पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

गावस्करांना हंगामी अध्यक्ष बनवा – सर्वोच्च न्यायालय 0

गावस्करांना हंगामी अध्यक्ष बनवा – सर्वोच्च न्यायालय

sunil-gavaskar-014
नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी अंतरिम आदेश देणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निकाल येईपर्यंत एन.श्रीनिवासन यांच्या जागी सुनील गावस्कर यांची बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी आयपीएल-सात मध्ये सहभागी होऊ नये असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने दिला. इंडिया सिमेंटशी संबंधित कुठल्याही व्यक्तीने बीसीसीआयमध्ये राहू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या मतांवर बीसीसाआयकडून उद्यापर्यंत उत्तर मागितले आहे.
त्याआधी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पदावरुन पायउतार होण्याचा इशारा दिला होता. त्यावर बीसीसीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश मुकूल मुदगल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव दिला. अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर कारवाई करु असे बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटच्या भल्यासाठी आम्हाला कठोर विचार करुन तसे आदेश द्यावे लागतील असे सांगितले. एन.श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असेपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही त्यामुळे श्रीनिवासन पदावरुन पायउतार व्हा, नाही तर तसे आदेश द्यावे लागेल असा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला होता.

March 27, 2014 in क्रीडा
लोकसभा निवडणूक, श्रीमंत आणि गुन्हेगारांचे वर्चस्व 0

लोकसभा निवडणूक, श्रीमंत आणि गुन्हेगारांचे वर्चस्व

CRIME 1
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधील पाच आणि त्रिपूरामधील एका जागेसाठी सात एप्रिलला निवडणूक होत आहे. या सहा मतदार संघात एकूण ६४ उमेदवार उभे आहे. त्यांनी निवडणूक अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रानुसार त्यातील १७ उमेदवार करोडपती आहेत. या करोडपती उमेदवारांकडे प्रत्येकी सरासरी पाच कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
सहा उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी सर्वाधिक आसाम गण परिषदेचे (एजीपी) उमेदवार आहेत. एजीपीच्या पाच उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. लॉटरी किंग मोनी कुमार सुब्बा हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ३०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. इशान्य भारतातील ते सर्वाधिक श्रीमंत आहेत. ६४ पैकी १० जणांचे उत्पन्न चार लाख आहे. तर लाखिमपुर ऋषिकेश येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराने आपल्याकडे अवघे नऊ हजार रुपये उत्पन्न असल्याचे सांगितले. यातील ३१ टक्के उमेदवार बारावी आणि त्याहून कमी शिकलेले आहेत. तर ६९ टक्के उमेदवार पदवी किंवा त्याहून अधिक शिकलेले आहेत. ५५ टक्के उमेदवार २५ ते ५० वयाचे आहेत. ४१ टक्के उमेदवार ५१ ते ७० च्या दरम्यान आहेत. तर तीन टक्के उमेदवारांनी वयाची सत्तरी पार केली आहे. यातील ९१ टक्के पुरुष असून महिलांचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे.

March 27, 2014 in मुख्य पान
मतदान करा 0

मतदान करा

Vote awareness campaign ahead of 2014 Lok Sabha polls
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानांतर्गत भाग घेतलेले मोरादाबादमधील शालेय विद्यार्थ्यी

March 27, 2014 in मुख्य पान
दोन वनरक्षकास अटक ; कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी 0

दोन वनरक्षकास अटक ; कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी

images-2
यवतमाळ – वन जमिनीवरील पराटी काढल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी लाच लाच मागणाºया दोन वनरक्षकांना अटक केली. आज गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुकुटबन येथील शासकीय निवासस्थानी ही कारवाही केली. संदिप शालीक साखरकर (२७), संदिप रमेश पारधी (२६) अशी अटक केलेल्या वनरक्षकांची नावे असून ते मुकुटबन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालात कार्यरत होते.
बालाजी देवराव नांदेकर (३९) रा. हेटी ता. कोरपना जि. चंद्रपुर यानी २४ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. वनविभागाची परवानगी न घेता वनजमिनीवरील पराटी ट्रॅक्टरने काढल्याने ट्रॅक्टर जप्त करुन दंड करतो अशी भिती दाखवून दाखविली. कायदेशिर कारवाई टाळायची असेल तर १० हजार लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमुद केले. त्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ मार्च रोजी पडताळणी केली. यामध्ये पंचासमक्ष दोन्ही वनरक्षकांनी कायदेशिर कारवाई टाळण्यासाठी १० हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान आज २७ मार्च रोजी वनरक्षकांच्या शासकीय निवासस्थानीच अटक केली. ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीचे पोलीस उपअधिक्षक उत्तम जाधव, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले,शैलेश ढोणे, अमित जोशी, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार , किरण खेडकर यांनी पार पाडली.

March 27, 2014 in विदर्भ
खा. विजय दर्डा यांच्याविरुद्ध आरोपपत्र ; कोळसा खाणवाटप घोटाळा 0

खा. विजय दर्डा यांच्याविरुद्ध आरोपपत्र ; कोळसा खाणवाटप घोटाळा

04_09_2012-scamcoal1
नवी दिल्ली – अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या यूपीए सरकारच्या तोंडाला काळं फासणा-या कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या दुस-या आरोपपत्रात राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांचं नाव आल्यानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला मोठा झटका बसलाय.
विजय दर्डा आणि त्यांचे चिरंजीव देवेंद्र दर्डा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १२० ब , ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१२ पासून कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत आहे. या कोळसा घोटाळ्यात खासदार विजय दर्डा यांचेही हात काळे झाल्याचा आरोप याआधी झाला होता. चुकीची आकडेवारी आणि सादरीकरण करून कोळसा खाणी मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवमताळ एनर्जी लिमिटेडवर सीबीआयनं छापेही टाकले होते. तसंच, या कंपनीसह पाच कंपन्यांच्या २० आजी-माजी संचालकांवर एफआयआरही दाखल केला होता. त्यात एएमआर आयर्न अँड स्टीलचे संचालक अरविंद कुमार जैसवाल, मनोज जैसवाल, रमेश जैसवाल, देवेंद्र दर्डा, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि खासगी व्यक्तींचा समावेश होता. या कोळसा घोटाळ्यातील पाच प्रकरणांबाबतच्या तपासाची माहिती सीबीआय शुक्रवारी सुप्रीम कोर्टात देणार होतं. परंतु, त्याआधीच त्यांनी आज दिल्ली कोर्टात दुसरं आरोपपत्र दाखल केलं. त्यात विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांचं नाव आल्यानं प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

March 27, 2014 in मुख्य पान

मोदींच्या सभेपूर्वी गयामध्ये दोन बॉम्बस्फोट

गया – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गयामध्ये होणा-या सभेपूर्वी माओवाद्यांनी या जिल्ह्यात दोन मोबाईल टॉवर शक्तीशाली स्फोटांमध्ये उडवून दिले आहेत.
गयामध्ये गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचार सभा होणार आहेत. बुधवारी मध्यरात्री माझहोली आणि दुमारिया बाजार या गावात मोठया संख्येने जमलेल्या माओवाद्यांनी दोन शक्तीशाली स्फोट घडवून आणत खासगी कंपन्यांचे मोबाईल टॉवर उध्दवस्त केले.अलीकडेच छत्रा येथे सुरक्षापथकांच्या कारवाईत दहा माओवादी मारले गेले होते. त्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी गुरुवारी बिहार आणि झारखंड बंद पुकारला आहे. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सासाराम आणि गयामध्ये गुरुवारी मोदी दोन निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत.माओवादी आणि दहशतवाद्यांकडून कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यानुसार आम्ही सुरक्षेच्या उपायोजना केल्या आहेत असे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी सांगितले.

March 27, 2014 in मुख्य पान
आप’चा चहा पाच हजार रुपये 0

आप’चा चहा पाच हजार रुपये

aap-logo
गुडगाव – आम आदमी म्हणून सर्वत्र वावरणा-या ‘आप’चे पक्षनिधीचे नवनवीन फंडे मात्र चांगलेच महाग आहेत. आधी बीजेपीने ‘नमो चाय’ म्हणून निवडणुकीच्या प्रचारसभेत रंगत निर्माण केली होती. त्यापाठोपाठ भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत आम आदमी पक्षाकडूनही अशाच प्रकारची चहा पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र हा ‘आम’ चहा काही साधासुधा नाही आहे तर या चहाच्या एका कपाची किंमत आहे तब्बल पाच हजार रुपये.
गुडगावमध्ये येत्या २९ मार्चला आम आदमी पक्षाची चहा पार्टी रंगणार आहे. या चहा पार्टीत सहभागी व्हायचे असल्यास पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.गुडगावमधील ‘आप’चे उमेदवार योगेंद्र यादव या पार्टीच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधणार आहेत. ही पार्टी कुठे होणार आहे याबाबत काही सांगण्यात आलेले नाही. याआधी खाजगी मॅनेजमेंट महाविद्यालयात अशी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी १५० लोकांनी भाग घेतला होता. या पार्टीच्या निमित्ताने अधिक निधी गोळा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे ‘आप’चे संयोजक संजय कुमार यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचार सभेचा खर्च अधिक असतो त्यामुळे अशा प्रकारे पक्षाला निधी गोळा करावा लागतो असेही कुमार म्हणाले.याआधी आपने दहा हजार द्या आणि केजरीवालांसोबत जेवा हा अनोखा फंडा वापरला होता. पक्षनिधी वाढवण्यासाठी आपने खास डिनर पार्टी आयोजित केली होती. मात्र आपच्या या फंड्यावर चहूबाजूंनी टीकाकारांनी टीका केली होती

March 27, 2014 in देश-विदेश
आयटम गर्ल राखी निवडणुकीच्या रिंगणात 0

आयटम गर्ल राखी निवडणुकीच्या रिंगणात

Rakhi Sawant at BJP office
मुंबई –  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकार आणि क्रीडापटू निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात आता बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतहीचा देखील समावेश झाला आहे. अन्य कलाकारांप्रमाणेच राखीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राखी वायव्य मुंबईमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
वायव्य मुंबईमधून राखी सावंत काँग्रेसचे गुरुदास कामत, शिवसेनेचे गजानन किर्तीकर, आपचे मयांक गांधी आणि मनसेचे महेश मांजरेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.राखीला भाजपकडून उमेदवारी हवी होती. त्यासाठी तिने दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयाला भेटही दिली. मात्र भाजपने तिला मुंबईसाठी उमेदवारी नाकारत श्रीरामपूरमधून तिकीट देऊ केले. भाजपने तिकीट नाकारल्याने राखीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत या उमेदवारांना जोरदार टक्कर देणार असल्याचाही विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.

March 27, 2014 in महाराष्ट्र
भाजपच्या सभा दहशतवाद्यांच्या रडारवर 0

भाजपच्या सभा दहशतवाद्यांच्या रडारवर

5578887993478026973_Org
लखनऊ – उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी गोरखपूर रेल्वे स्टेशन जवळून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोन्ही दहशतवाद्यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह काही प्रभावी नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती.
बरकत आणि मुझम्मील अशी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे असून, ते पाकिस्तानी नागरिक आहेत. लखनऊच्या एटीएस मुख्यालयात दोघांची कसून चौकशी सुरु आहे. अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना मोठया निवडणूक प्रचारसभांमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी माहिती तपास अधिका-यांनी दिली.दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उत्तरप्रदेश एटीएसने ही कारवाई केली. एटीएसचे प्रमुख राजीव सब्बरवाल यांनी अटकेच्या वृत्ताल दुजोरा दिला मात्र त्यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला.

March 27, 2014 in देश-विदेश

दोन दहशतवाद्यांना अटक

अयोध्या – उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (अँटी टेररिस्ट स्क्वाड) अयोध्येजवळ गोरखपूर स्टेशनवरुन बरकत आणि मुझममिल या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी मानवी बॉम्ब होण्याच्या उद्देशाने आले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि बॉम्ब निर्मितीचे बरेच साहित्य जप्त करण्यात आले.
दहशतवादी तहसीन अख्तर याच्या चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना मानवी बॉम्ब बनण्यासाठी आलेल्यांची माहिती मिळाली. ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सापळा रचून कारवाई केल्याचे एटीएसचे पोलिस महानिरीक्षक राजीव सभरवाल यांनी सांगितले. पकडलेले दोन्ही दहशतवादी पाकमधील मुलतानचे रहिवासी आहेत, असेही ते म्हणाले. याआधी दिल्ली आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमधून इंडियन मुजाहिदीनच्या सहा जणांना पकडले. यात बॉम्ब तयार करणारा पाकिस्तानी दहशतवादी वकास हा देखिल होता. हे दहशतवादी देखिल मोदींनाच मारण्याच्या उद्देशाने सक्रिय झाले होते. आठवड्याभरात मोदींना लक्ष्य करण्यासाठी सक्रिय झालेल्या आठजणांना पकडल्यामुळे मोदींच्या सुरक्षा यंत्रणेला विशेष खबरदारी घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

March 27, 2014 in मुख्य पान
मनसेचे राजू पाटील राजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज 0

मनसेचे राजू पाटील राजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज

pepar add - Copy

यवतमाळ – मनसेचे यवतमाळ वाशिम लोकसभेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचाराचा २७ मार्च रोजी प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. श्री संत सेवालाल महाराज, श्री संत मुंगसाजही महाराज यांचे चरणी नारळ फोडून पोहरा देवी ते धामणगाव देव पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. लोकसभे 

March 27, 2014 in मुख्य पान

युवकाची आत्महत्या, चिठ्ठीचे गुढ कायम

घाटंजी  –  शहरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी युवकाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून आत्महत्येचे गुढ कायम आहे.
राहुल अशोक भोयर (३० ) रा. घाटंजी असे मृतकाचे नाव असून तो रसिक इलेक्ट्रीक दुकानामध्ये नोकरी करीत होता. २५ मार्च रोजी रात्री दुकान बंद करुन तो घरी गेला. त्यानंतर अंगणात येऊन मोबाईलवर बोलतांनाही नागरिकांनी पाहिले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी राहुलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही बाब उजेडात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या शिखातून एक चिठ्ठी सापडली असून त्यामधील मजकुर कळु शकला नाही. त्यामुळे या युवकाच्या मृत्यूचे गुढ अजुनही कायम आहे. राहुल हा अविवाहीत असून त्याच्या वडीलानेही पाच वर्षापूूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार कुरळकर करीत आहे.

March 26, 2014 in विदर्भ

वीजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

कळंब  – तालुक्यातील झाडकिन्ही येथे मिटर दुरुस्तीचे काम करणाºया खाजगी वायरमनचा वीजेचा धक्क्याने मृत्यू  झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी ४ वाजता घडली.  प्रेमदास बापुराव पुडके (५०) रा. झाडकिन्ही असे मृतकाचे नाव असून तो खाजगी वायरमन होता. गावातीलच हरिचंद्र पाटील याच्या घरी मिटर दुरुस्तीचे काम करत होता. अशातच त्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

March 26, 2014 in विदर्भ
बिबट्याचा मृतदेह आढळला 0

बिबट्याचा मृतदेह आढळला

index
यवतमाळ  – बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला शिवारात  बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उजेडात आला असून अळ््यांनी वाघाचे शरीर पोखरल्याचे समोर आले आहे. या बिबट्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसून विष प्रयोग केल्याचे बोलल्या जात आहे.
यवतमाळ वनविभागातील बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला जंगलात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे कुजलेला बिबट्याचा मृतदेह दिसला. या बाबतची माहिती मिळताच उपवनसंरक्षक प्रेमचंद लाकरा, सहा. उपवनसंरक्षक वाभळे, उपवनसंरक्षक दहिवले, अविनाश घनमोडे, गवई, यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर जगताप, मानद वनजीव रक्षक शाम जोशी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मृतक बिबट्याचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असून तो म्हातारा झाला होता. त्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसुन कातडी व नख साबुत होते. त्यामुळे विषप्रयोग करुन बिबट्याला मारल्याची चर्चा वन्यप्रेमीमध्ये सुरु आहे. नेर येथील पशुवैद्यकीय अधिकरी डॉ. खोडवे यांना पाचारण करुन घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूचे गुढ  शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार आहे.

March 26, 2014 in विदर्भ
खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत मनात असते 0

खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत मनात असते

COLOR-BRAIN-297x300
गुन्हेगार सहजासहजी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाहीत. गुन्हा कबूल करण्यासाठी विविध पद्धती राबवल्या जातात. प्रसंगी गुन्हेगारांना शारीरिक मारहाण व मानसिक छळ केला जातो. व्यक्तीचा खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत माणसाच्या सुप्त मनात असते असे एका संशोधनात आढळले आहे.
अट्टल खोटे बोलणा-या व्यक्तींकडून खरे काढून घेणे सोपे नसते. मात्र, त्यांच्या सुप्त मनाचा मागोवा घेतल्यावर त्यांचा खोटेपणा उघड होऊ शकतो. व्यक्ती खरी बोलते की खोटे यासाठी ‘लाय डिटेक्टर’ टेस्ट घेतली जाते. मात्र, या टेस्टच्या यशस्वीपणाची खात्री केवळ ५४ टक्के असते. स्वत: व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत याबाबत माणसे ही अत्यंत संवेदनशील असतात, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लीन टेन ब्रिंके यांनी सांगितले. त्यांच्या या संशोधनात डायना स्टिमसन, डाना कार्नी यांनी सहभाग घेतला होता.
या संशोधकांनी नवीन चाचणी विकसित केली आहे. एखादी व्यक्ती खोटे बोलत असल्यास सुप्त मन ते ओळखू शकते. विशेष म्हणजे सुप्त मन हे ओळखण्यात अपयशी ठरल्यावरही ही चाचणी यशस्वी होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.या संशोधनासाठी ७२ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यांना संशयित आरोपींच्या मुलाखतींची चित्रफीत दाखवण्यात आली. काही व्यक्तींनी पुस्तकातून १०० डॉलर्स चोरले होते. मात्र या चोरीची कबुली मुलाखत देणा-यांना देऊ नये असे बजावले होते. आरोपींमध्ये काही जणांना खरे बोलण्यास सांगितले तर काही जणांना खोटे बोलण्यास सांगितले. त्यानंतर या ७२ जणांना मुलाखतीतील व्यक्तींचा खरे-खोटेपणा सिद्ध करण्यास सांगण्यात आले. त्यांनी तत्काळ ४३ टक्के जण खोटे बोलत असल्याचे सांगितले तर ४८ जण खरे बोलत असल्याचे सांगितले. या चाचणीचे निष्कर्ष ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्यक्तीचे सुप्त मन खरी माहिती देत असते, असे चाचणीत आढळले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, घराचे आश्वासन 0

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, घराचे आश्वासन

Cong launches manifesto

» सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन
» १०० दिवसात महागाई कमी करणार
» पाच वर्षात ७५ हजार मेगावॅट वीज निर्मिती करणार
» महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच आश्वासन
» आरोग्य सेवा कायदेशी अधिकाराच्या कक्षेत आणणार
» वीस वर्ष भाडयाच्या घरात राहिल्यानंतर मालकी हक्क देण्याच आश्वासन
» १० हजार लोकांशी चर्चा करुन तयार केला जाहीरनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – सर्वसमावेशक विकासाचे वचन देत काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणूकीसाठी बुधवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वसाने पूर्ण केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मागच्या पाच महिन्यात समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी चर्चा करुन हा जाहीरनामा तयार केल्याचे राहुल यांनी सांगितले. जाहिरनामा तयार करताना पहिल्यांदाच आम्ही लोकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. जाहीरनामा तयार करताना नेत्यांबरोबरच नव्हे तर शक्य असलेल्या प्रत्येक घटकांबरोबर चर्चा केली. व्यावसायिक आणि गरिबांकडे दुर्लक्ष करुन आपण विकास साध्य करु शकत नाही असे राहुल म्हणाले. विरोधकांपेक्षा आम्ही जास्त विकास करुन दाखवला आहे. आज आपण गुजरात मॉडेलबद्द ऐकतो पण ते एकच मॉडेल आहे. समानतेने सर्वांचा विकास करण्याचे मॉडेल काँग्रेसकडे आहे असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये रोजगार निर्मितीबरोबर विकासाची दूरदृष्टी असल्याचे मनमोहन यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत चांगली धोरणे आणि प्रशासन कोण देतो हे महत्वाचे ठरणार आहे. या जाहीरनाम्यात आम्ही आरोग्याबरोबर घराचा अधिकार देण्याचेही आश्नवासन दिले आहे. ज्येष्ठांना निवृत्ती वेतनाचाही अधिकार देणार आहोत. चांगल्या धोरणांबरोबरच नागरिकांचे सवैधानिक अधिकारही महत्वाचा असल्याचे सोनियांनी सांगितले.

March 26, 2014 in देश-विदेश
शरद पवारांनी मागितली माफी 0

शरद पवारांनी मागितली माफी

pawar
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – दोन वेळा मतदान करा, साता-यात मतदान केल्यानंतर पुन्हा मुंबईत मतदान करा आणि दु-यांदा मतदान करताना शाई पुसायला विसरु नका असे धक्कादायक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी निवडणूक आयोगाकडे माफी मागितली आहे. अशा प्रकारचे वक्तव्यकरून संभ्रम आणि गैरसमज निर्माण केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आयोगाने हे प्रकरण बंद करावे अशी विनंती ही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
रविवारी २३ मार्च रोजी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली. पवारांच्या या विधानावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने पवारांना गुरुवारपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.

March 26, 2014 in देश-विदेश
हवेतील प्रदूषणाचे ७० लाख बळी 0

हवेतील प्रदूषणाचे ७० लाख बळी

index.jpeg111

जीनिव्हा (वृत्तसंस्था ) – हवेतील प्रदूषणामुळे २०१२मध्ये जगभर ७० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आरोग्य विभागाने(डब्लूएचओ) दिली आहे. स्वयंपाकाच्या धुरापासून स्वयंपूर्ण धुरापर्यंतच्या विविध प्रकारच्या घटकांमुळे हवेतील वाढत्या प्रदूषणाबाबत या अहवालात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरांमधील आणि बाहेरील अशा दोन्ही प्रकारचे हवा प्रदूषण हा सध्याचा मोठा धोका आहे. मुख्य म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांना तो सारख्याच प्रमाणात सतावत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक व पर्यावरण आरोग्याच्या प्रमुख मारिया नीरा यांनी म्हटले आहे. जगात प्रत्येकी आठपैकी एकाच्या मृत्यूचे कारण हवेतील प्रदूषण आहे. फुप्फुसाचा कॅन्सर, श्वसनाचे विकार, ह्रदयविकार अशा विविध आजारांचा त्यात समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आग्नेय आशियाला या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यात भारत, इंडोनेशिया, चीन, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स आदी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये एकूण ५० लाख ९० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ४० लाख ३० हजार मृत्यू घरगुती प्रदुषणामुळे झाले आहेत. त्यात कोळसा, सरपण आदींपासून निघणाऱ्या धुराच्या त्रासामुळे झालेले मृत्यू आहेत. बाहेरच्या वातावरणातील प्रदूषणामुळे ३० लाख ७० हजार जणांचा जीव गेला. कोळशाचा धूर; तसेच डिझेल इंजिनच्या धुराचा त्रास त्यासाठी कारणीभूत आहे. घरगुती आणि बाहेरच्या प्रदूषणामुळे गेलेले बळीही मोठ्या संख्येने आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आणि काळजी करण्यासारखी असल्याचेही नीरा यांनी म्हटले आहे.आपण ज्या हवेत श्वास घेतो, ती शुद्ध राखण्यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. हवेतील प्रदुषणामुळे होणारे मृत्यू खूप वाढल्याने ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.- मारिया नीरा, प्रमुख, सार्वजनिक व पर्यावरण आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना

 भीमशक्तीच्या जिल्हा संघटकाचा खून 0

भीमशक्तीच्या जिल्हा संघटकाचा खून

images

औरंगाबाद – भीमशक्तीचे जिल्हा संघटक राजू जाधव यांचा चाणक्यपुरी भागात चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. जाधव यांनी भाचीला छेडणाऱ्या एकाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिल‌िंदनगर भागातील रहिवासी राजू यादवराव जाधव (वय ४४) हे सोमवारी रात्री दुचाकीवर विभागीय क्रीडा संकुलाकडून उस्मानपुरा भागाकडे जात होते. यावेळी त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सचिन सुरेश पगारे (वय २८), अनिल प्रल्हाद बदाडे (वय २० सर्व रा. मिल‌िंदनगर) व एका १७ वर्षाच्या तरुणाने अडवले. या तरुणांनी चाकूने राजू जाधव यांच्यावर सपासप वार करणे सुरु केले. गंभीर जखमी अवस्थेत राजू जाधव याना सोडून आरोपीनी पलायन केले. दरम्यान नागरिकांनी हा प्रकार जवाहरनगर पोलिसांना कळवला. पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत राजू जाधव यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या दरम्यान जाधव यांनी हल्ला करणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. उपचार सुरू असताना मध्यरात्री दीड वाजता राजू जाधव यांचा मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस निरीक्षक कदम यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीतून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सचिन पगारे याने काही दिवसापुर्वी राजू जाधव यांच्या भाचीची छेड काढली होती. त्यावरून जाधव यांनी त्याला मारहाण केली होती व पुन्हा छेड काढल्यास ‘गेम’ करतो अशी धमकी दिली होती. या घटनेचा राग तसेच ठार मारल्याची धमकी दिल्याने ‌भिती सचिनच्या मनात निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन जाधव यांची दुचाकी, चाकूची मुठ तसेच दुचाकीची लोखंडी चैन जप्त केली.

March 26, 2014 in महाराष्ट्र
मुजफ्फरनगर दंगलीला राज्य सरकारच जबाबदार: सुप्रीम कोर्ट 0

मुजफ्फरनगर दंगलीला राज्य सरकारच जबाबदार: सुप्रीम कोर्ट

supreme-court

नवी दिल्ली –  उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर दंगलीसाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनच जबाबदार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तसे असले तरी दंगलीप्रकरणी राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे. तसेच सीबीआय तपासाची आणि एसआयटी चौकशी करण्याचीही आवश्यकता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे, असेही स्पष्ट झाले आहे.
दंगलीला सुरुवात झाली त्या काळात राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळेच दंगल आणखी पसरली, असे कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे. दंगलीतील पीडितांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे, असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. जनतेच्या प्रचंड विरोधामुळे आम्ही पहिल्या काही घटनांमध्ये आरोपींना अटक करू शकलो नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र हा तर्क कोर्टाने सरळ अमान्य करत राज्य सरकार ती परिस्थिती हाताळण्यास असक्षम ठरल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मुजफ्फरनगर येथे २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत ५० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकार विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच या दंगलींची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती.

March 26, 2014 in मुख्य पान