पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January, 2015

 अध्यादेशावरुन राष्ट्रपतींची मोदी सरकारला चपराक 0

अध्यादेशावरुन राष्ट्रपतींची मोदी सरकारला चपराक

PRANAB-MUKHERJEE
नवी दिल्ली – सत्तेवर आल्यापासून अवघ्या सात महिन्यात नऊ अध्यादेश काढणा-या मोदी सरकारचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी जोरदार कान टोचले. सारखे सारखे अध्यादेश काढण्याची पद्धत बरी नव्हे. त्यापेक्षा सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन समस्यांवर मार्ग काढावा, अशी सणसणीत चपराक मुखर्जी यांनी मोदी सरकारला लगावली आहे.
केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अध्यादेश संस्कृतीवर टोला हाणला. ते म्हणाले की, आपत्कालिन परिस्थितीत आणि अतिविशेष कारण असल्यावरच अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत आहे.
अध्यादेशाच्या मार्गाने कायदे मंजूर करण्याची पद्धत योग्य नव्हे. या मार्गाने विधेयक मंजूर करण्याचे धोकेही आहेत. लोकसभा किंवा राज्यसभेत सहा महिन्यात या अध्यादेशांना मंजुरी न मिळाल्यास ते रद्द होऊ शकतात, असा इशाराही राष्ट्रपतींनी दिला. नियमीत कायदा करण्याच्या प्रक्रियेला कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांकडे बहुमत असल्यास ते प्रस्तावाला विरोध करणार, सरकारची चिरफाड करणार हे सुसंगतच आहे. मात्र, लोकसभा किंवा राज्यसभेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी सामूहिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. संसद आणि विधानसभेच्या कामकाजात सातत्याने होणा-या गदारोळाबाबत मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.
सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन गदारोळ टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संसदेचे काम सुरळीत चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. तसेच विरोधकांनी त्यांना कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. विविध अडचणीतून मार्ग काढण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबवा, अशी सूचना राष्ट्रपतींनी सर्वच राजकीय पक्षांना केली.
ते म्हणाले की, विधेयक मंजूर करण्यासाठी संयुक्त अधिवेशन ही सुद्धा घटनात्मक तरतूद आहे. मात्र ती वास्तवात उतरणे कठीण आहे. १९५२ पासून आतापर्यंत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केवळ चारवेळाच कायदे मंजूर झाले आहेत, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून अध्यादेश काढण्याचा सपाटा लावला आहे. जवळपास नऊ अध्यादेश सरकारने काढले आहेत. त्यात विमा विधेयक, भूसंपादन विधेयक, कोळसा खाण वाटप विधेयक आदींचा समावेश आहे.

 

 

January 19, 2015 in मुख्य पान
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत 33 जागा 0

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत 33 जागा

images (3)
केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहयोगी प्राध्यापक (संगणक) (4 जागा), सहाय्यक प्राध्यापक (रसायन शास्त्र) (2 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ) (21 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्लास्टिक सर्जरी ) (6 जागा), संचालक (संस्था) या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 10-16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2015 आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

January 19, 2015 in रोजगार
मध्ये रेल्वे नागपूर येथे खेळाडू कोट्यांतर्गत 4 जागा 0

मध्ये रेल्वे नागपूर येथे खेळाडू कोट्यांतर्गत 4 जागा

download (1)
मध्ये रेल्वे नागपूर येथे खेळाडू कोट्यांतर्गत बॅटमिंटन (1 जागा), ऍथलॅटिक (2 जागा), स्विमिंग (1 जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 16 जानेवारी 2015 च्या अंकात तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-23 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

January 19, 2015 in रोजगार
हिंदूंनो, १० मुले जन्माला घाला - शंकराचार्य 0

हिंदूंनो, १० मुले जन्माला घाला – शंकराचार्य

2015-01-19~SHANKARACHARYAVasudevanand_ns
अलाहाबाद : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हिंदूंनी प्रत्येकी १० मुले जन्माला घालावी, असा नवा संदेश बद्रीकाश्रमचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदू समाजाला दिला आहे.
येथील संगमावर ‘माघ मेळ्या’त बोलताना वासुदेवानंद सरस्वती शनिवारी रात्री म्हणाले की, हिंदूंच्या ऐक्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले आहेत. भारतातील हिंदूंची बहुसंख्य समाज म्हणून स्थिती कायम राखण्यासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाने १० अपत्ये जन्माला घालायला हवीत.
एवढेच नव्हेतर, संघ परिवाराशी संबंधित संघटनांनी ‘घर वापसी’च्या नावाने हाती घेतलेल्या धर्मांतर कार्यक्रमाचेही शंकराचार्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, ख्रिश्चन, इस्लाम व शीख या धर्मांची उत्पत्ती हिंदू धर्मातूनच झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मूळ धर्मातच परत यायला हवे. ‘घर वापसी’वर कोणताही प्रतिबंध असता कामा नये व धर्मांतराविरुद्धही कोणतीही कायदेशीर कारवाई करता कामा नये, असेही ते म्हणाले. हिंदूंनी चार मुले जन्माला घालावी, या भाजपा खासदार साक्षी महाराज यांच्या विधानाने उठलेले वादळ शमलेले नसतानाच शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आता हे १० अपत्यांचे खूळ काढले आहे.

January 19, 2015 in देश-विदेश
बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या 0

बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या

download
ठाणे, दि. १९ – दिवा येथील बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाटील यांच्यावर गोळीबार करून तसेच तलवारीचे वार करून त्यांना ठार मारण्यात आले. मूळचे दिव्याचे रहिवासी असलेल्या पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.

January 19, 2015 in मुख्य पान
ओबामांच्या सुरक्षेसाठी ९० हजार सैनिक 0

ओबामांच्या सुरक्षेसाठी ९० हजार सैनिक

images
नवी दिल्ली- १९६२ मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर १५ हजारांची एक अशा सहा तुकड्या भारत-चीन सीमेवर भारताने तैनात केल्या होत्या. आता भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी विविध सुरक्षा संस्थांचे ९० हजार सैनिक तैनात केले जाणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे १६ हजार सैनिक, सीआयएचे एजंट, सिक्रेट सव्‍‌र्हिस एजंट आदी सुरक्षेचा लवाजमा असेल.
या सुरक्षेसाठी खास ३५ श्वान तैनात केले असून, त्यांना २० आठवड्यांचे खास प्रशिक्षण दिले आहे. या श्वानांच्या तोंडाला खास प्रकारचा मास्क लावला आहे. या मास्कमुळे साध्या गोळ्यांचा कोणताही परिणाम त्या श्वानांवर होणार नाही. तसेच व्हीव्हीआयपी गाड्या पार्किंग करताना त्या एकाच दिशेने कराव्या लागतील. या गाड्या पार्क केल्यानंतर त्यांच्या चाव्या अमेरिकन एजन्सी ताब्यात घेतील. ओबामा यांच्यासमवेत सहा विमाने येणार आहेत.
तसेच ओबामा यांच्यासारख्या दिसणा-या दोन व्यक्ती या विमानात असतील. २६ जानेवारी रोजी राजपथावर जिथे मुख्य संचलन होणार आहे, तिथे भारताच्या राष्ट्रपतींसमवेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहेत. व्यासपीठाच्या भोवती ३०० मीटरपर्यंत सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांच्या खेरीज अन्य कोणालाही त्या व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही.
दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमेरिकन सिक्रेट एजन्सी आणि सीआयएच्या अधिका-यांनी आज रविवार असूनही घेतला. दिल्ली मेट्रोच्या सर्व स्टेशनांभोवती खडा पाहरा सोमवारपासून तैनात करण्यात येणार आहे. राजपथाकडे येणारे सर्व मार्ग उद्यापासून सील केले जाणार आहेत. त्या मार्गावरून जाणा-या वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. दिल्ली विमानतळाच्या भोवती कडक सुरक्षाव्यवस्था रविवारपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लोकांना जाकीट घातल्याशिवाय रस्त्यावरून फिरणे शक्य होत नाही. अशा जाकिटांची तपासणीही करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी खास रडार आहे. जमिनीपासून हवाई मार्गावर कडेकोट सुरक्षा ठेवल्याने राजधानीला लष्करी छावणीचे रूप आले आहे. या सुरक्षा व्यवस्थेसाठी मल्टी एजन्सी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यातून राजधानीतील प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यात येईल. अमेरिकेच्या सिक्रेट सव्‍‌र्हिसचे एजंट भारतात पोहचले असून, त्यांनी दिल्ली व आग्रा येथे तपासणी सुरू केली आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येताना ओबामा हे स्वत:च्या बुलेटप्रूफ लिमोझिनमधूनच येण्याची शक्यता आहे. ओबामा बसल्यानंतर व्हीव्हीआयपी कक्षाला भारताच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि सिक्रेट सव्‍‌र्हिसेस एजंटचे कडे असेल. त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी पथक तयार केले आहे. हे पथक राजधानीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये जाऊन अचानक तपासणी करणार आहे.

 

January 19, 2015 in मुख्य पान
 प्रेमसंबंधातून घरे पेटवली, चार ठार 0

प्रेमसंबंधातून घरे पेटवली, चार ठार

khed-fire
मुझफ्फरपूर- बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये प्रेमसंबंधातून एका विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर हे प्रकरण चिघळले असून गावातील ४० घरांना रविवारी रात्री आग लावण्यात आली. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
पाटणापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सरैय्या भागातील अजीजपुर गावात रविवारी ही संतापजनक घटना घडली. संतप्त जमावाने घरे, ट्रॅक्टर, दुचाकी आणि अन्य वाहनेही पेटवून दिली. यात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. बहिलवारा या गावातील भारतेंदु या एलएस महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात नऊ जानेवारी रोजी भारतेंदु याचे अपहरण करण्यात आले होते. रविवारी दुपारी अजीजपुर गावापासून जवळच असलेल्या शेतात एका पोत्यामध्ये भारतेंदु याचा मृतदेह आढळला. त्यामुळे बदल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर गावातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सीतामढी, मुजफ्फरपूर, छपरा आणि वैशाली जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. तसेच लष्कराचे ३०० जवानांची कुमकही येथे तैनात करण्यात आली आहे.

January 19, 2015 in देश-विदेश
पैसे घ्या, पण मत आपलाच द्या – केजरीवाल 0

पैसे घ्या, पण मत आपलाच द्या – केजरीवाल

Arvind Kejriwal pitted against Jagdish Mukhi
नवी दिल्ली – भाजपाने तुम्हाला मत देण्यासाठी पैसे देऊ केले तर ते पैसे घ्या, पण मत मात्र आपच्या उमेदवारालाच द्या असे विधान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दिल्लीमधील राजकीय वातावरण तापत चालले असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे.
निवडणुकीच्या काळात भाजपवाले तुमच्याजवळ येतील तुम्हाला पैसे देऊ करतील. नाही म्हणून नका ते पैसे घ्या पण मत मात्र आपच्याच उमेदवाराला द्या असे विधान केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल एवढयावरच थांबले नाहीत तर, काही पक्ष तुमच्याजवळ आले नाहीत तर, तुम्ही त्यांचे कार्यालय गाठा आणि त्यांच्याकडून पैसे घ्या असे वक्तव्य त्यांनी केले. केजरीवालांच्या या विधानाचा भाजपानेही चांगलाच समाचार घेतला. भ्रष्टाचार विरोधी लढयाचे कार्यकर्ते आता स्वत:चा भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत. अरविंद केजरीवालांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय 0

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

rohit-sharma
मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून आणि एक षटक राखून भारताचे २६८ धावांचे लक्ष्य पार केले. ऑस्ट्रेलियाचा तिरंगी मालिकेतील हा सलग दुसरा विजय असून, भारताची मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली आहे.
शेवटच्या तीन षटकांमध्ये दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. ब्रॅड हॅडीन आणि जेम्स फॉकनर या जोडीने ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंचने सर्वाधिक (९६) धावा केल्या.
भारताने ठेवलेल्या २६८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक पूर्ण झाले त्यावेळी डेविड वॉर्नरच्या रुपाने भारताला पहिले यश मिळाले.
त्यानंतर आलेल्या वॉटसन ४१ धावा करुन बाद झाला. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. फिंचने स्मिथच्या साथीने तिस-या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी साकारली. स्मिथला अर्धशतक पूर्ण करण्यास तीन धावा हव्य असताना अश्विनने त्याला बाद केले. त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल करणा-या फिंचला उमेश यादवने ९६ धावांत रोखले.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला होता. भारताने सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतक आणि सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर आठ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकात २६७ धावा केल्या.
भारताने फलंदाजीस सुरुवात केल्यानंतर पहिल्याच षटकात भारताला शिखर धवनच्या रुपात धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वारंवार संधी मिळूनही चांगली खेळी कऱण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन याही सामन्यात साफ अपयशी ठरला. सलामीला मैदानात उतरलेला शिखर धवन केवळ दोन धावा करुन तंबूत परतला. स्टार्कच्या गोलंदाजीवर तो फिंचकडे झेल देत बाद झाला. तर अजिंक्य रहाणेही १२ धावा करुन बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत तडाखेबाज शतकी खेळी साकारणारा आक्रमक विराट कोहलीनेही निराशा केली. त्याने नऊ धावा केल्या. त्याला आस्ट्रेलियाच्या फॉकनरने बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाच्या साथीने रोहितने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची महत्वाची भागीदारी साकारली.
सुरेश रैनाने ५१ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर रोहितने मेलबर्नच्या मैदानावर दमदार शतक साजरे केले. १३९ चेंडूत त्याने १३८ धावा केल्या. परदेशी भूमीवरील तिसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे चौथे शतक आहे. रैनानंतर आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी १९ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने रोहितसह ५१ धावांची भागीदारी केली. अश्विन पटेल आणि भुवनेश्रर कुमार भोपळा न फोडताही माघारी परतले आणि भारताचा डाव २६७ धावांवर संपुष्टात आला.

 

January 18, 2015 in क्रीडा
आठवड्यांत सात राज्यपालांची नियुक्ती – गृहमंत्री 0

आठवड्यांत सात राज्यपालांची नियुक्ती – गृहमंत्री

Rajnath Singh at press conference
नवी दिल्ली – येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बिहार, पंजाब आणि आसाम या राज्यांसह सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
सध्या बिहार, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या राज्यपालांची पदे रिक्त आहेत. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील येत्या २१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल उर्मिला सिंग यांचा २४ जानेवारीला पाच वर्षांचा कार्यकाल संपत आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे सध्या बिहार आणि मेघालय या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर नागालँडचे राज्यपाल पी.बी. आचार्य नागालँडसह आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल के.रोसैह आणि ओडिशाचे राज्यपाल एस.सी. जामीर पुढील काही महिन्यांत निवृत्त होत आहेत. या दोनही राज्यपालांची निवृत्ती संपुआ सरकारच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर संपुआ सरकारच्या काळात नियुक्त कऱण्यात आलेल्या अनेक राज्यापालांनी राजीनामे दिले होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर शीला दिक्षित(केरळ), एम.के नारायणन(प.बंगाल), अश्वनी कुमार(नागालँड), बी.एल.जोशी(उत्तर प्रदेश), बी.व्ही.वांछू(गोवा), शेखर दत्त(छत्तीसगड) आणि व्ही.के.दुग्गल(मणिपूर) यांनी राजीनामे दिले होते. मिझोरमचे राज्यपाल व्ही. पुरुषोत्तम यांची नागालँडला बदली केल्यानंतर राजीनामा दिला होता तर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मिझोरमला बदली केल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.

January 18, 2015 in मुख्य पान
पालकमंत्री राठोडांनी केली बसस्थानकाची सफाई 0

पालकमंत्री राठोडांनी केली बसस्थानकाची सफाई

ST station-3
यवतमाळ, दि. १८ – यवतमाळ बसस्थानकावर अचानक सकाळी उपस्थित होऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. जनजागृती समितीच्यावतीने दर रविवारी बसस्थानकावर सफाई मोहीम राबविण्यात येते. त्या मोहिमेत पालकमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन सहभाग घेतला.
यावेळी आ.मदन येरावार, जनजागृती समितीचे अजय मुंधडा, मनोज औदार्य, विनोद आरेवार, निलास झेंडेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सफाई मोहिमेत भाग घेतला. परिसरातील कचरा गोळा करून मोहिमेचे त्यांनी कौतून केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्र्यांनी प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. अस्वच्छतेमुळे अनेक आजार पसरतात. शासनाने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहे. प्रत्येकाने त्यात सहभागी होण्यासोबतच या सामाजिक कार्यात हातभार लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथसुध्दा दिली. आमदार मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

January 18, 2015 in विदर्भ
पोलिओ लसिकरणाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ 0

पोलिओ लसिकरणाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ

222
यवतमाळ, दि. १८ – पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीत मातोश्री प्रतिक्षालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी काही बालकांना लस पाजून मोहिमेची सुरूवात केली.
यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमानंद निखाडे, डा.पांडे, डॉ.मनोज सक्तेपार, डॉ.विजय कावलकर, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.देशमुख आदी उपस्थित होते. यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे तसेच उपाध्यक्ष व सभापतींच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर मोहिम जिल्हाभर राबवित असतांना एकही बालक सुटणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. पहिल्या टप्यात जिल्ह्यात एकूण २ लाख ६६ हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात २३४३, शहरी भागात २७५ असे २६१७ बुथ सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात ५१९ ट्रांझीट टिम तसेच ११४ मोबाईल पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी ठिकठिकाणी बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसिकरण केले. लसिकरणापासून सुटलेल्या बालकांना पुढे काही दिवस लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

January 18, 2015 in विदर्भ
मोबाईल दुकानाला आग, दोन लाखाचे साहित्य खाक 0

मोबाईल दुकानाला आग, दोन लाखाचे साहित्य खाक

IMG-20150118-WA0027
नेर , दि. १८ – तालुक्यातीन धनज माणिकवाडा येथील मोबाईल दुकानाला आग लागून मोबाईलसह अन्य साहित्य खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री १२.३० वाजता घडली. अफजल पठाण यांचे धनज येथेच केजीएन मोबाईल व दुरुस्तीचे दुकान आहे. द्वेषभावनेतून काल रात्री दुकानचा टीन वाकऊन टायरला आग लावुन दुकानात फेकुन दिला. त्यामुळे दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आगिने रौद्ररुप धारण केले. या दुकानातून धुर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यामध्ये मोबाईल, रिचार्ज व्हाऊचर यासह विविध साहित्य जळून खाक झाले असून दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

January 18, 2015 in विदर्भ
निम्नपैनगंगा प्रकल्पग्रस्ताची फसवणूक, बाजार समिती उपसभापतीसह माजी सरपंचावर गुन्हे दाखल 0

निम्नपैनगंगा प्रकल्पग्रस्ताची फसवणूक, बाजार समिती उपसभापतीसह माजी सरपंचावर गुन्हे दाखल

dharan 10
माहुर (नांदेड), दि. १८ – विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील बहुचर्चीत निम्न पैनगंगा प्रकल्पात शेतजमिन गेलेल्या शेतकºयाची ७ लाखाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व सरपंचाविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने मांडवी पोलिसांना दिले आहे. त्यावरून पोलिसांनी खंबाळ््याचे माजी सरपंच तथा किनवट बाजार समितीचे उपसभापती बळीराम दुलसिंग राठोड (४०), माजी सरपंच गणपत अमरसिंग आडे (५५) याच्याविरूद्घ गुन्हे दाखल केले.
निम्न पैनगंगा प्रकल्पाची मुख्य भिंत ही खंबाळा गावात असून तीन वर्षापासून काम सुरू झाले आहे. येथील शेतकरी बाब्या जाब्या राठोड यांची ४ एकर ०.७ आर शेती या प्रकल्पाच्या भिंतीमध्ये गेली आहे. त्या मोबदल्यात शेतकºयाला ७ लाख ८ हजार ३४३ रुपये १९ मार्च २००९ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा मांडवी येथील खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती बळीराम राठोड, माजी सरपंच गणपत आडे या दोघांनी संगणमत करून शेतकºयांस भूलथापा देऊन तुमच्या नावे एवढी रक्कम जमा राहील्यास सरकारला कर द्यावा लागणार म्हणून तुम्ही एवढी रक्कम जमा ठेऊ नका असे सांगितले. त्यानंतर बॅकेतून स्वत:च्या खात्यात सात लाख रुपये वर्ग करून घेतले. सात लाख रुपयाचे पाच वर्षात दुप्पट पैसे देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र सहा वर्ष होऊनही डिपॉझीटची पावती व पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयाने मांडवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र पोलीसांनी धुडकावून लावले होते. शेवटी शेतकºयाने किनवट येथील प्रथमश्रेणी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात मांडवी येथील स्टेट बँकेचे सुनील नुरसिंग राठोड, अशोक भाटु राठोड यांनी साक्ष ग्राह्य धरण्यात आली. न्यायालयाने बळीराम राठोड व गणपत आडे याच्याविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मांडवी पोलिसांना दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

January 18, 2015 in महाराष्ट्र
ट्रक अपघातात महिला ठार 0

ट्रक अपघातात महिला ठार

index
यवतमाळ, दि. १८ – भरधाव ट्रक घरात शिरल्याने झालेल्या अपघातात महिला घटनास्थळीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजता दरम्यान शहरालगत असलेल्या किन्ही येथे घडली. संगीता दामोधर गायधने रा. किन्ही असे मृत महिलेचे नाव आहे.
ट्रक क्रमांक एम.एच. ४४ / ८३०५ हा आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. किन्हीगावात येताच ट्रकचालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात शिरला. त्यावेळी संगीता गायधने ही महिला अंगणात सडा टाकत होती. ट्रकच्या जबर धडकेत महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रक हा शालेय पोषण आहारासाठी लागणारे खाद्यतेल यवतमाळकडे घेवून जात होता. ट्रक घरात शिरल्याने गायधने यांच्याघराची पडझड तर झालीच. शिवाय दुकाकी क्रमांक एमएच २९/ ७४३७ व बैलगाडीचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घरात शिरलेला ट्रक के्रनच्या सहाय्याने बाहेर काढावा लागला. याप्रकरणी संजय देवराव गायधने (४०) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चालक मोतीराम संभाजी चाटे रा. परळी जि.बीड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. या घटनेमुळे किन्हीत हळहळ व्यक्त होत आहे.

January 18, 2015 in विदर्भ
घाटंजीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, ओळनीने एकमेकांना बांधून जीवन संपविले 0

घाटंजीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, ओळनीने एकमेकांना बांधून जीवन संपविले

IMG-20150118-WA0032_resized 20150118_11485620150118_130948
यवतमाळ, दि. १८ (विशेष प्रतिनिधी) – कुटुंबीयानी लग्नाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी घाटंजी तालुक्यातील घाटी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुवर्णा भास्कर नारनवरे (२१) रा. बेलोरा , श्रीकांत अवधुत डगमल (२५) रा. घाटी घाटंजी असे मृतक प्रेमीयुगुलाचे नाव आहे. सुवर्णा ही घाटंजी येथील गिलाणी महाविद्यालयात बि.ए.भाग एक ची विद्यार्थीनी होती. तर श्रीकांत हा सेन्ट्रींगचे काम करीत असून युवती त्याची मामेबहीण होती. नातेवाईक असल्याने दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. अशातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी साथ जीयेंगे साथ मरेंगेची शपथ घेतली होती. अशातच त्यांनी आपल्या कुटुंबीयाना लग्न करुण देण्याची मागणी केली होती. यावेळी नातेवाईकांनी लग्नास विरोध केला होता. दरम्यान नारनवरे कुटुंबीयांनी सुवर्णासाठी विवाहयोग्य वर शोधणेही सुरू केले होते. त्यामुळे त्या दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविण्याच निर्णय घेतला . काल रात्री त्यांनी ओळणीने एकमेकांना बांधून गुरांचा बाजार भरत असलेल्या परिसरातील विहीरीत उडी टाकुन आत्महत्या केली. दरम्यान आज सकाळी ते दोघेंही घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर विहीरीत मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळतााच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून बेलोरा व घाटी घाटंजी परिसरात खळबळ उडाली आहे.

  आमचे मित्र तथा दै. पुण्य नगरीचे नेर येथील  तालुका  प्रतिनिधी अशोक इसाळकर यांच्या मुलाचा (चि. अनुराग) १८ जानेवारी रोजी वाढदिवस! चि. अनुराग याला लाख - लाख शुभेच्छा ! 0

आमचे मित्र तथा दै. पुण्य नगरीचे नेर येथील तालुका प्रतिनिधी अशोक इसाळकर यांच्या मुलाचा (चि. अनुराग) १८ जानेवारी रोजी वाढदिवस! चि. अनुराग याला लाख – लाख शुभेच्छा !

SP_1801_MN_05_YAT

गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला हाकललं 0

गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला हाकललं

mcd
पुणे – पुण्यात चिड आणणारी एक घटना घडलीय. मॅक्डोनाल्डमधल्या एका आऊटलेटमध्ये गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला धक्के मारून बाहेर काढणयात आलं. हा मुलगा मॅक्डोनाल्डमध्ये सॉफ्टड्रींक घेण्यासाठी गेला होता. हा सगळा प्रकार एका महिलेने आपल्या फेसबूकवर टाकलेल्या पोस्टवरून समोर आलाय. ही महिला त्या मुलाला मॅक्डोनाल्डमध्ये घेऊन गेली होती.
संबंधित महिला आपल्या मित्रांसह मॅक्डोनाल्डमध्ये सॉफ्टड्रींक घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी मॅक्डोनाल्डच्या बाहेर असलेल्या एका गरीब मुलाने त्यांच्याकडे तशाच सॉफ्टड्रींकची मागणी केली. सॉफ्टड्रींक देण्यासाठी ती महिला त्याला मॅक्डीमध्ये घेऊन गेली. त्यावेळी मॅक्डीच्या स्टाफने त्या गरीब मुलाला पाहून धक्के मारून बाहेर काढलं. आणि स्टाफने संबंधित महिलेलाही वाईट वागणूक दिली.
मुलाला हव्या असलेल्या सॉफ्ट ड्रींकचे पैसे मी देतेय. तरी तुम्ही त्याला का बाहेर काढताय, असं त्या महिलेने मॅक्डीच्या स्टाफला बजावलं. पण त्या महिलेचं मॅक्डीच्या स्टाफने ऐकलं नाही. उलट त्या महिलेशी असभ्य वर्तवणूक केली. ‘अशा लोकांना आतमध्ये येण्याची परवानगी नाहीए’, असं ते म्हणाले. यासगळ्या प्रकारानंतर संबंधित महिलेने बाहेर येऊन त्या मुलाला सॉफ्टड्रींक दिलं. पण सगळा संतापजनक प्रकार तिने फेसबूकवर पोस्ट केला.
पुण्यात जेएम रोडवर असलेल्या मॅक्डोलनाल्डच्या आऊटलेटमध्ये हा प्रकार घडला. पण त्यावेळी या प्रकारावर स्पष्टीकरण देण्यास मॅक्डीतील स्टाफने नकार दिला. मात्र, हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मॅक्डोनाल्ड इंडियाला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘या घटनेत तथ्य असेल तर संबंधित स्टाफवर योग्य ती कारवाई केली जाईल’, असं कंपनीने सांगितलं.

January 17, 2015 in महाराष्ट्र
बँक ऑफ बडोद्यावर दरोडा , ९६ लाखांची लूट 0

बँक ऑफ बडोद्यावर दरोडा , ९६ लाखांची लूट

95b6f2114a7c2479b14e7a61ffcb-grande
धुळे – धुळ्यात धाडसी चोऱ्यांचे सत्रच सुरू असून, गुरुवारी मध्यरात्री सात दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बँक ऑफ बडोदा शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. बँकेतून तब्बल ९६ लाख सहा हजार १०८ रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. एका आलिशान कारमधून तीन चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
शहरातील बाजारपेठ भागातील गल्ली क्रमांक पाचमध्ये बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेत शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ही चोरी झाली आहे. बँकेत एका कारमधून तीन जण आले. तिघांच्याही तोंडावर कपडा बांधलेला होता. त्यांनी बनावट चाव्यांनी बँकेचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील स्ट्राँग रूमलाही बनावट चावीने उघडले. तिजोरीतून ९६ लाख सहा हजार १०८ रुपयांची रक्कम एका बॅगमध्ये भरली. मात्र, चोरट्यांनी तिजोरीत असलेले सोने तारण योजनेतील जमा करण्यात आलेले सोने आणि इतर लॉकरमधील मुद्देमालाला हात लावला नाही. त्यानंतर बॅगमध्ये भरलेली रक्कम घेऊन आल्या दिशेने पसार झाले. चोरटे बँकेत सुमारे १५ ते २० मिनिटे होते. हा सर्व प्रकार बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बँकेचा शिपाई साफसफाई करण्यासाठी बँकेत आला असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच बँकेचे मॅनेजर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रावण सोनवणे, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके, गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट होत आहे.

January 17, 2015 in रोजगार
तांदूळ व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला 0

तांदूळ व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

download (4)
नागपूर – शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. चोरी व लुटीच्या दोन घटनांची नोंद एकाच दिवशी झाली, तर यशोधरानगर हद्दीत तांदूळ व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करीत तोडफोडही करण्यात आली. या वाढत्या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेट्रोल पंप संचालक अलीस शब्बर इस्माइल भाई (७०, रा. गोंडवाना चौक) यांच्याकारमधून चोरट्यांनी अडीच लाखांची रोख व धनादेश लंपास केला. ही घटना कॉटन मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. अलीस व त्यांचा चालक कारने जात होते. कॉटन मार्केट परिसरात त्यांची कार पंक्चर झाली. ते व चालक स्टेफनी बदलवित होते. यादरम्यान चोरट्याने कारमधील रोख रक्कम असलेली सुटकेस चोरली. गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास चालू केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत चाकूचा धाक दाखवून मोटरसायकलवर आलेल्या चौघांनी सतीश चैत्यानंद डोंगरे (२४, रा. मित्रविहारनगर) याच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी व रोख हिसकावली. ही घटना १४ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास हसनबाग ते खरबी मार्गावर घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
अन्य एक घटना यशोधरानगर हद्दीत घडली. प्रकाश ट्रेडिंगमधून तांदूळ न खरेदी केल्याने सात जणांनी तांदूळ व्यापारी संजित श्योमल सोम (४२) यांच्यावर सशस्‍त्र हल्ला केला. मदतीसाठी गेलेले त्यांचे मित्र कालिदास डे यांनाही मारहाण करून घरासमोरील कार व पानठेल्याची तोडफोड केली. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडलेलया या घटनेमुळे विनोबा भावेनगर येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्रकाश ट्रेडिंग कंपनीचा संचालक प्रकाश, जितू, शिवशक्ती बारमध्ये काम करणार रफिक अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

January 17, 2015 in विदर्भ