडेशनच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण 0

आधार हेल्थ फाऊंडेशनच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण

02
यवतमाळ : आधार हेल्थ फाऊंडेशनने गरीब व गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. मदन येरावार, राजू तोडसाम, आ. राजेंद्र नजरधने, आ. संजीवरेड्डे बोदकुलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर, यांच्या उपस्थितीत पार पडला.
ही रुग्णावाहिका मातोश्री रेवती निलावार फाऊंडेशनचे दिपक निलावार यांनी भेट दिली आहे. आधार हेल्थ फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी मनोज इंगोले, अजय बिहाडे, विजय कोटेचा, अंकूश डोळे, रेखा कोठेकर, माया खेरे उपस्थित होते. आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष राजु पडगीलवार यांनी गरीब व गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

December 04, 2014 in विदर्भ
विदर्भात दोन दिवसात ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 0

विदर्भात दोन दिवसात ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

images.jpeg00
यवतमाळ : एकीकडे शिवसेना भाजपशी सत्ता समीकरणात जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून ‘शिवशाहीचा ‘ सुतोवात करीत होती त्याच वेळी मागील विदर्भात ४८ तासात ७  दुष्काळग्रस्त उपासमारीला तोंड देत असलेले मदतीची आस संपलेले शेतकरी आपली जीवन यात्रा आत्महत्या संपवीत होते या  नापिकीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमरावतीचे घाटलाड्गीचे  संदीप  नागले ,चमकचे सुरेंद्र निकम चेटकपुरचे  प्रभाकर भोसले ,यवतमाळ येथील बाम्ह्रडाचे   शैलेश  खरे ,अकोला येथील राम्पापुरचे  कृष्णा मडावी ,वाशिमचे  वाईगौड  गावचे  राजू टोंगे तर भंडारा येथील बपेराचे  अप्पाजी निनावे यांचा समावेश आहे याच दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त  मराठवाडा भागात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले ,विदर्भात या वर्षी १०४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या आत्महत्या होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
मागील २ व ३ डिसेंबरला आपण दिल्लीयेथे केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी ,हंसराज अहिर यांना भेटून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  निवेदन देऊन  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे   सुमारे ५० लाख हेक्टर वरील नगदी पिक कापुस व सोयाबीन  सम्पूर्ण नापिकी झाल्यानंतर व आलेल्या पिकला हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे तसेच सतत दोन महिन्यापासून  ओरड करूनही  सादी  दखलही अधिकारी घेत नसल्यामुळे  सारा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे त्यातच केंद्र व राज्य सरकारने बध्याची  भुमिका घेतली  शेतकऱ्यांचे एकूण पिकांचे नुकसान ५० हजार कोटीचे झाले असतांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला फक्त साडे चार हजार कोटीची मदत मागितली असुन ही फारच अपुरी असुन महाराष्ट्राचे या वर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असुन या करीता कमीतकमी ६० हजार कोटीचे  विषेय पकेज देणे काळाची गरज असुन   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात यावे अशी विनंती  विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केंद्र सरकारला केली आहे .
आपल्या मागणी पत्रात  सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान द्या, संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करा, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करा, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी अनुदान द्या, सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्या आदी मागण्याही तिवारी यांनी केल्या आहेत.

December 04, 2014 in मुख्य पान
२०११च्या विश्वचषकातील ‘स्टार’ संघाबाहेर 0

२०११च्या विश्वचषकातील ‘स्टार’ संघाबाहेर

08word
मुंबई – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पुढल्यावर्षी होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य तीस सदस्यीय संघ जाहीर झाला आहे.  अपेक्षेप्रमाणे अनुभवी पण सध्या खराब कामगिरीमुळे संघाबाहेर असलेल्या चार खेळाडूंना ३० जणांच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या संघात एकवेळचे भारतीय संघाचे आधारस्तंभ समजले जाणारे विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना स्थान मिळालेले नाही. या पाच ही खेळाडूंना गेल्या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याचा निवड समितीने विचार केलेला नाही.
संभाव्य संघात आशिष नेहरा, पियुष चावला यांना स्थान मिळाले आहे. तर जम्मू काश्मीरकडून खेळणारा अष्टपैलू परवेझ रसूल, उत्तर प्रदेशचा कुलदीप यादव, मनिष पांडे,केदार जाधव, अक्सर पटेल यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या ३०मध्ये स्थान मिळवले आहे.
या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ३० जणांमध्ये २०११मध्ये झालेल्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची संख्या अगदी कमी आहे. युवराज, सेहवाग, हरभजन, गंभीर आणि झहीर हे खराब कामगिरीमुळे बाहेर आहेत. तर अन्य खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर याने निवृत्ती घेतली आहे. आणि एस.श्रीसंत यावर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली आहे.पुढील वर्षी १४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

December 04, 2014 in क्रीडा
साध्वींनी केलेले वक्तव्य निषेधार्ह – पंतप्रधान 0

साध्वींनी केलेले वक्तव्य निषेधार्ह – पंतप्रधान

images
नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अखेर आपले मौन सोडले. साध्वी यांचे हे विधान पूर्णपणे निषेधार्ह असून अशा प्रकारची विधाने करणे टाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सभेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकऱणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून साध्वी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी विरोधकांनी बुधवारी केली होती. यावर गुरुवारी पंतप्रधानांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. साध्वी यांनी केलेले हे विधान पूर्णपणे निषेधार्ह आहे. नेत्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. याप्रकरणी साध्वी यांनी माफी मागितली आहे त्यामुळे ही माफी स्वीकारुन संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे अशी विनंती मोदी यांनी केली.तसेच साध्वी या नवीन आहेत. त्यांनी याप्रकऱणी माफी मागितली आहे त्यामुळे हे प्रकऱण इथेच संपवावे असे त्यांनी सांगितले.

December 04, 2014 in मुख्य पान
हिवाळी अधिवेशन ३ आठवडे 0

हिवाळी अधिवेशन ३ आठवडे

parliment2
नागपूर – आतापर्यंतच्या अधिवेशनात नागपूर कराराची आठवण देत सहा आठवडे कामकाज चालवण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नव्या सरकारने पहिले हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यात गुंडाळण्याची तयारी केली आहे. ८ ते २६ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
नॅनो मंत्रिमंडळ, शिवसेनेकडून होत असलेली कोंडी आणि अल्पमताची टांगती तलवार सद्यस्थितीत सरकारसमोर आहे. त्यामुळे पहिले अधिवेशन चालवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले. मात्र, सेनेने सत्तेत सहभागी होण्याचे संकेत देताच तीन आठवडे अधिवेशन आहे. नवीन मंत्र्यांना संधी मिळावी म्हणून विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पण, सेनेशी चर्चा लांबली आणि विस्तारही पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे गेल्या १५ वर्षात विरोधी बाकावर बसून आवाज उठवण्याची सवय असलेले बरेच मंत्री आणि सदस्य अद्याप रुळलेले नाही. त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला धारेवर धरण्याचे मनसुबे आखले आहेत. मात्र, सेना सत्तेत सहभागी झाल्यास विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी सरकारला बळ मिळेल.
अधिवेशनाच्या १९ दिवसांच्या कार्यक्रम पत्रिकेत कामकाज सल्लागार समितीने मुंबईत झालेल्या बैठकीत १९ तारखेपर्यंतचे कामकाज निश्चित केले. १८ तारखेला समितीची बैठक होणार असून त्यात पुढील आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात येईल. कामकाजात ४ दिवस शनिवार व रविवारची सुट्टी आणि २५ तारखेला नाताळ असे ५ दिवस सुट्टी राहील. प्रत्यक्ष कामकाज १४ दिवसांचे असून त्यातही पहिला दिवस शोक प्रस्तावावर राहील. त्यामुळे २५ तारखेला गुरुवारनंतर शुक्रवारसाठी थांबवण्याऐवजी शेवटच्या दिवशीचे शासकीय कामकाज आधीच आटोपून २४ ला संपण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

December 04, 2014 in मुख्य पान
बंदोबस्तावरील पोलिसाचा मृत्यू 0

बंदोबस्तावरील पोलिसाचा मृत्यू

MSPD
नागपूर -हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वर्ध्याहून नागपूरला आलेल्या पोलिस हवालदार-ड्रायव्हर सुधाकर गंथळे यांचा मृत्यू झाला. रात्री राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ते पोलिसांच्या टाटा सुमो गाडीतच झोपले होते. गाडीमध्येच झोपेत त्यांचा मृत्यू झाला. सकाळी सहकारी पोलिसांना ते गाडीतच मृतावस्थेत आढळले. गंथाळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट) आल्यानंतर कळेल, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली. दरम्यान थंडी सहन न झाल्यामुळे अथवा अतिश्रमामुळेच पोलिस हवालदार-ड्रायव्हर सुधाकर गंथळे यांचा मृत्यू शक्यता व्यक्त होत आहे.

December 04, 2014 in रोजगार
जवखेडा हत्याकांड : फिर्यादीस अटक 0

जवखेडा हत्याकांड : फिर्यादीस अटक

2014-12-04~jawkheda_ns
अहमदनगर – अहमदनगरमधील बहुचर्चित जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जवखेडा येथे २० ऑक्टोबर रोजी दलित कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. पोलिसांची सुमारे सात पथकं या घटनेचा विविध पद्धतीने तपास करत होते. याप्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधव याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि कोर्टाच्या परवानगीनंतर प्रशांतच्या घराची घेतलेली झडती यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. या आधारे पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.
संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि १९ वर्षाचा मुलगा सुनील या तिघांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचे अवयव विहिरीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव यानेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तो संजय जाधव यांचा पुतणा आहे. या हत्येेचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरी हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

December 04, 2014 in मुख्य पान
राज्यात युतीचेच सरकार : १२ मंत्रिपदं देणार 0

राज्यात युतीचेच सरकार : १२ मंत्रिपदं देणार

yutisb
मुंबई – विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना – भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना – भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली असून शिवसेनेला १२ मंत्रिपदं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये ५ कॅबिनेट व ७ राज्यमंत्रीपदाचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन शिवसेना – भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटली होती. मात्र आता या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दुपारी भाजपा व शिवसेना नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा पालवे – मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते.  भाजपा व शिवसेनेला मिळालेले यश पाहता जनतेने आघाडी सरकार विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट होते. आम्ही दोघांनी एकत्र येऊनच सरकार चालवावे अशी इच्छा जनता व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची होती, त्यासाठी आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमची युती वैचारिक असून ती भविष्यातही कायम राहावी यासाठी समन्वय समिती स्थापन करु असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला १२ मंत्रिपद दिली जातील आणि त्यापैकी १० मंत्री उद्या शपथ घेतील. भाजपाचेही ८ ते १० मंत्री उद्या शपथ घेतील,या सर्वांची नावे आज रात्रीपर्यंत जाहीर करु असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच अन्य घटक पक्षांसोबतही चर्चा सुरु असून त्यांना उद्याच्या विस्तारात किंवा हिवाळी अधिवेशनानंतर होणा-या विस्तारात स्थान देण्याबद्दलचा निर्णयही आज रात्रीपर्यंत होईल असेे त्यांनी नमूद केले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रच लढवणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचे ठरवले आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाची भूमिका काय या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले.

December 04, 2014 in मुख्य पान
अरबी समुद्रातील शिवस्मारकाला केंद्राचा ग्रीन सिग्नल 0

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला केंद्राचा ग्रीन सिग्नल

2014-12-04~1-01_ns
नवी दिल्ली – मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकांस केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी दिल्लीत केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चले चलो मोदी के साथ’ अशा प्रकारचे बॅनरबाजी केल्याने शिवसेना-भाजपामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. छत्रपतींचा आशीर्वाद शिवसेनेच्याच पाठीमागे आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने शिवस्मारकाला परवानगी देत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अरबी समुद्रात ३०९ फूट उंचीचा  शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, बैलगाडी शर्यतीला केंद्राकडून परवानगी देण्यात येत असल्याने शंकरपटाचा नाद पुन्हा एकदा अनुभवयास मिळणार आहे. राज्याच्या अनेक कानाकोप-यात बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये उत्सूकता असते परंतू राज्यात यावर बंदी घालण्यात आल्याने अनेक शेतक-यांचा हिरमोड झाला होता. परंतू आता पुन्हा एकदा शेतक-यांना बैलगाडयांची शर्यत अनुभवायाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.

December 04, 2014 in मुख्य पान
बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 0

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

IMG-20141203-WA0076
यवतमाळ – बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवारी जोडमोहा नजिक घडली. गणेश मडावी (२८) रा. वटबोरी असे मृतकाचे नाव आहे. गणेश आपल्या एम. एच. २९ पी ५९८४ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळ जात असताना, यवतमाळवरून पांढरकवडाकडे जाणाºया एम. एच. ४० ८९६७ क्रमांकाच्या बसने त्याला जोडमोहानजिक समोरासमोर धडक दिली. या धडकेत गणेशच्या डोक्याला व शरीराला गंभिर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी बसचालक प्रमोद मनवर याचेविरुध्द गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी 0

नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी

images
यवतमाळ – शहरातील साफसफाईच्या क त्रांटाचा विषय सतत वादात ठरत असताना, आज बुधवारी नगर पालिकेत आयोजित सर्वसाधारण सभेत टेंडरच्या मुदतवाढीवरून नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी झाली. यावेळी नगरसेवकांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून उद्या साफसफाईच्या कत्रांटासाठी विशेष जीबीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील साफसफाईचा कत्रांट अमरावती येथील ठेकेदाराला देण्यात आला आहे. कत्रांटाच्या मुदतवाढीवरून पालिकेत वाद सुरू असताना, आज पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. हा विषय प्रशासकीस्तरावरील असल्यामुळे याचा निर्णय मुख्याधिकाºयांनी घ्यायला अपक्षित असताना, नगराध्यक्ष व नगरसेवकांपुढे हा विषय उपस्थित करण्यात आल्याने नगरसेवक मुख्याधिकाºयावर जाम भडकले. दरम्यान नगराध्यक्ष सुभाष राय यांनी सुध्दा मुख्याधिकाºयांची चांगलीच कानउघाउणी केली. साफसफाईच्या कत्रांटातच बैठकीचा अर्धा वेळ गेल्यानंतर आमदार निधीतील दोन तर खासदार निधीतील एका रस्त्याच्या कामाला मंजूरात देण्यात आली. दलीतवस्तीच्या रस्त्यांनाही बैठकीत मंजूरात देण्यात आली असून, साफसफाईच्या टेंडरसाठी उद्या विशेष जीबी बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
भारी येथे इसमाचा खून 0

भारी येथे इसमाचा खून

index.jpeg00
यवतमाळ – किरकोळ कारणावरून इसमाचा वस्तºयाने खून केल्याची घटना काल रात्री भारी येथे घडली. गजानन गेडाम असे मृताचे नाव असून, रमेश बावणे (५५) व राकेश बावणे (२२) या बापलेकास पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील भारी येथील या बापलेकांनी गजानन गेडाम याच्याशी म्हशीचे केस काढण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादात रमेश व राकेश यांनी गजानन गेडाम याच्या गळ््यावर वस्तºयाचे घाव घातले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या गजाननला पाहुन दोघानीही घटनास्थळावरून पळ काढला. मुलाला रक्ताच्या थारोळ््यात पाहून त्याची आई जोष्णा गेडाम घरातून धावत आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असताना, गजाननचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी दोघाविरुध्द गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या 0

तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या

2014-12-03~news_ns
सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीत आलेल्या एका जोडप्याच्या पाच वर्षीय मुलीला प्रियकराने दारूच्या नशेत उकळत्या तेलाचे चटके देऊन तिचा निर्घृण खून केला. चिंचोली औद्योगिक वसाहतीतील धर्मराज नगरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे अख्खे धर्मराजनगर हळहळले. आरुषी ईश्वर वंजारी (५) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अडीच वर्षांपूर्वी गोंदिया येथून ईश्वर वंजारी हा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली पत्नी संगीता, आरुषी (वय-५) आणि अंजली (वय-६) यांना घेऊन चिंचोली औद्योगिक वसाहतीत आले होते. वसाहतीतील धर्मराज नगरात त्यांनी भाड्याने घरही घेतले होते. ईश्वर आणि संगीता एका कारखान्यात काम करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. दरम्यान, याच भागातील शिवाजी भालेराव (३०) याने संगीताबरोबर प्रेमसंबंध जुळविले. सहा महिन्यांपूर्वी शिवाजीने ईश्वरला मारहाण करून तेथून हाकलून दिले. त्यानंतर शिवाजी हा संगीता आणि तिच्या दोन मुलींसमवेत राहत होता. मंगळवारी सकाळी दोघे नेहमीप्रमाणे गॅस कंपनीत कामाला गेले. शिवाजी हा काही वेळाने घरी आला. पुन्हा दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास शिवाजी कंपनीत जाऊन संगीताला घरी आणले. त्यावेळी दोन्ही मुली घरात खेळत होत्या. दुपारी संगीता पुन्हा कामावर गेली तर अंजली खेळण्यासाठी बाहेर गेली.
दरम्यान, शिवाजीने कढईत तेल ओतून ते गरम केले. तेलात चाकू बुडवून आरुषीच्या अंगावर चटके देत होता. बराच वेळ चटके दिल्यानंतर त्याची राक्षसी वृत्ती काही शांत झाली नाही. शेवटी बेलण्याने तिच्या डोक्यावर प्रहार करीत तिचा जागीच खून केला. त्याने मुलीला इतके चटके दिले की मृत आरुषिचे शरीर पूर्णत: काळे-निळे पडले होते. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी शिवाजी भालेराव यास अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरु होती.

December 03, 2014 in मुख्य पान
शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेणार शुक्रवारी 0

शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेणार शुक्रवारी

yutisb
मुंबई -राज्यातील शिवसेना-भाजप युतीचं घोडं अखेर गंगेत न्हहालं. शिवसेनेचे १२ तर भाजपच्या १० मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात असलं तरी शिवसेना, भाजपतील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे.
शिवसेनेतून आता मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची नावं आघाडीवर आहेत. तर राज्यमंत्री पदासाठी दादा भुसे, विजय आवटी, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर किंवा उदय सामंत, दीपक सावंत यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेत आता मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचं बोललं जातंय. शिवसेनेबरोबर भाजपमधील कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
शिवसेना-भाजपमध्ये मंत्रीपदाचं वाटप झालं असलं तरी शिवसेनेने कोणती खाती पदरात पाडून घेतली आहेत, हे अजून जाहीर झालेलं नाही. पण ‘शिवसेनेला कमी महत्त्वाची खाती असं म्हणणं चुकीचं आहे. एमएसआरडीसी, परिवहन ही खातीही महत्त्वाची आहेत. याशिवाय शिवसेनेने केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाची मागणी केलीय. पण भाजपकडून अद्याप उत्तर आलेलं नाही’, असं शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितलं.

December 03, 2014 in मुख्य पान
घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर 0

घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर

index
नवी दिल्ली –  दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पवार पुढील उपचारासाठी मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले असून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील नियोजीत दौराही रद्द केला आहे.
बुधवारी सकाळी पवार हे दिल्लीतील जनपथ येथील निवासस्थानी पाय घसरून पडले. यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे. शऱद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा आणि कन्या सुप्रिया सुळे आहेत.

December 03, 2014 in मुख्य पान